Wednesday 28 June 2017

लोटस पब्लिकेशनच्या ज्ञानगंगेच्या तीरी .....

लोटस पब्लिकेशनच्यावतीने २६ जून २०१७ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता त्यात सहभागी होण्याची सुसंधी प्राप्त झाल्यामुळे एका अविस्मरणीय घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य ईशकृपेने लाभले. अत्यंत प्रभावी भारदस्त व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दोन लेखिकांच्या पुस्तक पकाशनाचा हा सोहळा मुबईमध्ये दादर येथील बी.एन.वैद्य सभागृहात पार पडला.

विख्यात मराठी अभिनेते सचिन खेडेकर आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित ह्यांच्या हस्ते रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या सुप्रसिध्द अभिनेत्री आशालता वाबगावकर ह्यांच्या "गर्द सभोवती " पुस्तकाचे आणि  वैद्यकीय महविद्यालयांत , न्यायवैद्यक शास्त्र (Forensic Medicine) विभागांत ३५ वर्षे विभागप्रमुख पदावरून अध्यापन व सेवा करणार्‍या डॉक्टर वसुधा आपटे ह्यांच्या "गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र " पुस्तकाचे प्रकाशन लोटस पब्लिकेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्री समीरसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
                                                                    

प्रकाशन सोहळ्याचा आरंभ श्रीआदिमाता शुंभकरा स्तवनाने झाल्याने दैनिक प्रत्यक्ष आणि लोटस पब्लिकेशनतर्फे जपण्यात आलेल्या अध्यात्मिक बैठकीचे प्रत्यंतर आले. विनोद सातव ह्यांनी आपल्या खुमासदार शैलीत समारंभाची रूपरेखा प्रस्तुत केली. त्यानंतर लोटस पब्लिकेशनच्या मार्केटींग डायरेक्टर कल्पना नाईक ह्यांनी लोटस पब्लिकेशनच्या प्रकाशित झालेल्या आणि वाचकांच्या आवडीस उत्तीर्ण झालेल्या डॉ अनिरूध्द जोशी ह्यांच्या "तिसरे महायुध्द" , आणि डिझास्टर मॅनेजमेंट ह्या पुस्तकांची माहिती दिली. त्याच बरोबरीने दैनिक प्रत्यक्ष अध्यात्माबरोबरीनेच भारतवर्षाचा "समर्थ इतिहास " आणि उत्तुंग व्यक्तीमत्त्वांच्या जीवनाचा परिचय लेखमालांद्वारे करून देऊन  वाचकांना दर्जेदार लिखाण उपलब्ध करून देत असल्याचे नमूद केले.

कल्पना नाईक यांनी दैनिक प्रत्यक्षच्या अफाट व्याप्तीचा आढावा घेताना श्रोत्यांना दैनिक प्रत्यक्षने  चालता बोलता इतिहास या सदराद्वारे  आपल्या सुमधुर स्वर्गीय संगीताने श्रोत्यांची मने जिंकणार्‍या  विख्यात ज्येष्ठ अभिनेत्री जयमालाबाई शिलेदार, श्रीमती मृणालताई गोरे, सहकार क्षेत्रातील श्री बाळासाहेब विखे पाटील, वृत्तपत्रसृष्टीतले प्रसिध्द  श्री मुरलीधर शिंगोटे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला असल्याची जाणीव करून दिली. तसेच माननीय लेखिका श्रीमती पुष्पा त्रिलोकेकर, सुप्रसिद्ध संगीतकार श्री प्यारेलाल शर्मा, पटकथाकार श्री सलीम खान, रंगभूषाकार श्री पंढरीनाथदादा जुकर ह्यांच्या लेखांनी तर वाचकांना मेजवानीच दिली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

या लेखमालांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या लेखमालांची पुस्तकेही लवकरच लोटस पब्लिकेशन वाचकांसमोर आणणार असल्याची आनंददायक बातमी ह्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान देण्यात आली.  

लोटस पब्लिकेशनने "राष्ट्रीय सेवक संघ - विश्वातील अद्वितीय संघटन " ह्या मराठी , हिंदी, इंग्लिश, गुजराथी अशा चार भाषांतून नुकतेच प्रकाशित केलेल्या पुस्तकाचीही माहिती मिळाली.   

त्यानंतर आशालता वाबगावकर आणि डॉक्टर वसुधा आपटे ह्या दोन्ही लेखिकांनी दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ अनिरूध्द जोशी ह्यांनी आपल्या दैनिक प्रत्यक्षच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजेच २००६ पासूनच स्तंभ लेखनाला प्रोत्साहित करून एक दुर्मिळ संधी दिल्यामुळेच आज ह्या पुस्तकांचे प्रकाशन होत असल्याचे सांगून डॉ. अनिरुद्ध जोशींबद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त केला. दोन्ही लेखिकांचे हे प्रथम पुस्तकच आहे आणि ते एकाच वेळी दैनिक प्रत्यक्षच्याच लोटस पब्लिकेशनने प्रकाशित केले असल्यामुळे, लेखिकांना आपल्या चाहत्या वाचकवर्गाला भेटण्याचीही संधी लाभली होती - जणू दुग्ध-शर्करा योगच जुळून आला होता !
                                                              
आशालता वाबगावकर आणि डॉक्टर वसुधा आपटे

आशालताजींच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेता सुबोध भावे काही आकस्मिक कारणांमुळे उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी त्यांच्या मन:पूर्वक शुभेच्छांचा संदेश पाठविल्याचे विनोद सातव ह्यांनी कथन केले. सुबोध भावे ह्यांनी आपल्या प्रस्तावनेत आशालताबाईंच्या लिखाणाबद्दल खूपच सुंदर मत व्यक्त केले आहे की एखाद्या गायकाने रागांमधून सुरांचे मंथन आपल्यासमोर्पेश करावं त्या अनुभवांच्या संगीताचे राग आळवत आपल्या जगण्याचे मंथन आपल्यासमोर आशालताबाईंनी मांडले आहे अन् हे लिखाण त्यांच्या नावाप्रमाणेच आशादायी आहे, प्रफुल्लित करणारे आहे. ह्यावरून वाचकांना "गर्द सभोवती " मध्ये किती अप्रतिम अनुभवांची शिदोरीची पर्वणी लाभणार असल्याची कल्पना येईलच.   
                                                                  
ज्यांनी माझ्या हाती लेखणी धरण्याची ताकद दिली आणि मी लिहू शकेन असा विश्वास दाखविला त्या दैनिक प्रत्यक्षच्या कार्यकारी संपादक डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांच्या बद्दलची आपल्या मनातील अपार आदरभावना व्यक्त करताना आशालताबाईंचा कंठ दाटून आला होता.      

 डॉ. वसुधा आपटे ह्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित ह्यांनी स्वत: आपल्या भाषणातून त्या व्यक्त केल्या. त्यांनी न्यायवैद्यक विभागाचा पोलिसांच्या गुन्हेगार शोध प्रक्रियेत असलेला अन्योन्य संबंध स्पष्ट केला. सामान्य माणसांना न्याय वैद्यक शास्त्राच्या कार्याबद्दल सोप्या भाषेत माहिती देणार्‍या डॉ. वसुधा आपटे ह्यांच्या पुस्तकाचे व  कार्याचे कौतुक केले. तसेच दैनिक प्रत्यक्षने त्यांना लिखाणाची संधी दिल्याने हे समाजाला प्रबोधन करणारे पुस्तक आज उपलब्ध झाले असल्याचे आपले मत मांडले



" पोस्टमार्टेम" ह्या गुन्हेगारीशी निगडीत पोलीस आणि न्यायवैद्यक शास्त्राच्या संयुक्त कारवाईबाबत समाजात असलेल्या अज्ञानाला आणि गैरसमजूतींना दूर करण्यासाठी दैनिक प्रत्यक्षने ठोस पावले उचलावीत असे आपले मत त्यांनी लोटस पब्लिकेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री समीरसिंह दत्तोपाध्ये ह्यांना सभागृहातील श्रोत्यांच्या उपस्थितीत निवेदन केले. ह्या वरून समाजात दैनिक प्रत्यक्ष ह्या बिगर राजकीय पत्रक पार पाडीत असलेली मोलाची कामगिरी आणि दैनिक प्रत्यक्षने वाचक वर्गाला दिलेली सभानता ह्याची जाणीव झाली. भ्रष्टाचाराची पालेमुळे उखडून टाकणारे एक निडर, धडाडीचे पोलीस महासंचालक म्हणून ज्यांची कारकीर्द वाखाणली जाते असा ज्यांचा विनोदजींनी परिचय करून दिला होता त्या माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित ह्यांचे हे जाहीर निवेदन म्हणजे "दैनिक प्रत्यक्ष "च्या समाज-प्रबोधनाच्या कार्याची दखल आणि पाठीवरील कौतुकाची थापच जणू काही !
                                                                      


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन खेडेकर ह्यांनी लोटस पब्लिकेशनने एका अभिनेत्याला आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पदी आमंत्रित करून , अभिनेता हा देखिल अभिनयाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात आपली आवड जोपासत असतो ह्या विशेष बाबीकडे समाजाचे लक्ष वेधले असल्याचे समाधान आपल्या मनोगतातून व्यक्त केले. खेडेकरजींनी आपल्या विशेष शैलीतून विलेपार्ले येथील आपल्या वास्तव्यात अनुभवलेला प्रथितयश लेखक विजय तेंडूलकर ह्यांचा लेखकाने  लिखाणाच्या सरावासाठी घ्यावयाच्या प्रयासांचा मजेदार किस्सा प्रेक्षकांना सांगून एक महत्त्वाचा संदेशच जणू दिला.  लेखकाच्या जीवनातील नियमीत सरावासाठी एखाद्या दैनिकातील स्तंभ लेखनाची जबाबदारी कशी मोलाचा हातभार लावते ते नमूद करून दैनिक प्रत्यक्षने आशालताजी आणि डॉ वसुधा ह्यांच्यातील लेखिकेला प्रेरणा देण्याचे किती बहुमोल कार्यच केल्याचे जणू अधोरेखित केले होते. आपल्या भाषणातून त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी मराठी वाचनाला चांगले दिवस आणायला हवे असे प्रतिपादन केले आणि सरते शेवटी "तयारी असली पाहिजे" ही विंदा करंदीकारांची कविता आपल्या अनोख्या शैलीने मधुर आवाजात सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.


प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीत्या कार्यक्रमात योगदान देणार्‍या सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यकर्माची सांगता झाली. लोटस पब्लिकेशनतर्फे उपस्थितांना त्यावेळी प्रकाशित केली गेलेली पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून दिली गेली होती. लोटस पब्लिकेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री समीरसिंह दत्तोपाध्ये ह्यांनी आमंत्रितांसोबत मनमोकळा संवाद साधला होता. त्यातील श्री समीरसिंह दत्तोपाध्ये ह्यांनी सांगितलेले एक वाक्य मनाला खूप भावले की भारंभार वाचनामागे धावण्यापेक्षा वाचलेले आपल्या आयुष्यात आचरणात आणणे खूप महत्त्वाचे असते. आचरणात आणणे तर खूप दूरच राहते, पण साधे Implement करावयाचे ठरवून प्रयास केले तरी पुरेसे असते. लहान मुलांच्यावर हे वाच , ते वाच म्हणून फक्त मारा करण्या ऐवजी त्यांना त्यातील सार (मूळ ) सोपे करून समजावले तरी चालते. ह्यातून लोटस पब्लिकेशनच्या उदात्त विचारसरणीशी असलेली बांधिलकी अनुभवता आली. त्यांनी पुढे सांगितलं कि ही दोन्ही पुस्तके खालील संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत जेणेकरून वाचकांना घरपोचं  पुस्तके मिळू शकतात.

आजकाल पुस्तक हातात घेऊन वाचण्यापेक्षा तरूणाई बहुतांशी किंडलवर किंवा e-book वाचणे अधिक पसंद करतात हे ध्यानात घेऊन लोटस पब्लिकेशनने वाचकांसाठी e-book  स्वरूपातही ही पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत ह्याची विशेष नोंद घ्यायलाच हवी.

समाजातील अज्ञानाला झटकून, वाचकांच्या मनाची मरगळ अलगदपणे दूर करून, दर्जेदार वाचनाप्रती सामान्य मानवाला दिशा दर्शन करण्याबाबतची किती ही अटाटी, किती ही घट्ट बांधिलकी ! 



"गर्द सभोवती
Garda Sabhowati - गर्द सभोवती (Marathi Print Copy)
"गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र"  
Gunhegaranche Kardankaal - गुन्हेगारांचे कर्दनकाळ (Marathi Print Copy)
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GKDMDL

Gunhegaranche Kardankaal - गुन्हेगारांचे कर्दनकाळ (Marathi E-Book)
 https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GKDMAR

लोटस पब्लिकेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री समीरसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्याशी संवाद
लोटस पब्लिकेशनच्या स्वंयसेवकांनी केलेली स्टेजवरील मनोवेधक मांडणी म्हणजे "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी " ह्या तत्त्वाचा आरसाच होता जणू ! काळाबरोबर पावले टाकायला शिकताना वेळेची सभानता ही तितकीच महत्त्वाची नाही का बरे? लेखकांच्या तसेच प्रमुख पाहुण्यांच्या आणि आमंत्रितांच्याही अमूल्य वेळेचे भान ठेवून अवघ्या दोन- अडीच तासांच्या कालावधीत अत्यंत शिस्तबध्द वातावरणात नियोजित केला गेलेला हा लोटस पब्लिकेशनचा पुस्तक प्रकाशन सोहळा खरोखरीच खूप काही शिकवून गेला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
                                                                     
                                                                          

लोटस पब्लिकेशनच्या प्रकाशन समारंभात आशालाताबाई आणि डॉ वसुधा आपटे ह्या मान्यवर लेखिकांची
पुस्तकावर स्वाक्षरी मिळणे म्हणजे आनंदाची पर्वणी !


एखाद्या रत्नाची महती जगाला कळते ती रत्नपारख्याने त्या रत्नाला, हिर्‍याला कोंदणात बसविल्यावरच ! आशालाता वाबगावकर आणि डॉ वसुधा आपटे ह्या हरहुन्नरी लेखिकांना लिखाणासाठी केवळ प्रोत्साहीत करूनच नव्हे तर त्यांच्या लिखाणाला आपल्या दैनिक प्रत्यक्ष मधून प्रसिध्दीस आणून दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ अनिरूध्द जोशींनी ह्या लेखिकांच्या दैवी प्रतिभेला एक अनोखे दालनच उपलब्ध करून दिले. लोटस पब्लिकेशनतर्फे ह्या लेखिकांच्या दैनिक प्रत्यक्ष मधील स्तंभलेखनातील प्रकाशित लेखांचे पुस्तक प्रकाशन म्हणजे ज्ञानगंगेच्या तीरी लोटस पब्लिकेशनने लावलेला एक निरामय ज्ञानमयी दीप !

पुनश्च लोटस पब्लिकेशनच्या अवर्णनीय अशा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभो हीच आदिमातेच्या चरणी प्रार्थना !

       
                                                
                                                                                                                                      

Wednesday 21 June 2017

बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल , करावा विठ्ठल जीवभाव ....गानसरस्वतीचे अभंग सुर - किशोरीताई आमोणकर !

बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल , करावा विठ्ठल जीवभाव ....गानसरस्वतीचे अभंग सुर - किशोरीताई आमोणकर !

 

आषाढी एकादशीला भागवतसंप्रदायात खूप महत्त्व आहे. या दिवशी मातृतुल्य विठुमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी पायवारी करतात ती पंढरपूरच्या विठोबाची ! या वारीची सुरुवात सुमारे 700-800 वर्षांपूर्वी झाली असावी. ज्येष्ठ वद्य अष्टमीपासून सलग १५ दिवस एका नादात, लयीत, तालात तहान-भूक हरपून, ऊन-वारा-पाऊस कशाचीही पर्वा न करता वारकरी चालत असतात. सार्‍या वारकर्‍यांना वेध लागतात ते पंढरपूरच्या विठू माऊलीच्या भेटीचे ... त्या सर्वांचीच मने धाव घेत असतात ते पंढरीच्या वारीसाठी .. त्यांच्या जिवीच्या जिवलगाला भेटण्यासाठी तन-मन आसुसलेले असते  कधी एकदा माझ्या विठूरायाला डोळे भरून पाहीन , त्याच्या चरणांचे दर्शन घेईन - भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रं दिवस वाट तुझी...........
असा तो विठ्ठ्ल -  म्हणजे वारकरींचा भोळाभाळा शुध्द मूर्तीमंत प्रेम भावच जणू !

 "त्या" निर्गुण , निराकाराला पंढरपूरच्या मूर्तीतून सगुण , साकार करून भक्तांच्या जीवीची हाद पुरविणारा तो स्वर्गीय आवाज म्हणजे किशोरीताई आमोणकर ! असे म्ह्टले तर वावगे ठरणार नाही मुळीच.!

अभंग वाणीचे मह्त्त्व नुसते सांगून कसे कळणार?  बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल , करावा विठ्ठल जीवभाव म्हणजे काय ? हे शब्दावीण सांगण्याची सुरांची जादू , अद्वितीय सुरांची महती म्हणजे किशोरीताईंची वाणी...मन अगदी अमृताच्या अवीट गोडीने न्हाऊन निघते. 



संत तुकाराम महाराजांनी भंडार्‍याच्या डोंगरावर जाऊन एकांतात आर्त भावाने परमेश्वराला जगजेठी पांडुरंगाला आळविले होते असे वाचायचो , पण ती आर्तता कशी हृदयाला आरपार भिडून जाते हे ताईंच्या आवाजाने अनुभवता आले. शांती म्हणजे काय, तृप्ती , समाधान  म्हणजे ते परमेशाचे नाव, भगवंताचे नाम हे कळायला फक्त ताईंची वाणी , मग तो अभंग कोणत्याही संताचा असू दे. तुकोबांची बोलावा विठ्ठल ऐकताना आपोआप मनाच्या गाभार्‍यात "तो" सावळा विठ्ठल आनंदाने डोलू लागतो आणि "त्या" सावळ्या परब्रम्हासवे आपणही त्याच सच्चिदानंदाच्या भाव समाधीत तल्लीन होऊन जातो. आषाढी एकादशीला पंढरीची वारी करण्याचे सौभाग्य जरी लाभले नसले तरी किशोरीताईंचा अभंग ऐकताना आपसूक वारीच घडते, सर्व देहभान विसरून फक्त "तो" माझा विठ्ठल , माझी विठू माऊली आणि मी ह्याची अनूभूती ह्याची देही ह्याची डोळा घेता येते. जणू ताई आपल्या स्वर्गीय सुरांनी "त्या" परमात्म्याचे , परमेश्वराचे खरे रूप आपल्या भेटीला आणतात. देव्हार्‍यातील शांत पणे तेवणारी समई किंवा निरांजनाची ज्योत जशी मनाचा गाभारा एका क्षणात उजळवून टाकते लख्ख ! तसेच ह्या स्वर्गीय सुरांनी आपल्या अंतरात्मा, आपले तन-मन न्हाऊन निघते. आज कालियुगात परमेश्वराच्या अस्तित्त्वाविषयी अनेक कल्लोळ उठत असताना संताच्या अभंगाची, परमेशवरी अस्तित्वाची , "त्या " परब्रम्हाची , "त्या" सावळ्या रूपाची मोहिनीची गोडी लागणे खूप दुर्मिळ होत चालले आहे. तेव्हा फक्त डोळे मिटून शांत चित्ताने किशोरीताईंची ही अभंग वाणी ऐकली की कळते आणि अंतरीची खूण पटते . सुरांना "नादब्रम्ह" का म्हणतात ह्याची जिवंत प्रचिती ! 

"नाम घेता उरापोटी ब्रम्ह धरीते आकृती " ह्या अभंगाचा अर्थ मला कळायचा नाही पण किशोरीताईंचे "बोलावा विठ्ठल" ऐकले आणि कळले की नाम उरापोटी कसे घ्यायचे असते, किती ते अवर्णनीय प्रेम , किती ती निर्मळ भक्ती, किती तो गाढ विश्वास - तेव्हाच असा सहजसुंदर एकमेवाद्वैतीय भाव छेडता येऊ शकतो. तुका म्हणे देह हरीला विठ्ठ्ल , काम क्रोधे केले घर रिते ...... हे ऐकताना देहंभाव हरपणे म्हणजे काय ह्याचा जो अनुभव येतो ना तो शब्दांत वर्णणे खरेच पराकोटीतील अशक्य बाब आहे. साक्षात माझ्या विठू माऊलीच्या चरणांशी बसून मी फक्त "त्या" एकालाच अनुभवते ह्याहून जीवनात दुसरा आनंद काय असू शकतो.

संत सोयराबाईंचा अभंग "अवघा रंग एक झाला " ह्याचा तर अर्थ भल्या भल्यांना लावणे जड जाते पण किशोरीताई गाताना सोयराबाईंची ती भावसमाधी नयनांपुढे साकार होते. देव हा बुध्दीगम्य नसून भावगम्य आहे असे का म्हणतात ह्याचे उत्तर येथे अनुभवता येते. "देही असूनी  विदेही सदा समाधीस्थ पाही" ही सोयराबाईंची आंतरीक अवस्था , पाहते पहाने गेले दूरी - अहाहा ! किती प्रेमाने माझ्या देवाला न्याहाळू , "त्या" च्या अनिरूध्द गतीने "तो " येईलच मला भेटायला ह्याचा १०८ % भरोसा देणारा हा स्वर ! 



ज्यांच्या शास्त्रीय गायनाने मनाचा पवित्र  गाभारा बनतो आणि देह देवाचे मंदीर , अशी उच्च दर्जाची सुरांची अनमोल देणगी - परमेश्वरी प्रतिभेचा नितांत सुंदर आविष्कार म्हणजे किशोरीताई आमोणकर! साधना, अभ्यास व चिंतन या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांनी आपली गायकी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे.सादरीकरण करताना केवळ गायचे म्हणून त्या कधीच गात नसाव्या तर  तो राग - ते भजन - ते गीत संपूर्णपणे अभ्यासून , त्यामागची त्या संताची वा गीतकाराची भूमिका जाणून घेऊनच त्या गात असत. त्यामुळेच त्यांचे भजन असो वा गीत - एक प्रकारची पूजाच ठरते.

मानसपूजा करणे हे खूप श्रेष्ठ मानले जाते ही "मानसपूजा" केल्याचा आनंद घ्यायचा असेल तर किशोरीताईंचे सुर ऐकावे बस्स !
त्यांचा गातानाचा भाव समाधीत तल्लीन झालेला चेहरा आणी तो स्वगीय आवाज ऐकण्या साक्षात "तो" अवतरत नसेल तरच नवल ! म्हणूनच तसाच निर्भेळ आनंद त्या श्रोत्यांनाही देतात व देत राहतीलच !

संगीतातील शास्त्रशुद्धतेचा व पावित्र्याचा किशोरीताईंचा स्वत:चा सक्रिय आग्रह तर असतोच  पण या क्षेत्रातील इतरांकडूनही त्यांची याबाबत तशीच अपेक्षा असते असे वाचनात आले होते . "पावित्र्य हेच प्रमाण " जपणार्‍या किशोरीताईंचा `अशी' अपेक्षा व्यक्त करण्याइतका या क्षेत्रातील अधिकार निश्चितच स्पृहणीय आणि वंदनीय आहे . हा अधिकार लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रपती गौरव पदक, पद्‌मभूषण व पद्‌मविभूषण असे पुरस्कार बहाल केले. खरे तर ह्या पुरस्कांरांना "गानसरसवती" ने कृतकृत्यच केले असे म्हणणे उचित ठरेल असे वाटते. भगवंताच्या अगम्य,अनाकलनीय स्वरूपाची चिरंतन  गोडी लावणार्‍या गानतपस्विनीचे , गानसरस्वतीचे सुर अजरामरच असतात आणि राहतात ते  १०८% निर्विवाद सत्य !

Saturday 10 June 2017

मेरे साई बाबा की गेहूँ पीसनेवाली लीला यानी सच्चा भक्तिमार्ग !

ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नम:

मेरे साई बाबा की गेहूँ पीसनेवाली लीला यानी सच्चा भक्तिमार्ग !

साई बाबा की गेहूँ पीसनेवाली लीला यानी भोले-भाले भक्तों के लिए सच्चे भक्तिमार्ग की सींख हैं । आम तौर पर आदमी परमार्थ करने से हिचकिचाता है , उसका मन आशंका से कांप उठता है कि मैं तो ठहरा बाल बच्चोंवाला , बीबी , मां-बाप घर में रहनेवाला संसारी इंसान , मुझे भला यह परमार्थ करना कैसे मुमकीन होगा? ना मैं घरबार छोडकर जंगल में जाकर धुनी रमा सकता हूं ना मैं संन्यासी लोगों की भांति भिक्षा मांग सकता हूं , यदि मैं ये सब करने लगा तो मेरे संसार , घर गृहस्थी को कौन संभालेगा  भला? दूसरी ओर देखा जाए  तो कई बार यह भी गलत बात दिमाग में ठूस दी जातीं हैं कि परमार्थ याने भगवान की भक्ति आदी बातें तो बूढापे में करने की बातें हैं , संसारी आदमी को इससे चार हाथ दूर ही रहना चाहिए , जवानी में कोई भला भगवान का नाम जपतें बैठकर अपना किमती वक्त क्यों जाया करने का आदी । साईनाथ यही गलत बातों को जड से उखाडना चाहतें थे और आम आदमी को भगवान की भक्ति का सच्चा रास्ता दिखाना चाहते थे और वो भी सहजता से, आसानी से , संसार में रहकर ही परमार्थ करना चाहिए , यही सच्चा भक्ति मार्ग है यह सबक सिखलाना चाहतें थे ।

संत एकनाथजी ने कहा था कि प्रारब्ध का नाश हरिकृपा से ही हो सकता है ।  साईबाबा ने खुद आटा पीसकर इस बात को दिखला दिया कि प्रारब्ध का नाश करनेवाली हरिकृपा को प्राप्त करना यानी परमार्थ साध्य करना यह बिलकुल भी कठिन न होकर बिलकुल सहज साध्य हैं । और उसके लिए हरिभक्ति यही सर्वांग सुंदर और सहज सरल मार्ग है । साईबाबा ने आम आदमी की घरेलू बात को ही अपना सिखाने का जरिया बनाया । गेहूँ आदि पीसने का कार्य अपने भारत देश में पहले से ही (आदिकाल) स्त्रियाँ ही करते आई हैं । पुरूषों के लिए ये काम नहीं ऐसी कोई बात नहीं थी, परन्तु जाते पर पीसने के लिए बैठनेवाली गृहिणी (महिला) का दृश्य इस भारतवर्ष के ग्रामीण क्षेत्रों में अकसर प्रात: समय में दिखाई देता था ।  तो यही हमारी रोज मरा कि जिंदगी में अपना पेट पालने के लिए जो क्रिया हमें करनी पडती है , उसी क्रिया को साईबाबा ने चुना था । हमें पता है कि अगर हमें गेहूँ खाना है तो उसका पहले उसका आटा पीसना पडता है और बाद में उसके आटे से रोटी बनती है जो हम सब्जी, दाल के साथ खा सकतें हैं ।  भूख कितनी भी लगी हो लेकिन आदमी कच्चा गेहूँ  नहीं खाता क्यों कि वो उसको हजम करने में परेशानी हो सकती हैं, कच्चा गेहूँ -बिना आटे के हजम करना बहुत ही कठिन है ।


ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नम:
हेमाडपंतजी हमें साईनाथ का अवतार किन हालात में हुआ था इसका एहसास चौथे अध्याय में करवातें हैं कि सभी तरह से लोग अपने कर्मों को छोडकर गलत मार्ग पर भटक गए थे, धर्म के नाम से झूठ का सहारा लेकर लोगों को लूटा जा रहा था । इसिलिए साईबाबा का अवतार उस समय में हुआ था, जब इंसान को सच्चा भक्तिमार्ग दिखलाना बहुत ही जरूरी हो गया था । हेमाडपंतजी हमें समझातें हैं कि उस समय का विचार करने पर पता चलता है कि उस समय में सच्चे भक्ति मार्ग का तकरीबन हर किसी को विस्मरण हो चला था । उसके स्थान पर अनुचित प्रथा, वृत्ति और आडंबर इन सब का बोलबाला सिर्फ हुआ ही नहीं था, बल्कि, इन सबने मजबूती के साथ अपने कदम जमा लिए थे । भक्ति के नाम पर लोगों को,  भोली-भाली आम जनता को बहला-फुसला कर (अपनी जेब भरनेवाले) अपने आपको सर्वोत्तम कहलानेवाले ‘सद्‌गुरु’ संपूर्ण समाज को अनुचित दिशा की ओर ले जा रहे थे ।

तब अपने आचरण से समाज को सच्च्चा भक्तिमार्ग सिखलाने वाला मसीहा जरूरी था, साईबाबा को इसिलिए मानवी रूप में अवतार लेना पडा था कि आम इंसान को साईबाबा अपने लगे, मेरे अपने लगे, उनसे लोग सच्चाई को भली-भांति जान ले । इसि वजह से साईबाबा ने आटा पीसने की सहज क्रिया को चुना और परमार्थ सहज सामान्य करके दिखा देने की क्रिया की।

साईबाबा ने स्वंय आटा पीसकर सिखाया कि जैसे जाते के दोनों तह और खूंटा इनके एकत्र आने से  गेहूँ पीसने की क्रिया होती है इसी के साथ गेहूँ का रूपांतर आटे में होता है, उसी प्रकार श्रद्धा और सबुरी एवं अनन्यता इन तीनों बातों के एकत्रित आ जानेसे भक्ति मार्ग पर चलना आसान हो जाता है, और परमार्थ सहजता से साध्य किया जा सकता है । ये साईमाऊली विठुमाऊली ही हैं, यह हेमाडपंत हमें इस गेहूँ पीसनेवाली कथा के माध्यम से बता रहे हैं । ‘पर पीसनेवाला यही एक’ इस पंक्ति के एक चरण में वे साई बाबा के विठ्ठल स्वरूप को स्पष्ट करते हैं । ईंट पर समचरण खड़ा रहनेवाला, अठ्ठाईस युगों से भक्तों की राह देखते पंढरपुर में पुंडलिक को दिए वचनानुसार कमर पर हाथ रखे खड़ा रहनेवाला पांडुरंग ही शिरडी में अवतरित हुए हैं । कारण भक्तों के लिए कष्ट उठानेवाला सिर्फ़ यही एक है । भक्तों के लिए स्वयं देह धारण करके अपार परिश्रम करनेवाली सिर्फ़ यही एक विठुमाऊली, साईमाऊली है । यही बात हमें गौलीबुवा भी बतातें हैं , दासगणू भी बतातें हैं ।

‘पर पीसनेवाला यही एक’ इस वाक्य में हेमाडपंत इस साईनाथ के एकमेव अद्वितीयत्व को स्पष्ट कर रहे हैं ।

साईबाबा के गेहूँ पीसने के पिछे छुपे इस अनोखी लीला का राज मैं समझ पाई एक लेख्ह पढकर , जिसकी जानकारी आप को देना उचित जानती हूं -
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/shree-sai-satcharitra-adhyay1-part20-hindi/

यहां पर लेखक महोदय समझा रहें हैं कि माँ जैसे अपने बच्चे के लिए दूध-चावल  भी और अधिक नरम , मुलायम बनाके, उसे मसलकर (उसे छोटे-छोटे टुकड़ों में तोड़कर) उसे खाने को देती है, उसी प्रकार ये साईनाथ, ये साईमाऊली अपने बच्चों के लिए गेहूँ  पीसने बैठी है । गेहूँ को वैसे ही खाना यानी ज्ञानमार्ग द्वारा, योगमार्ग से अथवा अन्य किसी भी कठिन मार्ग से परमार्थ साध्य करना । इस तरह से गेहूँ खाना और उसे हज़म करना बहुत ही कठिन है यानी सर्व सामान्य के लिए ज्ञान, योग आदि कठिन / (मुश्किल तरीकेसे) मार्ग से परमार्थ साध्य करना बहुत ही मुश्किल है । परन्तु ये गेहूँ तो पोषक तत्त्व है, इसे खाये बगैर सामर्थ्य प्राप्त नहीं होगा । जीवन सुखपूर्वक निरोगी बनकर जीना मुश्किल होगा । फिर सामान्य भोले-भाले (भाविकों को ) भक्तों को ये गेहूँ खाना कैसे स्वाभाविक होगा इस बात की चिंता मेरे साईमाऊली को है । गेहूँ के सभी पोषकतत्त्व, उत्कृष्ट गुणधर्म तो मेरे बच्चों को मिलना ही चाहिए, परन्तु इसके लिए सीधे गेहूँ खाने के बजाय अन्य सहज सरल तरीके से इसका सेवन वे भी कर सके, इसके लिए मेरी यह साई माऊली स्वयं गेहूँ पीसने बैठी है ।

साई बाबा की गेहूँ पीसने की लीला यानी परमार्थ को सहज सरल बनाकर, भक्तों के लिए सहजसुंदर रास्ता निर्माण करने की लीला ।

लेखक महाशय ने समझाया कि साईबाबा ने अवतार क्यों लिया ?
अध्याय ४ में हेमाडपंतजी ने बयान किए हुए भारतवर्ष की प्रतिकूल परिस्थिती में सच्चा भक्तिमार्ग, सच्चा सद्‌गुरु, सच्चा भक्त आदि हर प्रकार से सुस्पष्ट रूप में सबके सामने (लाना) प्रस्तुत करने के लिए तथा इस भारतभूमि का मुकुटमणि होनेवाले मर्यादाशील भक्तिमार्ग को उज्ज्वल करने के लिए इस परमात्मा ने, इस सावरे ने, इस विठ्ठलने, साईरूप में अवतार लिया । परमार्थ साध्य करने के लिए नाक दबाकर, ब्रह्ममाया की चर्चा करके कर्मकांड का आहार बनकर कोई न कोई ढोंग-ढकोसला करना आवश्यक नहीं है, श्रद्धा-सबुरी एवं अनन्य सद्‍गुरु निष्ठा इस सहज-सरल मार्ग से परमार्थ आसानी से हर-कोई साध्य कर सकता है । किंबहुना गेहूँ पूर्णत: पाचक एवं पौष्टिक तत्त्व से बनता है, उसका आटा बनाने पर ही, यानी सही मायने में भक्ति मार्ग पर चलते हुए ही सच्चा परमार्थ साध्य किया जा सकता है । इस परमात्मा का सामीप्य प्राप्त होता है सिर्फ़ भक्तिमार्ग से ही । इसी सच्चाई को पुन: एक बार सबको  समझाकर बताने के लिए ही साईनाथ माऊली ने अवतार लिया था – ‘भक्त्याऽ हमे कथा ग्राह्य:।’

इस भक्ति मार्ग का आचरण कैसे करना चाहिए यह सभी को दिखाने के लिए ही साईबाबा यह गेहूँ पीसने की लीला करते हैं ।

लेख पढकर जाते का बहुत ही सुंदर मतलब ध्यान में आया -
जाते के नीचेवाला तल (चक्का) = श्रद्धा
जाते के ऊपरवाला तल (चक्का) = सबुरी
जाते का मज़बूती से ठोका गया (मज़बूत किया) खूंटा = अनन्यता

यह पढकर मुझे बहुत दु:ख हुआ कि मेरे साईबाबा ने सिर नीचे झुकाकर यहाँ पर गेहूँ पीसने की लीला क्यों  की ? लेखकजी बता रहें हैं कि इसका कारण यही है कि हम मनुष्यों को इस पवित्र भक्तिमार्ग को अपने तुच्छ स्वार्थ हेतु, (छोटे-मोटे स्वार्थ के लिए) अहंकार हेतु, कितना भ्रष्ट स्वरूप दिया था । भगवान की भक्ति - जो मूलत: शुद्ध आल्हादिनी भक्ति है, उसके मूल स्वरूप को हम अनदेखा कर देतें हैं , उसके सच्चे स्वरूप को नज़र अंदाज करके हमारे अपने द्वारा ही निर्माण किए गए विकृत प्रथाओं को ही हम भक्ति का लेबल चिपका देतें हैं । बाबा को इस गलत आडंबरों का ही निर्दलन करना था । यह वर्तुलाकार घुमनेवाला जाता कोरा ‘जाता’ न होकर वह साक्षात इस साईनाथ महाविष्णु का सुदर्शन चक्र ही है । दुष्टों का निर्दलन करनेवाले सुदर्शन चक्र यानी दुष्ट प्रथा एवं वृत्तियों को रगड़ कर पीसनेवाला यह, इस साईनाथ के हाथों का जाता है । कितनी सुंदर बात हैं यह कि मेरे साईबाबा का जाता यानि मेरे साईश्याम का सुदर्शन चक्र ही है, जैसे कॄष्ण भगवान ने राक्षसों का नाश  सुदर्शन चक्र फेंककर किया , ठीक वैसें  ही कालानुरूप अपना भेंस बदल कर आए वही भगवान ने साईश्याम बनकर बुराईयों को जाते में पीसा हैं और महामारी जैसी समस्या का निर्दालन किया। 

बाबा की यह पीसनेवाली लीला यानी भोले-भाले भक्तों के लिए परमार्थ को सहज,  सरल करके दिखानेवाली क्रिया है ।अपनी यह साईमाऊली का अपने बच्चों के लिए प्यार भी कितना अजीब है?  कितना निरपेक्ष प्रेम से (नि:स्वार्थ) है ? अपने बच्चों को मुसीबत में देखकर कोई मां चूप नहीं बैठ सकती, खुद कितना भी कष्ट सह लेती है, वैसे ही मेरे साईमाऊली ने खुद आटा पीसने का कष्ट उठाया है और दिखाया है कि भगवान को पाने का सच्चा रास्ता सहज है, सरल है , आसान है - वो है सच्चा भक्तिमार्ग !

आगे  तेरहवे अध्याय (१३ अध्याय ) में  भिमाजी पाटील के कथा के अन्त में हेमाडपंत हमें यही रहस्य और अधिक स्पष्ट करके बतला रहे हैं ।

दो हाथ एक माथा । स्थैर्य श्रद्धा अनन्यता । ना चाहे कुछ और साई । बस कृतज्ञतापूर्वक अर्पण हो ॥

श्रद्धा और सबुरी ये दो हाथ और अनन्यता रूपी माथा सिवाय इसके और कुछ ना चाहे मेरे साई, इसी लिए कृतज्ञतापूर्वक इन तीनों को एक साथ साईचरणों में अर्पण करना इतना ही है बस अपना काम !
इतनी सहज और सरल है यह परमार्थ की भक्तिरूपी राह - सच्चा भक्तिमार्ग !!!

Saturday 3 June 2017

साईकथा -साईनाथ के सहज ध्यान का आसान तरीका !

हरि ॐ
साईकथा सुनना यही एकमात्र  साईनाथ के सहज ध्यान का आसान तरीका  है ऐसे मुझे लगता है ।

ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नम: ।

हम हमेशा देखतें हैं कि कथा सुनने में आदमी  बहुत दिलचस्पी लेता है और किसी अन्य चीज के मुकाबले उसका मन कथा सुनने में सबसे जादा जुड जाता है, भले वो कथा भगवान राम की हो , बाल गोपाल कृष्ण कन्हैय्या की हो , या फिर राजा की हो या डरावनी भूतोंवाली हो । अब रामायण की रामकथा हो या नटखट कन्हैया की बचपन की गोकुल की लीलाओं की कथा हो - ये कथाएं हम बचपन से सुनतें आए हैं फिर भी कभी यह कथाएं सुनने से हम उब नहीं जातें हैं , हम ही नही बल्कि हमारे पूरे  गांव में , राज्य में, शहर में या पूरे भारतवर्ष में यह कथाएं  हजारों वर्षों से बारंबार सुनी जाती रही है फिर भी हम सभी के लिए आज भी वह उतनी ही लुभावनी , मनमोहक है। है

हमें इस के पिछे छुपी एक मूल बात को समझ लेना जरूरी है कि हर एक मनुष्य के मन में बचपन से ही कथाओं के प्रति लगाव रहता ही है , मन में कथाओंका   आकर्षण होता ही है। जब में जब अन्य कुछ भी समझ में नहीं आता है, तब भी बालमन का आकर्षण इन कथाओं की ओर बना रहता है। हमेशा परिवार में दादा-दादी से या फिर नाना-नानी से अथवा अन्य किसी से भी कहानियाँ सुनने का आकर्षण हर किसी के मन में आरंभ से ही होता है।

हर किसी के मन में अन्य बातों के प्रति चाहत-नफरत  अलग अलग  मात्रा में (प्रमाण में) , भिन्न भिन्न  प्रकार से होती है, परन्तु ‘कहानियाँ’ सुनने का शौक हर किसी के मन में होता ही है। आगे चलकर बड़ा हो जाने पर भी उपन्यास, चलचित्र(फ़िल्में), नाटक आदि में मन रमने का भी मूल कारण उनमें होनेवाली कथाएँ यही है। अर्थात हर एक मनुष्य के मन में कथाओं के प्रति झुकाव होना यह बात तो सामान्य रूप में होती ही है। इसीलिए परमात्मा का ध्यान करने के लिए भी मन पर अन्य मार्गों से दबाव डालने पर अनेक मुसीबतें, अड़चनें आती ही रहती हैं, परन्तु भक्तिमार्ग में भगवान की कथाओं में मनुष्य का मन अपने-आप ही रम जाता है और वे कथाएँ सुनते-सुनते मन के सामने भगवान की आकृति सहज ही दृढ़ हो जाती है, सहज ही ध्यान आकर्षित होने लगता है। अन्य साधनाओं में मन ऊब जाता है क्योंकि एक ही कार्य अधिक समय तक करते रहने से उसी बात को दोहराना यह मन को तकलीफ़ देने लगता है, वहीं कथाओं में मन कभी भी ऊबता नहीं हैं, क्योंकि भगवान की कथाएँ भी भगवान की तरह ही नित्य-नूतन हैं, सदैव नयी एवं सदाबहार रहनेवाली हैं। हर बार कथा सुनते समय, पढ़ते समय, मनन करते समय भगवान की लीलाओं का नया-नया पहलु खुलते रहता है और इस प्रक्रिया का कोई अंत नहीं है और इसीलिए बार बार उन कथाओं को सुनकर भी मन ऊबता नहीं है।

साईकथा सुनना - साईनाथ के सहज ध्यान का आसान तरीका इसके बारे में मैंने एक लेख पढा जिससे इस राज का मुझे पता चला -
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/shree-sai-satcharitra-adhyay2-part19/

इस लेख में लेखक महोदय हमें बतातें हैं कि हम साईकथा सुनते हुए आसानी से हमें साईनाथ का सहज ध्यान प्राप्त हो जाता है -


ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नम: ।
अब देखिए हम साईबाबा के भक्त है तो हमारे साईबाबा की बातें सुनने के लिए हम उत्सुक रहते हैं, बाबा के दर्शन करने के लिए हमारी आँखें आतुर रहती हैं, हम हमेशा सोअचतें रहतें हैं  कि कब मुझे मेरे साईबाबा का बुलावा आएगा और मैं मेरे साईबाबा के दर्शन पाने शिरडी चला जाऊंगा । पर शिरडी के बाहर रहनेवाले भक्त इस रोज के दर्शन से वंचित हो जाता है तो जभी हम साईबाबा की कथाएं सुनतें हैं हमे यह एहसास होता हैं कि हम हमारे साईबाबा से मिल रहें हैं , हम हमारे साईबाबा के पास ही बैठें हैं ।  इसिलिए साईकथा सुनते  सहज ही हम ध्यानमग्न हो जाते हैं। वैसे तो ध्यान लगाने पर भी नहीं लगता, मन में अनेक प्रकार के विचार आने लगते हैं, मन एकाग्र हो ही नहीं पाता। परन्तु बाबा की ये कथाएँ ‘सहज ध्यान’ प्रदान करती हैं और जो बातें सहज अर्थात पवित्र परमेश्‍वरी नियमों के अनुसार उत्स्फूर्त रूप में होती हैं, वे ही संपूर्ण होती हैंत। इसीलिए अन्य किसी तरह ध्यान लगाने की अपेक्षा भक्तिमार्ग का सहज-ध्यान यह सबसे अधिक आसान एवं अंतिम ध्येय की प्राप्ति करवाने वाला रास्ता है। अन्य मार्ग से ध्यान लगाने से यूँ ही जबरदस्ती ध्यान लगाने पर भी वह लग नहीं पाता, वहीं, भक्तिमार्ग में वह अपने-आप ही लग जाता है। सहजता केवल परमात्मा की मर्यादाशील भक्ति से ही प्राप्त होती है।

‘ज्ञानात् ध्यानं विशिष्यते’ इस तरह ध्यान की महिमा स्वयं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीता में कहते हैं। साई के सगुणरूप का ध्यान करना यह हम श्रद्धावानों के लिए सर्वश्रेष्ठ है। साई की कथाएँ सुनते समय मन में अपने आप ही श्रीसाई की सगुण आकृति अर्थात प्रत्यक्ष श्रीसाईनाथ ही बस जाते हैं और मन के सामने केवल साईनाथ के अलावा और कुछ बाकी ही नहीं रह जाता है। हर एक कथा में साईनाथ का ही सहजध्यान मन में अपना स्थान अपने-आप ही बना लेता है और बारंबार यही स्थिति कथा-वाचन-श्रवण-मनन-चिंतन इस प्रक्रिया के द्वारा भक्त अनुभव करता है। ऐसे में श्रीसाईनाथ का सहज ध्यान अपने-आप ही लगने लगता हैं। इस सगुण ध्यानावस्था में ही मन में परमात्मा की सबसे जादा  कृपा याने उनके नव-अंकुर-ऐश्‍वर्य प्रवाहित होते रहते हैं और अधिक से अधिक मन:सामर्थ्य प्राप्त होता है, ओज-संपन्नता प्राप्त होती है।

साईनाथ भक्तों को उदी बांट रहें हैं यह कथा पढते हुए मन ही मन हम सोचतें हैं कि क्या मैं साईबाबा को सचमुच मिल पाता , तो मेरे साईबाबा मुझे भी इसी तरह अपने खुद के हाथों से उदी देतें , क्या मेरे साईबाबा अपने हाथों से पकाया हुआ हंडी का प्रसाद मुझे भी खाने देतें , क्या मुझे मेरे साईबाबा अपने  संकटो से बाहर निकालने का उचित रास्ता दिखातें , याने क्या दुनिया से हटकर मै मेरे साईबाबा के बारे में सोचता हूं , उनके पास जाकर बैठ जाता हूं, साईबाबा को निहारने लगता हूं , और यही तो साईनाथ के सगुण ध्यान से मुझे मिलेगा , मेरे साईबाबा का सहवास, उनका सामिप्य ! चलिए तो फिर श्रीसाईसच्चर्त पढकर यह साईबाबा का ध्यान करने सिख जातें हैं - जो सचमुच का सब तकलीफों का सही इलाज हैं - भगवान का नाम सुमिरन , भगवान का सगुण ध्यान !

हेमाडपंतजी  हमें बतलातें हैं कि -
साईभक्तों की कथाओं का प्रस्तुतीकरण । उसमें भाव का उन्मीलन॥
तल्लीन होकर सुनेंगे श्रोतृगण। सुख-संपूर्ण होंगे सभी॥

सुनते ही साई की कथाएँ कानों से। अथवा दर्शन लेते ही नयनों से॥
मन हो जाता है उन्मन। और सहज ध्यानमग्न भी ॥

जिंदगी का सच्च्चा सुख, मन की शांती, समाधान सबकुछ सिर्फ मेरे साईबाबा के चरणों में ही हैं , और उसको पाने के लिए हमे साईबाबा की कथाएं हमेशा सुननी चाहिए ताकि मैं मेरे साईबाबा के सहज ध्यान में खुद को रख सकूं।      
     

ओम साईराम

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog