Saturday 17 December 2016

मेरे साईबाबा का आचरण - आत्मनिर्भरता का सबक ।

हरि ॐ

ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नम:।

मेरे साईबाबा का आचरण - आत्मनिर्भरता का सबक ।

हाल ही में  १६ दिसंबर को हमारे पूरे भारत देश में विजयदिवस मनाया गया । १९७१ साल  में इसी दिन (१६ दिसंबर ) हमारे भारत देश  ने पाकिस्तान को हराकर इतिहास रचा था। आज ही के दिन हमारे सैनिकों ने पूर्वी पाकिस्तान को पाकिस्तान से अलग करके एक नए राष्ट्र को जन्म दिया था। आज यह नया राष्ट्र बंग्लादेश के नाम से जाना जाता है। इसी उपलक्ष्य में हर साल इस दिन को भारत में विजय दिवस के रूप में मनाया जाता है।  



१९७१  के युद्ध में पाकिस्तानी सेना भारतीय फौजों के सामने सिर्फ १३ दिन ही टिक सकी। इतिहास की सबसे कम दिनों तक चलने वाली लड़ाइयों में से एक इस लड़ाई के बाद पाकिस्तान के करीब ९३ हजार सैनिकों ने आत्मसमर्पण कर दिया था।

आधुनिक सैन्य काल में इस पैमाने पर किसी फौज के आत्मसमर्पण का यह पहला मामला था। इस युद्ध में विजय के बाद पाकिस्तान की सेना ने बिना किसी शर्त के समपर्ण किया, १९७१ में हुए इस युद्ध में हमारे देश की तीनों सेनाओं ने संयुक्त ऑपरेशन चलाया था।



विजय दिन की बात चलती है , तो साथ ही में याद आता है २६ जुलाई ! हर साल २६ जुलाई को कारगिल दिन के रूप से मनाया जाता है , आज से सतरह साल पहले १९९९ में कारगिल में घुसपैठी हुई थी और हमारे जवानोंने जान की बाजी लगाकर ओपरेशन विजय में कामयाबी हासिल की थी। यह दिन हमेशा हमें आत्मनिर्भरता का पाठ उचित समय में सिखना कितना आवश्यक है इसकी याद दिलाता है।  
    
नेवीगेशन सिस्टम के लिए आत्मनिर्भरता किसी भी देश के लिए काफी मायने रखती है। एक रिपोर्ट के अनुसार देशी नेवीगेशन सिस्टम आम आदमी की जिंदगी को सुधारने के अलावा सैन्य गतिविधियों,  आंतरिक सुरक्षा और आतंकवाद-रोधी उपायों के रूप में यह सिस्टम बेहद उपयोगी होगा। खासकर १९९९ में सामने आई कारगिल जैसी घुसपैठ और सुरक्षा संबंधी चुनौतियों से इसके जरिये समय रहते निपटा जा सकेगा। यह बताया जाता हैं कि कारगिल घुसपैठ के समय भारत के पास ऐसा कोई सिस्टम मौजूद नहीं होने के कारण सीमा पार से होने वाले घुसपैठ को समय रहते नहीं जाना जा सका। बाद में यह चुनौती बढ़ने पर भारत ने अमेरिका से जीपीएस सिस्टम से मदद मुहैया कराने का अनुरोध किया गया था। हालांकि तब अमेरिका ने मदद मुहैया कराने से इनकार कर दिया था। उसके बाद से ही जीपीएस की तरह ही देशी नेविगेशन सेटेलाइट नेटवर्क के विकास पर जोर दिया गया, और अब भारत ने खुद इसे विकसित कर बड़ी कामयाबी हासिल की है । इसीके फलस्वरूप नेवीगेशन सिस्टम की आत्मनिर्भरता का महत्व उजागर हुआ और आज हमारा अपना भारतीय जीपीएस दुनिया में नाविक के नाम से जाना जाता है। प्रधानमंत्री मोदीजीने कहा कि सालों से मछुआरे और नाविक चांद-सितारों की गति से समुद्र में यात्राएं करते थे। यह उपग्रह उनको समर्पित है। 

मिसाईल मैन जिनकी पहचान है - हमारे भूतपूर्व प्रेसिडेंट ए.पी.जे. अब्दुल कलामजी ने भी हमें आत्मनिर्भरता की सींख हमेशा दी है  ।


आत्मनिर्भरता की  बात से साईबाबा के आचरण की याद आई कि कैसे हमारे सदगुरु हमें जिंदगी के जरूरी चीजोंका सबक अपने खुद के ही आचरण से देतें हैं।





श्रीसाईसच्चरित ग्रंथ में हेमाडपंतजी पहले अध्याय में हमे साईबाबा के गेहू पिसने की कथा बतातें हैं । ऐसे तो साईबाबा के कितने सारे भक्त उस वक्त शिरडी गांव में मौजूद थे, अगर बाबा किसी भक्त से गेहू पिसकर आटा बनाकर देने के लिए कहते , तो क्या कोई भक्त नहीं देता था ? किंतु मेरे साईनाथ तो पूरी दुनिया को अपने आचरण से अच्छी बातों का सबक सिखलाने के लिए हमेशा तत्पर रहतें थें , तो भला बाबा क्यों कहेंगे किसी से अपना काम करने के लिए ? इसिलिए साईबाबा ने खुद ही गेहू पिसना शुरु किया था । वैसे भी हम देखतें हैं कि साईबाबा अपनी कफनी खुद सितें थे, चाहे ५० हो या १०० लोगोंका खाना पकाना हो तो भी साईबाबा खुद दाल, चावल , सब्जी लातें थे. नमक , मरची. तेल आदी मसाला भी खुद अपने हाथोंसे खरीदकर , पिसतें भी थें ।

यानि ये अनंत कोटी ब्रम्हांडो का राजाधिराज होकर भी अपने काम खुद करने की , आत्मनिर्भरता की सींख हमें अपने बच्चोंको खुद के आचरण से देता था ।
इसी कथा से उन्होंने हमें सिखाया की चाहे सांसरिक जिंदगी हो या अध्यात्म हो हर ईंसान को आत्मनिर्भर होना कितना जरूरी है। इसी साईबाबा के आत्मनिर्भरता के पाठ के बारे में एक लेख मैंने पढा और मेरे साईबाबा के अकारण प्यार, उनकी अनगिनत कृपा  का एक नया एहसास हुआ और मेरा साई मेरे लिए खुद कितना कष्ट उठाता था यह जानकर आंखे नम हो गयी । हमारे साई की हर एक बात हमें कोई ना कोई सींख जरूर देती है । आप साईभक्ती का , साईरस का पान यह लेख पढकर करने मत भूलिएगा ।
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/shree-sai-satcharitra-adhyay1-part38/

उस लेख में लेखकने मेरे साईबाबा की अनेक बातोंसे आज मुझे परिचीत करवाया और साईबाबा के चरणों में अधिक प्यार से मैं जुड गयी, शरणागत बन गयी । साईमहिमा का आनंद जितना उठायें उतना कम ही है , तो चलिए आनंद की ओर बढतें हैं ...
   
ओम साईराम

Sunday 11 December 2016

नर देही नरसिंह | प्रगटला तरूपोटी | नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्या गती | |

नर देही नरसिंह  | प्रगटला तरूपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्या गती | |
रामानुजांनी लिहिलेल्या अक्कलकोट स्वामींचे स्तवनातील ह्या ओळी वाचून सदगुरुंचा मानवाचा उध्दार करण्याकरिता अविरत ,अखंडित वाहत असलेला कळवळा , त्यांचे भक्त-अभक्तांच्या हितासाठी कळवणारे मातृहृदयच दावितो. 

बहुतेक आपण सर्वांनीच भक्त प्रल्हादाची आणि त्याच्या वडिलांची म्हणजे हिरण्यकश्यपूचे कथा  लहानपणी ऐकली किंवा वाचली असेलच, ऋषी कश्यपांना दोन पत्नी होत्या. त्यांची प्रथम पत्नी अदितिमति आणि द्वितीय पत्नी दिति होती. अदितिमतिचे लावण्य अप्रतिम होते . हिमालय पर्वताच्या कुशीतील कश्यप ऋषींच्या पिता असलेल्या मरीचि ऋषिंच्या आश्रमामध्ये राहून  ती तपसाधना आणि गुरुकुलसेवा करीत असे,ज्यामुळे अदितिमतिचे सौंदर्य पवित्र तेजाने युक्त होते. ती आपल्या पतीला कश्यप ऋषींना भेटण्यासाठी येते , तेव्हा सर्व ऋषिवर व सम्राट तिला आदराने प्रणाम करतात.

कश्यप ऋषिंची दुसरी पत्नी दितिही अतिशय सुंदर होती ,पण आपले सौंदर्य जपण्यासाठी द्रव्य व औषधींचा व योगसाधनांचा नित्य उपयोग करणे ह्या तिच्या छंदामुळे तिचे लक्ष पति कश्यपाची सेवा, परमेश्वर भक्ती, य याग व गुरुकुलाची देखरेख ह्यावरून पूर्णपणे उडाले होते. अर्थातच ह्यामुळे आपल्या सवतीचे अदितिमतिची इतरांनी केलेली स्तुती पाहून दितिला खेद वाटू लागतो व ह्या खेदाचेच रूपांतर दु:खात होते. दिती सतत अदितिमतिशी स्वत:ची तुलना करू लागते. त्यातच काही काळानंतर अदितिमतिचे ३३ पुत्र कश्यपांच्या आश्रमात येतात. ह्या ३३ पुत्रांना त्यांच्या दिव्य तपोबलामुळे ’देव’ असे म्हणत. ह्या ३३ देवांचे सौंदर्य व तेज पाहून दितिचे मनातील दु:खाचे रूपांतर द्वेषात झाले. ऋषि कश्यपांनी दितिला ’अशी तुलना व स्पर्धा करू नकोस ’ असा उचित सल्ला दिला, पण ’माझे सौंदर्य विश्वात सर्वश्रेष्ठ असले पाहिजे ’ ह्या स्वसौंदर्याच्या श्रेष्ठत्वाच्या आपल्या हट्टापुढे तो दितिने धुडकावून लावला. त्यामुळे कश्यपांनी तिला तपश्चर्या करण्यास सांगितले.   

परंतु दितिचे मन खेद, दु:ख व द्वेषाने खच्चून भरून गेल्यामुळे तिला एकाग्र मनाने तपश्चर्या जमेना. ’आपण आता कधीच अदितिमतिएवढ्या सुंदर होऊ शकणार नाही ’ह्या जाणिवेने दितिच्या मनात प्रखर क्रोध व प्रचंड मत्सर निर्माण झाला. ह्या मत्सर, द्वेष , तुलनेत वाहून गेल्यामुळे दितिकडे ईश्वरभक्ती उरली नाही आणि त्यामुळे दितिचे ६६ पुत्रही तिच्यासारखेच अभक्त अर्थात श्रध्दाहीन बनले आणि जन्मत:च दितिच्या श्रेष्ठत्वाचा गर्व, क्रोध , व मत्सर ह्या गुणांनी युक्त होते,  दितिचे हे ६६ पुत्र ’दैत्य’ नावाने ओळखले जाऊ लागले. हे ६६ दैत्यही आपल्या आईप्रमाणेच मत्सरी होते आणि सतत आपल्या सावत्र भावंडांचा म्हणजेच ३३ देवांना कसे हरविता येईल ह्याच विचारांनी मोठे झाले.  

दितिच्या ह्या ६६ पुत्रांपैकी प्रथम पुत्र ’हिरण्याक्ष’, तर द्वितीय पुत्र ’हिरण्यकश्यपु’ हा होता. आपण ’दशावतराच्या आरतीत " गातो कि दाढे धरूनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी’ हे स्वत:च्या आसुरी  सामर्थ्याने  पृथ्वीला पळवून नेण्याचे कुकर्म हिरण्याक्ष दैत्याने केल्यामुळे परमात्म्याने म्हणजेच महाविष्णूने त्याचा वध केला. त्यामुळे उरलेले ६५ दैत्य नुसते श्रध्दाहीनच नव्हे, तर महाविष्णूचे शत्रू बनले. 

अर्थातच हिरण्यकश्यपु आता स्वत:च्या भावाच्या वधामुळे सूडाने पेटून उठला होता आणि त्याने आपल्या राज्यात महाविष्णूचे नाव घेण्यावर , पूजा करण्यावर बंदी घातली होती. स्वत:ला परमात्मा म्हणजेच सर्व विश्वाचा नियंता , भगवान म्हनून सिध्द करण्याची हिरण्यकश्यपुची प्रबळ इच्छा होती. ह्या हिरण्यकश्यपुचे लग्न ’कयाधु’ नावाच्या ऋषिकन्येशी झाले होते , जी महाविष्णुची निस्सीम भक्त होती . पुढे तिच्याच प्रबळ भक्तीभावातूनच त्यांच्या जगद्विख्यात पवित्र पुत्र ’प्रल्हाद’ ह्याचा जन्म झाला. 

आपल्या मातेकडून महाविष्णूच्या भक्तीचे बाळकडू मिळालेला प्रल्हादही महाविष्णुचा भक्त बनू लागला . प्रल्हाद आपल्या पित्याच्या हिरण्यकश्यपुच्या प्रचंड विरोधाला आणि अमानुष हाल-अत्याचारांनीही न भिता, डगमगता महाविष्णुची अविचल भक्ती करू लागला होता आणि शेवटी ’प्रल्हादाकारणें स्तंभी नरहरी गुर गुरसी ’ ह्या नुसार आपले भक्तवत्सल , दीनदयाळ , शरणागतवत्सल ब्रीद सदैव सांभाळणारा परमात्मा महाविष्णु आपल्या भक्ताच्या शब्दाला झेलण्यासाठी प्रगटतोच  हिरण्यकश्यपुने लाथ मारलेल्या राजमहालाच्या स्तंभातून ! 


शेवटी हिरण्यकश्यपुने ब्रम्हदेवाकडून स्वत:च्या मृत्यूबाबत घातलेल्या व त्याला अशक्य वाटणार्‍या सर्व  बंधनाना पाळूनही महाविष्णु त्याला स्वत:च्या मांडीवर घेऊन आपल्या सिंहनखांनी त्याचे पोट फाडून त्याचा वध करतोच .
वैरापोटी हिरण्यकश्यपु परमात्म्यालाच आपला शत्रू मानतो आणि मृत्युच्या दारी जातो खरा , परंतु "तो" अकारण्य कारूण्याचा पुतळा असलेला, ’लाभेवीण प्रेम आणि केवळ प्रेमच’ करणारा परमात्मा महाविष्णु त्याला मरतानाही आस्तिकाची गतीच देतो.  
नर देही नरसिंह  | प्रगटला तरूपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्या गती | |  

अक्कलकोट स्वामींच्या बखरीत अशा अनेक कथा वाचण्यात येतात की जेथे माणूस आपल्या ज्ञानाच्या अंहकारापोटी , पैशाच्या अभिमानापोटी साक्षात परब्रम्ह असलेल्या स्वामींची निंदा करीत, अपमान करीत . परंतु अत्यंत करूणामयी अशी सदगुरुमाऊली मात्र अशा दांभिकांना, नास्तिकांनाही त्यांच्या अंहकाराचे निर्दालन करून स्वत:च्या चरणीं शरण येण्यास भाग पाडीत. नरसिंहाप्रमाणे उग्र , कराल, भयावह रूप धारण करून क्रोध जरी धारण केला तरी नास्तिकाने वा अज्ञानापोटी अंहकाराने बरळणार्‍या माणसांना स्वामी त्वरीत वठणीवर आणीत. 

विज्ञानामुळे किंवा पवित्र चिंतनामुळे माणसाला स्वत:च्या मूळ स्थानाचा शोध घ्यवासा वाटतो , व तो तसा प्रयास करीत राहतो . कुणी त्याला सगुण साकार सावळे परब्रम्ह म्हणते तर कुणी निर्गुण निराकार म्हणून ’ त्या’ एकाचीच उपासना करतात. सत्य, प्रेम व पावित्र्य ह्या तीन मूळ गुणांवर ज्याचे अधिष्ठान आहे, जो ह्या त्रिसूत्रीचा उद्गाता आहे तेच मानावाचे मूळ स्थान आहे. कोणी त्याला आदिमाता चण्डिका म्हणून पूजते, तर कुणी दत्तगुरु तर कुणी राम , कृष्ण म्हणून तर कुणी दत्तावतार स्वामी-समर्थ  तर कुणी साईबाबा तर कुणी आदिमाता दुर्गा तर कुणी महिषासुरमर्दिनी तर कुणी गणपती तर कुणी शिव तर कुणी महाविष्णू ! अर्थात हा ज्याच्या त्याच्या मनाचा , श्रध्देचा भाग असतो. 

स्वामीसमर्थ  देवपूजा , देवाच्या नावाखाली , स्वत:च्या अज्ञानापोटी, दांभिकता मिरवणार्‍या भोंदू प्रवृत्तींवर कडाडून हल्ला चढवित. "पूजा अर्चा भस्म माळा अंतरंगी कामचाळा ऐसा मिळेना  सावळा फुका कष्टविता गळा " ह्याचे जणू जिवंत प्रत्यंतरच देत . रोकडी प्रचिती मिळाली की आपसूक विपरीत बुध्दी ताळ्यावर येत असे.

ह्या अफाट विश्वपसार्‍यात जे काही घडले, जे घडत आहे त्याच्या पाठी एक सुनिश्चित सुसूत्रता आहे , एक नियमित शिस्त आहे, तसेच एक "सत्य, प्रेम व पावित्र्य" ह्या त्रिसूत्रीला अनुसरून एक उदात्त हेतू आहे ह्याची ज्याला जाणीव होते ती "आस्तिक्यबुध्दी" तर ह्याउलट जगात जे घडते ते सर्व आपोआप घडते किंवा योगायोगाने घडते , घडले आहे असे म्हणणे म्हणजे "नास्तिक्यबुध्दी".

अक्कलकोट स्वामी समर्थांच्या बखरीतील २४५व्या कथेत आपण वाचतो की संकेश्वर मठाचे श्रीमत शंकराचार्य फिरत फिरत अक्कलकोटला येतात तेव्हा श्रीमंत मालोजीराजे त्यांची सर्व व्यवस्था योग्य रीतीने ठेवतात, षोडशोपचार पूजा करवितात, मोठ्या थाटाने भोजन समारंभ आयोजित करतात . परंतु सर्व जगाचे आदिकारण असलेल्या श्रीस्वामीसमर्थांची स्वारी चोळप्पासह तेथे जातात , तेव्हा त्या ठिकाणी ना कोणी त्यांचे आदरातिथ्य करीत ना कोणी बसण्यास साधे आसनही देत. त्यातील एक वृध्द ब्राम्हण जेव्हा स्वामींना हातांत हात धरून आदराने पाटावर बसवितो, तेव्हा सर्व ब्राम्हण आपापसांत कुजबूजतात कीं ," हे संन्यासी पाहिजे त्याकडे अन्न कातात, करितां यांचे पान पंक्तीच्या बाहेर ठेंवा. "अतिथीदेवो भव: " असलेली आपली वैदिक संस्कृती ! पण .....
पुढें चमत्कार होतो आणि संकल्प सुटायच्या वेळेला पक्वानांनी वाढलेल्या पात्रांत अन्नाऐवजी किडे बुजबुजू लागतात. तेव्हा सर्वच जण बुचकाळ्यात पडतात हे अद्भुत काय झालें? शेवटी तो वृध्द ब्राम्हण सांगतो की ," प्रत्यक्ष दत्त्ताचा अनादर झाला, म्हणून असें झालें !" हे ऐकून आचार्य सिंहासनावरून उठून श्रीस्वामीसमर्थां समोर बसून प्रार्थना करतात व क्षमा मागतात तेव्हा स्वामीसमर्थ चांगलीच कानउघाडणी करतात. अर्थातच श्रींचे भाषण ऐकून सर्व शास्त्री तोंडे खाली घालतात व एकदम जाऊंन श्रींचे चरण धरतात व अपराधाची क्षमा मागतात. तेव्हा करूणानिधन स्वामींस दया येऊन अनातील किडे नाहीसे होऊन अन्न पूर्ववत होते. 

असेच २५७व्या कथेतील मल्लिकार्जुन जंगम गर्वापोटी स्वामींना साधा पायातले पायतण काढून नमस्कारही करीत नाही तेव्हा स्वामी त्याच्या अंतरातील गर्वासहीत संशय जाणून म्हणतात ," अरे, आमची पंचाईत करूं नकोस. पायां पडलास अथवा न पडलास , तरी आम्हांस गरज नाहीं." असें श्रींचे अंतसाक्षित्त्वाचे भाषण ऐकून जंगाम पाण्यातील ढेकळांप्रमाणे विरघळतों आणि श्रींस साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करतो.

म्हणजेच "त्या" एकमेवाद्वितीय अंतिम जगत्कारणाला न मानण्याची नास्तिक्यबुध्दी दूर करून , त्यांच्या कुमतीवरील अज्ञानापोटी त्यांनीच घातलेले मायेचे पडळ दूर सारून त्या त्या माणसांना स्वामींनी आस्तिक्यबुध्दी प्रदान केली व आस्तिकाची गती दिली होती.

अखिल जगतात आजही वंदनीय आणि पूज्यनीय असलेले "रामायण" हे अजरामर महाकाव्य लिहिणारा वाल्याकोळी हा आधी असाच नास्तिक्यबुध्दी धारण करून उदरभरणाकरिता वाटपाड्या बनला होता, अगणित दरोडे घालून आणि असंख्य माणसांना लुबाडून , मारून तो आपले व आपल्या कुटूंबाचे पोट भरीत असे. त्याच्या जीवनाला जेव्हा सदगुरु नारदमुनींचा परीस स्पर्श झाला तेव्हा त्याची नास्तिक्यबुध्दी विलयाला गेली व परमात्मा रामाच्या जन्माआधीच वाल्मिकी महर्षि बनून तो आस्तिक्यबुध्दीने "रामायण " लिहीता झाला.

अपौरूषेय ग्रंथ असलेल्या "श्रीसाईसच्चरीत " ह्या मध्येही हेमाडपंत आपल्याला रूद्राध्याय म्हणून गणल्या जाणार्‍या ११व्या अध्यायांत अशीच एका अंहकारापोटी "नास्तिक्यबुध्दी" धारण करून , मक्का -मदीना केल्याचा ताठा वाहणार्‍या दर्शनास आलेल्या वृध्द हाजी सिदीक फाळके ह्यास सदगुरु साईबाबा ९ महीने ताटकळत ठेवतात, पण प्रत्यक्ष मशीदीत येऊन दर्शन घेण्यास त्याला मनाई असते. 

मक्का- मदीना केल्याचा ताठा त्या वृध्द हाजी फाळकेला वाटत असतो. मक्का- मदीना यात्रेला प्रचंड पैसा आपण खर्च करून आपण पुण्य मिळविले म्हणजे आपण खूप पुण्यवान झालो, आपण कुराण पढतो म्हणजे आपल्याला सर्व काही ज्ञान आहे ह्या  अज्ञानापोटी व नास्तिक्यबुध्दीच्या बळावर त्याला वाटते की मला शिरडीत सहज दर्शन मिळेल. पण "कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी , हृदयातील भगवंत राहिला हृदत्यातून उपाशी " ह्या न्यायाने "भाव तोचि देव" असलेला परमात्मा साईनाथ हाजीला तब्बल ९ महीने प्रत्यक्ष दर्शन देतच नाही.

शिव हा नेहमी आपल्या लेकरांसाठी रूद्र आणि भद्र रूप एकाचे वेळी धारण करतो असे सद्गुरु डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांनी त्यांच्या पितृवचनांत दिनां ०७-०४-२०१६ रोजी सांगितले असल्याचे वाचले होते. शिव नाम सर्वात पवित्र आहे. शं बीज धारण करणारा हा शिव असतो कर्पूरगौर ! कर्पूरगौर म्हणजे कापरासारखा शुभ्र , धवल , एकही दाग नसलेला ! शं बीज धारण करणारा हा भोलेनाथ भगवान  शिव शांती देतो आपल्या श्रध्दावान भक्तांना . माणसाच्या मनात शांती नसेल तर तृप्ती आणि समाधान लाभणे दुर्मिळच असते नाही का बरे? शिव हा शं करोति इति शंकर: म्हणजे शमन करणारा शिव आहे, ’तो" दमन नाही करीत तर शमन करतो. 

शांती नसलेले मन किती बेचैन असते आपण सारेच अनुभवतो. कोणत्याही गोष्टीचे, वासनेचे, दुष्ट प्रवृतीचे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आदी माणसाच्या सहा शत्रूंचे दमन होऊन चालत नाही कारण त्या दुषप्रवृत्ती पुन्हा पुन्हा डोके वर काढून माणसाला त्रास देतात, छळत राहतात , त्यांचे शमनच व्हावे लागते. 

भगवान शिवाच्या हातात त्रिशूळ असतो. त्याचे रूद्र स्वरूप हे असुर, राक्षस , श्रध्दाहीन , दुराचारी ह्यांच्यासाठी असते तर भद्र स्वरूप हे श्रध्दावानांसाठी , भक्तांसाठी असते. एखादा माणूस जेव्हा श्रध्दावान असतो, चुका करतो, आणि मग त्याला आपली चूक कळते,  पश्चाताप होतो आणि तो भगवंताकडे माफी मागतो , क्षमा मागतो, आपल्या चुकांची , अपराधांची कबूली देतो तेव्हा हे शिवाचे भद्र स्वरूप त्याच्या मदतीला तत्काळ धावून येते.
अनसूयो अत्री संम्भूतो दत्तात्रेयो दिगंबर:   |
स्मर्तुगामी स्वभक्तानां उध्दरता भवसंकटात्   |  | 
असा हा स्मर्तुगामी  - स्मरणासवे गर्जत , धावत येणारा ! 

हाजी फाळकेच्या कथेत आपण वाचतो की साईबाबा त्यांच्या लाडक्या शाम्याकरवी हाजीला प्रश्न विचारतात की तू बारवीपलिकडील वाट चालून येशील का? हाजी स्वत:च्या अनाठायी अभिमानाने उत्तर देतो की कितीही कठीण असली तरी मी ती वाट चालत येईन.  परंतु मला प्रत्यक्ष भेट द्या आणि आपल्या चरणांनिकट बसू द्या.  वरकरणी पाहता आपल्याला वाटते की हाजी  साईनाथांच्या भेटीसाठी आसुसलेला आहे आणि तो काहीही करायला तयार आहे .

येथे मला संत तुलसीदासविरचिते सुंदरकांडातील समुद्राचे वागणे आठवते. जेव्हा रामदूत हनुमंत सीतामाईंच्या शोधार्थ रामेश्वराहून लंकेला जायला उड्डाण करतो , तेव्हा वाटेत हा समुद्र हा उड्डाण करणारा रामदूत आहे असा विचार करून ( परमात्मा श्रीरामांचे महत्त्व जाणून , त्यांच्या दूताचाही आदर करण्याच्या पवित्र भावनेने ) मैनाक पर्वताला सांगतो की तू ह्याचा थकवा दूर करणारा हो (श्रीराम दूत हनुमंताला तुझ्यावर विसावू दे.) 
जलनिधी रघुपतिदूत बिचारी  |  तैं मैनाक होहि श्रमहारी  | 

परंतु तेच साक्षात प्रभू श्रीराम आपल्या मित्र सुग्रीवाच्या नेतृत्त्वाखालील  विशालकाय वानरसैन्यासह समुद्रकिनारी पोहचतात आणि शरणागत बनून आश्रयास आलेल्या रावणबंधू बिभीषणाचा मित्रत्त्वाचा सल्ला ऐकतात. पुढे श्रीराम आपल्याला वानरसैन्यासह समुद्र ओलांडून पैलतीरी लंकेत जाण्यासाठी वाट देण्यासाठी समुद्राला नमस्कार करून विनंती करतात व समुद्रकिनारी दर्भासनावर त्याच्या उत्तराची वाट पहात बसतात, तेव्हा हाच समुद्र स्वत:चा वृथा अभिमान बाळगून तीन दिवस उलटले तरी देखिल कोणतेही उत्तर देण्यास तयार नसतो. अर्थातच पुढे श्रीरामांनी अग्नीबाण उचलताच शरणागतीचे ढोंग करून स्वत:ची सुटकाही करून घेतोच.

तसेच मला वाटते की हाजी फाळके आधी ९ महीने वाट पाहून स्वत’ची श्रध्दा व सबूरी दाखवितो असे प्रथमदर्शनी आपल्याला वाटू शकते. मग हाजीला कोणी सांगते की साईबाबांची प्रत्यक्ष भेट व्हावी म्हणून साईबाबांच्या शामाला भेट व तसे हाजी शाम्याला गळ घालतो. येथे हेमाडपंत म्हणतात शिरडीवासीयांचा भाव असतो की भगवान शंकराच्या दर्शनाआधी जसे नंदीचे दर्शन घ्यावे तशा भावाने साईबाबांच्या आधी शामाकडे जावे. 

भगवान शंकराला भेटायच्या आधी नंदीचे दर्शन - प्रत्यक्षात नंदी हा वृषभ (बैल) नसून तो प्रत्यक्षात एक श्रेष्ठ ऋषी होता, ज्याने भगवान शंकराच्या असीम भक्तीने आपण शंकराचे वाहन व्हावे असा संकल्प केला आणि तसा वर मिळविला होता.  नंदी ऋषी आपल्याला भक्तीच्या ह्याच अत्युच्च शिखराची आठवण करून देतात की मला माझ्या भगवंतासाठी , सदगुरुसाठी त्याचे वाहन होणेही मान्य असावे इतुकी भक्ती हवी. साईबाबांचा शामा असाच होता भक्तीतले अत्युच्च असे एक शिखर - जेथे फक्त माझे साईबाबा आणि मी त्यांचा हाच भाव ! निस्सीम भक्तीचे शामा एक उदाहरण आहे ज्याच्या साईनाथांच्या वरील भक्तीला कोणत्याही सीमेचे बंधनच मुळी नव्हते. माधवराव उर्फ शामाची भक्ती निराकार आहे ,सर्व दिशांनी निराकार, जिला सीमा नाही अशी अपरंपार, अनंत भक्ती! तिला कसलाही आकार नाही, या भक्तीला आपण  कुठल्याही नवविधा भक्तींमध्ये बसवू शकत नाही. 

शामाची साईबाबांवर निस्सीम भक्ती तशीच साईबाबांचे शामावर निस्सीम प्रेम होते. साईबाबा स्वत: शामाविषयी उद्गारतात अध्याय २७ मध्ये-
माझा शामा असेल खुळा  |  परी मजला तयाचा लळा  | 
लोभ लावी जीवा आगळा  |  तयाचा कळवळा मज मोठा  |  | 
ज्याला सदगुरु स्वत: माझा म्हणतो, , जो मला इतर जीवांपेक्षा आगळा लोभ लावतो असे म्हणतो त्याची भक्तीही तशीच आहे म्हणूनच ना !
म्हणूनच एकमेव शामाला साईबाबांशी सलगीने , अत्यंत लडिवाळपणाने वागण्याचा , त्यांना "अरेतुरे " करून संबोधण्याचा अधिकार साईबाबांनी स्वत:च दिला होता हे आपण श्रीसाईसच्चरितात वाचतो. 

मग हाजी शामाला भेटतो आणि शामा साईबाबांकडे हाजीला दर्शन देण्यासाठी शब्द टाकतात. पुढे शामाच्या आग्रहाखातर साईबाबा तयार होतात आणि साईबाबा शामाकरवी विचारतात की ," असो बारवीपलीकडे थेट आहे जी एक पाऊलवाट चालूनि येसील काय तूं  नीट विचार जा स्पष्ट तयातें "  पण ज्या क्षणी साईबाबा दर्शन द्यायला तयार झाल्याचे कळते तो आपला वृथा अभिमान मध्ये घुसवितो. तुम्ही काही सांगाल ते मी सर्व करेन , पण मी जे मागतो ते मला तुम्ही जर देणार असाल तर ... हा तर चक्क व्यवहार झाला ना? निष्काम सदगुरुला कशाचाच काम नसतो मुळी. 

पुढे  साईबाबा विचारतात की, " तू मला चार वेळांती चार हजार रुपये देशील का?"  ह्याचेही उत्तर हाजी कसे देतो बघा की हे काय पुसतां. देईन चाळीस लाख ही मागतां , हजारांची कथा काय ? पैशाच्या दंभाचे हे प्रदर्शन नाही का ? ज्याच्या भ्रूकुटीचा एक केस जरी इवलासा हलला तरी रंकाचा राव वा रावाचा रंक होऊ शकतो "त्या" एकमेवाद्वितीय जगज्जेठीपुढे ही अरेरावी नाही का ?
आठवा बरे दामाजी पंताच्या मदतीसाठी धावलेला विठू महार - (पुढचे पाऊल "  ह्या १९५० च्या  माणिक चित्रच्या चित्रपटातील -
झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात 
नेसला मलीन चिंधोटी घेतली हातामध्ये काठी
घोंगडी टाकिली पाठी करी जोहार दरबारात
मुंडाशात बांधली चिठी फिकतो दुरून जगजेठी
दामाजीनं विकली जी कोठी त्याचं घ्यावं दाम पदरात
खळखळा ओतिल्या मोहरा घ्या जी मोजून पावती करा
ढीग बघून चमकल्या नजरा शहा घाली बोट तोंडात

"त्या" सदगुरुंपुढे मान झुकवून लीन व्हायचे, का "त्या" लाच आपण आव्हाने द्यायचे , पैशाचा माज दाखवायचा ? हाजीने नुसते चाळीस लाख  देण्याचे कबूल केले असते तर गोष्ट वेगळी होती. पण येथे तो बोलतो हजारांची कथा काय? ही स्पष्ट अंहकाराची दर्पोक्तीच नाही का?

तरीही साईबाबा पुन्हा एकवार संधी देतात की ," आज आमचा मशीदीत बोकड कापावयाचा मानस (विचार ) आहे , तुला कय गोस (बोकडाचे मांस ) पाहिजे किंवा तुला काय अस्थि पाहिजे की तुला चित्तीं वृषणवासना आहे ? शाम्याला बाबा सांगतात जा जाऊन त्या म्हातार्‍याला नक्की काय पाहिजे ते विचार,"
शामाने बाबांचा निरोप देता ह्यातील काही न मागता, हाजी सांगतो मला ह्यातले काही नको. तुमच्या चित्तीं असेल तर मला तुमच्या कोळंब्यातील तुकडा द्या, ज्याने मी कृतकल्याणता पावेन.
मग मात्र अंतर्साक्षी , सर्वांच्या हृदयातले जाणणारा साईनाथ रूद्र रूप धारण करतो. स्वत:च्या हातांनी कोळंबा व पाण्याच्या घागरी उचलून भिरकावून देतो आणि हात कराकरा चावून हाजीच्या शेजारी येतात. हाजीसन्मुख उभे राहून स्वत::च्या हातांनी आपली कफनी दोन्ही करांनी उचलून, म्हणतात , " तू काय समजलास मला  अंतरी, माझ्यापुढे फुशारी मारतोस, बुढ्ढेपणाचा तोरा दावतोस, तू असेच कुराण वाचलेस का? मक्का केल्याचा ताठा बाहतोस, पण तू मला जाणत नाहीस."
सर्वसाक्षी आहे बापू  तो काय जाणेना | 
परी  वर्ते मानव बनूनी म्हणे मी अजाणता |  | 
सदगुरु हा त्याच्या लेकरांचा बाबा, बापू ( माय बाप ) सर्वकाही असतो. त्वमेव माता पिता त्वमेव !
नंतर साईबाबांनी अवाच्य शब्दप्रहार करून हाजीची निर्भत्सना केली. त्यावर हाजी गांगरून गेला आपले पितळ उघडे पडलेले पाहून . बाबा माघारा मशीदीत परतले व अंगणी आंब्याच्या पाट्या घेऊन आलेल्या माळिणींकडून समस्त ( सर्व) आंब्याच्या पाट्या खरेदी करून ( स्वपैशाने) त्या हाजीस पाठविल्या तत्त्वतां एवढेच नव्हे तर तात्काळ तसेच ते आल्या पावली , उलट मागे फिरले आणि हाजी फाळक्यांपाशी जाऊन त्यांनी त्याला स्वत:च्या खिशांतील ५५ रुपये हातावर मोजून दिले. झालेला सर्व प्रकार अवघा विसरून हाजीला साईबाबांनी प्रेमाने जेवायला निमंत्रण दिले ...
माझा अनिरूध्द प्रेमळा  |  त्याला माझिया कळवळा |  | 
खरोखरी माझ्या सदगुरुंचे माझ्यावर अनिरूध्द गतीने धावणारे प्रेम असते , अनिरूध्द म्हणजे ज्याला कधीही , कुणीही , कुठेही कधीच रोखू , अडवू शकत नाही असा "तो" एकमेव - अनिरूध्द प्रेमळा - फक्त आपल्या भक्तांसाठी , लेकरांसाठी सदैव धाव घेणारा , अनिरूध्द गतीने धावणारा !

प्रभू श्रीराम असेच सीतामाईचा शोध घेताना, स्वत:चे पत्नीवियोगाचे असीम दु;ख पाठीवर टाकून , वाट वाकडी करून , असंख्य वर्षे वाट पाहणार्‍या शबरी मातेला भेट द्यावयास गेले होते पंपा सरोवराच्या काठी असलेल्या तिच्या कुटीमध्ये , ते असेच अनिरूध प्रेमळा बनून, अनिरूध्द गतीनेच !

महाभारत युध्द घडू नये म्हणून कौरवांना अंतिम संधी देण्यासाठी पांडवांचा दूत बनून भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या राजदरबारी जातात , तेव्हा राजगृहात पाहुणचार घ्यायला न थांबता, भगवत्भेटीची आंस धरून वाट पाहणार्‍या विदूर पत्नी पारसवीच्या महालांत जातात अनिरूध्द प्रेमानेच ! असा ’तो’ सदगुरु रूपात असो की परमात्मा स्वरूपात - "तो" सदैव असतो केवळ आणि केवळ प्रेमाचा भुकेला - अनिरूध्द प्रेमळा !

म्हणूनच आपल्या लेकरांचे अक्षम्य अपराधही "तो" माफ करतोच करतो , आणि त्यांत्यातील नास्तिक्यबुध्दीचा कायापालट करून आस्तिक्यबुध्दी प्रदान करतोच कारण "तो" असतो अचिंत्यदानी , लाभेवीण प्रेम करणारा !
म्हणूनच केवळ तो आणि फक्त तोच आपल्यातील नास्तिक्यबुध्दीरूपी अंहकाराचा, हिरण्यकश्यपुचे खलमर्दन करून, विगत बनून सैरावैरा इतस्त्त: भटकणार्‍या अशांत चित्ताला, क्लांत मनाला सुगती बनविण्यासाठी, आपल्याला आस्तिक्यबुध्दी देऊन सुगती देतो - आणि त्यासाठीच तर "तो" नरसिंह रूप धारण करतो, तेही नर देहात म्हणजेच मानव बनूनच -

नर देही नरसिंह  | प्रगटला तरूपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्या गती | |

संदर्भ-
१. अक्कलकोट स्वामीसमर्थ स्तवन - रामानुज लिखीत
२. मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्र्वर्यवेद: 
३. श्रीसाईसच्चरीत
४. श्रीमद्पुरुषार्थ:  ( अर्थात सत्यस्मृती ) - प्रथम: खण्ड: - सत्यप्रवेश:

  

Wednesday 7 December 2016

साईबाबा से अपनापन कैसे निभाना ?

हरि ओम
ओम कृपासिंधु श्रीसाईनाथाय नम:
कई दिनों से मोबाईल फोन के व्हाटसऍप (Whatsapp) के भिन्न भिन्न ग्रूपस में एक पोस्ट ( POST) पढने मिली रही थी जिस में  इक आदमी पूरे दिन में बहुत सी मुश्किलों का सामना करता है , और दिन भर की लगातार आनेवाली मुसीबतों से बहुत ही परेशान  हो उठता है ।  आखिर में उसका गुस्सा इतना बेकाबू होता है कि वो भगवान से ही इन परेशानियों की वजह पूछता है कि भगवान तूने मेरे साथ ऐसे क्यों किया ? तुमने मुझपर सुबह से लेकर रात तक इतनी मुसीबतें क्यों लायी ? क्यों मुझे परेशान किया? क्यों मैंने सोचा था या तय किया था वैसे कोई भी चीज सही तरीके से मेरे साथ क्यों हुई नहीं और फिर भगवान उस आदमी को हर किस्से में भगवान ने उसकी कैसी सहाय्यताही की थी, उसके मनसूबे भले ही नाकामयाब हुए या भले ही उसने सोचा या उसने चाहा वैसेही एक भी चीज ढंग से ना घटी , फिर भी भगवान की असीम कृपा से ही वो बाल बाल बच गया और अभी तक जिंदा हैं यह समझाया था।अर्थात वह भगवान पे आग बबूला हुआ आदमी अपनी नादानी मान लेता है और भगवान की कृपा से उसकी आंखे नम हो जाती है । यह कहानी हमें बतलाती हैं ,सीख देतीं हैं कि जो भी आदमी भगवान की भक्ति करता है , उसके चरणो में विश्वास रखता है, उस पर श्रध्दा रखता है, उसका भरोसा करता है उसे भगवान कभी भी मायूस नहीं करता, या खाली हाथ लोटाता नहीं हैं ।  हां यह बात जरूर है कि कभी कभी भगवान हम जो चाहते हैं वह हमें नहीं देतें हैं या देरी से देतें है , पर इसके पीछे भी उनका अनगिनत प्यार और कृपा ही छुपी रहती है, यह हमारा  भरोसा होना चाहिए ।

साईबाबा के ग्यारह वचनों में सबसे महत्त्वपूर्ण वचन है -
मेरी शरण आ खाली जाए , हो कोई तो मुझे बताए ।
( शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी  । )

मेरे साईबाबा , हमारे साईबाबा हमेशा हमें बतातें हैं कि जो भी मेरी शरण में आता है, मेरी पनाह में आता है , उसे मैं कभी भी खाली हाथ लौटाता नहीं हूं । अगर हम साईबाबा की भक्ति करतें हैं और उनकी शरण में गए हैं तो हमें हमारे साईबाबा पर १०८ % भरोसा होना ही चाहिए कि भले ही दुनिया इधर की उधर हो जाए , हमें हमारे साईबाबा हर हालात में संभालने वाले हैं ही ।यही विश्वास साईबाबा के भक्तों में था ।

श्रीसाईसच्चरित लिखनेवाले हेमाडपंतजी यही बात हमें उजागर कर देतें हैं - चाहे वो आंखों में इलाज के लिए साईबाबा ने  बिब्बा कूट कूट कर डाला हो या मलेरीया (हिवताप) जैसे न ठीक होनेवाले बुखार के लिए लक्ष्मी मां के मंदिर के नजदीक काले कुत्ते को दही-चावल खिलाने को साईबाबा ने कहा हुआ बाला शिंपी हो या कृष्णाष्टमी का उत्सव मनाने शिरडी आए हुए काका महाजनी को तुरंत बिना उत्सव मनाए वापस उसी दिन मुंबई अपने घर लौटने की बात कही हो । ये सभी भक्त अपने आचरीत से हमें बताते है कि सदगुरु साईबाबा को कभी क्यों , कैसे , कब ऐसे सवाल पूछने ही नहीं चाहिए , जब बाबा ने बताया तो तुरंत हमें वैसे ही करना चाहिए क्यों कि वैही हमारे लिए सबसे उचित अच्छा मार्ग रहता है ।



यही बात को पहले अध्याय में भी हेमाडपंतजी ने बखुबी बताया है , इस के बारे में हाल हि मैंने एक बहुत ही सुंदर लेख पढा । इस लेख में लेखक महोदय ने  बताया कि  श्रीसाईसच्चरित के प्रथम अध्याय ‘मंगलाचरण’ में मुख्य एवं मध्यवर्ती कथानक है- बाबा के द्वारा गेहूँ पीसा जाना और लेखक बताते है कि यह केवल कथानक नहीं है, सामान्य कथा नहीं है, बल्कि वह है एक घटित होनेवाली अद्भुत घटना। ऐसी घटना जिस घटना से हेमाडपंत का संपूर्ण जीवन ही बदल गया । इस गेहूँ पीसनेवाली घटना को देखकर जिन हेमाडपंत के मन में बाबा का चरित्र लिखने की इच्छा उत्पन्न हुई उन्हीं हेमाडपंत की भूमिका के बारे में वे हम एक नया नजरीया देतें हैं कि हेमाडपंत जब इस घटना को देखते हैं, तब उस घटना की समाप्ति पश्‍चात् भी वे बाबा से कहीं भी यह प्रश्‍न नहीं पूछते हैं कि ‘‘बाबा, अब इस आटे का आप क्या करोगे?’’ अथवा यह भी नहीं पूछते है कि ‘‘बाबा, आपने इस गेहूँ को पीसने के लिए इतनी मेहनत की और अब इसे सीमा पर डालने के लिए कह रहे हो ऐसा क्यों?’’ इस प्रकार का कोई भी प्रश्‍न हेमाडपंत बाबा से नहीं पूछते हैं। वे स्पष्टत: कहते हैं- ‘‘बाद में मैंने लोगों से पूछा। बाबा ने ऐसा क्यों किया ।

यहीं पर हेमाडपंत और एक सामान्य मनुष्य इनके बीच का अंतर बिलकुल स्पष्ट हो जाता है। हेमाडपंत के सामने साक्षात परमात्मा होने पर भी उन्होंने ‘उनसे’ प्रश्‍न नहीं पूछा। लेकिन हम वे सामने हो (किसी भी स्वरूप में) या ना हो, हमसे संबंधित यदि कोई घटना हमारे मन के विरुद्ध घटित हो जाती है कि तुरंत ही हम उनसे सबसे पहले यह प्रश्‍न पूछते हैं, ‘‘अरे भगवान, तुमने ऐसा क्यों किया?’’ तुरंत ही हमारा दूसरा प्रश्‍न भी तैयार हो जाता है, ‘‘मैं ही मिला तुम्हें ऐसा करने के लिए?’’ और कितनी बार तो मेरा जिन बातों के साथ कोई संबंध ही नहीं रहता, उन बातों के संदर्भ में भी ‘उन्हीं’ से प्रश्‍न पूछते रहता हूँ और मेरी ओर से मेरे इस ‘क्यों’रूपी पूछनेवाली वृत्ति का अंत होता ही नहीं।

लेखक जी इक बात से मैं सहमत हो गयी कि परमात्मा ने कभी यह निश्‍चय कर लिया और हर मनुष्य से उसके हर व्यवहार के बारे में, उसके हर एक कर्म के प्रति पूछना शुरू कर दिया कि ‘अरे बालक, तुमने ऐसा क्यों किया?’ तो हमारी स्थिती क्या होगी, इतना यदि हम जान भी ले तो काफी है।
परन्तु वे अकारण करुणा के महासागर कभी भी मनुष्य से ‘क्यों’ यह प्रश्‍न नहीं पूछते, उलटे उस हर एक मनुष्य के ‘क्यों’ का उत्तर उस हर एक व्यक्ति को वह व्यक्ति उसे सह सके इस कदर देते ही रहते हैं।
इसीलिए हमें भी जीवन के किसी न किसी मोड़ पर परमात्मा से प्रश्‍न पूछने कि इस मनोवृत्ति को बदलना ही चाहिए ऐसे मुझे भी लगता है ।यही बात हेमाडपंत ने जान ली थी और इसी कारण उन्होने बाबा से कभी प्रतिप्रश्न नहीं पूछा था ।

आरंभ बाबा का कोई न जान पाये। क्योंकि प्रथमत: कुछ भी न समझ में आये।
धीरज रखकर ही बाद में परिणाम सामने आ जाये । महिमा अपार बाबा की॥

हेमाडपंत की उपर्युक्त पंक्तियों से ही बाबा की गेहूँ पीसने की क्रिया की पहेली सुलझ जाती है। इसीलिए वे कहते हैं कि बाबा का किसी भी क्रिया के आरंभ करने के पीछे का रहस्य समझ में आ ही नहीं सकता है। लेकिन जो धैर्य रखता है उसे अवश्य ही इस कारण का पता चल जाता है।

मेरे खयाल से इस लेख की ओर सारी बातों को जानने के लिए उसे पढना ही बेहतर होगा -

मैंने  साईबाबा को अपना भगवान या सदगुरु माना , तो उन्हें "क्यों " जैसे प्रश्न नहीं पूछने चाहिए , बल्कि जो कुछ भी मेरे साईबाबा करतें हैं वोही मेरे लिए उचित है इस तरह का अटूट भरोसा , विश्वास मुझे अपने साईबाबा के चरणों में रखना चाहिए । यही सही मायनो में अपनापन जताना होगा ।


ओम साईराम

Monday 14 November 2016

माझ्या लाडक्या डॅड, साठाव्या जन्मदिवसाच्या तुम्हाला अनिरूध्द शुभेच्छा !

हरि ॐ

माझ्या लाडक्या डॅड,  साठाव्या जन्मदिवसाच्या तुम्हाला अनिरूध्द शुभेच्छा  !


तदबीर से बिगडी हुई, तकदीर बना ले
अपने पे भरोसा हैं तो एक दाँव  लगा ले

डरता है जमाने की निगाहों से भला क्यों ?
इन्साफ तेरे साथ है, इल्जाम उठा ले 

क्या खाक वो जीना है, जो अपने ही लिए हो
खुद मिट के किसी और को मिटने से बचा ले

टूटे हुए पतवार हैं कश्ती के तो गम क्या
हारी हुई बाहों की पतवार बना दे 







गुरुदत्तजींनी दिगदर्शित केलेल्या देवानंद आणि गीता बाली ह्यांच्या १९५१ सालच्या बाजी सिनेमातील हे साहिर लुधियानवीचें  स्वरांनी सजलेले  आणि बर्मनदांच्या संगीताने नटलेले हे जीवनाच्या अजरामर सत्याचे दर्शन घडविणारे हे गीत आजही मनाला तितकीच भुरळ घालते. 

हे गाणे ऐकताना जीवनाच्या हरत चाललेल्या डावाला जिंकायचाच आणि विजय प्राप्तीचा १०८% भरोसा देऊन , आकाशाला गवसणी घालणारे अनिरूध्द  मन:सामर्थ्य प्रदान करणार्‍या माझ्या अचित्यदानी गुरुमाऊलीचा , माझ्या सदगुरुरायाचा , माझ्या लाडक्या , प्राणप्रिय डॅडचा मनमोहक ,लाघवी, हसरा चेहराच डोळ्यांपुढे तरळला आणि नयनांत आनंद-विरहांश्रूची एकच दाटी झाली...  

ह्या गाण्यात वर्णिलेली परिस्थिती माणसाच्या आयुष्यात अनेक वेळा येत असते . जेव्हा स्वत: वरचा आत्मविश्वासच डगमगतो , संकटाचे डोंगर कोसळलेले असतात आणि आयुष्यात सर्व काही संपले असे वाटू लागते, परमेश्वराने बहाल केलेल्या मानवी जन्माचे माहात्म्य ठाऊक असूनही तोच जन्म नकोसा होतो आणि असा नैराश्येच्या गर्तेत सापडलेला तो असहाय्य जीव अगतिकपणे मिळेल त्या प्रत्येकाकडे मदतीचा हात मागतो पण कुठे म्हणून आशेचा किरण तर सोडाच पण प्रकाशाचा कवडसाही दिसत नाही आणि शेवटी हतबल होऊन तो माणूस  शेवटी आपले आयुष्य संपवण्याच्या चुकीच्या , अधोगतीला नेणार्‍या मार्गाकडे झुकू लागतो आणि अचानक त्याच्या आयुष्यात असे काही बदल घडू लागतात ...
तिमीरातूनी पसरूनिया बाहू आले ते उजळीत ....



राखेतून उठण्याचे मन:सामर्थ्य देत आकाशात उंच  भरारी घेणार्‍या फिनीक्स पक्ष्यासम जीवनाचा संपूर्ण कायापालट करविणारे माझे लाडके डॅड- माझे बापू!
 


वाट पहाशील तर आठवण बनून येईन, एकदा मनापासून आठवून तर बघ तुझ्या चेहर्‍यावर "हास्य" बनून येईन ... अनिरूध्द बापू . अंबज्ञ !
क्षणार्धात होत्याचे नव्हते होत असतानाच "तो " येतो आणि भरोसा देतो , ऊठ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे  असे अभयवचन देत  "तो" अभयदाता स्वामी समर्थ बनून येतो, सर्व जगाने  साथ सोडली असताही भक्कम , खंबीर आधार देतो - "तो" असतो माझा खराखुरा आप्त, जीवीचा जीवलग - माझा सदगुरु !
शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी अशी ग्वाही देत  कृपेचा अमाप वर्षाव करीत "कृपासिंधु" बनून "तो" येतो साक्षात ईश्वर बनून - माझा "साई"बनून आणि ग्वाही देतो  मी असताना तू अनाथ नाही , तुझा साईनाथ आहे ना तुझ्या संगे ! - "तो " असतो माझा सदगुरु !
"तू आणि मी मिळून अशक्य असे ह्या जगात काहीच नाही " असे म्हणत मित्रत्वाच्या नाते सदैव सांभाळून , माता-पित्याच्या मायेची पखरण करणारा , कधीही दगा न देता सच्च्या मित्राच्या नात्याने अखंड साथ देणारा, निभावणारा  असतो "तो " माझा मन:सामर्थ्यदाता - माझा आत्मा, माझा प्राण बनून माझे जीवन रसरशीत ठेवणारा, माझ्या जीवनात सत्याला प्रकाशित करून "सत्यप्रवेश " करवून देणारा, प्रेमाचा अविरत स्त्रोत बरसवून
"प्रेमप्रवास" करवून घेणारा , आणि पदोपदी, ठायी ठाय़ी आनंदाच्या राशीवर पहुडायला लावून " आनंद साधना " करवून घेणारा - "तो" असतो माझा सदगुरु !

"मी तुला कधीच टाकणार नाही " ह्याची प्रचिती देत साता-समुद्रांच्या पलिकडे असो वा उंच कड्यावरून दरीत कोसळत असो वा सुनामी , भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात फसलेले असो वा मृत्यूच्या कराल दाढेत अडकलेले असो , "स्मर्तुगामी " बनून अनिरूध्द गतीने धाव घेणारा , चिडीच्या पायाला दोर लावून अलगद आपल्या प्रेमपाशात खेचणारा, आधारवडाच्या सावलीत विसावा देणारा "तो" असतो माझा सदगुरु - माझा DAD- माझा बापूराया - माझे सदगुरु !

नशीब नशीब म्हणून काय रडत बसतो वेड्या, माझ्या राजा "त्या" अनंत करूणामयी परमेश्वरावर विश्वास ठेवून तर बघ एकदा , "तो" लाभेवीण प्रेम करणारा एकच ! "तो" आपल्या लेकरांना कधीच असहाय्य अवस्थेत ठेवत नाही ह्याची ग्वाही आणि जिवंत प्रचिती देऊन जगण्याची आस जागवितो, मरगळलेल्या मनाला चैतन्याची नव उभारी देतो "तो" माझा बापूरायाच !



तू आणि मी मिळून अशक्य असे ह्या जगात काहीच नाही अशी ग्वाही देत , आळसाला घालवून , "जेथे राबती हात तेथे हरी " ह्या उक्तीला जीवनात सत्यात उतरावयाला भाग पाडणारा "माझा बापूराया - तदबीर से बिगडी हुई, तकदीर बना ले

मन:सामर्थ्यदाता असलेला माझा सदगुरुराया मला जीवनाचे फासे फेकताना भरोसा देतो "त्या"च्या चरणांवरचा आणि पर्यायाने " स्वत:" वरचा ! - अपने पे भरोसा हैं तो एक दाँव  लगा ले

भगवंत , परमात्मा, परमेश्वर अन्यायी नाहीच मुळी , "त्या"च्या न्यायीपणावर विश्वास ठेवायला शिकवतो "एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा " हे साईनाथांचे वचन सत्यात उतरविण्याची ग्वाही देत माझा बापूराया मला संकटाशी झुंजायला शिकवतो -    डरता है जमाने की निगाहों से भला क्यों ? इन्साफ तेरे साथ है, इल्जाम उठा ले 

माता-पित्यांच्या ऋणाइतकेच मातृभूमीचे ऋण असते ह्याची जाणीव करवून देऊन , सदैव सभान राहून माझ्याकडून मायभूमीचे पांग फेडून घेतो "तो" माझा बापूरायाच - क्या खाक वो जीना है, जो अपने ही लिए हो  खुद मिट के किसी और को मिटने से बचा ले

अरे माझ्या राजा, जीवनात हे नाही , ते नाही असा नन्ना चा पाढा वाचत , रडत बसण्यापेक्षा आहे त्यातून जीवनाची बाग फुलवायला शिक - माझ्या साईनाथाने उजाड , बंजर जमीनीतूनच चैतन्याची बाग फुलविली हे शिकविणारे हेमाडपंतविरचिते अपौरूषेय ग्रंथ असलेले "श्रीसाईसच्चरीत" जरा डोळे उघडून वाच, मनाची बंद कवाडे उघड आणि मग बघ "तो" आहेच तुझ्या पाठीशी दूधाची वाटी घेऊन उभा ,मग माझ्या लेकरा तुझे प्रयास नको का करायला तू म्हणत प्रेमाने गोंजारत तर कधी रागाने कान पकडून दरडावत तर कधी नाठाळ, टवाळ लेकराला पाठीत धपाटा घालत जीवनाची युध्द्कला आचरणात आणायला शिकवितो ’"तो" माझा नंदारमणा अनिरूध्द ! राम बनून सत्याशी , मर्यादेशी बांधिलकी घालून देणारा, निष्काम कर्माची दीक्षा देणारा कृष्ण बनून , हातातले गळून पडणारे गांडीव धनुष्य सावरीत , तुझ्या जीवनाचे कुरुक्षेत्र होऊ नये म्हणून मी आज येथे उभा आहे हे मनावर बिंबवीत , सत्य-प्रेम -पावित्र्य ह्या त्रिसूत्रीला अनुसरूनच आणि "पावित्र्य हेच प्रेमाण" ह्या आदिमाता चण्डिकेच्या नियमाला कटीबध्द होत , "ठं" बीजाची जीवनात बीज रोवणारा - माझा रणधुरंधर , लढवय्या - बापूराया -   
टूटे हुए पतवार हैं कश्ती के तो गम क्या
हारी हुई बाहों की पतवार बना दे


अशा ह्या माझ्या प्राणप्रिय गुरुमाऊलीचा - माझ्या सदगुरु बापूरायांचा  आज ६० वा जन्मदिवस !  त्या निमीत्त्ताने ही गुणसंकीर्तनाची पुष्पांजली त्यांच्या चरणी समर्पित!

अखिल जगताचा समर्थ , मूळ आधार असणारे दत्तगुरु आमच्या बापूंना उदंड आयुष्य देवो,हीच तुमच्या चरणी प्रार्थना !

हे आदिमाता माय चण्डिके माझ्या प्रेमळ पित्याला, माझ्या गुरुमाऊलीला, माझ्या बापूंना उदंड आयुष्य़ लाभो हीच तुझ्या चरणी प्रार्थना !

माझ्या बापूरायाला आवडेल अशीच भक्ती-सेवा आमच्या हातून सदैव घडो , जेणेकरून माझ्या सदगुरुंच्या चेहर्‍यावर हास्याची, आनंदाची एक लकेर तर झळकू हेच आदिमातेकडे मागणे !  

I LOVE YOU MY DAD ALWAYS AND FOREVER !!!
हरि ॐ. श्रीराम.अंबज्ञ  







Sunday 16 October 2016

युरेका युरेका ....आर्किमिडीज !

"युरेका युरेका" शब्द उच्चारताच आठवतात ते पटकन जगद्विख्यात शास्त्रज्ञआर्किमिडीज ! " युरेका" हा शब्द प्राचीन ग्रीक भाषेतील εὕρηκα ह्या शब्दावरून प्रचलित झालेला शब्द ! ह्याचा अर्थ इंग्लिश भाषेत I have found it म्हणजेच मला ती मिळाली म्हणजेच मला सापडले, मला गवसले असाच होतो. 

आपण एखादी गोष्ट शोधत असतो बराच वेळ आणि आपल्याला ती सापडता सापडत नाही. आपण  ती हरवलेली गोष्ट म्हणा वा वस्तू बर्‍याच ठिकाणी नेहमीच्या ठेवायच्या वा अनपेक्षित जागीही शोधतो, पण ती काही केल्या सापडत नाही. तेव्हा सतत त्याच हरवलेल्या गोष्टीचा विचार आपल्या मनात घोळत राहतो, आपल्या ध्यानी -मनी तीच गोष्ट दिसत राहते आणि कधी एकदा ती सापडते असे आपणास होऊन जाते, आणि मग अचानक ती गोष्ट सापडते तेव्हा आपल्याला होतो तो आनंद अगदी अवर्णनीय असाच असतो नाही का?  

अप्रगत काळात आणि प्रतिकूल परिस्थितींमध्येही आपल्या विवेकशक्ती आणि तारतम्य ह्यांमुळे आपले विशेष स्थान बनविणार्‍या मान्यवरांमध्ये आर्किमिडीज ह्यांचे नाव विशेषत: गणले जाते. इ.स.पू. काळातील जेता मानल्या गेलेल्या रोमन सैनिकांना आपल्या शहराच्या सीमांवर रोखण्याचे अत्यंत धाडसाचे, शौर्याचे काम करणार्‍या ह्या प्रतिभासंपन्न संशोधकाचे नाव होते ’आर्किमिडीज’.

आर्किमिडीज  हे कल्पक वैज्ञानिक संकल्पनांचा जनक म्हणून प्रसिध्दीस आलेले (इ.स.पू. २८७ – इ.स.पू. २१२) प्राचीन ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ , अभियंता , संशोधक व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म सिसिलीमधील सेरॅक्यूज येथे झाला. सेरॅक्यूजचा राजा दुसरा हीरो व त्यांचा मुलगा गेलो यांच्याशी त्यांची दाट मैत्री होती. स्वत: खगोलशास्त्रज्ञ असलेल्या आर्किमिडीजच्या पित्याने त्यांना शिक्षणासाठी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे पाठविले होते, तेथीच त्यांचे सर्व शिक्षण झाले.

आर्किमिडीज ह्यांनी गणितातील घनफळ , पॅराबोला इत्यादी विषयांवर अत्यंत मोलाचे संशोधन केले.  तसेच भूमिती ,अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलीआहे. “पदार्थाचे पाण्यात केलेले वजन हे त्याच्या हवेतील वजनापेक्षा त्याने बाजूला सारलेल्या पाण्याच्या वजनाइतके कमी असते” हे त्यांचे तत्त्व ‘आर्किमिडीजचा सिद्धान्त’ या नावाने सुप्रसिद्ध आहे.

अशा ह्या विवीध क्षेत्रांत आपले मौलिक योगदान देणार्‍या आर्किमीडीज ह्यांच्या कार्याचा आढावा घेणारा एक सुंदर रीत्या मांडलेला,  माहितीपूर्ण लेख एका संकेतस्थळावर वाचनात आला आणि माझ्या वाचक मित्रांसवे तो वाटून त्यांनाही त्याचा लाभ मिळावा अशी तळमळ लागली.

नक्की जाणून घ्या - आर्किमिडीज ह्यांचे अमूल्य योगदान ...
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/archimedes/

Sunday 7 August 2016

माझे सदगुरु - माझे एकमेव प्रत्यक्ष मित्र !

नुकतेच एका नवीन विषयाने माझे कुतूहल चाळवले गेले. माझ्या खांद्याचे ऑपरेशन झाले आणि दररोज फिजीओथेरपी करावी लागत असे. त्या दरम्यान त्या फिजीओथेरपीस्टशी बोलताना एक नवीन ज्ञानाचे दालन खुले झाले. त्या हॉस्पिटलमध्ये रिसर्च सेंटर (संशोधन विभाग ) कार्यरत आहे. त्याचा एक हिस्सा म्हणून तेथील सर्व डॉक्टर्सना आपापल्या क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत (अपडेट) ठेवण्यासाठी सूचना दिली जाते आणि तसाच तो आग्रह कार्यान्वितही केला जातो Corporate Progress Developemnet(CPD) ह्या योजने अंतर्गत !

विवीध देशांत विवीध ठिकाणी वेगेवेगळ्या स्तरांवर शास्त्रज्ञ संशोधन करत असतात मग ते वैद्यकीय क्षेत्रात असेल, कॉम्पुटरमध्ये असेल, नॅनो टेकनॉलॉजीमध्ये असेल , मोबाईलच्या क्षेत्रात असेल. ह्या सार्‍या संशोधनाचे चांगले-वाईट असे परिणाम असू शकतात. परंतु मानव हा  नेहमी ह्याच संशोधनाच्या आधारांनी आपली प्रगती , विकास साधत असतो. "गरज ही शोधांची जननी आहे" असे ह्याच करीता म्हटले जात असावे , नाही का बरे ?

गप्पांच्या दरम्यान मला त्या फिजीओथेरापिस्ट्ने सांगितले की कामाच्या वेळेतील दर आठवड्यातील दोन तासांचा वेळ हा त्या प्रत्येकाला जगामध्ये नाना ठिकाणी मग ते राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही संशोधन त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांशी निगडीत सुरु असते त्यावर माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने दिला जातो. अर्थात ह्या वेळेत त्यांना त्या वेळेत नियोजित काम करायचे नसून नवीन माहिती , शोध एकत्रित करायचे असतात. दर आठवड्याला त्यांच्या ग्रूपला एक विषय निवडण्याची मुभा असते , जो विषय ते आपापसांत ठरवितात आणि त्यावर इंटरनेटवरून माहिती मिळवतात आणि त्यावर नंतर चर्चा आयोजित होते, प्रेझेंटेशन बनविले जाते आणि नवीन उपचाराच्या पध्द्तींचा सखोल अभ्यासही केला जातो आणि पुढे त्याची सर्व पातळींवर नीट शहानिशा करून नवीन , आधुनिक उपचारासाठी त्याचा अवलंबही केला जातो. 

बदलत्या काळानुसार माणसाने स्वत:ला बदलणे आणि स्वत: मध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणात , कामाच्या स्वरूपात बदल करणे हे अत्यंत आवश्यक आहे, आजच्या युगात अनेक नवनवीन स्थित्यंरे, संशोधन सतत घडत असतात आणि बदलत्या काळाबरोबर आपण पाऊले टाकायला नाही शिकलो तर आपण कधी काळाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाऊ ह्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आपण नेहमी दोन पिढ्यांमध्ये चाललेला संघर्ष अगदी घराघरांतूनही अनुभवतो बर्‍याच वेळेस. तरूण युवा पिढीला आपले आई-बाबा, आजी-आजोबा हे जुन्या मतांचे वाटतात. त्यांना आपल्या बरोबर जुळवून घेणे कठीण वाटू लागते. आणि ह्याला "जनरेशन गॅप" असे गोंडस नाव दिले जाते. पण खरेच नीट विचार करता ही विचारांतील तफावत, जीवनशैलीतील चढ-उतार ह्यांच्याशी आपण मिळते-जुळते घ्यायचे ठरवले तर काहीच अवघड बनत नाही. आता हेच बघा ना हळू हळू का होईना आपण नवीन मोबाईल. संगणक(कॉम्पुटर) , टॅब अशा अनेक गोष्टी नव्यानेच शिकतो ना. बदलत्या काळाची गरज ओळखून जो माणूस स्वत: मध्ये असे सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयास करतो , तेव्हा मग त्याला  कधीच अपयशाला सामोरे जात नाही, कासवाच्या धीम्या गतीने का होईना , तो विकासाच्या दिशेने पुढेच पाऊले टाकत असतो. 

ह्यावरून मला माझ्या सदगुरु डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांच्या एका अभिनव संकल्पनेची आठवण झाली . त्यांनी "रामराज्य-२०२५" ह्या त्यांच्या ६ मे २०१० रोजीच्या प्रवचनातून आमच्या पुढे "द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स " ही एक नवीन संकल्पना मांडली होती. माझे सदगुरु हे स्वत: एका प्रथितयश, नावाजलेले डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत ठेवणे हे अत्यंत आवश्यक असते. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मेडीकल क्षेत्रात अशासाठी मेडीकल जर्नल्स प्रसिध्द होतात , मग ती मासिक असतील वा वार्षिक ! त्या जर्नल्सच्या आधारे डॉक्टर्स आपले ज्ञान अपडेट ठेवू शकतात. ह्याच प्रकारे जर Electronics, Information Technology, Shares and Stock Market, Health and Health Services Information, CA, General Engineering, Professional Medicine, MBA ह्या विवीध क्षेत्रातील तज्ञमंडळीनी एकत्रित येऊन सुसंघटीतपणे अशी जर्नल्स तयार केली , तर समाजात नवीन प्रकारे प्रबोधन करता येऊ शकते असा पर्याय मांडला होता त्या प्रवचनात . 

सदगुरु हा आपला खरेच एक सच्चा मित्रही असतो, मार्गदर्शक ही असतो. तो नेहमीच आपल्याला संकट समयी उचित मार्गदर्शन करतो. भलेही कुणी मला साथ देवो , मला एकटे पाडो परंतु सदगुरु मात्र एकमेव असा मित्र असतो जो मला कधीच दगा तर देतच नाही. पण माझी सदैव साथ ही देतो. साक्षात भगवंत कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीच्या गोष्टी आपण वाचतो. कृष्ण आणि अर्जुनाची सख्य भक्तीही हेच "मैत्री" चे अनमोल नाते, निरपेक्ष प्रेमाचे, अतूट बंध दाखविते. अगदी संत तुकाराम सुध्दा आपल्या भगवंताबरोबर हेच नाते मैत्रीचे स्थापयाला शिकवतात - "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती "    



कृष्ण भगवंताने सुदाम्याला शिकविलेल्या निरपेक्ष म्हणजेच विना मतलब, विनाकारण प्रीतीचा खरा भाव मला माझ्या सदगुरुंच्या कृतीतून उमगला - "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले." 

माझ्या सदगुरुंनी आम्हां सर्व श्रध्दावान मित्रांना असेच मैत्रीचे अभयवचन दिले की "मी तुला कधीच टाकणार नाही." आणि सच्चा मित्रच उचित वाटेवर आपल्या मित्राला चालवितो. माझ्या सदगुरुंनी आमच्या साठी असेच काळाबरोबर पावले टाकण्यासाठी एक ज्ञानाचे आगळे-वेगळे भांडार उघडले ते ह्या "द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स " .

ह्यात ही ई-जर्नल्स ही इंटरनेट वर असल्याकारणाने २४ तास उपलब्ध असतात, आणि कुठुनही वाचता येतात; शिवाय आपल्याला कुठलेही ओझे जवळ घेऊन वावरावे लागत नाही. हा याचा अत्य़ंत महत्त्वपूर्ण उपयोग आहे. विविध विषयांमध्ये उपलब्ध असलेली ही ई-जर्नल्स खूपच माहितीपूर्ण आहेत आणि त्या त्या विषयातील पारंगत लोकांनी लिहिली आहेत. तर अश्या ह्या ई-जर्नल्सचा आपण नक्कीच उपयोग करू शकता. http://exponentjournals.com/ या website वर The Exponent Group of Journals launch झाली आहेत. या संचात एकूण ८ प्रकारातली ई-जर्नल्स उपलब्ध झाली आहेत, ती पुढीलप्रमाणे:

मी स्वत: Electronics and Telecommuniction Engineer आहे आणि माझी दोन्ही मुले ह्याच क्षेत्रातील Engineer आहेत. त्यांच्या शिक्षणादरम्यान त्यांना अनेकदा अवघड वाटणार्‍या बर्‍याच Topics ना ह्या ई-जर्नल्स मुळे खूप सहाय्य झाले.

ह्या व्यतिरिक्त दुसर्‍या क्षेत्रांतील अमूल्य माहिती अत्यंत सुलभ व सोप्या पध्दतीने समजण्यास खूप मोलाचा हातभार ही जर्नल्स लावतात. समजा आपण मेडीकल फिल्डचे नाही आहोत तरी एखाद्या आजाराची माहिती , त्याची संभाव्य कारणे, समज-गैरसमज ह्याबद्दल देखिल अत्यंत महत्त्वाची माहिती येथे अनेक निष्णात डॉकटरांनी इतक्या सहजपणे समजावून दिली आहे की आपल्या मनातील भीती पार दूर पळून जाते आणि आपल्याला त्या विषयाचे छान ज्ञान ही मिळते, तेही विना सायास , ना कोठे शोधाशोध करायची गरज, ना कुठे फी भरायची गरज, अगदी बसल्या जागी ! म्हणूनच सदगुरु हा प्रत्यक्ष मित्रच असतो - अनेक जन्मांचा कधीही साथ न सोडणारा एकमेवाद्वितीय सखा !      

विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे "लाभेवीण प्रेम" करणार्‍या ह्या माझ्या सदगुरुंनी आपल्या मित्रांसाठी हे ज्ञानाचे दालन विनामूल्य अगदी फुकट उपलब्ध करून दिले आहे. म्हणतात ना खर्‍या मैत्रीत देवाण घेवाण नसते व्यवहारी पैशाची, असते फक्त नि:स्वार्थ प्रेमाची उधळण ! 


ह्या माझ्या एकमेव प्रत्यक्ष मित्राला - माझ्या सदगुरुंना मैत्रीदिनाच्या अनिरूध्द शुभेच्छा ! त्याच बरोबरीने वाचकांनाही अनिरूध्द शुभेच्छा ! 

संदर्भ: 

Friday 29 July 2016

चला स्वावलंबी बनू, आत्मनिर्भर होऊ या ...

नुकताच २६ जुलै हा "कारगिल दिवस" हा भारतीयांनी अत्यंत अभिमानाने साजरा करीत आपल्या शहीद जवानांना मानवंदना देऊन त्यांच्या व असीम पराक्रम गाजविणार्‍या भारमातेच्या सुपुत्रांचा, वीरांचा उदो उदो केला. परंतु ह्याच कारगिलच्या युध्दात नामर्दपणे भेकड छुप्पे हल्ले चढविणार्‍यांवर यश मिळवायला अनेक जवानांना आपले रक्त सांडावे लागले आणि धारातीर्थी पडलेल्या आपल्या निधडया छातीच्या शूर लढवय्या वीर पुत्रांच्या बलिदानावर भारतमातेला आसवे ढाळावी लागली ती काही बाबतीत आपल्या मातृभूमीची आत्मनिर्भरता , आपली स्वावलंबी वृत्ती कमी पडल्याने असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
त्यावेळी भारताची स्वत:ची नेव्हीगेशन सिस्टीम नव्हती आणि शत्रूंच्या चौक्या हुड्कायला त्याची तर नितांत गरज होती. मैत्रीचा हात पुढे करणार्‍या अमेरीका ह्या मित्र देशाकडे आपण मागणी केली खरी , पण ती मदत नाकारली गेली. अर्थात आपल्या जवानांनी प्राणांची पर्वा न करता बाजी मारली खरी, पण स्वावलंबी असण्याची फार मोठी किंमत मोजावी लागलीच ! स्वावलंबी होण्याचा निर्धार करून मग भारताने स्वत:ची "नाविक जीपीएस यंत्रणा " विकसित केली आणि जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली.
                                                                    
संसार असो वा अध्यात्म माणसाने नेहमी आत्मनिर्भर असावे, स्वावलंबी असावे. "आपला हात जगन्नाथ" ही म्हण बहुधा ह्याच करीता प्रचलित झाली असावी. दुसर्‍यावर अवलंबून राहिल्याने आपल्याला अनेकदा तोंडघशी पडावे लागते, खूप मोठ्या नाचक्कीला कधी सामोरे जावे लागते. म्हणूनच खरा सदगुरु आपल्या शिष्याला, भक्ताला नेहमीच स्वावलंबी होण्याचा , आत्मनिर्भर होण्याचा कित्ता गिरवायला शिकवतो आणि तेही स्वत:च्या आचरणातून !
माणूस कोणतीही गोष्ट समोरच्या माणसाच्या कृतीतून , वागण्यातून पटकन , सहजरीत्या शिकू शकतो, पण तीच गोष्ट वाचून किंवा ऐकून समजणे कठीण बनते. म्हणूनच सदगुरु जेव्हा जेव्हा देहधारी असतात तेव्हा ते आपल्या स्वत:च्या वागण्यातून , चालण्या-बोलण्यातून ,सहज साध्या आचरणातून एखादी शिकवण आपल्या लेकरांच्या गळी सहज उतरविताना दिसतात.
आपल्या महात्मा गांधीजीनी स्वदेशीची चळवळ सुरु केली आणि आपल्या देशातील बनलेल्या खादी म्हणा सुती म्हणा कपड्यांवर भर देताना पहिल्यांदा स्वत: हातात चरखा घेऊन सूत कातले आणि मग इतरांना त्याचा मंत्र दिला होता असे इतिहास सांगतो.
तसेच आपल्याला आपले सदगुरु स्व आचरणातून शिकवण देतात.
भगवंत कृष्णाने गीतेत सांगितलेल्या "उध्दरेत आत्माना आत्मानं " ह्याचा अर्थ सदगुरुंच्या मार्गदर्शनानुसार स्वत:चा उध्दार स्वत: करावा असाच असावा.
सदगुरु साईनाथ आपल्या स्वत:च्या कृतीतून आपल्या भक्तांना अनेक शिकवणी सहजगत्या शिकवीत, कोणतेही काम ते आधी स्वत: करीत , मग दुसर्‍यांना करायला लावीत. श्रीसाईसच्चरीत ह्या ग्रंथाचे नावच मुळी साईबाबांचे आचरीत आणि त्यांच्या शिकवणीनुसार त्यांच्या भक्तांनी केलेले आचरण आहे असे दर्शविते.
हेमाडपंत ह्या अपौरूषेय ग्रंथातील प्रत्येक अध्यायांतून साईबाबांच्या ह्या लीला सहज सुंदर , सोप्या कृतीतून उलगडून दावतात. अगदी प्रथम अध्यायांत देखिल साईनाथ गहू दळायला स्वत: बसतात आणि स्वावलंबी होण्याचा, आत्मनिर्भर बनण्याचा महान संदेश स्वत:च्या आचरणातून देतात. खरेतर ह्या पहिल्या वहिल्या अध्यायांत एवढे गुपित , बाबांच्या लीलेमागील सखोल अर्थ जाणायला मी य:कश्चित पामर खरेतर समर्थ नव्हतेच. आंतरजालाच्या अजीबो गरीब गारूड्याच्या पोतडीतून अशी दुर्मिळ रत्ने कधी कधी हाती लागतात , सैरसपाटा करताना, तशीच माझी गत झाली.
श्रीसाईसच्चरीतातील साईनाथांच्या अद्भुत शिकवणीचा सखोल अर्थच लेखकाने समोर प्रस्तुत केला आणि समोर सदगुरुंच्या घरचे गारूड  उकलले गेले. उध्द्वा अजब तुझे सरकार !
ह्या सरकारची लीला लई न्यारी बघा . सत्य, प्रेम, आनंदाच्या कृपेच्या अमृताचा एखादा तरी थेंब चाखला तरी जीवन सुमधूर होते..    ह्या गुरुमाऊलीचे रूप न्याहाळायला, त्याचे रसपान करायलाच हवे नाही का बरे?
चला तर मग-
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/shree-sai-satcharitra-adhyay1-part38/

Tuesday 19 July 2016

गुरुपौर्णिमा -बापूवीण नाही कुणी रे,बापू नाम हाचि श्वास रे !

हरि ॐ
गुरुवीण नाही कुणी रे । दत्त नाम हाचि ध्यास रे ।।
गुरु माऊली तू साऊली जीवा़ची । 
तूच बंधू  पिता रे ।।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।। धृ ।।
गुरु धेनू होय मीच तान्हुले गे । चकोर मी होता देवा तू चांदणे ।।
गुरु हाच चारा । गुरु हा निवारा ।
गुरु हा माझा श्वास रे ।।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
गुरु नाम छाया । गुरु नाम माया ।
गुरु नाम घेता झाली शुध्द काया ।
गुरु हाच सूर । अमृताचा पूर ।।
गुरु हीच माझी नाव रे ।
गुरुवीण नाही कुणी रे ।  दत्त नाम हाचि ध्यास रे ।।
गुरु माऊली तू साऊली जीवा़ची ।
तूच बंधू तू पिता रे ।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
गुरुवीण नाही कुणी रे। दत्त नाम हाचि ध्यास रे ।
गुरुवीण नाही कुणी रे । दत्त नाम हाचि ध्यास रे
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।


किती समर्पक शब्दांत गुरुरायाचे, सदगुरुमाऊलीचे गुणसंकीर्तन मांडले आहे ना? मनीची आर्त, सदगुरु चरणींची ओढ अधिकच दाटून , भावविव्हल करते ती कधीही न शमणारी अनन्य पिपासा ! सदगुरु चरणी सदैव अनन्य शरणागत होण्याची , गुरु हाच श्वास बनण्याची , जीवनयज्ञाची एममेव समिधा !

गुरुपौर्णिमा  म्हटले की आपोआप मनी उमटतो ते अचिंत्यदानी गुरुमाऊलीचे अनंत , अमाप , अगणित प्रेम , प्रेम आणि बस्स फक्त प्रेमच !
गुरुची कृपा हीच गुरुपौर्णिमा हो ।
प्रतिक्षणी आम्हा अनुभव लाहो ।।
गुरुच्या ऋणांचे अखंड स्मरण राहो ।
गुरुमाऊलीच्या ऋणी मी बुडालो।।33।।
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
सद्गुरु श्री अनिरुद्ध ऋणज्ञापक स्त्रोत -डॉ. योगीन्द्रसिंह  जोशी ह्यांचे शब्द काळजाला स्पर्शून जातात.

माणसाचे जीवन हे सुख दु:खाच्या धाग्यांनी विणलेले असते. परंतु "सुखाचिया काळी जमती आप्त सारे , वेदनेत माझ्या मी एकलाची राही " ही प्रत्येक माणसाची दुखरी , खुपरी बाजू असते. आणि मग अशा असहाय्य, बिकट , एकाकी परिस्थीतीत कुणाचा तरी नि:स्वार्थी प्रेमाचा , मायेचा हात लाभावा , कुणीतरी आपले भेटावे , कुणीतरी माझे दु:ख , माझी वेदना समजून घेणारे , फक्त माझे आणि माझे असावे अशी किमान अपेक्षा प्रत्येकाच्या मनी असतेच आणि अगदी तसाच कोणत्याही लाभेवीण प्रेम करणारा , मला कधीही एकटे न सोडणारा, माझ्या सुखाने आनंदीत होणारा, माझ्या दु:खाने माझ्यापेक्षा अधिक कळवळणारा, कोणत्याही परिस्थितीत मला सदैव साथ देणारा , माझा खराखुरा एकमेव आप्त म्हणजे माझा सदगुरु ! कारण "तो "फक्त माझा आणि माझा आणि माझाच असतो अनंत काळासाठी, अनंत जन्मांसाठी. म्हणूनच संत तुकोबा "त्या" चे वर्णन करताना सदगदीत होऊन म्हणतात - जेथे जातो तेथे तू माझा सांगाती , चालविशी हाती धरोनिया । बोलो जाता बरळ करीसी ते नीट मेली लाज धीट झालो देवा । 

गुरु माऊली तू साऊली जीवा़ची । तूच बंधू  पिता रे ।।

लहान बाळाचे लालन -पालन , प्रेमाने संगोपन त्याची आईच करते . लहान बाळाचे बोबडे बोल तीच प्रेमाने ऐकून घेते आणि त्याला नीट बोलायला शिकविते. तसे माझा गुरु माझी माऊली, माझी माय बनून मला प्रत्येक पावलावर सांभाळतोच , पण मी चुकीने जरी काही वेडेवाकडे बरळलो , चुकीचे काम केले, वागलो तरी माझ्या अनंत अपराधांना क्षमाच करून मला पोटाशी अत्यंत मायेने कवटाळतो, उरी मला घट्ट धरून ठेवतो. 
हेमाडपंत सदगुरु साईनाथांबद्दल हेच श्रीसाईसच्चरीतात आपल्याला दावतात -
नऊ महीने होताच आई आपल्या बाळाला जन्म देऊन आपली नाळ तोडते पण ही गुरुमाऊली मात्र आपल्या बालकास , आपल्या लेकरास सदैव आपल्या पोटातच म्हणजेच तिच्या गर्भगृहातच सांभाळून ठेवते आणि बाळाने कितीही हट्ट केला , वेडेपणा केला तरी देखिल आपली गर्भनाळ कधीही तुटून देतच नाही मुळी. म्हणूनच ती आणि फक्त तीच ग्वाही देऊ शकते "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " किंवा "मी तुला कधीच टाकणार नाही."  
आपला जन्मदाता , आपला पिता हा आपल्या देहाला जन्म देण्यास कारणीभूत असतो , परंतु  त्या नाशिवंत देहापाठी मरण हे लागलेलेच असते, जे कुणालाच चकवता वा टाळता येत नाही. 
परंतु सदगुरु हा एकमेव असा अद्वितीय पिता आहे की जो जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून आपल्या लेकराला निर्दाळू शकतो, पैल तीरावर नेऊ शकतो सुखनैव ! 
हे सामर्थ्य "त्या " एकाचेच , कारण असे जगावेगळे कनवाळूपण "त्या"चे च असू शकते. 
संसाराच्या त्रिविध तापांनी तापलेल्या , दमलेल्या जीवाला सदगुरु माऊलीच सावली देते . आत्महत्येसारख्या अक्षम्य वातेवरून परत माघारी फिरविते मग ती कधी स्वामी समर्थ रूपाने वामनबुवा बडोदेकरांना बडोद्याच्या सुरसागरात जलसमाधी घेण्यासाठी भर रात्री धावून जाते, तर कधी विहीरीत जीव द्यायला तयार झालेल्या गोपाळ नारायणआंबडेकरांना वाचवायला सगुण खानावळवाल्याच्या रूपाने साईबाबा बनून धाव घेते. 
मग तो जीव मानवयोनीतच असायला पाहिजे असेही नाही , मागील जन्मातील ऋण-वैर-हत्या ह्या सूडाच्या दुष्टचक्रातून न सुटलेल्या आणि पुनश्च: शेळी बनून जन्मलेल्या क्लांत जीवाला दोन शेरभर डाळ चारण्यासाठी धाव घेणारी साईमाय बनते, तर कधी दुर्धर व्याधीनने पछाडलेल्या ,साखळदंडानी जोखडलेल्या , मृत्यूच्या अंतिम घटका मोजणार्‍या वाघाला संतदृष्टीपुढे मरण देऊन  मुक्ती देते. 

गुरु धेनू होय मीच तान्हुले गे । चकोर मी होता देवा तू चांदणे ।।
गुरु हाच चारा । गुरु हा निवारा ।
गुरु हा माझा श्वास रे ।।
कसायाच्या हातून आपल्या वासराला वाचविण्यासाठी जशी गाय त्या तान्हुल्यावर आपले स्वत:चे शरीर कवच बनवून पसरविते स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता, अगदी त्याही पेक्षा अधिक कनवळ्याने गुरू ही आपल्या लेकरांसाठी धाव घेते व प्राणांचे रक्षण करते. 
स्वामी समर्थ अक्कलकोटला निवास करत असताना त्यांचा एक भक्त लक्ष्मण कोळी हा समुद्रांत भीषण तुफान वारा, पाऊस ह्यांत फसला होता आणि स्वामींचा सतत धावा करीत असताना दयाघन स्वामी ओळंबले आणि लक्ष्मण कोळ्याला त्यांनी बुडत्या नांवेतून वाचविले आणि जीवनदान दिले अशी कथा स्वामींच्या बखरीत आढळते. 
हरीभाऊंना स्वामी समर्थांनी स्वमुखाने जेव्हा सांगितले "तू माझा सुत आहेस" व स्वत:च्या पादुका दिल्या तेव्हा स्वामीसुतांची भावना - चकोर मी होतां , देवा तू चांदणे अशीच झाली असावी. 
कारण साक्षात परब्रम्ह श्रीकृष्ण स्वमुखे ग्वाही देतात उध्दवाला की 
 "सदगुरु तोचि माझी मूर्ती " । कृष्ण बोले उध्दवाप्रती । 
ऐसा सदगुरु भजावा प्रीती । अनन्य  भक्ति या नाव ।। ५ ।। ( श्रीसाईसच्चरित , अध्याय २५ )     
शिरडीत अस्मानी पावसाचे संकट उभे ठाकले आणि सारा गाव आता वाहून जातो असी पूरसदृश्य परिस्थिती ओढावली तेव्हा सर्व गुरे-ढोरे, भणंग-भिकारी, शिरडीवासी ह्यांना साईनाथांच्या द्वारकामाईतच निवारा लाभला होता. सदगुरुचे चरण हाच अखिल जगतातील एकमेव शाश्वत निवारा आणि सदगुरुची कासवीची दृष्टी हीच पैलतीराहून राहूनही आपल्या बाळकाला चारा पुरविणारी , शांती ,तृप्ती, समाधान देणारी  करूणामयी दृष्टी - समस्त कृपेचा चारा !
गुरु हा माझा श्वास रे ।।
चोळाप्पाच्या मुलास कृष्णाप्पा महामारीचा उपद्रव होऊन अंत झाला आणि घरची सर्व मंडळी आक्रोश करू लागली असतां करूणार्णव , कृपासिंधु स्वामी समर्थांनी " अरे नीळकंठा , ऊठ, ऊठ ! आमच्याबरोबर दोन शब्द बोल.  " म्हणून हांक मारू लागतांच  , श्रींचे अमृततुल्य वचन ऐकतांच कृष्णाप्पा डोळे उघडून पाहू लागला व उठून बसला होता.
मुंबईच्या पितळे नावाच्या गृहस्थाच्या लहानग्या मुलास साईबाबांच्या दर्शनास शिरडीला नेले असतां तो कुमार साईंची दृष्टादृष्ट होतांच दोळे फिरवून अवचिता बेशुध्द होऊन पडला व त्याच्या तोंडातून भरपूर फेस जाऊन , सर्वांगास घाम फुटला आ णि त्याच्या जीविताची आंस सरली असतां, केवळ साईबाबांनी आश्वासन देतां - "मुलास घेऊनि जा बिर्‍हाडी । आणीक एक भरतां घडी  ।सजीव होईल तयाची कुडी । उगीच तांतडी करूं नका " ।। आणि मग त्या कुमार मुलास वाड्यांत नेतांच तो तात्काळ शुध्दीवर आला व माता-पित्यांचा घोर फिटला.
गुरु हा माझा श्वास रे ।। ह्याची जिवंत अनूभूती !         

गुरु नाम छाया । गुरु नाम माया ।
गुरु नाम घेता झाली शुध्द काया ।
गुरु हाच सूर । अमृताचा पूर ।।
गुरु हीच माझी नाव रे ।
थकल्या भागल्या पांथस्थांना, वाटकरूंना जसे रस्त्यावरील वृक्ष आपल्या शीतल छायेत निवारा देतात, त्यांच्या श्रमाचा परिहार करतात, तसेच सदगुरु आपल्या संसाररूपी भवसागरात गंटागळ्या खाणार्‍या जीवाला चैतन्य देतात, नव-संजीवनी देतात . 
बाळाप्पा हा स्वामींचे श्रीचरणी शरण जाण्याआधी व्यापार धंदा करीत असताना. तीन वर्षे आधी त्याच्या  व्यापारातील भरभराटीमुळे एका द्वेष्ट्याने त्याला कानवल्यातून विष खाऊ घातले होते. एकदा अचानक बाळप्पाच्या बेंबीतून रक्तस्त्राव होऊ लागला व तो फार आजारी झाला होता. तेव्हा स्वामी कृपेने एकदा फारच रक्त वाहू लागले आणि कांही वेळाने त्यातून एक कागदाची पुडी निघाली , ज्यात कांही काळा पदार्थ होता. त्यानंतर रक्तस्त्राव थांबून बाळाप्पास आराम झाला. " ही सारी स्वामी समर्थांच्या नावाचीच छाया होती असे आढळते. 
गुरुचें नाम मायेच्या पसार्‍यातून भक्ताला बाह्य जगतात तारून नेते. 
श्रीसदगुरु नाम पवित्र । हेंचि आमुचे वेद्शास्त्र । ’साईसमर्थ’ आमुचा मंत्र । यंत्रतंत्रही तें एक ।। ६२ ।। 
                                                                                                       - ( श्रीसाईसच्चरित , अध्याय १ )
गुरु नाम घेता , अनेक भागोजी शिंदे ( साईबाबांचा एक सेवेकरी भक्त ), ठाकूरदासबुवा (श्वेतकुष्ठ झाला असता स्वामी समर्थांछ्या कृपेने व्याधीमुक्त झाला)  सारख्या कुष्ठ्यांचे कोड दूर झाले ,महामारीसारख्या जीवघेण्या व्याधीतून मुक्तता लाभली , कोणाअंधाला नेत्रप्राप्ती झाली, तर कोणाचा पोटशूळ गेला. 
म्हणजेच सदगुरुचे नाम अत्यंत पुण्यप्रद, पावन असते जेणे भक्तांची काया शुध्द होते , हे १०८ % निर्विवाद सत्य !

जेव्हा माझ्या जीवनी मी सदगुरुंच्या चरणी शारण्यभाव ठेवतो आणि भक्ती करू लागतो तेव्हा माझ्या जीवनगाण्याला  सुमधुर सूर सदगुरुच प्रदान करतो आणि सुखाचा, आनंदाचा पूरच जणू माझ्या जीवन नदीला व्यापून टाकतो.   

म्हणूनच कोरड्या चरणें भव तरून जाण्यासाठी  मला सदगुरुलाच माझ्या जीवनाचा नाविक करायला हवे , आणि माझ्या जीवनाचे वल्हे त्याच्या हाती बिनधास्त सोपवायला हवे. 
आज माझ्या सदगुरु बापूंना एवढेच सांगावे वाटते - बापूवीण नाही कुणी रे, बापू नाम हाचि श्वास रे ... 
(हे सदगुरुराया  मी फक्त तुझाच आणि तू फक्त माझाच . 
I LOVE YOU MY DAD ALWAYS AND FOREVER ! ) 
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
सदैव तुझ्याच चरणी तुझा एक दास बनून , तुझ्या चरणी बापूज्ञ , अंबज्ञ बनव ! 



आजच्या पुण्यप्रद पावन दिवशी माझ्या जीवनाची नाव अलगद लीलया सांभाळणार्‍या माझ्या सदगुरु श्री अनिरूध्द बापूंच्या चरणीं कोटी कोटी लोटांगण आणि हेमाडपंताच्या शब्दांत एकच मागणे -
मी तो केवळ पायांचा दास  नका करू मजला उदास। जोवरी ह्या देही श्वास। निजकार्यासी साधूनि घ्या ।।

हरि ॐ. श्रीराम . अंबज्ञ.



  

Friday 15 July 2016

विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला

मुख दर्शन व्हावे । आता तू सकल जगाचा त्राता ।।
घे कुशीत या आता । ठेवितो पाऊली माथा ।।
माऊली माऊली ।  पुंडलिका वरदे हारी विठ्ठल ।।

आज आषाढी एकादशी , वारकर्‍यांचा अवर्णनीय आनंदाचा जल्लोष , त्यांच्या विठू माऊलीला भेटण्याची अनिवार ओढ , सर्व सुख-द:खांना पाठीशी टाकून एकमेव लाडक्या प्राणांहून प्रिय अशा सख्याला , जीवीच्या जिवलगाला भेटायसाठी उरी लागलेली अनामिक आर्तता , सदैव अमृतातेही पैजा जिंकी असे अवीट माधुर्याचे रसपान करणारी विठू माऊलीच्या चरणांची पिपासा आणि चंद्रभागेच्या तटी बेधुंद होऊन टाळ, मृदंग , वीणा, झांजाच्या तालावर थिरकणारी पावले ! 

जणू सारी संसाराची बंधने झुगारून , नाती झिडकारून  फक्त "त्या" एकमेव सावळ्या विठ्ठलाची आस उरी बाळगून  "तो " वारकरी वारी करत असतो...
म्हणूनच पंढरपूरच्या वेशीला लागताच , चंद्रभागेत "त्या"च्या प्रेमाने न्हाऊन निघता निघता वारकरी त्याच्या लाडक्या विठू माऊलीच्या दर्शनाने धन्य धन्य होतो , सुखावतो , आंतर्बाह्य ! तेव्हा देहभान हरपलेल्या ह्या जीवाला विठ्ठलाचे दर्शन भले ना होवो देवळात गाभार्‍यात भले न जाता येवो पण त्याच्या जीवनाचे सार्थक होते तो पंढरपूरच्या विठ्ठल मंदीराचा कळस पाहूनच !
खेळ मांडीयेला वाळंवटी काठी  नाचती वैष्णव गाती रे  
होतो जयजयकार गर्जत अंबर  मातले हे वैष्णव विरळे 

आणि म्हणूनच संत तुकोबा म्हणतात "तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे " 

संत तुकोबा, ज्ञानोबा, मानदेव, एकनाथ, जनाबाई, मीराबाई, कबीर , चोखामेळा , सोयराबाई अशी सारी संताची मांदियाळी एक्मुखाने, एकरवाने गर्जून "विठू माऊली" च्या नामाचा अगाध महिमा, तिच्या भक्तीप्रेमाच्या ऐश्वर्याचा गोडवा गाताना थकत नाही . हा भवसागर विना सायास तरून जाण्यासाठी सोपा एकमेव उपाय म्हणजे "त्या" च्या नामाचा !
अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग म्हणून दर्शन न घेताही सुख मानणारा आणि विठ्ठल मंदीराची पायरी ही न शिवू शकणारा (त्या काळच्या स्पृश्य-अस्पृश्य जातीभेदामुळे) तरीही विठूच्या प्रेमाने रंगून गाणारा
उंबरठ्यासी कैसी शिवू आम्ही जातीहीन, पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग  म्हणून विठूला कोणताही दोष न देता उलट त्याचे, त्याच्या प्रेमाचे गोडवेच गाणारा चोखामेळा,
दर्शन घेऊनही विठूची महती न जाणणार्‍या समाजाला विठूच्या रूपाची , त्याच्या सावळ्या रंगाची आणि प्रेमाची महती समजाविणारी सोयराबाई -
अवघा रंग एक झाला  । रंगी रंगला श्रीरंग  ।
एक तत्त्व नाम दृढ धरी  मना   । हरीसी करूणा येईल तुझी  
ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद   । वाचेसी सदगद जपे आधी 
 ही शिकवण देणारे तुकोबा,
हरी मुखे म्हणा । हरी मुखे म्हणा  । पुण्याची गणना कोण करी । म्हणून भक्तीच्या  वाटेवर बोट धरून चालविणारी   ज्ञानोबा माऊली अशा संतानी दाविलेल्या वाटेला आपले करणारे असंख्य वारकरी ह्याच "त्या"च्या चरणीच्या अनन्य भावाने शरणागत होऊन पंढरीची वाट दिंडीमधून चालतात अथकपणे, अविरत . अशाच
 बोल एका श्रेष्ठ वारकरी स्त्री भक्ताचे ( द्वारकामाई पाध्ये)  स्वानुभवाचे बोल मनाला स्पर्शून जातात -
 ज्याने धरिले हे पाय आणि ठेविला विश्वास  । त्यासी कधी ना अपाय  । सदा सुखाचा सहवास  ।



किती निर्मळ मन असते ह्या वारकर्‍यांचे, त्याच्यांसाठी त्यांची विठू माऊली म्हणजे जगातील एकमेव श्रेष्ठ नाते, भलेही संसारात, व्यवहारात आपल्या नातेवाईकांशी संबंध तुटले, दुरावले तरी त्यांना एक मात्र पुरते पक्के ठाऊक असते ते अंतिम सत्य की त्यांची माऊली त्यांना कधीच टाकणार नाही कारण "त्या " सावळ्याच्या प्रेमाने , त्यांच्या मनात एकविध भाव जागवलेला असतो , तोच त्यांना धीर देतो की -
आता नको नाती सारी  त्याचे पायी माझी वारी ।

संताचा हाच भाव , अनन्य शरणागती आपल्या सदगुरुंच्या ठायी ठेवणारा अशीच एक महान विभूती अगदी नजिकच्या काळात होऊन गेली ती म्हणजे श्रीसाईसच्चरीत ह्या महान , अपौरूषेय ग्रंथाचे विरचिते - श्री गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ साईबाबांचे लाडके हेमाडपंत !

आज १५ जुलै ! ८७ वर्षांपूर्वी १५ जुलै १९२९ साली हेमाडपंतांनी श्रीसाईबाबांच्या  चरणी  आपला देह समर्पित केला . आज ज्यांच्यामुळे परमार्थाची वाट गवसली, माझ्या जीवनाला सदगुरुंचा परीस स्पर्श लाधला त्या माझ्या अत्यंत लाडक्या हेमाडपंताची म्हणजेच श्रीसाईसच्चरितकार श्री.गोविंद रघुनाथ दाभोलकर उर्फ अण्णासाहेब ह्यांची पुण्यतिथी. त्यानिमित हेमाडपंताचे  पुण्यस्मरण करताना आजच्या दिवसाच्या योगायोगाचे नवल दाटले मनी ! 

संत जनाबाईसवे विठ्ठल दळ्ण दळू लागे अशा कथा लहानपणी आजीकडून ऐकल्या होत्या , तेव्हापासून विठ्ठल तर साक्षात देवबाप्पा ! मग तो कसा आपल्या भक्तासाठी धावून येतो आणि कसे त्याच्या कामात त्याला हातभार लावतो ह्याबद्दल अपार कौतुक मनात दाटले होते . कसा दिअसत असेल बरे हा पंढरीचा पाटील  ! हा तर वैकुंठाचा स्वामी , त्रिभुवनाचा जगजेठी , हा कसे बरे काम करेल , असे नानापरीचे कुतुहल मनात दाटे.

त्या सगळ्या गोष्टींचे साक्षात प्रत्यंतर मिळाले श्रीसाईसच्चरीत वाचताना ! हेमाडपंताच्या समर्थ , सदगुरुंच्या प्रेमाने आकंठ डुंबलेल्या लेखणीतून ! आपल्या सदगुरुची प्रत्येक गोष्ट, मग भले त्याचे हसणे, त्याचे बोलणे, त्याचे रागावणे, त्याचे चालणे ह्याचा आनंद कसा लुटाय़चा ह्याचे साग्रसंगीत रसाळ , मधुर अमृत पदोपदी चाखायला मिळतेच .

माझा सदगुरुचे चरण हेच माझ्यासाठी काशी, पंढरपूर , प्रयाग ! सर्व तीर्थक्षेत्रे माझ्या सदगुरु साईबाबांच्या चरणीच वास करतात हा अत्यंत सुंदर भक्तीचा अनन्य शरणागताचा भाव हेमाडपंताच्या प्रत्येक शब्दांतून अव्याहतपणे पाझरत राहतो. माझा गणपती तूच, , माझी सरस्वती तूच, माझा विठ्ठल ही तूच , माझा शंकरही तूच  ह्या अनन्य भावाला न्याहाळताना समोर त्या त्या देवतेचे आपसूक दर्शन सदगुरुंच्याच ठायी न घडले तरच नवल !

अशा हेमाडपंतांनी माझ्या साईनाथाने, माझ्या साईबाबाने गहू दळले कसे आणि त्या गव्हाच्या पिठातून चक्क शिरडी गावावर ओढावलेले महामारीचे संकटाचे कसे निरसन केले ह्याचे अगदी श्रीसाईसच्चरीताच्या पहिल्याच अध्यायात रसरशीत वर्णन केले आहे. मानवी पातळीवर अशक्य वाटणार्‍या गोष्टी सुध्दा माझे सदगुरु त्यांच्या  भक्तांवरील अथांग प्रेमापोटी कशा सहज लीलांद्वारे घडवून आणत व शक्यात उतरवीत ह्याची अल्पशी ओळख माझ्या सुमार बुध्दीला "त्या" घननीळ साईबाबांच्याच भक्तीने झाली होती .

तरी देखिल ह्या श्रीसाईनाथांच्या अगम्य लीलेत अजूनही अशा अगणित गोष्टींचे भांडार दडलेले असेल ह्याची पुसटशी जाणीव सुध्दा नव्हती कारण "त्या"च्या प्रेमाला पिण्याइतकी तहान लागली नव्हती, मनी ती आस, ती तृषा, ती पिपासा दाटली नव्हती. पण आजच्या ह्या आषाढी एकादशीच्या पुण्यप्रद पावन दिवशी "त्या " विठ्ठलाचे आपणही वारकरी व्हावे असा भाव मनी तीव्रतेने दाटला आणि "त्या" सावळ्याच्याच प्रेमाने,  "त्या" च्या चरणी नि:शंक मनाचे, नि:संशयी प्रेमाचे, अनन्य नाते कसे स्थापयाचे , त्याला कसे न्याहाळायचे ह्याची अमूल्य शिकवण देणारा एक लेख वाचनात आला.

माझ्या साईबाबांची प्रत्येक कृती ही कृपाच असते.कृपा म्हणजे कृतीला , क्रियेला पूर्णत्व देणारी !
माझा साईबाबा हा अनन्य प्रेमाचा , कृपेचा सागर आहेच मुळी - "कृपासिंधु"
पण माझी ती कृपा स्विकारण्याची तयारी हवी , मला त्या दृष्टीने त्याला न्याहाळता आले तर हा अगणित मोलाचा अमृतकुंभ मला गवसेल.

आपल्याला वाटेल साधे गव्हाचे दळण तर साईबाबांनी दळले , त्याचे काय एवढे कौतुक आणि त्यातून काय शिकायचे ? पण हेच जाणून घेण्यासाठी मला जो लेख अत्यंत लाख मोलाचा वाटला तो तुम्ही पण वाचून पहाच एकदा!

रोजच्या जीवनात असंख्य गोष्टी करण्याचे , एखादे कार्य करण्याचे आपण ठरवितो, त्यासाठी लागणार्‍या अनेक गोष्टींची जमवाजमव करतो तरी कधी कधी आपले कार्य नीट पार पडत नाही किंवा आपल्या गोष्टीला अपेक्षित यश मिळत नाही  वा अपेक्षित फळ मिळत नाही आणि आपण दुं:खी होतो, निराश होतो, उदास होतो. हा सर्व दुष्ट चक्रातून सुटायला मला जाणून घ्यायला हवे ते कोणत्याही कार्याच्या खर्‍या यशाचे गमक ! त्यातील बारकावे जे स्वत: माझा साईनाथ स्वत: कृतीतून मला शिकविण्यास सदातुर आहे , पण मीच करंटेपणाने त्याची उपेक्षा करतो, त्याच्या कडे दुर्लक्ष करतो आणि मग माझी झोळी फाटकी, मी कमनशिबी, मी  दुर्दैवी असे स्वत:ला दूषणे देत बसतो, त्यापेक्षा एकदा आपण फक्त थोडा वेळ काढून हा लेख वाचल्यास मला माझ्या कृतीला पूर्णत्व देणारा एकमेव रामबाण उपाय सापडेल- अगदी १०८ % सत्य !
आणि आनंदही गवसेल -
" विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला " म्हणजे नक्की काय असते ह्याचा जिवंत अनुभव !

श्रीसाईसच्चरीतात गवळीबुवांची कथा हेच आपल्याला शिकविते . "त्या" एकाच्या चरणी अनन्य भाव ! पंढरीचे वारी करणारे , आठ महीने पंढरीत आणि चार महीने गंगातटावर निवास करणारे ९५ वर्षांचे गवळीबुवा शिरडीत साईनाथांना न चुकता दरवर्षी भेटायला येत आणि त्यांच्या दर्शनाने पावन होऊन स्वत:ला धन्य धन्य मानीत आणि उद्गारत -
हाच तो  मूर्त पंढरीनाथ ।  अनाथनाथ दयाळ । 
धोत्रें नेसूनि रेशीमकानी ।  होतील काय संत कोणी ।   करूं लागती हाडांचे मणी  । रक्ताचें पाणी निजकष्टें । 
फुकाचा काय होईल देव  ।  हाचि हो प्रत्यक्ष पंढरीराव  । जग वेडें रे वेडें हा दृढ भाव ।  ठेवूनि देव लक्षावा ।। 

कारण पंढरीचा पळपुट्या विठ्ठल पाटील गवळीबुवांना भेटायला शिरडीतही साईबाबांच्या ठायी प्रकटत असे, मला असा विठ्ठ्ल भेटावा म्हणून आस लागली असेल तर "त्या" एकाला मला माझ्या सदगुरु साईबाबां मध्ये सुध्दा दर्शन घडते कारण मी त्याला भेटायला जितका तळमळतो , आतुरतो त्याच्या कैक अनंत पटींनी "तो" मला भेटायला धाव घेतो .मी एक पाऊल त्याच्या दिशेने टाकतो तेव्हा तो बाकीची ९९ पाऊले स्वत:च चालत नव्हे तर धावत येतो आणि मला कडेवर घेतो...

चला तर भेटू या आजच विठू माऊलीला आणि दळण दळताना आपण त्याच्या प्रेमाची , भक्तीची गीते गाऊ या हा लेख वाचून -
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/shree-sai-satcharitra-adhyay1-part36/

Wednesday 6 July 2016

ऑपरेशन जल- राहत


आज पहिल्यांदा टेलिव्हीजन वरील बातमी पाहून आपला भारत देश आपत्ती निवारणासाठी उच्च तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करताना पाहून उर अभिमानाने भरून आला. तसा आपला भारत देश हा सतत दुष्काळ, पूर ह्या नैसर्गिक आपत्तींचे तडाखे सोसत असतो. परंतु तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापराच्या अभावी मदत आणि बचाव कार्य पार पडताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे आणि परिणामी होणारी मनुष्यहानी, वित्तहानी ह्यांची आकडेवारी मनाला चटका लावून जात असे.   
     
आपल्या भारत देशात पूराच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी व मदत आणि बचाव कार्य   प्रभावीपणे पार पाडण्याकरीता प्रथमच भूदल , नौदल , वायुदल , अशा तीन्ही सेना  आणि एनडीआरएफ़ आणि एसडीआरएफ़ ह्या संस्था सुसंघटीत झाल्या आणि "ऑपरेशन जल- राहत " आसाम येथील गुवहाटी येथील ब्रम्हपुत्रा नदीच्या किनार्‍यावर प्रथम खेपेस  यशस्वी रीत्या पार पाडण्यात आले. ह्या मागे अर्थातच आपल्या पंतप्रधान नरेंद मोदीजी ह्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 

वास्तविक पहाता डिसेंबर २०१५ मध्ये कंबाइंड कमांडर कॉन्फरन्स मध्ये पंतप्रधान नरेंद मोदीजी ह्यांनी आपत्ती निवारणाचे मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी तीन सेनांनी सुसंघटीत होऊन  एकत्रित प्रयास करावे ह्या विषयी सूतोवाच केले होते. त्यावेळी पंतप्रधानानी भूदल, नौदल आणि वायुदल अशा तीन सेना आणि बाकी इतर एंजसींनी आपापसात सुसूत्रीकरण करून मदत आणि बचाव कार्याचे आयोजन करावे ह्यावर अधिक भर दिला होता. पूरामुळे दरवर्षी सुमारे अडीच लाख लोकांना झळ पोहचते आणि त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यास आणि सराव आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ मदतीचा हात देऊ शकेल असा अंदाज वर्तविण्यात  आला होता. सेनेच्या हार्न डिव्हीजनचे मेजर जनरल राजीव सिरोही ह्यांच्या मते "ऑपरेशन जल राहत " मध्ये तीन सेनांनी एकत्रित येऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.ह्या ऑपरेशन दरम्यान चिता हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तर त्याच बरोबरीने भारतीय वायुसेनेच्या "एम आई १७ : हेलिकॉप्टरच्या वापराने पूराच्या प्रभावाखाली असलेल्या पोहचण्यास  दुर्गम अशा  भागात जाऊन वैद्यकीय मदत देऊन सुटका करणे, बचाव करणे शक्य झाले आणि सोबत बचाव पुरवठा साहित्य पोहचविणे सुध्दा सुकर झाले. ह्या संपूर्ण बचाव कार्यात तीन सेनांबरोबर एनडीआरएफच्या तीन युनिट आणि आसाम   एसडीआरएफच्या टीमही सहभागी झाल्या आहेत. 

अशा प्रकारच्या सरावाने आपण नक्कीच निसर्गाच्या प्रकोपाला सुसंघटीतपणे ,सशक्त सबल होऊन सामोरे जाऊ शकतो ह्याची अनूभूती मिळाली आहे.  

मदत आणि बचाव कार्य कशा प्रकारे पार पाडण्यात आले हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडीओ पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=jisouq7iaiI


प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog