Wednesday 30 December 2015

आरोग्यम् सुखसंपदा - चांगले बॅक्टेरिया - आरोग्याची खरी गुरुकिल्ली !!!

सर्वसामान्यत:  anti-biotics हा शब्द ऐकला नाही असा माणूस शोधून देखिल सापडणे दुर्मिळच म्हणावे लागेल इतका आजकाल हा anti-biotics शब्द हा आजाराशी अगदी जवळचे नाते बनवून बसलाय. सर्वसामान्यपणे सर्दी/पडसे किंवा, खोकला , ताप , जुलाब झाले आणि डॉक्टरांकडे गेले तर आपल्याला डॉक्टर सांगताना आढळतात की तुम्हाला बॅक्टेरियल इनफेक्शन ( bacterial infection/ viral infection) झाले आहे आणि anti-biotics  घ्यावी लागतील. तर कधी कधी उलटेच चित्र दिसते की डॉक्टर सांगतात दोन तीन दिवस औषधे घ्या बरे वाटेल, पण आम्हालाच घाई झालेली असते लवकर बरे वाटावे म्हणून आणि मग आम्हीच डॉक्टरांना सांगतो, " नाही डॉक्टर, ताबडतोब बरं वाटलं पाहिजे, तुम्ही आताच anti-biotics सुरु कराच !

बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. पण जीवाणू म्हणण्यापेक्षा बॅक्टेरिया हा शब्द जास्त परिचयाचा असल्याने पुढील भागात आपण जीवाणूऐवजी बॅक्टेरिया शब्दच वापरू या.  

बॅक्टेरिया हे अपायकारक , घातक असतात , पण सर्वच बॅक्टेरिया हे वाईट किंवा अपायकारक असतातच असे नाही, काही बॅक्टेरिया चांगले पण असतात हे मला डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांच्या " आपले आरोग्य " ह्या दिनांक १३ डिसेंबर २०१४ च्या व्याख्यानाला जाऊन कळले.  
     

डॉक्टर अनिरूध्द जोशी सांगत होते की आपली आतडी अत्यंत चांगली असणं , हीच आपल्या आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे. 
The Healthy Gut is hidden key to perfect health. 

Saturday 12 December 2015

आपले आरोग्य - आरोग्यम् सुखसंपदा

आजपासून बरोबर एक वर्ष आधी म्हणजेच १३ डिसेंबर २०१४ च्या संध्याकाळी अंधेरी स्पोटर्स कॉम्प्लेक्सचा परिसर अगणित माणसांनी खचाखच भरून गेला होता ? कसली होती ही अमाप गर्दी? कसली जत्रा होती का मेळावा होता का खाद्य जत्रा होती ? का बरे एवढी लाखोंची  गर्दी लोटली होती? कारणच तसे घडले होते त्या वेळी आयोजित केले गेले होते डॉक्टर अनिरुध्द धैर्यधर जोशी ,एम. डी. (Rheumatology) ह्यांचे " SELF -HEALTH " म्हणजेच "आपले आरोग्य" ह्या विषयावर व्याख्यान !

तसे पाहता आपण आपल्या कारची , गाडीची , बाईकची , राहत्या घराची किवा कोणत्याही महागड्या वस्तुची किती काळजी घेतो ना परंतु परमेश्वराने दिलेल्या आपल्या लाखमोलाच्या मानवी शरीराच्या आरोग्याची किती काळजी घेतो ? खर्‍या अर्थाने काळजी तरी आपण करतो  का ?

एकदा वाचनात आले होते की "शरीरम् आद्य्ं खलु धर्मसाधनम् " म्हणजे आपले जीवनकार्य पूर्णत्त्वाला नेण्यासाठी आपले शरीर एक  महत्त्वाचे धर्मसाधन आहे. संतमंडळी सांगतात आरोग्यपूर्ण शरीरात सुदृढ मन वास करते, राहते , ज्यात सुमति नांदते. पण सर्वसामान्यपणे माणूस आपल्या स्वत:च्या आरोग्याकडे खूपच दुलर्क्ष करत असतो. हेच बघा ना साधी सर्दीच झाली आहे ना, नुसता खोकला येतो य ना , थोडासा बारीक तापच आहे ना , होईल बरा १-२ दिवसात असे मानून आपणच आपल्या शरीराच्या तक्रारींकडे कानाडोळा करत असतो आणि जेव्हा त्रास खूपच बळावतो आणि सहनशक्तीच्या पलीकडे जातो तेव्हाच डॉक्टरचा दरवाजा ठोठावतो. म्हणजेच आपल्याला आरोग्य बिघडले ह्याची तशी फारशी दखल घ्यावी वाटत नाही. त्यात आरोग्यावरचेच व्याख्यान म्हटले तर काय बाबा डॉक्टर हेच सांगणार हे खाऊ नका, ते खाऊ नका आणि इतकी पथ्ये पाळा, हे व्यायाम करा असे सल्ले देणार ? मग कशाला जायचे? पण त्या दिवशी मात्र गजबच घडले होते म्हणा ना? डॉक्टरांच्या ओघवत्या, मंत्रमुग्ध करणार्‍या आणि सर्वसामान्यांनाही समजेल अशा तितक्याच सोप्या भाषेतून समजावून सांगण्याच्या कौशल्यपूर्ण हातोटीने सारा समुदाय जागच्या जागी खिळून बसला होता. एरव्ही घड्याळाच्या काटेवर धावणार्‍या मुंबापुरीच्या माणसांचे वेळेचे भानच हरपले होते जणू ! अर्थातच व्याख्यान संपूच नये असेच प्रत्येकाला वाटत होते.

सांजवेळेला दिवेलागणीच्या वेळी गावांगावांतून आणि घरांघरांतून आजी-आजोबा आपल्या नातवंडासवे "शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् सुखसंपदा" अशी प्रार्थना करून भगवंताची करूणा भाकताना आढळायचे. पण नीट विचार केला तर खरेच आपण आरोग्याला आपली खरी धनसंपदा मानतो का? इंग्रजी भाषेतही " Health is divine wealth" असे म्हणतात आनि आरोग्याचा आदर केला जातो. तरी देखिल आपण सारेच "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" ह्या म्हणीनुसार न वागता, आपल्या परिवारातील, मित्र -परिवारातील एखाद्या व्यक्तीला काही आरोग्याबाबत त्रास झाला असेल तरी आपण त्या व्यक्तीचे कसे चुकले , काय चुकले आणि किती चुकले हे शोधून काढण्यातच जास्त धन्यता मानतो , पण त्यातून शहाणपणा शिकतो का आपण ? तर उत्तर बहुधा नाही असेच मिळेल. अशा सर्व प्रकारच्या दुर्लक्षित बाबींचा उहापोह डॉक्टर अनिरुध्द जोशी ह्यांनी आपल्या व्याख्यातून केला होता त्यातील काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न तर करू या-

Thursday 10 December 2015

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई ....

कबीराचे विणतो शेले 
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम । 
भाबडया या भक्तासाठी देव करी काम । । 

एक एकतारी हातीं, भक्त गाई गीत । 
एकएक धागा जोडी जानकीचा नाथ । 
राजा घनश्याम !

दास रामनामी रंगे, राम होई दास । 
एकएक धागा गुंते रूप ये पटास । । 
राजा घनश्याम !

विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम । 
ठायिंठायिं शेल्यावरती दिसे रामनाम । । 
राजा घनश्याम !

हळूहळू उघडी डोळे पाहि जो कबीर ।  
विणूनिया शेला गेला सखा रघुवीर । । 
कुठे म्हणे राम ?

Sunday 6 December 2015

फलाशाविरहित कर्म- निष्काम कर्मयोग !!!

माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा
भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा

दैवजात दुःखांनी मनुजा पराधीन केले
त्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले
भूषण रामा एक पत्‍नीव्रत मला नको तसले
मोह न मजला कीर्तिचा मी नाथ अनाथांचा

रुक्मिणी माझी सौंदर्याची प्रकटे जणु प्रतिमा
किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा
तरीही वरितो सहस्‍त्र सोळा कन्या मी अमला
पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा

कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो
हलाहलाते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो
जगता देण्या संजीवन मी कलंक आदरीतो
वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा


Tuesday 24 November 2015

त्रिपुरारी पौर्णिमा

दीपावली असो वा कार्तिक पौर्णिमा असो दीप उजळवून अंधकाराचा नाश करण्याची शिकवण देणारे हे भारतवर्षातले सण वा उत्सव आपल्याला आपल्या आदर्श, महान भारतीय परंपरेची ओळखच करून देतात जणू काही ! दिवे लावून परमेश्वरी कृपेच्या सत्याचा उजेड आपल्या मनात पडावा यासाठी असे दीपोत्सव आवश्‍यक असतात आणि त्यांपासून प्रेरणा घ्यायची असते ती निराशाजनक वातावरणातही न डगमगता खंबीरपणे, मनोधैर्य उंचावून , "त्या" एकावर , "त्या"च्या अगाध सामर्थ्यावर अढळ , अविचल श्रध्दा ठेवून जीवनात, "त्या" भगवंताच्या तेजाचा वारसा जागवायचीच असे मला वाटते. 

आपल्या भारतवर्षातील बहुतेक सण, उत्सवांमागील कथा या दुष्ट-निर्दालनाच्या असतात. यावरून असे लक्षात येईल की आपण पराक्रमाचे पूजक आहोत. पण पूजा करून पराक्रम विसरून गेलो तर काय उपयोग? सांप्रतकाली आपली तशीच अवस्था झाली आहे असेच चित्र दिसू लागले आहे व ते पाहून संभ्रम पडतो की क्षात्रतेज आटू लागले आहे की काय? रणधुरंधर योध्दा बनून संकटाशी झुंज देण्याचे , लढवय्या वृत्तीचा परिपोष करून प्रारब्धावर मात करण्याची आम्हा भारतीयांची झुंजार वृत्ती , रणमर्दानी शक्ती कुठे लोप पावत चालली आहे का? सैन्यात जाऊन पराक्रम गाजवण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा आम्ही सुखासीनता आणि चंगळवादी भोग संस्कृतीचे पुजारी बनून अध:पतनाकडे तर नाही झुकत आहोत ना? छत्रपती शिवराय, राणा प्रताप, गुरू गोविंदसिंह, शंभू राजे, पहिला बाजीराव , सावरकर, भगतसिंग अशा क्रांतिकारक वीरांची चरित्रेच आजच्या पिढीला माहिती करून घ्यायलाच हवीत आणि त्यांच्यातील असीम पराक्रम अंगी बाळगायला हवा , त्यांची संकटांवर विजय मिळविण्याची इच्छा, तेज, साहस आणि क्षात्रवृत्ती परत नव्याने चेतवायला हवीच ....अन्यथा मरगळ आलेल्या समाजाची दैन्यावस्था पाहून -

कुसुमाग्रजांसारख्या कवीला खंत व्यक्त करण्याची दुर्दैवी पाळी ओढावते  -
सूर्यकुलाचा दिव्य वारसा, प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे। 
काळोखाचे करूनी पूजन, घुबडाचे व्रत वरू नका।।.......... 

भानु म्हणजे सूर्य त्यावरून "भारत " ह्या शब्दाचा मला भावलेला अर्थ म्हणजे - 
"भा' म्हणजे तेज आणि "रत' म्हणजे नित्य पूजन करणे. तेजाचे पूजन करणारा तो भारतीय. नुसताच भारतात राहणारा तो भारतीय असे नव्हे! म्हणूनच आपली भारतीय हिंदवी तेजोमयी संस्कृती असा दिव्य संदेश देते आपल्या सणांतून , उत्सवांतूनही !
त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा . कार्तिक महिन्यातील शुध्द पक्षातील ही पौर्णिमा "त्रिपुरारी पौर्णिमा"म्हणून साजरी केली जाते.
त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे मानवी जीवनात प्रकाश, उजेड, आनंद देणारा उत्सव. आपल्या मनातील क्रोध, द्वेष, मत्सर नाहीसा करून भगवान शिव-शंकराची पूजा करावी, आराधना करावी व सुख-शांती याची मागणी करावी. असा संदेश या उत्सवातून मिळतो.

आता त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यामागची जनमानसांतील कथा बघू या....
कार्तिक शुध्द पौर्णिमा म्हणजेच त्रिपु्रारी पौर्णिमेशी निगडीत कथेशी रांजणगाव व महागणपतीच्या आणि महडच्या वरदविनायकाचा संबंध आहे असे अष्टविनायक महात्म्य वर्णिते.

रांजणगाव - महागणपती - त्रिपुरारी पौर्णिमा 

Wednesday 18 November 2015

HAPPY BIRTHDAY OUR BESTEST DAD !!! We Love YOU DAD !!!

हरि ॐ.
माझ्या जीवनाचा एकमेव सच्चा सांगाती - माझे सदगुरु, माझे लाडके बापू म्हणजेच डॉक्टर अनिरुध्दसिंह जोशी !


तुम ही हो माता पिता तुम्ही हो
तुम ही बंधू , सखा तुम्ही हो

तुम्ही हो साथी तुम ही सहारे
कोई न अपना सिवाए तुम्हारे

तुम्ही हो नैया तुम्ही खिवैया
तुम ही हो बंधू सखा तुम्ही हो ...

जो खिल सके न वो फूल हम हैं
तुम्हारे चरणों की धुल हम हैं

दया की दृष्टि सदा ही रखना
तुम ही हो बंधू सखा तुम ही हो...



Sunday 15 November 2015

सेतू

सेतू शब्द उच्चारताच डोळ्यापुढे पटकन चित्र उभे राहते ते रामायणातील साक्षात श्रीराम प्रभूंच्या आज्ञेने व प्रत्यक्ष श्रीहनुमंतानी पाषाणावर स्वत:च्या हाताने रामनाम लिहून वानरसैनिकांकडून लंकेला जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधून घेतला होता त्या सेतूचे ! वानरसैनिकांनी प्रभु रामचंद्राची आज्ञा पाळली, हनुमंताच्या सांगण्यावरून पाषाण उचलण्याचा पुरुषार्थ केला आणि पहिले पाऊल उचलले होते. 


संत तुलसीदास "सुंदरकांड" मध्ये सांगतात की सीतामाईचा शोध घेण्यासाठी हनुमंताने एकट्याने आकाशातून उड्डाण केले होते आणि त्याला त्यावेळेस जाणवले होते की हा समुद्र पार करणे खूप कठीण आहे कारण त्या सागरात अनेक मगरी , अजस्त्र मोठाले जलचर प्राणी, भोवरे , खडक आहेत. तसेच त्या सागरात निशाचरी नावाची मायावी राक्षसी राहत होती जी हवेतून उडणार्‍याची सावली पकडून त्याला गिळते त्यामुळे ह्या समुद्रात उडी मारून पोहून जाणे , नौकेने प्रवास करणे किंवा आकाश मार्गे हवेतून उडत जाणे कठीणच नाही तर अशक्य आाहे. परंतु हनुमंताचा आपल्या प्रभु श्रीरामांवर अढळ विश्वासही होता की माझ्या भगवंताच्या, माझ्या प्रभुच्या , श्रीरामांच्या नावाने अशक्य ते शक्य सहज होऊ शकते. ह्याच हनुमंतातच्या एकमेव विश्वासापोटी आपण पाहतोच की पाषाण सुध्दा समुद्राच्या पाण्यावर न बुडता तरंगतात. 

सामान्यत: विज्ञानाचा नियम पाहू जाता एखादी जड गोष्ट पाण्यात टाकली तर ती बुडते आणि हलकी गोष्ट पाण्यावर तरंगते. आता पाषाण म्हणजे तर मोठाले दगड किंवा शिळाच ! पण ज्या वेळी हनुमंत त्याच्या लाडक्या भगवंत प्रभु श्रीरामाच्या चरणांवरील प्रेमाने, भक्तीने पाषाणावर "रामनाम " लिहीतो तेव्हा मात्र विज्ञानाच्या नियमाला डावलून ते सर्व पाषाण समुद्राच्या पाण्यावर तरंगतात, एवढेच नव्हे तर श्रीरामांची कित्येक कोटी वानरसेना त्या सेतूवरून समुद्र पार करून लंकेला पोहोचली देखिल. ही असते भक्तीची ताकद, भगवंताच्या चरणांवरील विश्वासाचे सामर्थ्य !      
    
आता सेतू म्हणजे साध्या सरळ शब्दांत मांडायचे झाले तर दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या गोष्टींना जोडणारा दुवा ! 

Saturday 14 November 2015

मधुमेह- गोड विषाच्या आपत्तीचे व्यवस्थापन

१४ नोव्हेंबर म्हटले की आम्हा भारतीयांना बाल दिन आणि चाचा नेहरू आठवतात , पण जगात १४ नोव्हेंबर हा दिवस एका विशीष्ट कारणासाठी साजरा केला जातो. काय आहे बरे वेगळे कारण ? चला तर जाणून घेऊ या -

आज शनिवारी ऑफीसला सुट्टी असली तरी १४ नोव्हेंबर निमीत्त " Walkethon" आणि मधुमेह अर्थात डायबेटीस संबंधी जनजागरूकता वाढविण्याच्या हेतूने ऑफीसने सर्व कर्माचार्‍यांसाठी "मधुमेह - जागरूकता" परिसंवाद आणि शिबीराचे आयोजन केले होते. एक तर सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी झोप काढण्याच्या मनसुब्यावर पाणी पडले होते आणि त्यातून कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबादारी असलेल्या विभागाच्या कर्मचारी वर्गाला नियोजित वेळेच्याही २ तास आधीच पोहचायचे होते, त्यामुळे त्या विभागाचे कर्मचारी तणतणतच कार्यक्रमाच्या नियोजित स्थळी पोहचले होते.  

परंतु मधुमेहाबाबत झालेल्या परिसंवादानें तर प्रत्येकाचे डोळे खाडकन उघडले होते आणि आपल्या आळसापोटी नियमित व्यायाम न करून, खाण्याच्या गोष्टींचा मोह न टाळता आल्याने अनावश्यक चरबट गोष्टी खाऊन, जंक फूडच्या वेडापायी चुकीचे खाणे खाऊन आपणच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या हातांनीच स्वत:च्या पायावर कसा धोंडा मारून घेतलाय ह्याबाबत खडसून कान उघाडणी झाली आणि आपल्या चुकांची किती मोठी भरपाई  आपल्याला स्वत:ला आणि आपल्या कुटूंबीयांना, आप्त-स्वकीयांना करावी लागेल ह्या भीषण वास्तवाशी चांगलाच परिचयही झाला. सकाळचा राग कुठेच पळाला होता आणि ऑफीसच्या कार्यक्रम नियोजनाचे महत्त्व मनापासून पटले होते. मनातल्या मनात प्रत्येक जणच परमेश्वराकडे आभार व्यक्त करीत होता.   
       
जागतिक मधुमेह दिवस - दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरूवात जागतिक मधुमेह फेडरेशन (World Diabetes Foundation )  आणि  जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health Organization )  संयुक्तपणे केली. मधुमेहामुळे होणार्‍या रोगाच्या तक्रारीविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या दिवसाची सुरूवात करण्यात आली. फ्रेड्रिक बॅटिंग व चार्ल्स बेस्ट यांनी सर्वप्रथम इन्शुलिन तयार करण्याची कल्पना जगासमोर मांडली. फ्रेड्रिक बॅटिंग ह्याचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस असल्यामुळे पुढे १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करण्याचा पायंडा पडला.


Sunday 8 November 2015

धनत्रयोदशी व धनलक्ष्मीपूजन ( श्रीयंत्र पूजन )

धनत्रयोदशी म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशी -दिपावलीचा दुसरा दिवस ! 
चला तर पाहू या धनत्रयोदशीच्या दिवसाचे माझे सदगुरु श्री अनिरुध्द बापूंनी सांगितलेले महत्त्व (दैनिक प्रत्यक्षच्या अग्रलेखातून) 
धनत्रयोदशी म्हणजे धनाच्या सन्मानाचा व धनलक्ष्मीच्या आणि कुबेराच्या पूजनाचा दिवस ! वेगवेगळ्या प्रकारे त्या त्या प्रदेशांतील रीतिरिवाजांनुसार विवीध प्रकारे ही पूजा वा पूजन केले जात असले तरी सर्वत्र पूजन केले जाते ते धनाचेच !  
धनत्रयोदशीला धनलक्ष्मीपूजन केले जाते आणि लक्ष्मीपूजनाला ऐश्वर्यलक्ष्मीपूजन केले जाते. धनलक्ष्मी व ऐश्वर्यलक्ष्मी ही एकाच लक्ष्मीमातेची दोन वेगवेगळी नामे आहेत, वेगेवेगळी रुपे तर नाहीत आणि वेगवेगळी दैवते तर मुळीच नाही. (जसे पार्वती आणि उमा ही दोन नावे वेगळी असली तरी ती मुळात भगवान शिव-शंकराची पत्नी आहे आणि ती एकच आहे, अगदी तसेच) 


Friday 6 November 2015

गो-वत्स द्वादशी अर्थात वसुबारस - दीपावली

दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या? लक्षुमणाच्या..
लक्षुमण कुणाचा? आईबापाचा..
लहान मुले मस्त फेर धरून गात होती , नाचत होती आणि त्यांना पाहून आठवले ते बालपणीचे दिवस. 


मागील वर्षी आम्ही सर्व कुटूबीयांनी गावी जाऊन दिवाळी साजरी करायची ठरवली होती आणि गावाकडच्या वाटेवर ही गाणी कानी पडली , तसे न राहवून आमच्यातल्या बच्चे कंपनीने त्यांच्या आजीला नाना प्रश्न विचारून भंडावून सोडले. आजी, हे गाणे असे काय ग ? आम्ही कधी गाई-म्हशींना ओवाळताना नाही पाहिले कुणाला, आपण तर लहान मुलांना ओवाळतो ना जसे आजी तू आई आम्हाला वाढदिवसाला ओवाळता, मग हे काय़? 
शेवटी आजीने त्यांना आणि सर्व लहान-थोरांना  दिवाळी साजरी करण्या मागच्या आपल्या वैदिक पध्द्तींची माहिती दिली. 

आजीचे बोल ऐकता-ऐकता माझे सदगुरु श्री अनिरुध्दसिंह जोशी ह्यांनी २००६ साली आम्हाला दैनिक प्रत्यक्षच्या अग्रलेखांतून दिलेली माहिती आठवली- 

Saturday 31 October 2015

आधुनिक भारताचे पोलादी पुरुष - "भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल"

आधुनिक भारताचे पोलादी पुरुष किंवा लोह पुरुष म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल ह्या खंबीर व्यक्तिमत्त्वाच्या कणखर नेतृत्त्वाची आज ३१ ऑक्टोबर रोजी १४० वी जयंती आहे त्या निमीत्ताने -    


धाडसी, कुशल, न्यायप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोलादी पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्त्व शब्दात मांडणे म्हणजे टिटवीने समुद्र उपसण्याचा अट्टाहास करण्यासारखेच आहे. अष्ट्पैलू असामान्य प्रतिभेचे वरदान लाभलेला हा भारतमातेचा सुपुत्र गुजरातमधील खेडा जिल्ह्यतील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी लेवा पाटीदार ह्या समाजातील एका शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन भारतमातेची कूस खर्‍या अर्थाने उजविता झाला. लाडबा व झव्हेरीभाई पटेल ह्या माता-पित्यांच्या उदरी जन्मलेले हे चौथे अपत्य. वल्लभभाईंच्या वडिलांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला होता व या कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव होता. देशप्रेमाचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला व लहानपणी घरीच राजकीय संस्कारांचे बाळकडूही पाजले गेले होते. 

Wednesday 28 October 2015

भूकंप - निसर्गाचा प्रकोप वा रौद्ररूपी तांडव ?

नुकत्याच सोमवारी दिनांक २६ ऑक्टोबर २०१५ रोजी ईशान्य अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतराजीत केंद्र असलेल्या , अमेरिकेच्या "जिऑलॉजिकल सर्व्हे" ने ७.५ रिश्टर क्षमतेची तीव्रता नोंदविलेल्या भूकंपाच्या जोरदार झटक्यांनी दुपारी पावणेतीनच्या सुमारास उत्तर भारतासह, अफगाणिस्तान , पाकिस्तान येथील जनजीवन विस्कळीत झाले असल्याची बातमी वाचनात आली, ज्यात सुमारे २४८ हून अधिक लोक मूत्युमुखी पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याआधी २५ एप्रिल २०१५ मध्ये नेपाळ मध्ये ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप व लागोपाठ  त्याचा पडसाद म्हणून १२ मे २०१५ रोजी ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला ज्यात सुमारे ८००० हून अधिक लोकांचा बळी गेला असल्याची भीती व्यक्त केली जाते. म्हणजेच अवघ्या ६ महिन्यांमध्ये दक्षिण आशियाला भूकंपाचा मोठा धक्का बसण्याची ही दुसरी वेळ आहे. 

 नेपाळ भूकंप 
त्यामुळे सध्याच्या अफगाणिस्तान येथील भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा एकदा भूकंप आणि त्याची कारणं हा विषय चर्चेत आला आहे. भूकंप होणं ही एक नैसर्गिक आपत्ती वा निसर्गाचा प्रकोप दर्शवणारी घटना असूनही आज सुध्दा भूकंपाचे धक्के बसले की, आपल्याकडे लोकांमध्ये भीती निर्माण होऊन गोंधळ उडतो वा भूकंप कसा होतो ह्याबाबतची शास्त्रीय कारणे माहीत नसल्यामुळे अज्ञानापोटी तो लोकांकडून केला जातो. मुळातच आपल्या भारतात आपत्ती व्यवस्थापन , आपती निवारण अर्थातच डिझास्टर मॅनेजमेंट ह्या विषयाबाबत म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही. मुळातच जनजागृती नसल्यामुळे लोकांना भूकंपाविषयी आणि तो झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, याची पुरेशी कल्पना नाही. त्यामुळे ते मृत्युमुखी पडतात.

Saturday 26 September 2015

टेलिपोर्टेशन - दूरप्रागट्य - अदृश्‍य करण्याचे तंत्र !!!

१८ सप्टेबर २०१५ ला सकाळ ह्या वृत्तपत्रात " वैज्ञानिकांना गवसले अदृश्‍य करण्याचे तंत्र! " ह्या मथळ्याखाली टेलिपोर्टेशन संबंधी एक बातमी नुकतीच वाचनात आली होती. त्यात असे सांगितले होते की -
  
वॉशिंटन डी सी - आतापर्यंत आपण केवळ कल्पनाविश्‍वात, जादूच्या प्रयोगांमध्ये किंवा हॅरी पॉटरसारख्या चित्रपटात पाहिलेली अदृश्‍य होण्याची कला आता विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्यक्षात साकारणार असल्याचे कळले. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी अतिशय पातळ त्वचेसारखा अंगरखा तयार केला असून तो माणसाने अंगात घातल्यास क्षणार्धात अदृश्‍य होता येणार असल्याचा दावाही केला आहे. 

अमेरिकेतील बर्कले लॅब आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी सोन्याच्या वीटेच्या आकाराच्या अतिशय सूक्ष्म भागापासून अदृश्‍य करणारा अंगरखा तयार केला आहे. या अंगरख्याची जाडी केवळ 80 नॅनोमीटर आहे. या अंगरख्याच्याभोवती त्रिमितीय (थ्रीडी) पद्धतीने काही जीवनशास्त्रीय पेशी चढउतारांसह गुंडाळण्यात आल्या आहेत. हा अंगरखा परिधान करणाऱ्या व्यक्तीशी एकरूप होऊन प्रकाशातही संबंधित व्यक्तीला अदृश्‍य करतो. "कोणताही विशिष्ट आकार नसणारा तसेच प्रकाशातही न दिसणारा हा थ्रीडी अंगरखा प्रथमच निर्माण करण्यात आला आहे' अशी माहिती बर्कले लॅबच्या मटेरियल सायन्स विभागाचे संचालक माहिती झियांग झांग यांनी दिली आहे. असे वाचनात आले होते. 

त्यापाठोपाठ लगेच २३ सप्टेंबर २०१५ ला Washington Post ह्या वृत्तपत्रात Scientists just smashed the distance record for quantum teleportation ही बातमी वाचनात आली. 

Washington Post च्या बातमीनुसार National Institute of Standards and Technology (NIST) च्या भौतिकशास्त्रज्ञांनी माहिती पाठवताना एक फॉटॉन (PHOTON) द्वारे दुसर्‍या फॉटॉन मध्ये ६० मैलांच्या अंतरावर फायबर ऑप्टीक केबलच्याद्वारे यशस्वीरीत्या पाठवले असल्याचा दावा केला आहे, जे पूर्वीच्या पेक्षा ४ पट अधिक अंतर आहे. 

अधिक माहितीसाठी आपण खालील link वर भेट देऊन माहिती वाचू शकता.

https://www.washingtonpost.com/news/speaking-of-science/wp/2015/09/23/scientists-just-smashed-the-distance-record-for-quantum-teleportation/?wpmm=1&wpisrc=nl_most

लागोपाठच्या ह्या दोन्ही बातम्यांमुळे साहजिकच टेलिपोर्टेशन म्हणजे नक्की काय असते ह्या विषयी अपार कौतुक मनी दाटले आणि खरेच माणूस असा विज्ञान- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अदृश्य होऊ शकतो , किंवा माणूस एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी असा अदृश्य होऊन प्रगटू शकतो का खरेच ? हे जाणण्याची जिज्ञासा मनात दाटली आणि संगणकावरच्या आंतरजाल(Internet) ह्या महान माहिती स्त्रोताचा वापर करण्याचे ठरविले आणि त्यातून हाती लागलेले हे ज्ञान !!!!

अमेरिकेतील एलॉन विद्यापीठ आणि प्यु इंटरनेट ह्या दोन संस्थांनी येत्या १५० वर्षांतील म्हणजे भविष्यकाळातील इंटरनेट कसे असेल याचा अंदाज घेणारे अहवाल तयार केले होते असे वाचनात आले. ह्या अहवालाची माहिती देताना मांडलेल्या लेखात २०१५ ते २०२४ ह्या दहा वर्षांचा काळ कसा असेल ह्यावर भाष्य केले आहे. त्यात २०१५ ते २०२० चा वेध घेताना एलॉन विद्यापीठ आणि प्युइंटरनेटचा अहवाल म्हणतो की नारदमुनींसारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे क्षणार्धात प्रकट होणे माणसाला शक्य नाही हे लहान मुलालाही कळते. मात्र ह्या अशक्यप्राय चमत्काराला प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया इसवी सन २०१५ मध्ये सुरू झालेली असेल, ज्याला तंत्रज्ञानाच्या भाषेत याला 'टेलिपोर्टेशन' असे म्हणतात. 

टेलिपोर्टेशन म्हणजे आपण समजायला सोपे म्हणून त्याला दूरप्रागट्य असेही मराठीत म्हणू शकतो. आता टेलिपोर्टेशन म्हणजे काय? हा पहिला प्रश्न साहजिकच मनात उद्भवतो. आपण लहानपणी गोष्टींच्या पुस्तकातून वाचले आहे किंवा टी.व्ही. मालिकेत पाहिले आहे की काही पौराणिक कथांमध्ये देवर्षि नारद मुनी, देव किंवा अंगी मायावी शक्ती असणारे काही राक्षस हे डोळे मिटून ध्यान करताच क्षणार्धात कधी वसुंधरा पृथ्वीवर तर कधी पाताळलोकात तर कधी देवलोकात वावरताना दिसत आणि ते त्यांच्या इच्छेप्रमाणे काम होता क्षणी अंतर्धान पावून इच्छित स्थळी पोहचत असत. 


एवढेच नव्हे तर चक्क काही वर्षांपूर्वी टी.व्ही.वर प्रक्षेपित होणार्‍या "स्टार ट्रेक " ह्या मालिकेतही आपण असे पाहिले आहे की या मालिकेतील काही पात्रे (माणसे)  त्यांच्या अंतराळयानातून जवळच्या ग्रहावर किंवा इतर ठिकाणी कोणत्याही वाहनाशिवाय किंवा हवेतून न उडता आपोआप अवतरत असल्याचे दाखवले जायचे. त्यासाठी त्या व्यक्ती ह्या एका विशिष्ट कक्षात जाऊन विशिष्ट प्रकारच्या वैज्ञानिक आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या प्रणालीद्वारे त्यांचे स्थलांतर होत असल्याचे दृश्य तेव्हा आपल्या सर्वांनाच थक्क करून टाकत असे. त्या कक्षामध्ये तीन वर्तुळाकार जागांवर तीन व्यक्ती उभ्या राहत आणि ते यंत्र सुरू केले की त्या जागेवरील त्या व्यक्ती हळूहळू कणस्वरूपांमध्ये विरून जाताना दिसत व काही वेळाने त्या वर्तुळाकार जागेवर कोणीही उरत नसे. त्या ठिकाणाहून अदृश्य झालेल्या त्या व्यक्ती इतरत्र कुठे तरी (त्यांना हवे असलेल्या ठिकाणी ) तशाच प्रकारे प्रकट होताना दिसत होते. 



Saturday 5 September 2015

शिक्षक दिन - ०५ सप्टेंबर - राष्ट्रउभारणीचा पाया रचणार्‍या पाईक शिक्षकांना मानाचा मुजरा !!!

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरुरेव परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नम: ।।
गुरुची महती गाणारा हा श्लोक  सार्‍या आबालवृध्दांना ठाऊक असतोच.  

मानवाच्या जीवनात त्याचा प्रथम गुरु ही त्याची जन्मदात्री माताच असते, जी त्याला अगदी जन्मापासून बोलायचे, चालायचे , धावायचे कसे ह्याचे प्राथमिक धडे शिकविते. पाटीवर हाताला धरून धुळाक्षरे गिरवायला शिकविते. ओल्या मातीच्या गोळ्याला जसे कुंभार चाकावर फिरवून सुंदर , सुबक आकार देतो, तसेच बाळाच्या जीवनाला आकार देण्याचे , घडवण्याचे महत्त्वपूर्ण काम मुलाची आई/माता करते. त्यानंतर पिता ही गुरुची भूमिका पावलोपावली निभावतच राहतो. परंतु व्यावहारीक जगाचे शिक्षण घेण्यासाठी लहान मुलाला शाळेची पायरी चढावी लागते आणि तेथून पुढे त्याच्या बाल जगात त्याचे शिक्षक , त्याचे गुरुवर्य अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका पार पाडतात. म्हणूनच आपल्या भारतभूमीत वैदिक संस्कृतीने गुरुला वा आजच्या कालानुसार शिक्षकाला मानवाच्या जीवनात अत्यंत मानाचे , आदराचे असे अत्युच्च स्थान दिले आहे. आज जगात जी डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ, विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी अशी अनेकविध क्षेत्रातील नामवंत , कीर्तीवंत मान्यवर मंडळी आहेत , ती त्यांच्या यशाचे मानकरी बहुतांशाने त्यांच्या शालेय वा महाविद्यालयीन जीवनातील मार्गदर्शक शिक्षक/गुरुवर्य असल्याचे कौतुकाने आणि अभिमानाने सांगताना आढळतात.  
   
आपल्या भारतवर्षात फार प्राचीन काळापासून गुरूंची थोर परंपरा आहे. साक्षात भगवान शिव पार्वती मातेला गुरुगीतेमधील एका श्लोकात गुरुंचे अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगताना म्हणतात - 
                      न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोर्धिकं तप: ।
                   तत्त्वं ज्ञानात्परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नम: ।
                     ध्यानमूलं गुरोर्मूर्ति: पूजामूलं गुरो: पदम् ।। ७४ ।।
                   मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरो: कृपा ।। ७६ ।। 
                             ॐ दत्तगुरवे नम: ।।
सद्गुरु वा गुरुतत्त्वापेक्षा अधिक श्रेष्ठ असे कोणतेही अन्य तत्त्व नाही, गुरुसेवेपेक्षा अधिक श्रेष्ठ असे कोणतेही अन्य तप नाही. ह्या ज्ञानाहून श्रेष्ठ असे कोणतेही तत्त्व नाही. (ह्याचा अर्थ गुरुतत्व/सदगुरुतत्त्वच सर्वोच्च , परम श्रेष्ठ तत्त्व आहे, हेच सत्य आहे.) अशा श्रीसदगुरुंना नमस्कार असो. 
सदगुरुमूर्ति हेच ध्यानाचे मूळ आहे. सद्गुरुंचे चरण हेच सर्व पूजांचे मूळ आहे . सदगुरुंचे वाक्य हेच सर्व मंत्रांचे मूळ आहे व मोक्षाचे मूळ आहे, सदगुरुकृपा. 
पुढे एका श्लोकात शिव पार्वतीस म्हणतात ," हे देवी , गुरुभाव हेच सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. गुरुदत्तांचा चरणांगुष्ठ ( पायाचा आंगठा ) सर्व तीर्थांचे आश्रय स्थान आहे ब्रम्हाविष्णुमहेश्वरांना नमस्कार असो." 
                      गुरुभाव: परं तीर्थं अन्यतीर्थं निरर्थकम् ।
                      सर्व तीर्थाश्रयं देवि पादाङ्गुष्ठे च् वर्तते ।।
                          ॐ ब्रम्हाविष्णुमहेश्वरेभ्य: नम: ।। 

संत कबीर सुध्दा आपल्या एका दोह्यात गुरुंच्या ह्या महती गाताना अप्रतिम उदाहरण देतात -  
गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागुं पांय ।
बलिहारी गुरु आपने , गोविंद दियो बताय ।।
म्हणजे माझे गुरु आणि माझा परमेश्वर (गोविंद) एकाच वेळी माझ्या समोर उभे असतील तर माझ्या मनाला मी आधी कोणाच्या पाया पडू हा प्रश्नच पडता कामा नये , मला माझ्या गुरुंच्याच चरणांवर लोटांगण घालायला हवे आधी ज्यांनी मला माझा गोविंद , माझा देव , माझा परमेश्वर मला दाखविला. 

तर अशा ह्या आदरणीय गुरुंच्या ऋणांचे स्मरण करण्याचा, आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा पायंडा आपल्या भारतवर्षात सुरु केला ते महान व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन !


Saturday 29 August 2015

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन द्रौपदीसी बंधु शोभे नारायण - रक्षा बंधन

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदीसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, "शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?"
पाठची बहिण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न





 https://www.youtube.com/watch?v=cyAOzD6_5ms ह्या लिंकवर आपण हे गीत ऐकू शकता.

"श्यामची आई " ह्या अत्यंत लोकप्रिय चित्रपटातील हे प्रल्हाद केशव अत्रेंनी लिहीलेले , वसंत देसाईंनी संगीत दिलेले आणि आशाताईंच्या सुमंजूळ स्वरांनी साज लेऊन नटलेले हे सुश्राव्य गीत ऐकताना आठवते ते द्रौपदी व कृष्णाचे एक्मेकांवरील अगाध प्रेम आठवून ऊर दाटून येतो, नकळत डोळे पाणावतात.  

Wednesday 26 August 2015

माझे सदगुरु बापू - माझ्या जीवनातील एकमेव सांगाती !!!


जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया ॥१॥
चालो वाटे आम्ही तुझा चि आधार । चालविसी भार सवे माझा ॥धॄ॥
बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा ॥२॥
अवघे जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही ॥४॥

हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला सहज आणि सोप्या भाषेत मानवी जीवनात खराखुरा आणि एकमेव  सांगाती कोण असतो आणि कोण असू शकतो ह्याची स्पष्ट जाणीव करून देतात असे मला प्रामाणिकपणे वाटते  

माझ्या आयुष्यात माझा असा एकमेव सांगाती मला माझे सदगुरु डॉक्टर अनिरुद्धसिंह जोशी (बापू) ह्यांच्या रुपात मिळाला.

Friday 21 August 2015

आसाम पूराचा तडाखा - निसर्गाचा विनाशकारी प्रकोप !

दिनांक २१ ऑगस्ट २०१५ च्या वृत्तानुसार -
गुवाहाटी – पूर्वेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आल्यामुळे सुमारे ६ लाख नागरिकांना याचा फटका बसला असून आसाममधील जवळपास २ लाख लोकांना १७७ कॅम्पमध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरामुळे आसामच्या १९ जिल्ह्यांना फटका बसलाय. तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. तर हिमाचल प्रदेशलाही अतिवृष्टीने वेढलंय. 
याच वर्षी आसाममध्ये दुसऱ्यांदा पूर आला असून अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धेमाजी, कोकराझाड, लखीमपूर, चिरांग, बंगाईगाव, तिनसुकिया आणि दिब्रुगड जिल्ह्यातून वाहणाऱ्या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामध्ये हजारो वाहने अडकली आहेत. मुसळधार पावसामुळे पर्वतीय भागात दरडी कोसळल्याने वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत.
नागालँडमध्येही मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे येथील जनजीवन ठप्प आहे. नागालँड आणि मणिपूर यामधील महत्त्वाच्या महामार्गासह अनेक मार्ग बंद आहेत.
ही बातमी वाचून मन सुन्न झाले काय हा निसर्गाचा प्रकोप , किती भीषण हे रौद्र स्वरूप आणि त्याचे तांडव .-



Saturday 15 August 2015

डॉक्टर अब्दुल पी जे. कलाम - भारतमातेला लाभलेले परमात्म्याचे अनमोल "दृष्टी " वरदान !

आज आपल्या भारत देशाचा स्वातंत्रदिन १५ ऑगस्ट . भारतभूमीला खर्‍या अर्थाने विकसित देश म्हणून नावालौकिकाला आणण्याचे नुसते स्वप्न स्वत: न पाहता, ते सत्यात उतरविण्याचा दृष्टीकोन करोडो भारतीयांना देणारा आणि त्या दिशेने भारतीयांची वाटचालही करवून आणणारे भारतमातेचे महान , थोर सुपुत्र म्हणजेच डॉक्टर अब्दुल पी जे. कलाम !
अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (ऑक्टोबर १५, १९३१ - २७ जुलै २०१५) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते .  

डॉक्टर अब्दुल पी जे. कलाम - भारतमातेला लाभलेले परमात्म्याचे अनमोल "दृष्टी " वरदान !  

भारतमाता आपल्या कुशीतून ज्या नररत्नांना प्रसवून आपले मातृत्त्व सार्थकी लागल्याचा अभिमान बाळगते, धन्यता मानते अशा थोर , महान सुपुत्रांपैकी एक म्हणजे डॉक्टर अब्दुल पी जे. कलाम होय. 
' जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसे शतकातून एखाद्या वेळेला जन्माला येतात' - पु.लं.चं हे वाक्य सोदाहरण पटविते अशी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी दुर्मिळ व्यक्तीमत्त्व आहेत आणि त्यापैकी सद्य काळातील एक म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम !

लहानपणी बाळ ध्रुवाची गोष्ट वाचली होती की राजा पिता उत्तानपादाच्या मांडीवर बसून खेळण्याचा हक्क सावत्र माता हिरावून घेते आणि मग परमेश्वराची निश्चल भक्ती करणारी स्वत:ची माता आणि सदगुरु नारद मुनींच्या उपदेशानुसार साक्षात भगवान विष्णूची घोर तपश्चर्या करून अगदी बालवयातही ध्रुवाने आकाशातील तारामंडळात आपले अढळ स्थान बनविले, भक्तीच्या सामर्थ्यावर ! 

डॉक्टर कलाम ह्यांनी सुध्दा असेच अढ्ळ स्थान आज प्रत्येक भारतीयाच्या मनात नुसते बनवलेच आहे नाही तर कोरून ठेवले आहे जे कधीच काळाच्या प्रवाहातही पुसले जाणार नाही असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. 
इस्रोच्या माध्यमातून भारताला शक्तिसंपन्न करणारा हा मिसाईल मॅन निश्चितच ईश्वराने दिलेल्या बहूमूल्य मानवी जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक करणारा , सोने करणारा मानव असे मला तरी वाटते. प्रजापती ब्रम्हाने जेव्हा सृष्टीच्या उत्त्पत्तीमध्ये सर्वात शेवटी जी रचना केली त्याला "मानव " म्हणजे आता नव्याने काही जन्माला येणार नाही अशा अर्थाने ह्या बुध्दीप्रधान जीवाला नाव दिले असे वाचले होते. डॉ. कलाम ह्यांचे जीवन पाहता खरोखरीच पुन्हा नव्याने असा मानव जन्माला येणे केवळ अशक्य म्हटल्यास वावगे ठरणार नाही.    

डॉ.कलाम यांनी 'भारतरत्न' पुरस्काराची प्रतिष्ठा द्विगुणित केली. २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून डॉ.कलाम यांनी दिलेल योगदान अजोड आहे. राष्ट्रपती म्हणून डॉ.कलाम हा एकमेव आश्वासक चेहरा भारताची नवी आंतरराष्ट्रीय ओळख बनून राहिला आहे असे मत व्यक्त केले जाते ते उगाच नाही. जितक्या सहज त्यांनी राष्ट्रपतीपद संभाळले, तितक्याच सहज ते निवृत्तीनंतरचं नियमित जीवन जगले. कुठे बडेजाव नाही की भपका नाही. राष्ट्रपतीपद त्यांनी विश्वस्त म्हणून सांभाळले. आजच्या मालक म्हणून दिमाख मिरवणार्‍या बडेजावाने वावरणाऱ्यांसाठी तो उत्तम वस्तुपाठ आहे. निवडणुकीच्या राजकारणाचा तिटकारा म्हणून त्यांनी पुन्हा मिळणारी उमेदवारी नाकारली असे ऐकिवात आहे. इतका सरळ साधा सज्जन माणूस आपल्याला राष्ट्रपती म्हणून पुन्हा मिळणे केवळ अशक्यप्राय वाटते.  

“It is very easy to defeat someone, but it is very hard to win someone” असे म्हणणार्‍या कलाम साहेबांनी मात्र लहान मुले, तरूण युवा पिढी असो की मध्यमवयीन वा वयस्क मंडळी असो अगदी आबालवृध्द सार्‍यांनाच आपलेसे केले होते. आपल्या आगळ्या व अनोख्या कार्यपध्दतीमुळे लोकप्रिय झालेला सार्‍या लोकांचा हा लाडका राष्ट्रपती ! कुणा भारतीयाला आज आवडत्या राष्ट्रपतीचे नाव विचारले तर जराही वेळ न दवडता अगदी सहजपणे "डॉ. अब्दुल कलाम" हेच नाव प्रत्येक भारतीयाच्या ओठावर येईल ह्यात तिळमात्र शंका नाही, ह्यातच डॉक्टर कलाम ह्यांच्या अफाट लोकप्रियतेचे, त्यांच्या बद्दल असणार्‍या लोकांच्या मनातील आत्मीयतेचे, जिव्हाळ्याचे दर्शन घडते. 

"शुध्द बीजाचिया पोटी फळे रसाळ गोमटी" ह्या उक्तीचे प्रत्यंतर डॉक्टर कलाम ह्यांच्या लहानपणाकडे पाहिले असता कळते. त्यांचे वडील जैनुलब्दीन कलाम हे अत्यंत सात्विक वृत्तीचे, भगवंतावर अचल विश्वास आणि कोणत्याही संकटात न डगमगणारी भक्ती असणारे होते आणि त्याच बरोबरीने ते तितकेच लोककल्याण तत्पर असल्याचे कलाम ह्यांनी आपल्या " माझी जीवनयात्रा - स्वप्ने साकारताना"  ह्या पुस्तकात सांगितले आहे. डॉक्टर कलाम लिहीतात माझ्या वडिलांचं औपचारिक शिक्षण फारसं झालेलं नव्हतं किंवा त्यांना त्यांच्या दीर्घ आयुष्यात फार ऐश्वर्यही कधी लाभलं नाही, पण मला आयुष्यात ज्या अत्यंत सुज्ञ व खरोखर उदार व्यक्ती भेटल्या, त्यामध्ये माझे वडीलही आहेत. ते कुणी प्रवचनकार नव्हते की शिक्षक! स्वत:ची श्रद्धा व आपल्या धर्माच्या तत्त्वांनुसार जगणारी ती एक व्यक्ती होती. 
लहानपणीच्या वडिलांनी केलेल्या संस्काराच्या आठवणी सांगताना डॉक्टर कलाम म्हणतात एकदा आईच्या हातून भाकरी करपली तरी वडील खूप समजूतीने वागतात आणि आईवर चिडत नाही, उलट करपलेली भाकरी मला आवडते असे सांगून आपल्या बायकोला दु:खी करीत नाही. लहानग्या अब्दुल कलामांना नवल वाटते आणि ते वडीलांना रात्री तुम्हाला खरेच करपलेली भाकरी आवडते का असा बाळबोध सोपा प्रश्न विचारतात त्यावर वडीलांनी दिलेल्या उत्तराने अब्दुल कलाम ह्यांना माणुसकीने माणसे कशी जोडायची आणि इतरांची मने कशी सांभाळायची असतात ह्याचे अनमोल शिकवण दिली, जी त्यांनी आयुष्यभर आपल्या आचरणात संपूर्णपणे बिंबवलेली दिसते.   

डॉ.कलाम यांनी लिहिलेली ( काही ) ग्रंथसंपदा : 

* इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
* ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 
‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया – माय-ड्रीम एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
* ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
* विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक :माधुरी शानभाग.
* सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
* टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
* दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
* अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तकं :
* इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
* ’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद – मंदा आचार्य).
* ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
* प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :आर के पूर्ती)
* रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां. ग. महाजन) 
       
अग्नीपंख (The WINGS OF FIRE)  - देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागर सन्मान मिळवणारे आमचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्यांचा त्यांच्या कालावधीतील १९९२ पर्यंतचा प्रवास वर्णिला आहे. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष दाखविला आहे. तर दुसर्‍या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघर पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण ही फार सहज सोप्या भाषेत सामान्य माणसाला समजेल अशा सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारत्याच्या तंत्रज्ञानाविषयक लढाईचे एक स्पंदन आहे असे मत मांडले जाते. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहर्षक खंडकाव्यच आहे.


सकारात्मक दृष्टीकोन(Positive attitude) ह्याचा अर्थ सोपा करून देणारा आणि जीवनातील नैराश्य संपवायचा महामंत्र देणारा हा महान द्रष्टा !

Thursday 6 August 2015

स्टेम सेल थेरपी - बायोटेक्नॉलॉजी - तंत्रज्ञानाचा नवीन आविष्कार !!!

दिनांक १९ जुलै २०१५ च्या " टाईम्स ऑफ इंडिया" ह्या दैनिक वृत्तपत्रातील एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले -
स्टेम सेल डोनेशन विषयी जनजागृती करण्यासाठी सायकल स्वारांची आधुनिक रॅली :
चेन्नई येथे शनिवार दिनांक १८ जुलै २०१५ रोजी दात्री फाऊंडेशन आणि कॉगनिझंट (Cognizant)  ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे २०० तरूण व वयस्क सायकल स्वारांची रॅली आयोजित करण्यात आली होती. दात्री ही स्टेम सेल रक्त दाता नोंदणी संस्था आहे, ज्यांना रक्तातील विकृतींचे आजार दूर करण्यासाठी बर्‍याचे मोठ्या संख्येने आजारग्रस्त रूग्णांना ह्या स्टेम सेलच्या दात्यांची अत्यंत मोठी गरज भासत असल्याचे निदर्शनाला आले. आपल्या भारताची लोकसंख्या १ अब्जावर आहे, तरी देखिल एवढी अवाढव्य लोकसंख्या असूनही स्टेम सेल डोनेशनच्या विषयीच्या जनजागृतीच्या अभावापाय़ी स्टेम सेलची रक्तातील विकृतींचे आजार दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असूनही खूपच उणीव भासत आहे. त्यामुळे ह्या रॅलीच्या माध्यमातून स्टेम सेलचे दान किती गरजेचे आहे ह्या बद्दल जनजागृती करण्यात आली. 

मनात अपार जिज्ञासा दाटली की काय असते ही स्टेम सेल टेकनॉलोजी ? 

त्यातूनच शोध घेताना अजूनही काही अशीच कुतूहल चाळवणारी माहिती वाचनात आली ती टाईम्स ऑफ इंडियाच्या ४ मे २००२ च्या बातमीने ! 
त्यात असे सांगितले होते की बी. जी मातापूरकर हे नवी दिल्ली येथे मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालय येथे सर्जन आहे. "ऑल इंडिया असोसिएशन ऑफ बायोटेक"च्या दक्षिणेकडील शाखेने स्टेम सेल संशोधनाशी निगडीत एक परिषद ( Conference) हैदराबाद येथे  आयोजित केली होती. बीजी मातापूरकर हे  यूएसए मध्ये एक पेटंट धारक आहेत ज्या पेटंट द्वारे त्यांनी १० वर्षांपूर्वी असे तंत्र विकसित केले होते की जे एका अवयवापासून नवीन अवयव उत्पादन करू शकत होते.

ह्या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की महाभारताच्या आदिपर्वाच्या एका ओवीने ते दिङ्मूढ झाले होते ज्यात गांधारी (महाराज धृतराष्ट्र पत्नी ) हिने एका गर्भापासून प्रत्यक्षात १०० मुलांना (कौरव ) आणि १ मुलीला जन्म कसा दिला ह्याचा उलगडा केला होता. त्यावर आपले मत मांडताना त्यांनी असे प्रतिपादन केले होते की एकच मानवी स्त्री एकाच वयाच्या १०० पुत्रांना आणि १ कन्येला कसा काय जन्म देऊ शकते? 

पुढे आणखी माहिती शोधताना असे आढळले की गांधारीने प्रसूतीनंतर पाहिले की तिने एका मांसाच्या गोळ्याला जन्म दिला आहे , तेव्हा ती भयंकर चिडली. त्या आधीच्या काळात तिने व्यास मुनींची सेवा करून १०० मुले होण्याचा वर मिळवला होता. जेव्हा गांधारी दु:खाने आणि क्रोधाने तो गर्भाचा मांसल गोळा फेकून देणार होती तेव्हा व्यास मुनी तेथे प्रकटले आणि त्यांनी दिलेला वर वृथा जाणार नाही असे समजावले. त्यानंतर त्यांनी त्या एका गर्भाचे १०१ भाग करून तेल/तूपाने भरलेल्या विशीष्ट प्रकारच्या कुंडामध्ये ( सध्याच्या Test-tube ) ठेवले आणि तब्बल २ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ते कुंड उघडले असता १०० मुले आणि १ मुलगी जन्माला आली. ती १०० मुले म्हणजेच १०० कौरव (सर्वात ज्येष्ठ पुत्र दुर्योधन , दु:शासन इत्यादी कौरव ) आणि त्यांची १ बहीण दु:शाला असे वर्णन वाचनात आले. 

ह्या कथेच्या आधारे मातापूरकरांनी असे मत व्यक्त केले होते की प्राचीन भारतवर्षात महाभारत (3000 इ.स.पू.) ह्या काळातही भारतीय ऋषी-मुनींना अत्यंत प्रगत विज्ञान अवगत होते ज्या द्वारे गर्भ विभागणी आणि चाचणी-नळीद्वारे मानवी स्त्रीच्या गर्भाशायाच्या बाहेर जाऊनही ते गर्भाला जन्म देऊ शकत होते. शास्त्रज्ञांच्या मते हे त्यांनी स्टेम सेल विज्ञान वापरूनच केले होते, ज्या मुळे मानवी स्त्रीच्या शरीरा बाहेरही ते गर्भ धारणा करवून घेऊ शकत होते. 

आता ह्या कथेवर अधिक कसे , काय , खरेच का खोटे असा अधिक उहापोह करण्यापेक्षा कमीत कमी सध्याच्या आधुनिक विज्ञानाच्या स्टेम सेल टेक्नॉलोजी बाबत माहिती करून घ्यावी असे ठरवले. " तुटे वाद तो संवाद हितकारी " अशी आपल्याला संत समर्थ रामदास स्वामी ह्यांची शिकवण आहे ना? म्हटले तीच आचरणात आणावी. 

मग  विचार केला की आणि चंगच बांधला की संगणकावर आंतर महाजाल एवढे अफाट माहिती पुरविणारे स्त्रोत असताना आपण का कचरा ? ठरवलेच की काही झाले तरी माहिती तर वाचून काढू या काय असते ही स्टेम सेल टेक्नॉलोजी ? 

चला तर जाणून घेऊ या स्टेम सेल थेरपी वा टेक्नॉलोजी - बायोटेक्नॉलॉजी - तंत्रज्ञानाचा नवीन आविष्कार !!!

स्टेम सेल ह्या मराठीत मूळ पेशी किंवा स्कंधकोशिका म्हणून ओळखल्या जातात. आता स्कंध कोशिका हा शब्द उच्चारायला मला तरी कठीण वाटतो म्हणून आपण सोयीने मूळ पेशी किंवा स्टेम सेल असाच उल्लेख ह्या पुढील लेखात करू या. 

मूळ पेशी (स्टेम सेल्स) हे नाव  अलीकडे अनेक वेळा वाचनात येते. त्याबद्दल ही थोडीशी ढोबळ माहिती वाचनात आली ती अशी -



Sunday 26 July 2015

२६ जुलै- कारगील विजय दिन - शहीद हुतात्म्यांना व भारतीय सैन्याला मानवंदना !!!

आजपासून १६ वर्षांपूर्वी आपल्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांनी कारगिल युध्दात टायगर हिलवर आपल्या भारतमातेचा तिरंगा ध्वज फडकवून आपला यशाचा, विजयाचा गौरव साजरा केला होता. आपण त्या महान , थोर भारतमातेच्या सुपुत्रांना नतमस्तक होऊन त्रिवार प्रणाम करू या आणि भाव-सुमनांजली अर्पण करून आजच्या दिवशी त्यांची विजय गाथा स्मरू या. 


अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानवर विजय मिळवला. जोझीलापास पासून द्रास-कारगील, बटालीक सेक्टर, टायगर हिल व तोलोलिंग शिखर  -  सगळीकडे ऊंचावर शत्रू आणि पायथ्याला आपले सैनिक. शत्रू कुठे दडलाय, त्यांचे किती संख्याबळ आहे, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र कोणती आहेत आणि किती ताकदीची आहेत याचा काहीच थांगपत्ता नसताना लढून जिंकलेलं हे युद्ध म्हणूनच खूप खडतर होते. 

Friday 24 July 2015

आली आषाढी एकादशी..चला करू पंढरीची वारी ... माझी विठ्ठल रखुमाई !!!

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी ! भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशी यात्रा.



लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरतात, विठ्ठल विठ्ठल च्या नामस्मरणाने अवघे पंढरपूर दणाणून जाते, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना "माउली-माउली" ची हाक देतात, हा अनोखा माऊलीच्या अफाट प्रेमाचा मेळावा बघणार्‍यांचे खरेच डोळ्यांचे पारणे फिटतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

Friday 17 July 2015

हेल्मेट / कार सीट बेल्ट - सुरक्षेची हमी !!!

नुकतीच १५ जुलै २०१५ ला ठाणे - पोलिसांनी देशाचे भवितव्य असलेल्या युवा वर्गाला आपलेसे करण्याची नवी मोहीम आखली आहे अशी एक अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाची माहिती http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2015/07/15023056/youth-protection-campaign.vpf  ह्या स्थळावर वाचनात आली. ह्या बातमीत युवा सुरक्षा अभियानांतर्गत मराठी कलाकारांच्या उपस्थितीत पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २०० हेल्मेटची वाटप केली. यावेळी पोलीस सहआयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, वाहतूक उपायुक्त रश्मी करंदीकर उपस्थित होते.

ठाणे शहर वाहतूक विभाग यांच्यामार्फत मंगळवारी ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात युवा सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यासाठी बायोस्केप या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव, कलाकार स्पृहा जोशी, विजू माने आणि मंगेश देसाई आदींनी रस्त्यांवर नियम पाळणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. तर सहआयुक्त लक्ष्मीनारायण यांनी तरुणाईला शिस्त लावण्याची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असून अन्य महाविद्यालयातही असे कार्यक्रम राबवणार असल्याचे स्पष्ट केले.

ह्यात पोलिस सहाआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनाराय़ण ह्यांनी तरूणाईने हेल्मेट वापरून सुरक्षा नियम आपल्या अंगी बाणवणे किती जरूरीचे आहे ह्याबाबत माहिती दिली. कलाकार स्पृहा जोशींनी ह्या पोलिसांनी सुरु केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यामुळे पोलिस आणि जनता ह्यांमध्ये जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते स्थापन होण्यास हातभार लागेल असा आशावाद व्यक्त केला. रवी जाधव ह्यांनी आपला हेल्मेट असल्यामुळे जीवघेण्या अपघातातून कसा जीव वाचला आणि जरी दुसर्‍या चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला असला तरी हेल्मेट घातले नसते तर त्यांच्या स्वत:च्या जीवाला किती मोठा धोका उद्भवला असता हे स्वानुभवाचे बोल सांगून तरूणाईशी संपर्क साधला. 

खरेतर ही बातमी खरोखरीच एक स्तुत्य उपक्रम आहे ह्यात शंकाच नाही. परंतु त्याच वेळी आपल्या स्वत:च्या सुरक्षेसाठी आपण किती बेपर्वाईने वागतो, किती बेजबाबदारीचे वर्तन करतो, अपघातात आपणच आपल्य़ा चुकांमुळे किती मोठे संकट ओढावून घेऊ शकतो आणि ह्या प्रकारच्या दिसाय़ला लहानशा वाटणार्‍या एका चुकीने वेळप्रसंगी आपण आपला लाखमोलाचा जीव कसा गमावूही शकतो ह्या सर्वाची जाणीव होऊन मन अगदी बेचैन झाले. 


खरेच आपण स्वत:ला सुजाण , सुशिक्षीत म्हणवतो खरे , पण आपल्या स्वत:च्याच जीवावर उदार होऊन असे बेजबाबदारीचे आयुष्य जगण्यात काय मोठेपणा मानतो, कसली धन्यता मानतो ह्याची मनाला बोचक जाणीव "आता तरी " आपल्याला झाली पाहिजे ना? 


Thursday 16 July 2015

श्री. परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.)वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचे पुण्यस्मरण !!!


।। ॐ द्रां दतात्रेयाय नम: । अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ।।

आज आषाढ शुध्द प्रतिपदा - श्री. परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.)वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी ह्यांची १०१ वी पुण्यतिथी !
वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हटले की पटकन आठवते ते घोरकष्टोध्दरण स्तोत्र, दत्तमालामंत्र, करुणात्रिपदी आणि असंख्य स्तोत्र !

घोरकष्टोध्दरणस्तोत्र   
श्रीपाद श्रीवल्ल्भ त्वं सदैव श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।१।।
त्वं नो माता त्वं पिताऽऽप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत्सदगुरुस्त्वम् ।
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्र्वमूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।२।।
पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराऽशु त्वदन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।३।।
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योऽकहर्ता ।
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।४।।
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् । 
 भावासक्तिं चाखिलाऽनन्दमूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।५।।
श्लोकपंचकमेतदयो लोकमंगलवर्धनम् ।
य: पठेत् प्रयतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ।।६।।
।। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य
श्रीमदवासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं घोरकष्टोध्दरणस्तोत्रं संपूर्णम् ।।  

श्री दत्त महाराजांच्या इच्छेनुसार श्री प. प. नृसिंह सरस्वती महाराजांचा पुढील अवतार हा माणगांवी झाला. तो अवतार अर्थातच श्री गणेशभट्ट व सौ. रमाबाई यांच्या पुत्ररुपाने १८५४ साली अवतरला असे वाचनात आले. वासुदेवशास्त्री टेंबे म्हणजेच संन्यासानंतरचे श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज , जे थोरले महाराज म्हणून सुध्दा ओळखले जातात.



Wednesday 15 July 2015

१५ जुलै - श्रीसाईसच्चरितकार हेमाडपंताचे पुण्यस्मरण !!!


आज १५ जुलै ! ८६ वर्षांपूर्वी १५ जुलै १९२९ साली हेमाडपंतांनी श्रीसाईबाबांच्या  चरणी  आपला देह समर्पित केला . आज ज्यांच्यामुळे परमार्थाची वाट गवसली, माझ्या जीवनाला सदगुरुंचा परीस स्पर्श लाधला त्या माझ्या अत्यंत लाडक्या हेमाडपंताची म्हणजेच श्रीसाईसच्चरितकार श्री.गोविंद रघुनाथ दाभोलकर उर्फ अण्णासाहेब ह्यांची पुण्यतिथी. त्यानिमित हेमाडपंताचे  पुण्यस्मरण करू या, 
हेमाडपंताच्याच शब्दांत मांडायचे तर - 
ज्यांचेनि पावलों परमार्थातें । तेचि कीं खरे आप्त भ्राते । सोयरे नाहींत तयांपरतें । ऐसें निजचित्तें मानीं मी ।।

Tuesday 14 July 2015

मुंगी -एक अद्भुत, विलक्षण विश्व आणि सामूहिक बुध्दीमत्ता ( SWARM INTELIGENCE) - 2

जीवसृष्टीतील अनेक लहान -मोठे जीव आपण आपल्या सभोवताली वावरताना पहातो. छोटे-मोठे किडे, मुंगी, डास, झुरळ, पाल हे तर आपल्या घरात जणू काही  "हे माझे घर " अशा थाटाने न बोलावता सुध्दा हक्काने येऊन आपल्यासोबतच राहतात. आपल्याला त्यांचे अस्तित्व अगदी नकोसे आणि त्रासदायक वाटते. त्यांना आपल्या घरातून बाहेर हाकलण्यासाठी आपण कीटकनाशके फवार, औषधी पावडरी वापर , प्रतिबंधक रेषा मार असे नाना उपायही अवलंबतो. परंतु त्यांना आपल्या घराबाहेर करणे किती कष्टाचे आणि अशक्यप्राय आहे याची जाणीव बहुधा आपल्या सर्वांनाच चांगल्याच माहितीतली आहेच. 

या जीवांपकी 'मुंगी' हा स्वत:मध्ये अफाट सामर्थ्य घेऊन जीवन जगणारा अतिसामान्य कीटक आहे असे आपल्याला प्रथमदर्शनी वाटू शकते. परंतु मुंगीचे अभ्यासक व संशोधक मात्र वेगळेच मत मांडतात. त्यांच्या मते मुंगी आणि तिचे संपूर्ण विश्व , तिचे सामाजिक जीवन , तिची जीवननिष्ठा आणि जगण्यातील शिस्त, जगण्याची कार्यप्रणाली, संरक्षणप्रणाली आणि युद्धनीती, सफाई पध्दती, अन्नशोधपद्धती, संदेशवहन, तिच्या वसाहती, बुरशीची शेती करण्याची त्यांची पारंपरिक पद्धती, मावापालन, किडय़ांचा सांभाळ करणारी गोशाळा, तेथील स्वच्छता, कामविभागणी असे सारेच थक्क करून सोडणारे विश्व आहे.

विल्सन आणि हॉलडॉब्लर ह्या दोन महान संशोधकांनी तर आपले अवघे जीवन मुंग्याचा अभ्यास करण्यात वेचले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या दोघांनी लिहीलेले " द ऍन्ट्स " हे पुस्तक ह्या त्यांच्या संशोधनाचा आढावा घेण्यास खूप मोलाचा हातभार लावते.

चला तर मग फेरफटका मारू या ह्या अद्भुत अशा मुंग्याच्या विश्वात -

Tuesday 7 July 2015

बायोइंजिनिअरिंग- वाळा- खस गवताची लागवड - Landslideसाठी प्रतिबंध

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला , पूर येऊ लागले की त्याच्या सोबतीने भूस्सखलन होणे, दरडी कोसळणे , भूघसरण होणे म्हणजेच Landslide होणे ह्या प्रकारच्या आपत्तीही तोंड वर काढू लागतात.

नुकतीच वर्तमानपत्रात सोमवारपासून उत्तर बंगालमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री दार्जिलिंगमधील कलिम्पोंग आणि मिरिक येथे भूस्खलन झाले. दार्जिलिंग - सिक्कीमला देशाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (एनएच) 55 वर देखील दरड कोसळली आणि वाहतूक कोंडी झाली आहे. संततधार पावसामुळे जमिनीची धूप होऊन दार्जिलिंग परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मंगळवारी रात्री १जुलै २०१५ ला सुमारे ३८ जणांचा बळी गेला आहे. दार्जिलिंगमध्ये २५ ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग १० व ५५वरील वाहतूक विस्कळ‌ित झाली. ही बातमी वाचली. आणि त्यानंतर NIDM ( National Institue of Disasater Management) मधील Geo Hazards भागाचे मुख्य आणि अध्यापक (Professor) असणार्‍या तञ व्यक्तीचे मत वाचण्यात आले ज्यात त्यांनी Landslide होण्यामागची कारणमिमांसा केली होती आणि Landslide थोपविण्यासाठी जमिनीची मशागत करून Vetiver grass ची लागवड केल्यास प्रतिबंध होऊ शकतो असे मत व्यक्त केले होते ज्यामुळे मनात जिज्ञासा दाटली की निसर्गाच्या प्रकोपाला एक साधेसुधे गवत कसा काय प्रतिकार करून थोपवू शकते. 

पण त्याआधी दरड कोसळणे किंवा Landslide होण्यामागची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊ या. साधारणपणे ढोबळमानाने डोंगर किंवा टेकडी ही त्रिकोंणी आकाराची असते. ह्यातील भूमध्य  स्थिती नीट असते तोवर घसरण होण्याची शक्यता नसते. पण जेव्हा कोणत्याही बाजूच्या पायाकडची जमीन किंवा माती ही पकड सैल झाल्याने घसरू लागते तसे भूमध्याची जागा बदलते आणि संपूर्ण वरचा भाग खाली कोसळू लागतो.

भूस्सखलन होणे म्हणजेच दरड कोसळणे किंवा भूघसरण होणे . धो धो पडणार्‍या पावसात साचलेले पाणी उताराच्या दिशेने वेगाने वाहते आणि पाण्याच्या जोराच्या वेगाने तेथील भुसभुशीत झालेली मातीही वाहू लागते. अशा वेळी मातीची पकड कमकुवत वा ढिली पडली की मोठा भूभाग घसरून पडण्याची शक्यता वाढते , ज्यामुळे मातीचे ढिगारे वा दरडी कोसळून पडण्याची भीती वाढते, ज्याच्या प्रचंड द्बावाखाली लोक चेंगरून मरू ही शकतात. त्यामुळे अशा दरडी कोसळण्याच्या संभाव्य शक्यता असलेल्या जागी जल-मृद्‌संधारणासाठी वनीकरण अत्यंत गरजेचे असते.

आपण सारे जाणतो की आपल्या परिसरातील जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चालले आहे; तसेच झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणाचा परिणाम वनसंपदेवर होताना दिसतो. वनांच्या कमी झालेल्या क्षेत्रामुळे ऋतुमानात बदल होत आहेत. जंगलांच्या घटलेल्या प्रमाणामुळे मातीची धूप झाली आहे, जलस्रोतांवर परिणाम झालेला आहे; माती, पाणी इत्यादींवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

एक सें.मी. मातीचा थर तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. खडकांची झीज होऊन विविध सूक्ष्मजीव, शेवाळ, नेचेवर्गीय, अपुष्प, पुष्पवर्गीय वनस्पतींच्या सहयोगाने माती तयार होते. जंगलाचे जमिनीवरील आवरण कमी झाल्याने पर्यावरणात असमतोल निर्माण झाला आहे. अन्नसाखळ्यांचे संतुलन बिघडले आहे. रस्ते दुतर्फा, नद्याकाठ, शेते इ. ठिकाणी जमिनीची धूप होण्याबाबत अत्यंत संवेदनानशील आहेत.

मातीच्या संवर्धनासाठी नैसर्गिक स्थिती आपण जर पाहिली तर पहिल्या पावसानंतर लगेचच गवत येते. या गवतामुळे हजारो टन मातीचे संवर्धन होते; परंतु बऱ्याचशा भूभागावर गवतही आढळत नाही, अशा परिस्थितीमध्ये मोठे नुकसान होते. अशा परिस्थीतीत Vetiver grass ची लागवड केल्यास landslide म्हणजेच दरडी कोसळणे ह्या नैसर्गिक आपत्तीला आळा घालता येऊ शकतो हे वाचून मोठे कुतुहल दाटले आणि Internet search केले असता चक्क आ वासण्याची परिस्थीती झाली.

Vetiver grass म्हणजे चक्क आपले वाळा किंवा खस म्हणून ओळखले जाणारे गवत बरे का !!!


Saturday 4 July 2015

मुंगी -एक अद्भुत, विलक्षण विश्व आणि सामूहिक बुध्दीमत्ता( Swarm Inteligence)

सुटीसाठी ८-१० दिवस बाहेरगावी जाऊन परत घरी आले आणि दार उघडून आत प्रवेश केला तर भरपूर ठिकाणी मुंग्याच्या रांगाच रांगा दिसत होत्या, दाराच्या , खिडक्यांच्या फटींतून त्यांची लगबग आणि मुख्य म्हणजे शिस्त पाहून मला गंमत तर वाटलीच आणि कुतुहलही दाटले की एक एवढासा छोटासा जीव पण अन्नाचा इतकुसा कण मिळवायला किती आटाटी करतो, किती परिश्रम घेतो आणि किती कौशल्याने सारी कामे करतो. तसे मनात आले की मुंग्याच्या ह्या वागण्यात काही तरी अर्थ, सूत्रबध्द संचालन नक्कीच असले पाहिजे. आपण ह्याचा शोध काढला पाहिजे. एकीकडे वाटत होते की Internet लावून शोध घ्यावा आणि दुसरीकडे वाटत होते की काय कटकट ? आता सारी साफसफाई करायला हवी पहिल्यांदा. द्विधा अवस्थेत मनाची कोंडी चालू होती. पण भुकेने पोटात कावळे कोकलत होते त्यामुळे तूर्तास तरी पोटापाण्याची सोय करणे हेच आद्य कर्तव्य होते आणि जे अत्यंत निकडीचे होते. आता मात्र त्या मुंग्याच्या रांगाना पळवून लावणे आणि किचन , किचन मधील ओटा साफ करणे हेच माझे उद्दीष्ट होते . म्हटले आधी स्वत:च्या पोटात पाडू आणि मग त्या मुंग्या कशा स्वत:चे पोट भरतात ह्याकडे वळू.

अन्न पोटात गेले आणि मग बुध्दीची भूक जागी झाली , म्हटले चला एकदा शोध घेण्याचा प्रयत्न तर करू या आणि हाती खूपच अद्भुत , विलक्षण  अशा मुंगीच्या विश्वाची माहिती मिळाली असे मला वाटते.

Swarm Inteligence हा शब्द तसा जास्त परिचयाचा नसावा असे मला वाटते. माझ्याही माहितीतला नव्हता. आता ह्या Swarm Inteligence चा आणि मुंग्याचा काय संबंध असे तुम्हाला वाटले असेल ना, पण थोडे थांबा . आपण त्याचा अर्थ आणि संबंध दोन्ही जाणून घेऊ या.

Saturday 6 June 2015

शिवराज्याभिषेक - भारतीय जनमनातील, इतिहासातील अविस्मरणीय सुवर्ण क्षण !!!

शिवराज्याभिषेक - भारतीय जनमनातील, इतिहासातील अविस्मरणीय सुवर्ण क्षण !!!



निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु | 
अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी |
यशवंत, कीर्तिवंत | सामर्थ्यवंत वरदवंत |
पुण्यवंत, नीतिवंत | जाणता राजा || 

सदगुरु श्रीरामदासस्वामी ह्यांनी आपल्या ह्या स्वशिष्याचे (शिवरायांचे) कौतुक करावे (तेही शिवरायांची सुपुत्र धर्मवीर संभाजी राजे ह्यांना लिहीलेल्या पत्रात ) आणि ते यथार्थ उद्गार संपूर्णत: जेथे जिवंत प्रचिती देत उभे ठाकावेत असे ते  आमुचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराज, शिवबा, शिवछत्रपती अशा अनेक नावांनी ज्यांनी प्रत्येक भारतीयाच्याच नव्हे तर अनेक परदेशीय़ांच्या ही मनाला भुरळ पाडली असे हे रणधुरंधर, परम प्रतापी, न्यायप्रिय, कर्तव्यदक्ष भव्य दिव्य, धीरोदात्त, परम तेजस्वी असे महान व्यक्तीमत्त्व! "दिव्यत्त्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती " ह्याचा जिवंत साक्षात्कार , आविष्कार म्हणजे आमचे शिवराय! आणि अर्थातच अशा आमच्या शिवरायांचा राज्याभिषेक - शिवराज्याभिषेक ही प्रत्येक भारतीयास अत्यंत आवडती , अविस्मरणीय घटनाच म्हटले तर वावगे ठरणार नाही असे वाटते.

Friday 5 June 2015

जागतिक पर्यावरण दिन - पर्यावरणाचा वसा !!!!

आज ५ जून म्हणजे जागतिक (विश्व ) पर्यावरण दिन ! 



संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंबलीने १९७२ च्या स्टॉकहोम येथील पर्यावरणविषयक परिषदेच्या निमित्ताने ‘५ जून’ हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जाहीर केला. पर्यावरणविषयक जागतिक जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याबाबत राजकीय सहाय्य व कृती वाढवण्यासाठी हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. 



UNEP म्हणजे United Nations Environment Programme द्वारे दरव्रषी ५ जून  रोजी जागतिक पर्यावरण दिन वेगवेगळ्या संकल्पना मांडून साजरा करण्याचे आव्हान केले जाते.‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात सर्व लोकांच्या सहभागाला महत्त्व असून यातून शासन, सामाजिक गट, कारखानदार या सर्वांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी प्रेरणा मिळते. जगभरातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये हा दिवस निरनिराळ्या पध्दतींनी साजरा केला जातो. यात पथयात्रा, हरित सोहळे, निबंध व पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम यासारखे उपक्रम राबविले जातात. हा दिवस साजरा करून आपण स्वत:ला व इतरांना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रेरित करत असतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.

Wednesday 3 June 2015

वटवृक्षाची पूजा - भूमातेची अंबज्ञता - 2

आधीच्या लेखात आपण वडाचे औषधी गुणधर्म पाहिले, आता आपण वडाच्या झाडासंबंधी अजून काही महत्त्वाचे मुद्दे पाहू या - 

वड हा मंजिराच्या जातीचा वृक्ष.  त्याला फुटणार्‍या पारंब्या जमिनीच्या खोल भागात जातात आणि त्याला मुळे फुटून पुन्हा वटवृक्ष तयार होतो. त्याचा रुंद खोड आणि विस्तारीत फांद्यामुळे होणारा भव्य विस्तार, डौलदारपणा, दाट पानांमुळे मिळणारी दाट सावली यामुळे पूर्वीच्या काळी हा वृक्ष वाटसरूचे आश्रयस्थान असे. म्हणूनच याला आधारवडही संबोधले जाते. फार पूर्वी आणि आजही खेडय़ातून बैलगाडीने किंवा पायी प्रवास करणारे शेकडो पांथस्थ या वटवृक्षाखाली निद्राधीन होऊन विश्रांती घेतात. हिंदी मध्ये व्यापारी लोकांना ’बनिया’ असे म्हणतात. ब्रिटीश जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी पाहिले की हे ’बनिया’ लोक व्यापाराच्या वेळी प्रवास करताना ह्या झाडाच्या विशाल सावलीत बसून चर्चा करतात , मिंटीग घेतात आणि म्हणून त्यांनी ह्या झाडाला बनिया वरून बॅनियन ट्री -     ( Banyan Tree) असे नाव ठेवले.



Tuesday 2 June 2015

वटवृक्षाची पूजा - भूमातेची अंबज्ञता

वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा ! हिंदू कालगणनेनुसार मराठी वर्षातील ज्येष्ठ महिना हा नावाप्रमाणेच ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा म्हणावा लागेल. संपूर्ण वर्षभरातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो.( २१ जून - ह्या वर्षी अधिंक महिन्यामुळे तो आषाढ शुध्द पंचमीला येतो - अपवाद  अधिक महिना कालगणनेनुसार) उन्हाळ्याची दाहकता सोसून सर्व चराचर आर्ततेने पावसाची कधी चाहूल लागेल म्हणून आसुसलेले असते आणि अशावेळी आभाळ काळ्या मेघांनी  भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला, कधी पाउस येईल वाटते आणि मध्येच पावसाची हलकी सर येणार्‍या पावसाळ्याची आठवण करून देते. परतीच्या वाटेवर पाऊल ठेवत निरोप घेणारा उन्हाळा नि सुरू होऊ पाहणारा पावसाळा यांची जणूकाही गळाभेट या महिन्यात पाहता येते. ज्येष्ठात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. या पौर्णिमेला अध्यात्मिक  व धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्यामागचे वैज्ञानिक महत्त्वही समजून घेतल्याने खर्‍या अर्थाने आजच्या वैज्ञानिक युगाशी मिळते जुळते घेण्यासारखे होईल. 

भारतीय संस्कृती, शास्त्र, परंपरा या महान ऋषी-मुनींच्या वैज्ञानिक, अध्यात्मिक चिंतनातून निर्माण झाल्या आहेत ज्यात त्यांनी चराचरातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अभ्यासिले, जाणले आणि समाजात रुजवले, बिंबवले ते अनेक सण, उत्सवांच्या आधारे. त्यात त्यांनी निसर्गाचा समतोल सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या वृक्षांचे अनन्यसारधारण महत्त्व आहे हे जाणूनच वृक्ष, वेली झाडांचे मानवी जीवनाशी पूर्वापार नांत जुळवून दिले. 

माणसाला निरोगी, निरामय जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची खूप मदत होते. याशिवाय झाडांची पाने, फुले फळे अगदी वाळलेले लाकडे देखील मानवाला उपयोगीच असतात. या अनमोल देण्याचे जपणूक करावी, संवर्धन करावे हा संदेश पूर्वजांनी पूर्वापार काळापासून समस्त  मानवजातीला दिला. म्हणूनच विविध व्रते, उत्सव, सण तसेच विविध देवी देवतांच्या पूजेत झाडांना, त्यांच्या पाना-फुलांना फळांना मानाचे महत्त्वाचे स्थान आहे. वृक्षांचा महिमा वाढून वृक्ष जतन करण्यास माणूस प्रवृत्त व्हावा, म्हणूनच आपल्याकडे वटपौर्णिमेसारखी व्रतं, परंपरा पाळली जातात. गरज आहे ती आपण ती व्रते सुजाण पणे पाळण्याचा. वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची महिमा आपण जर समजून घेतला तर खरे वृक्षपूजन करण्याचा प्रयत्न आपण केला असे आपण म्हणू शकतो. 


Friday 29 May 2015

उष्णतेची लहर (Heat wave) आणि उष्माघात - उन्हाळ्यातील आपत्ती - २९ मे २०१५

उष्णतेची लहर (Heat wave) आणि उष्माघात - उन्हाळ्यातील आपत्ती -  २९ मे २०१५



रोजच्या मृतांच्या वाढत जाणार्‍या आकडेवारीने वृत्तपत्रातील ह्या बातमीने अधिकच लक्ष वेधून घेतले.  
यंदाचा उन्हाळा जीवघेणा ठरला असून देशात उष्म्याच्या लाटेने आतापर्यंत १७०० वर लोकांचा बळी घेतला आहे. सध्या हैदराबाद - तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील उष्णतेची लहर काही कमी होत नसल्याचेच दिसून येत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात उकाड्याने मृत्यू झाल्याची नोंदीत दिवसागणिक अधिकच वाढ होत चालल्याचे आढळून येते आहे. कालच्या गुरुवारपासून ( २८ मे २०१५) फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्माघाताने ४१४ वर जणांचा बळी घेतला आहे.

जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेची ही लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशात अनेक राज्यांत पारा ४७ अंशावर असून अनेक राज्यांत सरासरी तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिएसपर्यंत पोहोचले आहे. केंद्र सरकार उष्णतेच्या लाटेने तत्पर झाले असून डॉक्टरांच्या सुट्‌या रद्द केल्या आहेत.

आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यात उष्णतेच्या बळींची संख्या सर्वाधिक आहेत. या राज्यात तापमानाचा पारा ४५ अंशांपेक्षा अधिक आहे. दोन्ही राज्यांमध्ये उष्णतेची लाट आणखी किमान दोन दिवस कायम राहील असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ईशान्य भारतातून येत असलेल्या उष्ण वाऱ्यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रात्रीचे तापमानही भारतात वाढू लागले आहे. सरकारने सर्व राज्यांना दक्षता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयांमध्ये अतिरिक्त वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत.

Sunday 26 April 2015

आमच्या घराचा हरवलेला (?) आनंद - आपत्ती व्यवस्थापनाचे पहिले वास्तविक पाऊल !!!

संध्याकाळची वेळ होती. शाळेतून कंटाळून, दमून भागून आलेली बच्चे कंपनी खेळायला बिल्डींगच्या परिसरात जमू लागली. धावाधावी, पकडापकडी, लपंडाव असे खेळ रंगू लागले आणि बघता बघता अख्खा परिसर त्यांच्या ओरडण्याच्या, किंचाळण्याच्या आवाजांनी दुमदुमून गेला होता.

काही लहान मुलांचे उडया मारायचे खेळ चालले होते. आजूबाजूला बसायला जे सुमारे २ - २ १/२ फूट उंचीचे बाकडे बनवले होते त्यावरून ६-७ वर्षाची ती लहानगी चिमुरडी बाळे उडया मारून आपण किती शूर आहोत हे दाखवून आपाआपसात गोंधळ घालत होती.

त्यातल्या काही मुलांचे बोलणे कानी पडले ए मी ना जिन्यावरून २ पायर्‍यांवरून उडी मारू शकतो.

दुसर्‍याने त्याला तोंड वेंगाडून दाखवत चिडवले हे त्यात काय एवढे मोठे सांगतोस तू. मी तर ना ३ पायरीवरून पण उडी मारतो.

प्रत्येक जण आपण किती उंचावरून उडी मारू शकतो हे अगदी तावातावाने रंगवून सांगत होता.

तेवढ्यात एक चिमुरडी म्हणाली त्यात काय ? तुम्ही कोणी गच्चीवरून खाली उडी माराल का?

आधी जरा सगळे घाबरले आणि गोंधळले.

तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणाला त्यात काय ते टी.व्ही.वर दाखवतात ना तसे पोटाला दोरी बांधून मारायची उडी.

एका भित्र्या मुलाने विचारले आपण पडून हात पाय मोडले तर? आई-बाबा किती मारतील, झोडूनच काढतील बघ...

त्या प्रश्न विचारणार्‍या चिमुरडीने सांगितले  फक्त उडी मारायच्या आधी suicide note लिहून ठेवायची ...

अग ते suicide note काय असते ? ह्या श्रावणीचे तर काही तरी नवीनच असते बाबा....

आता आश्चर्याने अवाक होऊन तोंड वासायची पाळी  माझी  होती . एव्हाना तेथे असलेल्या काही जणांची बाचाबाची सुरु  झाली... ह्या एवढ्या लहानशा चिमुरडीला कसे काय माहिती?

एक वयस्क बाई म्हणाल्या हे सारे त्या टी. व्ही. वरच्या नको नको त्या मालिका, सिरीयल्स पाहण्याचे परीणाम. किती वेळा सांगून आई - बापांना कळत नाही. लहान मुले जे बघतात ते करायला बघतात. त्यात चांगले काय , वाईट काय हे त्यांना कुठे कळते. म्हणून तर त्यांना वेळ द्यावा लागतो.
दुसरी कडाडली हल्लीच्या आई-बापांना वेळ असतो का मुलांना द्यायला. कामावरून आले तरी कोठे लक्ष असते घरात... लहान मुले एकतर बिचारी वाट पाहून पाहून दमतात आणि आई बाबा नाही लक्ष देत असे दिसले की मुकाट्याने टी.व्ही. म्हणा., Computer म्हणा नाहीतर ते मोबाईल , व्हिडीओ गेम्स घेऊन बसतात आणि शिकतात मग हे असले नको ते...

Friday 24 April 2015

श्री आद्य शंकराचार्यविरचितं श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्‌ भाग - २ !!!

आता जाणून घेऊ  या  आदिमातेचे लाभेवीण प्रेम  ….


जगन् मात: मातस्तव चरणसेवा न रचिता 
न वा दत्तं देवि द्रविणम् अपि भूयस्- तव मया ।
तथा अपि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत् प्रकुरुषे 
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।।

आई तुझ्या चरणांची सेवा मी कधीच केलेली नाही , तुझ्यासाठी एक कवडीसुद्धा खर्च केलेली नाही गं ! तरीदेखील माझ्यासारख्या अधमावार तु अनुपम स्नेह करतेस ह्याचे कारण एकच "कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. शरीराने ,मनाने , बुद्धीने कधीही तुझी भक्ती, सेवा, दान केले नाही तरीही तु माझ्यावर निरुपम प्रेम करतेस कारण मी कितीही कुपुत्र असलो तरी तु कुमाता नाही आहेस.


Wednesday 22 April 2015

श्री आद्य शंकराचार्यविरचितं श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्‌ !!!

आज श्री आद्य शंकराचार्य जंयती.

श्री आद्य शंकराचार्यांनी अखिल मानव समाजाला श्री देवी अपराध क्षमापन स्तोत्र, महिषासुरमर्दिनी स्तोत्र ह्या सारखी आदिमातेची अनेक स्तोत्रे देऊन आदिमातेच्या अनिर्वचनीय रूपाला शब्दबध्द करून जणू काही साक्षात तिचे प्रत्यक्ष दर्शनच घडवले आहे असेच वाटते.

आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या १८ हातांमध्ये शस्त्रे असतात म्हणून काही लोक भोळ्या, भाबड्या भक्तांना घाबरवतात की हे देवीचे उग्र रूप आहे , तिच्या सर्व हातांत तर शस्त्रे आहेत , मग ती तुम्हाला मदत कशी करणार, ती सदैव उग्र रूपच धारण करते. त्या सर्व प्रश्नांना अगदी सोप्या पध्दतीने उत्तर देऊन शंकराचार्य निरुत्तर करतात. आदिमाता एवढी अपार करुणामयी आहे , तिची करुणा आपल्या लेकरांसाठी कशी सदैव भरभरून वाहते ह्याचे एवढे सुंदर वर्णन अजून तरी कोठे वाचनात नाही आले. आदिमाता उग्र रूप धारण करते , हातात शस्त्रे धारण करते ते दुष्ट . असुरांचा नि:पात करायला, त्यांनाचे निर्दालन करून श्रध्दावानांचे संरक्षण करायला , अन्यथा ती सर्वतोपरी प्रेमळ आणि प्रेमळच आहे, तिच्या इतुकी क्षमाशील अन्यत्र कोठेही सापडणे केवळ अशक्य...आदिमाता कशी आपल्या बालकाच्या अपराधाला पोटात घालून सदैव क्षमा करण्यास तत्पर असते हे जाणून घेऊ या , शंकराचार्यांच्या ह्या महान स्तोत्रातून ...      

चला तर मग आज त्यांच्या जंयतीच्या निमीत्ताने ह्या स्तोत्रांची आठवण करून त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करू या आणि आदिमातेच्या प्रेमात आकंठ अवगाहन करू या...
मूळ संस्कृत स्तोत्र पुढीलप्रमाणे आहे-

।। श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्‌।।

न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदपि न च जाने स्तुतिकथा।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम्‌।।1।।
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत्‌।
तदेतत्‌ क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।2।।
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।3।।
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।4।।
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम्‌।।5।।
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ।।6।।
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम्‌।।7।।
न मोक्षस्याकाङ्‌क्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रूक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः।
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मयि अनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव।।9।।
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।10।।
जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि।
अपराधपरम्परापरं न हि माता समुपेक्षते सुतम्‌।।11।।
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवि यथा योग्यं तथा कुरु।।12।।

।। एवं श्रीशंकराचार्यविरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम्‌।।




प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog