Thursday 27 July 2017

इमारतींच्या दुर्घटना आणि त्यामागील संभाव्य कारणे

२५ जुलै २०१७ रोजी घाटकोपर येथील दामोदर पार्क भागातील  साईदर्शन ही चार मजली इमारत सकाळी १०.३० च्या सुमारास कोसळली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत मृतांची संख्या आतापर्यंत १७ वर पोहचली असल्याचे वृत्त वाचून दु:ख झाले.  अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरुच आहे . 
                                                                      

आता पर्यंत ठाणे, भिवंडी, मुंब्रा, माहिम आणि इतर ठिकाणी इमारती पडून झालेल्या दुर्घटनांमागे  इमारतींच्या बांधकामाचा दर्जा , बांधकामाची अयोग्य पध्दत , बांधकामात वापरलेले निष्कृष्ट दर्जाचं साहित्य , इमारतींच्या डागदुजीकडे झालेले दुर्लक्ष  , जुन्या इमारतीं मध्ये नूतनीकरणासाठी विना परवानगी केलेले  बदल अशा अनेक बाबी असल्याचे निदर्शनास आले आहे. 

२७ जुलैच्या दैनिक प्रत्यक्षच्या घाटकोपर येथील साईदर्शन इमारतीच्या दुर्घटनेच्या बातमीतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की दुर्घटना  वा अपघात झाल्याशिवाय त्यामागच्या कारणांचा आपण पाठपुरावा करीत नाही. तसे पाहता आपण राहतो ती घरे, इमारती अथवा सोसायटी ह्यांची सुरक्षा हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा विषय असायला पाहिजे. आपण सारेच जण अगदी शाळेत असल्यापासून "Prevention is better than cure " ह्या उक्ती शी परिचित असतो. परंतु व्यवहारात वा दैनंदिन जीवनात आपण खरेच ह्याचा जेवढा पाहिजे तेवढा विचार करतो का हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. प्रत्यक्षच्या बातमीतून ध्यानी आले की पालिकेच्या नियमांनुसार ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे बंधनकारक आहे. घाटकोपर येथील ’साईदर्शन’ इमारत ही १९८१ साली बांधण्यात आली होती म्हणजे आता २०१७ साली तिला जवळपास ३७ वर्षे होत आली आहेत. अशा परिस्थितीत त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट झालेले असणे हे गरजेचे होते. परंतु ’साईदर्शन ’ ह्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आलेले नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच भरीस भर म्हणजे गेल्या २-३ महिन्यांपासून इमारतीच्या तळमजल्यावर नूतनीकरणाचे काम चालू होते ज्यात इमारतीच्या मूळ आराखाड्यात बदल करण्यात आले होते व त्यातूम इमारत कमकुवत झाल्याचे आरोप इमारतीतील रहिवाशांनी केले आहेत.
ह्यावरून आपण राहतो त्या घराची ,इमारतींची सुरक्षा , विशेषत: जुन्या पडकळीला आलेल्या इमारतींची सुरक्षा ही किती महत्त्वाची बाब आहे हे ध्यानात येते.

ह्या दुर्घटनेच्या अनुभवाने जागे  होऊन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मालाड येथील कुरार गावातील दफ्तरी रोडवरील विजयद्वारा ही चार मजली इमारत रहिवाशांनी रिकामी केली व ’पी’ उत्तर पालिका विभागाने त्यांना शांताराम तलावानजीक असलेल्या पालिका शाळेत स्थलांतरीत केले ही खरोखरी दखल घेण्याजोगी गोष्ट आहे. विजयद्वारा ही इमारत सुध्दा मंगळवारी दुपारी खचली होती. इमारत पुनर्विकासासाठी विकासकाला देण्यात आली होती व इमारत रिकामी करण्यासाठी आठवडाभराची मुदत दिली असतानाही पालिकेने हा निर्णय त्वरीत घेतला आणि रहिवाशांनीही सहकार्य केले त्यामुळे एक खूप मोठा येऊ घातलेला धोका टळला गेला. 

जीर्ण झालेल्या , मोडकळीस आलेल्या इमारतींच्या डागदुजीबाबत त्वरीत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करून घेणे हे कधीही आपल्याच फायद्याचे असते ही गोष्ट आपण विसरता कामा नये.  जुन्या इमारतींची वजन पेलण्याची क्षमता कमी होत जात असते. या इमारतींच्या कॉलम-बीम, स्लॅब, बाल्कनीचे सज्जे किंवा भिंती यामध्ये जर काही कारणांनी भेगा पडल्या असतील,तर त्या लवकरात लवकर बुजवून टाकाव्यात. कारण सुरुवातीला ह्या भेगा जरी अगदी लहान किंवा बारीक दिसत असल्या तरी या भेगांमधून दर पावसाळ्यात पाणी मुरत जातं आणि शेवटी काँक्रीटच्या  आतील भागांमधल्या सळ्या गंजायला सुरुवात होते. बऱ्याच वर्षांनी किंवा खूप महिन्यांनी या सळ्या पूर्णपणे गंजल्या की, त्यांची वजन पेलण्याची क्षमता खूपच कमी होते. 

                                                                           


आपण आपल्या शरीरामध्ये ही हा बदल पाहतो की माणसाच्या शरीरात म्हातारपणी  पायांमधली हाडं किंवा पाठीच्या मणक्यामध्ये झीज झाल्याने किंवा कूर्चा (दोन हाडांमधील वंगण ) कमी झाल्याने ठिसूळप्णा येतो , व हाडांना दुखापत होऊन ती मोडण्याची वा गंभीर इजा होण्याची जास्त शक्यता असते. हाडे ठिसूळ झाल्यामुळे वजन पेलायची ताकदच उरत नाही आणि त्यामुळे घसरून पडण्याचा वा कोलमडण्याचा धोका बळावतो. त्याप्रमाणेच जुन्या इमारतीच्या बीम-कॉलमची ताकद पेलण्याची क्षमता नाहीशी झाली की इमारत कोसळते. त्यामुळे इमारतीच्या कोणत्याही भागात निर्माण होणाऱ्या भेगा या इमारतीला संभवणाऱ्या धोक्यांपकी एक महत्त्वाचा धोका असतो. त्यामुळे या भेगा निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणं आवश्यक असतं. जुन्या झालेल्या इमारतीच्या भेगा ह्या धोकादायक ठरण्याआधीच योग्य ती काळजी घेतली तर या भेगा आपण नियंत्रणात ठेवून इमारतीचं आयुष्य कमी होण्यापासून रोखू शकतो.

त्याच बरोबरीने इमारतीच्या विविध भागांमध्ये केल्या जाणाऱ्या नूतनीकरणाच्या वेळी केल्या जाणाऱ्या तोडफडीमुळे इमारतीला हादरे बसतात. जर इमारत जास्त जुनी असेल  किंवा इमारतीचं मूळ बांधकाम मजबूत नसेल, तर अशा हादऱ्यांमुळे बीम-कॉलम, स्लॅब किंवा सज्जामध्ये भेगा निर्माण होऊ शकतात ज्यातून इमारत कमकुवत होण्याचा धोका अजून वाढतो. घाटकोपर येथील साईदर्शन इमारतीच्या कोलमडण्यामागे हे ही एक कारण असल्याची शक्यता स्थानिक रहिवाशांनी वर्तविली आहे हे जिवंत, बोलके उदाहरण ह्याच्या पुराव्यासाठी पुरेसे आहे असे वाटते.   
                                                                           
                                                                            


आपण बरेच वेळा इमारतींच्या बाहेरील भिंतीवर उगवलेली लहान झुडुपे किंवा झाडे पाहतो. पक्षी जेव्हा इमारतीवर बसतात, तेव्हा त्यांच्या पायांना चिकटून आलेल्या अनन्धान्याच्या बिया ह्या अशा भेगांमध्ये जाऊन रूजतात व त्यांचीच पुढे रोपे म्हणा वा लहान झुडूपे , झाडे बनून बाहेर उगवतात. ह्यांचीच मुळे वाढून  खोलवर जातात आणि या भेगा किंवा तडे अधिकच रुंदावतात. त्यातून मग पाण्याची गळती किंवा पाझर सुरु होते जी इमारतीसाठी धोकादायक असते. अशा प्रकारच्या पाण्याच्या गळतीमुळे किंवा झिरपण्यामुळे बुरशी येते. इमारतीच्या भिंतींना लागणारी बुरशी , ओल ही केवळ बाहेरच्याच किंवा पावसाच्या पाण्यानेच येते असं नाही, तर टॉयलेट, स्वयंपाकघराचं सिंक किंवा बेसिन यांतून होणारी पाण्याची गळतीही त्याला कारणीभूत असते.
त्यामुळे पाण्याच्या गळतीचं कारण काहीही असलं, तरी ती ताबडतोब थांबवली पाहिजे. कारण अखेरीस ह्या भेगा, ही ओल हेच पुढे इमारतीच्या आयुष्याला धोका निर्माण करतात. 

अनिरूध्दाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट  ह्या संस्थेच्या वतीने करण्यात येणार्‍या आपती व्यवस्थापनाचा कोर्स (विनामूल्य) करण्याची संधी मिळाली होती त्यामधील प्रशिक्षणाच्या द्वारे आणि लोटस पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमीटेड आणि अनिरूध्दाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या "आपत्ती व्यवस्थापन " ह्या पुस्तकाच्या आधारे इमारतीला पडणार्‍या भेगा आणि गळतीच्या बाबतीत काही खबरदारी घेता येऊ शकते ह्याची माहिती हाती लागली होती ती अशी -
* घर घेण्याआधी शक्य असेल, तर एखाद्या स्थापत्य अभियंत्याला दाखवून इमारतीच्या दर्जाची खात्री करून घर घ्यावं. कुठेही घर विकत घेताना किंवा नवीन घर बांधताना राष्ट्रीय प्रमाणक संस्थेचे (नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅंडर्डस ) कोड पाळले आहेत किंवा नाही ह्याची खात्री करून घ्यावी, हे कोड आहेत IS: 1893:1984, IS: 4326:1993 , IS: 13828:1993 इत्यादि.
* आपण राहात असलेल्या इमारतीत आपल्या घरातले पाण्याचे किंवा सांडपाण्याचे पाइप किंवा नळ यातून गळती होणार नाही, याची काळजी घ्यावी. विशेषत: कन्सिल्ड पाईपसंबंधी ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
* एअरकंडिशनरच्या आऊटलेट पाईपमधून येणारं पाणी इमारतीच्या सज्जावर किंवा इतर भागांवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी व हा पाइप एखाद्या बादलीत सोडावा. म्हणजे इमारतीच्या भागांवर हे सतत पडणारं पाणी ओल किंवा बुरशी निर्माण करणार नाही.
* इमारतीला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी घराचं नूतनीकरण करताना एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी व शक्यतो तोडफोड टाळावी. उदाहरणार्थ - बाल्कनीत किचन किंवा न्हाणीघर बांधायला परवानगी देऊ नये. सर्वसामान्य आरसीसी स्लॅबवर (RCC Slab) क्षमतेपेक्षा जास्त वजान टाकू नये. शौचालयांची जागा बदलायला किंवा अशा स्लॅबवर नवीन शौचालय बांधायला परवानगी देऊ नये.
* बांधकामाविषयक सल्ला देणार्‍या (Structural Consultant) योग्य सल्ल्याशिवाय गच्चीवर पाण्याच्या अतिरिक्त टाक्य़ा बांधू नये किंवा बांधण्यास परवानगी देऊ नये.
* विशेष करून जुजबी तांत्रिक ज्ञान असलेल्या अगर स्थापत्य अभियंता किंवा वास्तुविशारद नसलेल्या कोणाही व्यक्तिच्या सल्ल्यावरून  हे असले बदल करणं टाळावं. कारण या धोकादायक बदलांमुळे तुमचं आयुष्य सुखकर होण्याऐवजी तुम्ही तुमच्याबरोबरच इतरांचीही आयुष्य धोक्यात घालता ह्याची जाणीव ठेवा.
* फ्लोअिरगच्या जुन्या लाद्या काढून त्याजागी नव्या लाद्या बसवण्याआधी इमारतीचं वय, तिची स्ट्रक्चरल परिस्थिती आणि वजन पेलण्याची क्षमता लक्षात घ्यावी.
* इमारतीच्या कोणत्याही भागात रोपं अगर झाडं वाढू देऊ नयेत. तशी ती आढळलीत, तर लगेचच मुळासकट उपटून टाकावीत आणि त्या भेगा लवकरात लवकर भरून घ्याव्यात. अ‍ॅसिडचा वापर करू नये. कारण हे अ‍ॅसिड भेगांमधून आत शिरून लोखंडी सळ्यांना घातक ठरू शकते.
* गच्चीवरून होणारी गळती थांबवण्यासाठी भेगांमध्ये डांबर घालू नये. कारण उन्हाळ्यात दिवसभर गच्चीबरोबरच हे डांबरही तापून प्रसरण पावल्यामुळे भेगा अधिक मोठ्या होतात तर रात्रीच्या वेळी तापमान कमी झाले की डांबर आकुंचन पावतं; पण भेगा मात्र तशाच राहतात. याच वाढलेल्या भेगांमधून मग पावसाळ्यात अधिकच गळती सुरू होते.
* घराच्या वा इमारतीच्या कुठल्याही भागावर, भिंतीवर वा अन्य कुठेही ओल दिसली, तर त्या पाण्याचे मूळ शोधून काढून ते पाणी थांबवावं.

वरीलप्रकारे जर सुजाण , सुशिक्षीत नागरिकाची भूमिका बजावून आपणच आपल्या घरांची, इमारतींची , सोसायटीची काळजी घेतली तर इमारती कोसळून पडल्याने होणार्‍या दुर्घटनांचे प्रमाण रोखण्यासाठी आपण नक्कीच हातभार लावू शकतो.

संदर्भ : १. दैनिक प्रत्यक्ष दिनांक २७ जुलै २०१७ 
२. आपती व्यवस्थापनाचा कोर्स (विनामूल्य)- ह्या विषयी अधिक http://www.aniruddhasadm.com/माहितीसाठी ह्या संकेत-स्थळाला भेट देऊ शकता.
३. लोटस पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमीटेड आणि अनिरूध्दाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या "आपत्ती व्यवस्थापन " ह्या पुस्तकासाठी http://www.e-aanjaneya.com/ ह्या लिंकवर भेट देऊ शकता.


Tuesday 25 July 2017

घरे व उंच इमारतीं मधील अग्निसुरक्षेबाबत अजूनही उदासीनता !

मागील जून महिन्यात  लंडनमध्ये ग्रीनफेल टॉवर या इमारतीला लागलेल्‍या भीषण आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर ३० जण गंभीर जखमी झाल्‍याची बातमी आली.लंडन अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग २७ व्या मजल्यापर्यंत पोहचली. इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी ४० अग्‍निशमन दलाच्या गाड्या आणि २०० जवान प्रयत्न करत होते ह्यावरून ह्या भीषण आगीची व्याप्ती किती जबरदस्त होती हे ध्यानात येते. 
                                                                     
लंडन येथील आग
त्या पाठोपाठ नुकतेच जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात सौदी अरेबिया मधील एका खिडकीविरहीत घराला आग लागून त्यात तेथे राहणार्‍या १० भारतीय कामगारांचा मृत्यू झाला असल्याची बातमी आणि त्यानंतर लगेचच होनोलुलु , हवाई येथील मार्क पोलो अपार्टमेंट्स ह्या ३६ मजली इमारतीतील २६ व्या मजल्यावर आग लागून त्यात ३ जणांचा मृत्यु ओढावल्याची बातमी ट्विटरवर वाचली. ह्या उंच इमारतीमध्ये स्प्रिंकलर सिस्टीम नसल्याने १०० अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असूनही ती लवकर विझवू शकले नाही. १९७४ पूर्वी बांधलेल्या उंच इमारतींमध्ये "फायर कोड" च्या नियमा प्रमाणे स्प्रिंकलर सिस्टीम असणे बंधनकारक नव्हते आणि ही इमारत १९७१ साली बांधून पूर्ण झाली होती असे "सीएनएन" ह्या वृत्त वाहिनीवर म्हटले आहे. 
                                                                             
होनोलुलु येथील आग
यावरून राहत्या घरांमधील, विशेषत:  उंच गगनचुंबी इमारतीं मध्ये आगीबाबत कितपत सुरक्षा पाळली जाते हा मुद्दा विचारात घ्यावासा वाटतो.

दरवर्षी १४ अप्रिल हा अग्निशमन दिवस म्हणून साजरा केला जातो , अग्निशमन सुरक्षेवर व्याख्याने, प्रात्यक्षिके आयोजित केली जातात व त्यानंतर मात्र परत कधीतरी अशीच भीषण आगीची घटना होईपर्यंत सर्वकाही विसरून परत एकदा दैनंदिन कामात सर्व जण मग्न होऊन जातात.

९ मे २०१५ रोजी "गोकुळ निवास " ह्या काळबादेवी, मुंबई येथील ५० वर्षाहून जुन्या लाकडी बांधणीच्या पाच मजली इमारतीमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये काही  अग्निशमन दलाचे अधिकारी भीषण आगीशी तोंड देताना वीरगतीस प्राप्त झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर उंच इमारती , निवासस्थाने ह्यांतील आगीबाबतच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. 

काळबादेवी येथील आग
महाराष्ट्र राज्याचे अग्निशमन सल्लागारांच्या चिकाटी, पाठपुरावा व अथक परिश्रमाने महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ६ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ तसेच त्या अनुषंगाने २३ जून २००९ पासून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा उपाययोजना नियम २००८ लागू केला होता. गॅस सिलेंडरचा स्फोट, पाइप गॅसची अव्यवस्थित हाताळणी, ज्वालाग्राही पदार्थ घरात ठेवणे, सिगारेट इत्यादींमुळे आग लागण्याचे प्रकार घडतात. राष्ट्रीय सुरक्षा परिषद (National Safety Council), केंद्रिय विद्युत प्राधिकरण (CEA) अशा मान्यवर संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे एकूण आगीच्या घटनांपैकी फक्त ४० ते ४५ टक्के आगी या इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने लागतात,असे विधान त्यांच्या कार्यक्रम अंदाजपत्रकात केले असल्याचे समजते. म्हणजेच बाकीच्या आगीच्या घटना या अन्य कारणांमुळे जसे- गॅस सिलेंडरचा स्फोट, पाइप गॅसची अव्यवस्थित हाताळणी, ज्वालाग्राही पदार्थ घरात ठेवणे, सिगारेट इत्यादींमुळे घडतात हे स्पष्ट होते. तरीही शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगी जर कमी झाल्या तर ४० ते ४५ टक्के नुकसान व जीवितहानी टळू शकते, नाही का? ते साध्य करण्यासाठी सर्व ठिकाणची विद्युत संचमांडणी ही विद्युत अधिनियम- २०१० प्रमाणे ठेवणे अनिवार्य आहे. नंतर अग्नि सुरक्षेकरिता National Building Code 2016 हा लागू करण्यात आला असे वाचले होते.

सुजाण व सुशिक्षीत म्हणविणार्‍या नागरिकांनीही त्याकडे डोळेझाक केल्याने आणि इतर सर्वांच्याच या विषयातील उदासिनतेमुळे ज्याप्रकारे या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे त्याप्रकारे ती होत नाही. आजमितीला तरी ह्या कायद्याच्या अंमलबजावणीची  अत्यंत निकडीची गरज आहे असे चित्र दिसत आहे.

सर्वसामान्य जनतेचा असा समज आहे की, सर्वात जास्त आगी या कारखाने, कार्यालये अथवा इतर ठिकाणी लागतात व या आगीमध्ये जास्तीत जास्त माणसे जखमी व मृत होतात; पण हे समीकरण एकदम उलट आहे. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे आज सर्वात जास्त आगी या राहत्या वस्तीतील असून या आगीमध्येच जखमी व मृताची संख्या सर्वात जास्त असते व त्याची महत्त्वाची कारणे असतात विद्युत उपकरणे व स्वयंपाकघरातील निष्काळजीपणा आणि अगिशमनाबद्दलचे अज्ञान.

सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण देऊन स्वयंसेवकाची फौज (Volunteer Force) निर्माण करण्यामुळे ह्या आगीविषयक प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी नक्कीच मोलाचा हातभार लागू शकतो. अग्निशमन करणार्‍या जवानला पहिल्या दिवसापासून शिकवण्यात येते की आग विझवणे म्हणजे आगीचे मूळस्थान शोधून काढून कमीत कमी वेळात व कमीत कमी नुकसानात आगीवर ताबा मिळवणे व सर्वप्रथम अडकलेल्यांची सुटका करणे. मग एक सामान्य सुजाण नागरिक म्हणून आपणही प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर नियंत्रण नाही का करू शकत? नक्कीच करू शकतो!

आग लागल्यावर जर आपल्याला आग विझवण्याबाबतचे ज्ञान असेल तर आपण प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर ताबा मिळवून आग विझवूच, शिवाय होणारे मोठे नुकसानही टाळू शकू, त्यासाठी आपल्याला काही छोटया छोटया गोष्टी माहीत असणे गरजेचे असते.

आग कुठल्या प्रकारची आहे, यावर आग विझवण्याच्या पद्धती अवलंबून असतात. जगातील सर्व अग्निशमन सेवा आग विझवण्यासाठी थंड करणे, उपासमार करणे, दडपणे या तीन पद्धतीने आगीवर नियंत्रण करतात.  प्रशिक्षण देताना आगीचा त्रिकोण व आग विझवण्याचा त्रिकोण हा महत्त्वाचा मानतात. 
आपणही याचा थोडासा अभ्यास केल्यास सहजपणे आगीवर नियंत्रण मिळवू शकतो. आगीचा त्रिकोण म्हणजे उष्णता, हवा व जळाऊ पदार्थ या तीन गोष्टी योग्य प्रमाणात एकत्र आल्या तर आग लागते व हीच आग नियंत्रणाबाहेर गेली की, त्यावर लगेच नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. ही नियंत्रणाबाहेरील आग प्राथमिक अवस्थेत नियंत्रणात आणली तर नुकसानही कमी होऊ शकते.

या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आगीच्या त्रिकोणातील घटकांपैकी एक अथवा दोन अथवा तीनही गोष्टींवर नियंत्रण करता आले तर आग विझते, व त्यालाच म्हणतात आग विझवण्याचा त्रिकोण म्हणजे थंड करणे, दडपणे व आगीची उपासमार करणे. आगीची उष्णता कमी करायची असेल, तर पाण्याचा वापर करा व आगीला थंड करा. जळणा-या पदार्थाच्या जवळील इतर जळाऊ पदार्थ बाजूला करा अथवा जळणारा पदार्थच बाजूला करा, त्यामुळे होणारे नुकसान कमी होऊ शकते, म्हणजेच काय तर आगीची उपासमार करा.

आपल्याला सर्वांना माहीतच आहे की शाळेत आपल्याला शिकवले जाते की आपल्या कपडयांना आग लागल्यास जमिनीवर लोळा अथवा ब्लँकेट/ चादर घट्ट लपेटून घ्या.
साधे घरगुती स्वयंपाक घरातील उदाहरण बघायचे झाले तर कढईमधील तेलाला आग लागल्यास गृहिणी पटकन त्या कढईवर झाकण टाकते म्हणजेच आगीचा संपर्क हवेपासून तोडला जातो व आग दडपून विझवली जाते. इलेक्ट्रिक केबल अथवा वायरिंगला आग असेल तर सुकी वाळू अथवा योग्य ते एक्स्टिंग्विशर वापरले जाते, या प्रकारातही हवेचा संपर्क आगीपासून तोडला जातो व नंतर आगीवर ताबा मिळवला जातो व विद्युत पुरवठा बंद करून आगीवर नियंत्रण मिळवले जाते.

अग्निशमनासाठी उंच इमारती, कारखाने व्यावसायिक इमारतीमध्ये विविध प्रकारची अग्निशमन यंत्रणा बसवलेली असते व ही यंत्रणा तेथील प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व अग्निशमन विभागातील कर्मचा-यांना कशा प्रकारे वापरावी याची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे असते; परंतु सामान्य नागरिकांनीही प्राथमिक स्वरूपाच्या आगीमध्ये योग्य प्रकारचे एक्स्टिंग्विशर्सचा वापर योग्य प्रकारे केल्यास आग नियंत्रणात ठेवणे सहज शक्य असते. एक्स्टिंग्विशर्स ही इमारतीमधील त्या ठिकाणच्या धोक्यानुरूप ठेवण्यात येतात व इमारतीमधील रहिवाशांनी प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर त्यांचा वापर करावा हाच खरा उद्देश असतो.

सर्वसाधारणपणे ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स किंवा ए.बी.सी. ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स सर्वत्र ठेवलेली आढळतात, कारण कुठल्याही प्रकारच्या आगीवर सहजपणे त्यांचा वापर करता येतो, परंतु आगीच्या वर्गीकरणानुरूप चार प्रकारची एक्स्टिंग्विशर्स प्रचलित आहेत. लाकूड, कपडा, कागद इत्यादीच्या आगीसाठी वॉटर सीओटू प्रकारचे एक्स्टिंग्विशर्स वापरतात, ज्यामध्ये पाणी सीओटू वायूच्या दाबाने बाहेर पडून आग थंड करून विझवली जाते.

फोम प्रकारचे एक्स्टिंग्विशर्स तेलाच्या किंवा द्रव पदार्थाच्या आगीवर नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये साबणाच्या फेसासारखा पदार्थ तेलावर तरंगून दडपून आग विझवली जाते. सीओटू एक्स्टिंग्विशर्स अथवा ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स वापरताना आगीला मिळणा-या हवेचे प्रमाण कमी करून आग विझवली जाते.

एक्स्टिंग्विशरवर लिहिलेल्या सूचनांचे पालन करून ही उपकरणे सहजपणे कोणीही वापरू शकतो; परंतु त्यासाठी त्यांची योग्य ती देखभाल व त्यावरील वापरासंबंधीच्या सूचनांकडे इतर वेळी लक्ष देणे तेवढेच आवश्यक नाही का? पण इथेच आपण चुकतो व त्याकडे दुर्लक्ष करतो. "दात आहेत तर चणे नाही व चणे आहेत तर दात नाही " ह्या म्हणीनुसार अग्निशमन उपकरणांची देखभाल नीट केली गेली नसेल तर आगीच्या वेळी त्यांच्या योग्य तो वापर आपण करू शकत नाही.
अग्निसुरक्षा फक्त अग्निसुरक्षा उपकरणे बसवून पूर्ण होत नाही, त्यासाठी हवी असते इमारतीच्या आराखडयाला मंजुरी घेतानाच इमारतीच्या सुरक्षतेबाबतच्या उपाययोजनेचे नियोजन.

इमारतीच्या बांधकामाच्या आराखडयाला मंजुरी घेताना अग्निसुरक्षेचे व त्यावरील उपाययोजनांचे नियोजन आवश्यक असते. ह्यामध्ये अ‍ॅक्टिव्ह व पॅसिव्ह या दोन प्रकारच्या यंत्रणा असतात. पॅसिव्ह प्रकारात इमारतीमध्ये Emergency मध्ये निवाशांना सुटकेसाठी एकत्रित होण्यासाठी योग्य मोकळी जागा, जिने, दरवाजे कॉरिडोर, पॅसेजेस, लिफ्ट लॉबी, बांधकामाची उंची, वायुविजन, रिफ्जुय एरिया इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश असतो. १०-११ मजली इमारतींमध्ये अशी मोकळी जागा ६त ८ मजल्यां दरम्यान एखाद्या मजल्यावर ठेवता येऊ शकते. दुसरा भाग अ‍ॅक्टिव यंत्रणा, यामध्ये पाण्याची आगीच्या वापरासाठी असलेली टाकी, रायझर सिस्टीम, हायड्रन्ट,  स्प्रिंकलर सिस्टीम , होजरिल इत्यादी अनेक यंत्रणेचा समावेश असतो. या सर्वांचा वापर प्रत्यक्ष आग विझविण्यासाठी केला जातो.

ह्या यंत्रणांची योग्य प्रकारे निगा व काळजी न घेतल्यास प्रत्यक्ष दुर्घटनेच्या वेळी या यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरतात व त्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविताना दुसर्‍या अडचणींना तोंड द्यावे लागते. ह्याची सभानता ठेवणे व काळजी घेणे आपल्याच फायद्याचे असते.

आजही कित्येकांना अजूनही माहिती नाही की, उंच इमारतीतील Fire Lift ही दुर्घटनेच्या वेळी अग्निशमन कर्मचा-यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक असून इमारतीमधील रहिवाशाने जिन्याचा वापर स्वत:च्या सुटकेसाठी करावयाचा असतो.

थोडक्यात बघायचे झाले तर -
आग लागल्यानंतर घ्यावयाची खबरदारी -
* आग लागल्यावर प्रथम घरातील मेन स्विच बंद करावा व मगच पाणी न वापरता कार्बनडाय ऑक्साइड, कोरडी रेती यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करावा.
* त्यापूर्वी १०१ नंबरवर फोन करून फायर ब्रिगेडला कळवणे.
* अर्थिग कार्यक्षम राहील याची दक्षता घेणे.
* घाबरून न जाता जिथे शॉर्ट सर्किट झाले आहे, तो भाग मुख्य संचमांडणीपासून अलग ठेवणे व  स्पर्श टाळणे.
* घरात व जिन्यांमध्ये पसरणाऱ्या धुरापासून सुरक्षित राहण्यासाठी उभे न राहता वाकून चालणे किंवा सरपटणे.
* पायात रबरी स्लीपर्स व हातात लाकडी काठी घेऊनच कुठल्याही बटनास हात लावणे, अन्यथा रिटर्न करंटची भीती असते

* उंच इमारतीमध्ये आग लागल्यास लिफ़्टचा वापर टाळणे व शक्यतो जिन्याने खाली उतरणे.
* फायर ब्रिगेडच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करून धोक्यापासून दूर व्हावे.

आजच्या या आधुनिक जगात अद्ययावत अग्निशमन यंत्रणा बिल्डिंग मॉनिटरी सिस्टीमद्वारे सुद्धा नियंत्रणात ठेवता येऊ शकतात असे वाचनात आले होते.परंतु त्यासाठी आपल्याला अग्निसुरक्षेबाबतच्या जागरूकतेत बदल करून सभानता बाळगायला हवी, नाही का ?

Thursday 20 July 2017

वणवे ,जंगलतोड आणि जागतिक तापमानवाढ

दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक २ जुलै २०१७ रोजीच्या अंकातील जितेंद्र पाटील ह्यांचा "जंगलांना लागणारे वणवे आणि वातावरण " हा लेख हा खूपच दु:खद आणि धक्कादायक  बातमी देणारा !

पोर्तुगालमध्ये १७ जून २०१७ च्या रात्री जंगलांमध्ये भीषण आग लागली होती आणि त्या आगीवर अथक प्रयत्नांनी ५ दिवसांनंतर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने सुमारे ६५ जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले तर ५० हजार हेक्टर वनक्षेत्र बेचिराख झाले. 
                                                               


जागतिक तापमानवाढ आणि त्यास कारणीभूत असणार्‍या कार्बन  डायऑक्साईड व तत्सम वायूंच्या उत्सर्जनात होणाऱ्या वाढीची गती रोखण्यासाठी जंगलांचे किती महत्व आहे हे आपण सारे जाणतो. पोर्तुगालमधील जंगलात लागलेल्या आगीतून निर्माण झालेल्या राखेचे अंश स्वित्झर्लंडमध्ये मिळाले हे वाचल्यावर लक्षात आले की  जंगलात लागणारे वणवे  हे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढविण्यास अधिक हातभार लावतात. म्हणजेच जंगलातील वणवे हे शक्यतोवर लागू न देण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे व हे वणवे लागल्यास त्यांची आग लवकरात लवकर आटोक्यात आणणे व त्यासाठी आवश्यक उपाय योजना करणे हे ही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ध्यानात आले.

नुकतेच १ जुलै रोजी वनमहोत्सव साजरा करण्याच्या निमीत्ताने सुजाण. संवेदनशील नागरिक, सेवाभावी संस्था, वृक्षप्रेमी संघटनानी  वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पाडल्याच्या अनेक बातम्या वाचनात आल्या, खरोखरी ही स्तुत्य गोष्ट आहे. तथापि आपण कितीही प्रमाणात झाडे लावली तरीदेखील जोपर्यंत आपण अस्तित्त्वातआहे ती जंगले , डोंगर नाहीसे करणारी प्रक्रिया थांबवत नाही , म्हणजे जंगलतोड करून जंगल कमी करण्यास प्रतिबंध करावयाचे , जंगलातील आगींमुळे जंगलांचे घटणारे प्रमाण कमी करावयाचे,  डोंगराच्या पायथ्याशी होणार्या खाणकामामुळे होणारे डोंगरांचे खच्चीकरण थांबवण्याचे उपाय योजत नाही तोपर्यंत आपल्या झाडे लावण्यामागचा तापमान वाढ रोखण्याचा मूळ हेतू साध्य होतं  नाही असे वाट्ते.

डिसेंबर महिन्यात पॅरिस येथे युनोतर्फे जगातील १९६ देशांच्या प्रमुखांची परिषद झाली होती ज्यातील ‘पॅरिस कराराच्या’ दस्तावेजात म्हटले आहे की, “वातावरणातील बदल हे तातडीचे, अत्यंत धोकादायक स्वरूपाचे अपरिवर्तनीय स्वरूप धारण करीत असलेले संकट आहे. सर्व मानवजातीने सहकार्याने व एकत्र प्रतिसाद देऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करणे जरुरीचे आहे.”
“सर्व देशांनी वार्षिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सन २०२० पर्यंत घेतलेल्या प्रतिज्ञेच्या अमलबजावणीतील त्रुटीची गांभीर्याने दखल घ्यावी. उद्योगपूर्ण काळाच्या (१९५०) तुलनेत तापमानात २० सें. ची वाढ होऊ नये आणि झालेली वाढ १.५ सें. पर्यंत कमी करावी अशा रीतीने गांभीर्याने प्रयत्न करावे.”
हा करारातील भाग वाचून मानवजातीच्या जबाबदारीची जाणीव आपल्याला होईल.

वाचनात असे आढळले की नासाचे माजी संचालक डॉ. जेम्स हेनसेन यांच्या ‘स्टोर्म्स ऑफ माय ग्रँडचिल्ड्रन’ या पुस्तकात म्हटले आहे की, “सध्या होत असलेली वातावरणातील कार्बनची वाढ अभूतपूर्व व अत्यंत चिंताजनक आहे”. “सध्या दरवर्षी ६०० कोटी टन कार्बनची वाढ होत आहे. पृथ्वीवर आतापर्यंत आलेल्या सर्वात वेगवान उष्णयुगात साडेसहा कोटी वर्षांपूर्वी, कार्बनच्या वाढीचा वेग दहा हजार वर्षांत ३०० कोटी टन असा होता. सध्या आपण त्या उष्णयुगाच्या तुलनेत एका वर्षात २० हजार वर्षे ओलांडत आहोत.” दि. १२ मे-२०१३ रोजी वातावरणातील कार्बनने ४०० पीपीएम (१ पीपीएम = ३०० कोटी टन) ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. साधारण १२ मे-२०२३ पर्यंत २० पीपीएमची वाढ होईल. या काळात तापमानवाढ अनियंत्रित होऊ शकते, असा तज्ञांचा अंदाज आहे. याचा अर्थ पृथ्वीवर आणीबाणीची स्थिती आहे. अहवाल म्हणत आहे की, कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याची गरज आहे; कारण, एकदा वातावरणात गेलेला कार्बन एक हजार वर्षे टिकतो.
‘हेनसेन’ यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहीले आहे की, “वातावरणातील हा बदल महाविस्फोटक स्वरूपाचा आहे. ही मानवजातीला वाचवण्याची शेवटची संधी आहे. तापमानवाढ अनियंत्रित झाल्यास या शतकात मानवजात व पृथ्वीवरील बहुतांश जीवसृष्टी नष्ट होईल.”
पुढे हेनसेन म्हणतात की, “जनतेची समज आणि वैज्ञानिक सत्य यात प्रचंड दरी आहे. आता कुठे थोड्याशा जनतेला तापमानवाढीची जाणीव होत आहे; मात्र, त्याचवेळी या संबंधित शास्त्रज्ञांना, ज्यांना ते काय व कशाबद्दल बोलत आहेत याची माहिती आहे, ते समजून चुकले आहेत की, पृथ्वीची वातावरणीय व्यवस्था कडेलोटच्या क्षणाला पोहचलीय.”
अजून एक उदाहरण वाचनात आले की -
‘गाम्बिया’ ह्या आफ्रिकेतील देशातील विकासामुळे  १९८१ पासून पुढील बारा वर्षात झालेल्या कॉंक्रीटीकरण, शहरीकरण आणि जंगलांच्या नाशामुळे पावसाचे प्रमाण सुमारे १४०० मि.मी.वरून निम्म्यापेक्षा कमी म्हणजे सुमारे ६०० मि.मी. एवढे कमी झाल्याचे नमूद केले आहे.

ह्यावरून जंगलांचे घटणारे प्रमाण हे तापमान वाढीत किती मोठा हातभार लावतात हे कळते.
                             
आपण मानवानेच लोभापोटी केलेल्या बेसुमार जंगलतोडीने, तसेच जंगलातील वणव्यांनी  वातावरणावर किती दुष्परिणाम होतात  हे जाणून आता तरी जंगल वाचविण्याचा प्रभावी उपाय आपण योजलाच पाहिजे.जागतिक तापमानवाढीच्या समस्येच्या अक्राळविक्राळ स्वरूपासमोर सर्वतोपरीने लढणे  आवश्यक असल्याने झाडे लावण्यावरोबरीनेच जंगलातील झाडे वाचविणे, त्यांचे आगींपासून संरक्षण करणे हे ही  अपरिहार्य ठरत आहे असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

Thursday 6 July 2017

‘मेरे साईनाथ मेरे हृदय में हैं’ - सर्वोच्च प्रेमसमाधि ।

ॐ. कृपासिंधु  श्रीसाईनाथाय  नमः ।

श्रीसाईनाथ की कथाओं को सुनकर हम मन  में सहज ही श्रीसाईनाथ का ध्यान करने लग जातें हैं और साई के सहज-ध्यान से ही हमारे मन में हमारे साईबाबा की कृपा  प्रवाहित होने लगती हैं। मनुष्य का सर्वोच्च ध्येय यानी उसके खुद के जीवन का समग्र विकास और उसके लिए आसान रास्ता ,सही मार्ग हमारे साईबाबा से ही हासिल हो सकता  है। साईनाथ के प्रेम से भक्त का मन साईबाबा के प्यार में इस तरह से घुल जाता है कि मानो तो उसे उसके साईनाथ की प्रेमसमाधि लग जाती है, और वह इसी सगुण ध्यान की राह से ही। समाधि यह ध्यान की परिपूर्ण विकसित अवस्था है, इसीलिए इस साई का सहज ध्यान करते-करते मन के विकास के साथ-साथ प्रेमसमाधि का भी अनुभव प्राप्त होता है। साई के प्रेम का सदैव अनुभव लेते हुए घरगृहस्थी एवं परमार्थ सुखमय बनाना और ‘मेरे साईनाथ मेरे हृदय में हैं’ इस बात की अनुभूति प्राप्त होकर बाबा की ओर से प्रवाहित होने वाला प्रेम लगातार मेरे अंदर में प्रवेश करता है। यह सर्वोच्च अनुभूति प्राप्त करना ही प्रेमसमाधि है। ऐसी समाधि प्राप्त करने वाला श्रद्धावान कोई घरबार छोड़कर बदन पर राख पोतकर किसी गुफा में जाकर आँखे बंद करके नहीं बैठ जाता है, बल्कि आनंदपूर्वक घरगृहस्थी एवं परमार्थ दोनों को ही सफल करते हुए सभी को साई-प्रेम बाँटते ही रहता है। हेमाडपंत ठीक इसी तरह साई की प्रेमसमाधि में पूरी तरह से डुब चुके थे और उसी स्थिति में उन से साईनाथ ने इस साईसच्चरित की रचना करवायी।
इस के बारे में एक लेख पढने में आया -
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/shree-sai-satcharitra-adhyay2-part20/


जब हम हमारे सद्गुरु साईनाथ की कथा सुनकर उसे बारंबार याद करते रहतें हैं उतना ही हमारा साई के प्रति प्यार बढने लगता है और वह प्यार हमारा साई के चरणों पर का विश्वास और बुलंद करता है और जितना हो सकेगा उतना जादा भरोसा पका कर देता हैं । हमारा एहसास और भी जादा मजबूत हो जाता हैं कि हमारे साई हमारे साथ ही हैं इतना ही नहीं बल्कि वो तो हमारे मन में ही बसतें हैं ।


साईसच्चरित में इस साई की कथा हम  हेमाडपंत से सुनते रहें, उनमें से जो भी याद आती रहेंगी, उन्हें बारंबार याद करते रहें, मन में उन्हें सजोकर प्रेम के सूत्र से उन्हें मजबूती से गाँठ मार कर रख लें और फिर एक दूसरे को कथाएँ सुनाते रहें। यह प्रेमरूपी सोना जितना हो सके उतना लूटाता ही रहूँ, यही हेमाडपंत का भाव है। सवेरे उठने पर सर्वप्रथम श्रीसाईनाथ की जो भी कथा याद आती है उसी का हम स्मरण करते रहें, उसका चिन्तन-मनन करते रहें, दूसरों को बताएँ। हर रोज़ इसी तरह जो भी कथा सहज याद आ जाती हैं, उसे याद करते रहें, कराके हमारे जीवन का समग्र विकास करेंगी।

इसे वजह से साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी यह संस्था हर साल दो बार साईचरित के उपर “पंचशील परीक्षा” का आयोजन करती है ।
अधिक जानकारी मिलेगी - http://saisatcharitrapanchasheel-exams.blogspot.in/

पंचशील परीक्षा के लिए अध्ययन करते समय हमें इसी तरह हर रोज एक-एक कथा को याद करते रहना चाहिए, मनन-चिंतन करते रहना चाहिए, इससे ही हमारी नी पढ़ाई सहज रूप में होगी एवं इससे ही बाबा को जो मुझे देना है, उसे मैं स्वीकार कर सकूँगा। वैसे तो हम सीधी-सादी पोथी को भी हाथ लगाने में आलस करते हैं, तो कथा का अध्ययन करना तो दूर की बात है और इसीलिए सदगुरु  श्रीअनिरुद्ध जोशी ने पंचशील परीक्षा की योजना बनाई है। हेमाडपंत के कहेनुसार प्रेमपूर्वक इन कथाओं का अध्ययन करके हम अपनी प्रगति यक़ीनन ही कर सकते हैं।

हेमाडपंत कहते हैं कि श्रीसाईसच्चरित की विरचना करते समय कौन सी कथा कहाँ पर लेनी है, कथाओं का क्रम कैसा होना चाहिए आदि बातें मेरे द्वारा निश्‍चित नहीं की गई हैं, बल्कि बाबा जैसी प्रेरणा देंगे, वैसी कथाएँ अपने-आप ही लिखती चली गईं। साई की सहज प्रेरणा के द्वारा ही इस साईसच्चरित ग्रन्थ की रचना हुई है और यही सबसे अधिक महत्त्वपूर्ण बात है। मानवी अहंकार का ज़रा सा भी स्पर्श इस रचना को नहीं हुआ है। यह पूर्णत: श्रीसाई ने साईइच्छा से ही जैसी उन्हें चाहिए उसी प्रकार उसकी रचना की है और इसीलिए साईसच्चरित यह ग्रंथ ‘अपौरुषेय’ है। अपौरुषेय रचना अर्थात किसी मनुष्य के द्वारा न रची गई, साक्षात ईश्‍वर द्वारा निर्मित इस प्रकार की रचना। इसीलिए साईसच्चरित यह सर्वथा पवित्र, निर्दोष एवं संपूर्ण ही है। मानव कितना भी श्रेष्ठ क्यों न हो फिर भी उसके द्वारा की जानेवाली रचना में पूर्णत्व आ ही नहीं सकता है। कुछ न कुछ न्यूनता उसमें होती ही है। भगवान की इच्छा से भगवान द्वारा रची गई रचना मात्र सर्वथा सुसंपूर्ण ही होती है, उसमें कही भी जरा सी भी कमी नहीं होती। श्रीसाईनाथ ने ही स्वयं इस साईसच्चरित की निर्मिती, करने के कारण यह ग्रंथ सत्य, प्रेम, आनंद एवं पावित्र्य को पूर्ण रूप में धारण करने वाली परमेश्‍वरी रचना ही है। इसमें कोई संदेह नहीं। यहाँ पर यदि हेमाडपंत लिख रहे हैं ङ्गिर भी वह सर्वथा साईमय हो जाने के कारण उनमें ‘मैं’ का किंचित्-मात्र भी अंश नहीं है और इसीलिए साई को जैसा चाहिए वैसा यह ग्रंथ लिखे जाने में कोई भी अवरोध नहीं था। हेमाडपंत ने स्वयं का ‘मैं’ बाबा के चरणों पर समर्पित कर दिया था और इसलिए यह साईसच्चरित श्रीसाई की ही कृति है, इस बात को वे पूरे विश्‍वास के साथ कहते हैं।

इसमें मेरा कुछ भी नहीं। साईनाथ की ही प्रेरणा है यह।
वे जैसे भी कहते हैं । वैसे ही मैं करता हूँ।
‘मैं कह रहा हूँ’ यह कहना भी होगा अहंकार। साई स्वयं ही सूत्रधार।
वे ही हैं वाचा के प्रवर्तनकर्ता। तब लिखनेवाला मैं कौन॥

साईसच्चरित में हम दामू अण्णा कासार नाम के साई भक्त की कथा पढतें हैं कि उनका बंम्बई में रहनेवाला दोस्त उन्हें कपास रूई का कारोबार करने के लिए बुलाता है और आगे चलकर होनेवाले मुनाफे के बारे में भी बता देता है । अभी दामू अण्णा ठहरें साईभक्त तो वह बाबा की आज्ञा लेतें है । साई को तो तीन काल का ज्ञान होने के कारण पता होता है तो वे दामू अण्णा को ब्यापार करने से रोक देतें हैं । शुरु में तो दामू अण्णा को बहुत बुरा लगता है , वो बाबा को मनाने की लाख कोशिश भी करता है ,किंतु बाबा उसके मनाने पर भी नहीं मानतें । दामू अण्णा समझ जाते है और बाबा कि बात मान लेतें हैं । आगे चलकर पता लगता है कि उस दोस्त का बहुत नुकसान हुआ और वो पूरी तरह से बरबाद हो गया था ।

यह कथा हमें सिखाती है कि हमारे साथ हमारा साई होने में ही हमारी भलाई है।उपर दिए गए लेख में लेखकजी ने यह बात बहुत ही आसान तरीके से समझाई है ।

हमारे अपने जीवन प्रवास में भी जब हम अपने इस ‘मैं’ को छोड़कर , दामू अण्णा की तरह ,बाबा के शरण कें पूर्णरूप में जाकर साईनाथ को ही अपने जीवन का कर्ता बना लेते हैं, तो इसके पश्‍चात् अपने-आप ही साईप्रेरणा हमारे जीवन में प्रवाहित होती है तथा किस स्तर पर कौन सा निर्णय लेना चाहिए इस बात का मार्गदर्शन इस प्रेरणाद्वारा साईनाथ ही हमें करते हैं। हम सामान्य मनुष्य हैं जीवन के प्रवास में एक के पिछे एक, एक-एक पाड़ाव पर रुकते हुए हमारा जीवन प्रवास चलते रहता है। एक पड़ाव तक पहुँचने के पश्‍चात् आगले पड़ाव के लिए किस मार्ग का अवलंबन करना है, किस दिशा को चुनना है, निश्‍चित तौर पर हमें करना क्या है इस बात का निर्णय हमें वहाँ पर लेना होता है। भविष्यकाल के गर्भ में क्या छिपा हुआ है इस बात का पता हमें नहीं चलता है, इसके साथ ही उपलब्ध अनेक विकल्पों में से कौनसा विकल्प हमें चुनना है इसके प्रति हम गड़बड़ा जाते हैं। हम पूरे आत्मविश्‍वास के साथ उचित निर्णय नहीं कर पाते हैं। कभी-कभी योग्य लगने के कारण चुना गया मार्ग गलत दिशा में ले जाता है, हमारी दिशा भटक जाती है इससे अगले पड़ाव तक हम नहीं पहुँच पाते हैं। हमारी जीवन नैय्या इस भवसागर में इसी तरह भटक जाती है जैसे दामू कासार के दोस्तकी । 

दामू अण्णा  कासार की तरह साईनाथ के शरण कें पूर्णरूप में जाकर साईनाथ को ही अपने जीवन का कर्ता बना लेना चाहिए । 
उचित समय पर उचित निर्णय लेना यह जीवन में बहुत महत्त्वपूर्ण होता है। और कई बार इस निर्णय के चूक जाने से हमारा जीवन चिंताजनक बन जाता है।इसीलिए यह ‘साईप्रेरणा’ जीवन में प्रवाहित होना ज़रूरी है। 


प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog