Tuesday 24 November 2015

त्रिपुरारी पौर्णिमा

दीपावली असो वा कार्तिक पौर्णिमा असो दीप उजळवून अंधकाराचा नाश करण्याची शिकवण देणारे हे भारतवर्षातले सण वा उत्सव आपल्याला आपल्या आदर्श, महान भारतीय परंपरेची ओळखच करून देतात जणू काही ! दिवे लावून परमेश्वरी कृपेच्या सत्याचा उजेड आपल्या मनात पडावा यासाठी असे दीपोत्सव आवश्‍यक असतात आणि त्यांपासून प्रेरणा घ्यायची असते ती निराशाजनक वातावरणातही न डगमगता खंबीरपणे, मनोधैर्य उंचावून , "त्या" एकावर , "त्या"च्या अगाध सामर्थ्यावर अढळ , अविचल श्रध्दा ठेवून जीवनात, "त्या" भगवंताच्या तेजाचा वारसा जागवायचीच असे मला वाटते. 

आपल्या भारतवर्षातील बहुतेक सण, उत्सवांमागील कथा या दुष्ट-निर्दालनाच्या असतात. यावरून असे लक्षात येईल की आपण पराक्रमाचे पूजक आहोत. पण पूजा करून पराक्रम विसरून गेलो तर काय उपयोग? सांप्रतकाली आपली तशीच अवस्था झाली आहे असेच चित्र दिसू लागले आहे व ते पाहून संभ्रम पडतो की क्षात्रतेज आटू लागले आहे की काय? रणधुरंधर योध्दा बनून संकटाशी झुंज देण्याचे , लढवय्या वृत्तीचा परिपोष करून प्रारब्धावर मात करण्याची आम्हा भारतीयांची झुंजार वृत्ती , रणमर्दानी शक्ती कुठे लोप पावत चालली आहे का? सैन्यात जाऊन पराक्रम गाजवण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा आम्ही सुखासीनता आणि चंगळवादी भोग संस्कृतीचे पुजारी बनून अध:पतनाकडे तर नाही झुकत आहोत ना? छत्रपती शिवराय, राणा प्रताप, गुरू गोविंदसिंह, शंभू राजे, पहिला बाजीराव , सावरकर, भगतसिंग अशा क्रांतिकारक वीरांची चरित्रेच आजच्या पिढीला माहिती करून घ्यायलाच हवीत आणि त्यांच्यातील असीम पराक्रम अंगी बाळगायला हवा , त्यांची संकटांवर विजय मिळविण्याची इच्छा, तेज, साहस आणि क्षात्रवृत्ती परत नव्याने चेतवायला हवीच ....अन्यथा मरगळ आलेल्या समाजाची दैन्यावस्था पाहून -

कुसुमाग्रजांसारख्या कवीला खंत व्यक्त करण्याची दुर्दैवी पाळी ओढावते  -
सूर्यकुलाचा दिव्य वारसा, प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे। 
काळोखाचे करूनी पूजन, घुबडाचे व्रत वरू नका।।.......... 

भानु म्हणजे सूर्य त्यावरून "भारत " ह्या शब्दाचा मला भावलेला अर्थ म्हणजे - 
"भा' म्हणजे तेज आणि "रत' म्हणजे नित्य पूजन करणे. तेजाचे पूजन करणारा तो भारतीय. नुसताच भारतात राहणारा तो भारतीय असे नव्हे! म्हणूनच आपली भारतीय हिंदवी तेजोमयी संस्कृती असा दिव्य संदेश देते आपल्या सणांतून , उत्सवांतूनही !
त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा . कार्तिक महिन्यातील शुध्द पक्षातील ही पौर्णिमा "त्रिपुरारी पौर्णिमा"म्हणून साजरी केली जाते.
त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे मानवी जीवनात प्रकाश, उजेड, आनंद देणारा उत्सव. आपल्या मनातील क्रोध, द्वेष, मत्सर नाहीसा करून भगवान शिव-शंकराची पूजा करावी, आराधना करावी व सुख-शांती याची मागणी करावी. असा संदेश या उत्सवातून मिळतो.

आता त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यामागची जनमानसांतील कथा बघू या....
कार्तिक शुध्द पौर्णिमा म्हणजेच त्रिपु्रारी पौर्णिमेशी निगडीत कथेशी रांजणगाव व महागणपतीच्या आणि महडच्या वरदविनायकाचा संबंध आहे असे अष्टविनायक महात्म्य वर्णिते.

रांजणगाव - महागणपती - त्रिपुरारी पौर्णिमा 

Wednesday 18 November 2015

HAPPY BIRTHDAY OUR BESTEST DAD !!! We Love YOU DAD !!!

हरि ॐ.
माझ्या जीवनाचा एकमेव सच्चा सांगाती - माझे सदगुरु, माझे लाडके बापू म्हणजेच डॉक्टर अनिरुध्दसिंह जोशी !


तुम ही हो माता पिता तुम्ही हो
तुम ही बंधू , सखा तुम्ही हो

तुम्ही हो साथी तुम ही सहारे
कोई न अपना सिवाए तुम्हारे

तुम्ही हो नैया तुम्ही खिवैया
तुम ही हो बंधू सखा तुम्ही हो ...

जो खिल सके न वो फूल हम हैं
तुम्हारे चरणों की धुल हम हैं

दया की दृष्टि सदा ही रखना
तुम ही हो बंधू सखा तुम ही हो...



Sunday 15 November 2015

सेतू

सेतू शब्द उच्चारताच डोळ्यापुढे पटकन चित्र उभे राहते ते रामायणातील साक्षात श्रीराम प्रभूंच्या आज्ञेने व प्रत्यक्ष श्रीहनुमंतानी पाषाणावर स्वत:च्या हाताने रामनाम लिहून वानरसैनिकांकडून लंकेला जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधून घेतला होता त्या सेतूचे ! वानरसैनिकांनी प्रभु रामचंद्राची आज्ञा पाळली, हनुमंताच्या सांगण्यावरून पाषाण उचलण्याचा पुरुषार्थ केला आणि पहिले पाऊल उचलले होते. 


संत तुलसीदास "सुंदरकांड" मध्ये सांगतात की सीतामाईचा शोध घेण्यासाठी हनुमंताने एकट्याने आकाशातून उड्डाण केले होते आणि त्याला त्यावेळेस जाणवले होते की हा समुद्र पार करणे खूप कठीण आहे कारण त्या सागरात अनेक मगरी , अजस्त्र मोठाले जलचर प्राणी, भोवरे , खडक आहेत. तसेच त्या सागरात निशाचरी नावाची मायावी राक्षसी राहत होती जी हवेतून उडणार्‍याची सावली पकडून त्याला गिळते त्यामुळे ह्या समुद्रात उडी मारून पोहून जाणे , नौकेने प्रवास करणे किंवा आकाश मार्गे हवेतून उडत जाणे कठीणच नाही तर अशक्य आाहे. परंतु हनुमंताचा आपल्या प्रभु श्रीरामांवर अढळ विश्वासही होता की माझ्या भगवंताच्या, माझ्या प्रभुच्या , श्रीरामांच्या नावाने अशक्य ते शक्य सहज होऊ शकते. ह्याच हनुमंतातच्या एकमेव विश्वासापोटी आपण पाहतोच की पाषाण सुध्दा समुद्राच्या पाण्यावर न बुडता तरंगतात. 

सामान्यत: विज्ञानाचा नियम पाहू जाता एखादी जड गोष्ट पाण्यात टाकली तर ती बुडते आणि हलकी गोष्ट पाण्यावर तरंगते. आता पाषाण म्हणजे तर मोठाले दगड किंवा शिळाच ! पण ज्या वेळी हनुमंत त्याच्या लाडक्या भगवंत प्रभु श्रीरामाच्या चरणांवरील प्रेमाने, भक्तीने पाषाणावर "रामनाम " लिहीतो तेव्हा मात्र विज्ञानाच्या नियमाला डावलून ते सर्व पाषाण समुद्राच्या पाण्यावर तरंगतात, एवढेच नव्हे तर श्रीरामांची कित्येक कोटी वानरसेना त्या सेतूवरून समुद्र पार करून लंकेला पोहोचली देखिल. ही असते भक्तीची ताकद, भगवंताच्या चरणांवरील विश्वासाचे सामर्थ्य !      
    
आता सेतू म्हणजे साध्या सरळ शब्दांत मांडायचे झाले तर दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या गोष्टींना जोडणारा दुवा ! 

Saturday 14 November 2015

मधुमेह- गोड विषाच्या आपत्तीचे व्यवस्थापन

१४ नोव्हेंबर म्हटले की आम्हा भारतीयांना बाल दिन आणि चाचा नेहरू आठवतात , पण जगात १४ नोव्हेंबर हा दिवस एका विशीष्ट कारणासाठी साजरा केला जातो. काय आहे बरे वेगळे कारण ? चला तर जाणून घेऊ या -

आज शनिवारी ऑफीसला सुट्टी असली तरी १४ नोव्हेंबर निमीत्त " Walkethon" आणि मधुमेह अर्थात डायबेटीस संबंधी जनजागरूकता वाढविण्याच्या हेतूने ऑफीसने सर्व कर्माचार्‍यांसाठी "मधुमेह - जागरूकता" परिसंवाद आणि शिबीराचे आयोजन केले होते. एक तर सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी झोप काढण्याच्या मनसुब्यावर पाणी पडले होते आणि त्यातून कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबादारी असलेल्या विभागाच्या कर्मचारी वर्गाला नियोजित वेळेच्याही २ तास आधीच पोहचायचे होते, त्यामुळे त्या विभागाचे कर्मचारी तणतणतच कार्यक्रमाच्या नियोजित स्थळी पोहचले होते.  

परंतु मधुमेहाबाबत झालेल्या परिसंवादानें तर प्रत्येकाचे डोळे खाडकन उघडले होते आणि आपल्या आळसापोटी नियमित व्यायाम न करून, खाण्याच्या गोष्टींचा मोह न टाळता आल्याने अनावश्यक चरबट गोष्टी खाऊन, जंक फूडच्या वेडापायी चुकीचे खाणे खाऊन आपणच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या हातांनीच स्वत:च्या पायावर कसा धोंडा मारून घेतलाय ह्याबाबत खडसून कान उघाडणी झाली आणि आपल्या चुकांची किती मोठी भरपाई  आपल्याला स्वत:ला आणि आपल्या कुटूंबीयांना, आप्त-स्वकीयांना करावी लागेल ह्या भीषण वास्तवाशी चांगलाच परिचयही झाला. सकाळचा राग कुठेच पळाला होता आणि ऑफीसच्या कार्यक्रम नियोजनाचे महत्त्व मनापासून पटले होते. मनातल्या मनात प्रत्येक जणच परमेश्वराकडे आभार व्यक्त करीत होता.   
       
जागतिक मधुमेह दिवस - दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरूवात जागतिक मधुमेह फेडरेशन (World Diabetes Foundation )  आणि  जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health Organization )  संयुक्तपणे केली. मधुमेहामुळे होणार्‍या रोगाच्या तक्रारीविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या दिवसाची सुरूवात करण्यात आली. फ्रेड्रिक बॅटिंग व चार्ल्स बेस्ट यांनी सर्वप्रथम इन्शुलिन तयार करण्याची कल्पना जगासमोर मांडली. फ्रेड्रिक बॅटिंग ह्याचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस असल्यामुळे पुढे १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करण्याचा पायंडा पडला.


Sunday 8 November 2015

धनत्रयोदशी व धनलक्ष्मीपूजन ( श्रीयंत्र पूजन )

धनत्रयोदशी म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशी -दिपावलीचा दुसरा दिवस ! 
चला तर पाहू या धनत्रयोदशीच्या दिवसाचे माझे सदगुरु श्री अनिरुध्द बापूंनी सांगितलेले महत्त्व (दैनिक प्रत्यक्षच्या अग्रलेखातून) 
धनत्रयोदशी म्हणजे धनाच्या सन्मानाचा व धनलक्ष्मीच्या आणि कुबेराच्या पूजनाचा दिवस ! वेगवेगळ्या प्रकारे त्या त्या प्रदेशांतील रीतिरिवाजांनुसार विवीध प्रकारे ही पूजा वा पूजन केले जात असले तरी सर्वत्र पूजन केले जाते ते धनाचेच !  
धनत्रयोदशीला धनलक्ष्मीपूजन केले जाते आणि लक्ष्मीपूजनाला ऐश्वर्यलक्ष्मीपूजन केले जाते. धनलक्ष्मी व ऐश्वर्यलक्ष्मी ही एकाच लक्ष्मीमातेची दोन वेगवेगळी नामे आहेत, वेगेवेगळी रुपे तर नाहीत आणि वेगवेगळी दैवते तर मुळीच नाही. (जसे पार्वती आणि उमा ही दोन नावे वेगळी असली तरी ती मुळात भगवान शिव-शंकराची पत्नी आहे आणि ती एकच आहे, अगदी तसेच) 


Friday 6 November 2015

गो-वत्स द्वादशी अर्थात वसुबारस - दीपावली

दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या? लक्षुमणाच्या..
लक्षुमण कुणाचा? आईबापाचा..
लहान मुले मस्त फेर धरून गात होती , नाचत होती आणि त्यांना पाहून आठवले ते बालपणीचे दिवस. 


मागील वर्षी आम्ही सर्व कुटूबीयांनी गावी जाऊन दिवाळी साजरी करायची ठरवली होती आणि गावाकडच्या वाटेवर ही गाणी कानी पडली , तसे न राहवून आमच्यातल्या बच्चे कंपनीने त्यांच्या आजीला नाना प्रश्न विचारून भंडावून सोडले. आजी, हे गाणे असे काय ग ? आम्ही कधी गाई-म्हशींना ओवाळताना नाही पाहिले कुणाला, आपण तर लहान मुलांना ओवाळतो ना जसे आजी तू आई आम्हाला वाढदिवसाला ओवाळता, मग हे काय़? 
शेवटी आजीने त्यांना आणि सर्व लहान-थोरांना  दिवाळी साजरी करण्या मागच्या आपल्या वैदिक पध्द्तींची माहिती दिली. 

आजीचे बोल ऐकता-ऐकता माझे सदगुरु श्री अनिरुध्दसिंह जोशी ह्यांनी २००६ साली आम्हाला दैनिक प्रत्यक्षच्या अग्रलेखांतून दिलेली माहिती आठवली- 

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog