Wednesday 16 May 2018

अमेरिका , इराण, अणुकरार आणि कॉन्डोलिझा राईस !!!

दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ३ मे २०१८च्या तिसरे महायुध्द ह्या सदराखालील एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले ! त्या बातमीचे शीर्षकही त्याचे आगळेपण स्पष्टपणे आणि प्रभावीरीत्या मांडण्यास पुरेपूर समर्थ होते. 
अमेरिकेने इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेतल्याने जगबुडी होणार नाही - कॉन्डोलिझा राईस यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प यांच्या भूमिकेचे समर्थन. 

ह्या बातमीचे शीर्षकच अमेरीका व इराणच्या अणुकराराचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करत आहे. कोणत्याही गोष्टीतून महाभयंकर, प्रलंयकारी विध्वंस होऊन सर्वच पातळ्यांवर अतोनात नुकसान होऊन त्यातून विश्वसंहार , जागतिक संहार उद्भवू शकतो तेव्हाच बहुतांशी जगबुडीशी  त्याचे नाते जोडले जात असावे असे वाटते.. अर्थातच अमेरीकेने इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेतल्यास असाच पराकोटीचा नरसंहार, अगणित वित्तहानी आणि अपरिमीत नुकसान ह्यांना सामोरे लागेल असे स्पष्ट संकेत विवीध पातळ्यांवरून विवीध देश सातत्याने देत असल्यामुळेच हे अस्मानी सुलतानी संकट असल्याचे चित्र उभे केले जात आहे . ते कसे ह्याचा दैनिक प्रत्यक्षच्या बातम्यांद्वारे आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता आढळले -

एकीकडे दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ३० एप्रिल २०१८ च्या बातमीनुसार इस्त्रायलमधील फ्रान्सच्या राजदूत - ’हेलन ली गाल ’ यांनी इशारा दिला आहे की - अमेरिकेने  इराण बरोबरील अणुकरारातून माघार घेतली तर त्याचे भयंकर परिणाम होतील . यानंतर इराणही अणुकरार तोडून अण्वस्त्रे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु करील . म्हणूनच अणुकरार मोडला तर युध्द पेटण्याची दाट शक्यता आहे व खामेनी अणवस्त्रनिर्मितीचे आदेश देतील असेही त्यांनी बजावले होते. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन ह्यांनी देखिल अमेरिकेने अणुकरारातून बाहेर पडण्याच्या केलेल्या तयारीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. 

इराणबरोबरील अणुकरार निर्दोष नाही, हे मान्य करूनही जर्मनीच्या चॅंसेलर मर्केल हा अणुकरार वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याच बरोबरीने युरोपातले प्रमुख देशही हा अणुकरार वाचविण्यासाठी जोरदार पप्रयत्न करीत आहेत. 

खामेनी यांचे सल्लागार अली अकबर विलायती ह्यांनी ट्रम्प यांनी अणुअकरारातून माघार घेतल्यास त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल अशी धमकी दिली होती तर खामेनी ह्यांचे सहाय्यक मानले जाणार्‍या ’रिव्होल्युशनरी गार्डस्’ चे ब्रिगेडियर जनरल हुसैन सलामी यांनी इराण पुढच्या २५ वर्षांमध्ये अमेरिकेला जमीनदोस्त करील आणि  इस्त्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकील अशी  धमकी दिली होती.    

दुसरीकडे इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर इराण दोन दिवसांत २०% संवर्धित युरेनियम मिळविल असा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. संवर्धित युरेनियमचा साठी वाढविण्याइतके प्रगत तंत्रज्ञान इराणकडे असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी अण्वस्त्रनिर्मितीचे संकेत दिल्याचे चित्र दिसत आहे. 

हे एवढ्यावर थांबत नाही तर  इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी खुद्द अमेरिकेत दाखल झाले असताना देखिल त्यांनी इराणला अणुबॉम्ब नको आहे पण अमेरिकेने अणुकरारातून माघार घेतल्यास वा बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास इराणसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत . अमेरिकेच्या माघारीनंतर इराणची प्रतिक्रिया सगळ्यांसाठीच अस्वस्थ करणारी असेल व इराण पुन्हा एकदा ’न्युक्लिअर एनरिचमेंट ’ ची प्रक्रिया सुरु करेल असा   लक्ष वेधून घेणारा  सज्जड इशारा उघड उघड दिला आहे ही बाब दुर्लक्षित करून चालणारी नाही.  
अशा ह्या बहुचर्चित अणुकराराबद्दल आता थोडेसे मागे वळून जाणून घ्यायला हवे की ह्या अणुकराराला एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे ? 

अणुकरार २०१५ -
१९५०च्या सुमारास अमेरिकेच्याच पुढाकाराने इराणचा अणुकार्यक्रम सुरू झाला होता. मात्र १९७९मध्ये इराणमध्ये क्रांती होऊन शाह यांची राजवट उलथवून टाकण्यात आल्यापासून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, रशिया आणि जर्मनी या सहा प्रमुख अण्वस्त्रधारी देशांनी इराणने अण्वस्त्रनिर्मितीत उतरू नये, यासाठी प्रयत्न केले होते. २००६पासून या देशांनी त्यासाठी इराणशी व्यापक चर्चा सुरू केली होती, ती २०१५ मध्ये सफळ संपूर्ण झाली ती ह्याच अणुकराराच्या माध्यमातून  !

त्यावेळी या अणुकराराने इराणचे घातक अण्वस्त्र निर्मितीचे इराणचे मार्ग रोखले गेले आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा (२०१५ सालीचे) यांनी म्हटले होते  तर इराणनेही या करारामुळे जागतिक सहकार्याचे नवे पर्व सुरू झाल्याचे नमूद केले होते. या कराराअभावी लागू असलेल्या र्निबधांमुळे इराणचे १०० अब्ज डॉलरचे महसूली नुकसान होत असूनही इराणने त्यास मान्यता दिली होती असे निदर्शनास आले होते.

ह्या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता नुकत्याच २ मे २०१८ च्या दैनिक प्रत्यक्ष मधील शोधपत्रकार बेंजामिन फुलफोर्ड ह्यांचा दावा ह्या अणुकरारापलिकडे जाऊन इराणमध्ये काहीतरी नवीनच प्रकरण शिजत असण्याकडे अंगुलीनिर्देश तर करीत नाही ना असेच जाणवते. अणुकरारावरून इस्त्रायलसह अमेरिकेशीही टक्कर घेण्याची तयारी करीत असलेल्या इराणच्या मागे वेगळीच शक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॅंकिग क्षेत्रात कार्यरत असलेल्या रॉथचाईल्ड ह्या जगातील सर्वात धनाढ्य कुटूंबाचे पाठबळ इराणला लाभले असून ,  त्यांच्याकडून इराणला प्रचंड आर्थिक मदतही दिली जात आहे व त्यांच्या इशार्‍यानुसार जगात फार मोठ्या उलथापालथी होत असतात असा बेंजामिन फुलफोर्ड व इतर ’कॉन्स्पिरसी थिअरिस्ट’ करीत असलेला आरोप बिनबुडाचा असूच शकत नाही असे प्रामाणिकपणे वाटते. कारण त्यांचे वास्तविक स्वरूप व त्यांच्याबाबतच्या बातम्या कधीही मुख्य धारेतील माध्यमांसमोर येत नाही असाही त्या मंडळींचा दावा फोल नसल्याचेच चित्र प्रकर्षाने नजरेसमोर येत आहे. अजून तरी फुलफोर्ड ह्यांनी केलेल्या दाव्याला कुठूनही दुजोरा मिळालेला नाही तसेच अण्वस्त्रे व हा प्रचंड प्रमाणातील निधी इराणपर्यंत पोहचला आहे का ह्याबाबतही खात्रीलायक माहिती देखिल उपलब्ध झालेली नाही तरी देखिल इराण सारख्या देशाला पैसा व अण्वस्त्रे पुरवून रॉथचाईल्ड यांनी जगात विध्वंस माजविण्याचा कट आखल्याचे फुलफोर्ड ह्यांचे मत दुर्लक्षित करून चालणार नाही. 

सद्य परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प  ह्यांनी २०१५ साली अमेरिका व मित्रदेशांनी केलेला अणुकरार सर्वात वाईट करार असून १२ मेच्या आधी या करारात आवश्यक ते बदल करून इराणकडून  सदर करार संमत करून घेण्याची सूचना केली असताना पुढच्या काही दिवसांतच अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि इराण बरोबरील अणुकरारात महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या जॉन केरी यांनी युरोपमध्ये इराणच्या परराष्ट्र्मंत्री जावेद झरीफ ह्यांची घेतलेली गोपनीय भेट तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन व जंर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंक-वॉल्टर यांच्याशी झालेल्या चर्चा काही तरी अघटीत घडणार असल्याची कल्पना देत आहेत जणू असेच वाटते.  

अशा वेळी अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प यांच्या भूमिकेचे समर्थन केले जाते व तेही अमेरिकेने इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेतल्याने जगबुडी होणार नाही अशा शब्दांत ! तेव्हा आश्चर्याने तोंडच आ वासले गेले नाही तरच नवल , नाही का बरे? 
                                                                     


हा करार इराणच्या अणुकार्यक्रमाला रोखण्यात यशस्वी ठरल्याचा दावा अमेरिकेचे सहकारी देश करीत आहेत ह्याकडे राईस यांनी लक्ष वेधले पण त्याच वेळी इराणबरोबर आर्थिक सहकार्यात गुंतल्यामुळे अमेरिकेच्या मित्रदेशांना या कराराबद्दल प्रेम वाटत आहे असा टोला ही त्यांनी लगावला. त्यांच्यासाठी अमेरिका अणुकरारात राहण्याचा निर्णय घेतला घेतला तर ते ठीक आहे. पण या अणुकरारापासून अमेरिकेला काही मिळणार नाही . तसेच या अणुकरारातून माघार घेतल्यामुळेही काही फरक पडणार नाही असे सूचक उद्गार राईस ह्यांनी एका वृत्तपत्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काढले व त्याच वेळी माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कार्यकाळात इराणबरोबर झालेल्या करारावर ताशेरेही ओढले.  

त्यात भरीस भर म्हणजे इराणला आर्थिक सवलत देणार्‍या तसेच निर्बंध शिथिल करणार्‍या आणि अणुकार्यक्रमावरील पकड ढिली करणार्‍या या करारावर मी कधीही सही केली नसती ’ असे सांगून राईस यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली.                                                                        

राजकीय मुत्सेद्देगिरीत अत्यंत प्रवीण , डावपेचात कुशल आणि धडाडीचे व खंबीर अंतर्मुख व्यक्तीमत्त्व असे कॉन्डोलिझा राईस  ह्यांचे वर्णन केले जाते - ते का ? ह्याची पुरेपूर प्रचिती ह्या त्यांच्या मतांद्वारे मिळाली . अणुकरारातील सहभागी असलेल्या बहुतांशी प्रमुख राष्ट्राध्यक्षांची मते आणि राईस ह्यांचे मत पाहताना प्रकर्षाने जाणवतात -   राईस ह्यांचा खंबीरपणा, सुस्पष्ट विचारसरणी व त्यांची  मुद्देसूद मांडणी . इतर कोणाच्या मतांनी बुजून न जाता धरलेला स्वमताग्रह व स्वत:च्या ताकदीचे व गरजांचे संपूर्ण भान !

राईस ह्यांची ही परखड भूमिका वाचताना आठवले ती "तिसरे महायुध्द" ह्या आपल्या पुस्तकात दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ अनिरूध्द धैर्यधर जोशी ह्यांनी तब्बल १२ वर्षांपूवी म्हणजेच २००६ साली ’कॉन्डोलिझा राईस ’ ह्यांच्या बाबत नेमक्या शब्दांत माहिती दिली होती  ती अशी -
                                                                             


तिसर्‍या महायुध्दाची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे ह्याची पुरेपूर जाणीव ह्या जबर महत्त्वाकांक्षी व धोरणी महिलेला आहे. अगदी मोजकेच बोलणे व स्वत:च्या मनाचा थांगपत्ताही लागू न देणे , हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. स्वत:च्या जबाबदारीची पुरेपूर जाणीव असल्यामुळे त्या कधीही उतावीळपणा वा धरसोड वृत्तीला जवळपास फटकूही देत नाहीत.    

डॉ जोशी कॉन्डोलिझा राईस ह्यांच्या विषयी सांगतात की मिडीयाशी  काय बोलायचे ह्याचे ज्ञान त्यांना सहज अवगत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मिडीयाशी ह्यांचे अधिक चांगले संबंध आहेत. ह्याची प्रचीती ह्या समर्थनातून सहज येते

त्यामुळेच डॉ अनिरुद्ध जोशी यांचे मत -
कॉन्डोलिझा राईस हे नाव  तिसर्‍या महायुध्दाबरोबर इतिहासात कायमचे जोडले जाईल. हिची पुढील सर्व घटनांवर घट्ट पकड असेल. ह्या स्त्रीचा सल्ला जगातील अनेक देशांचे भवितव्य ठरवू शकतो. 
हे पूर्णपणे माझ्या मनास पटते. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ह्यांनी अणुकरारातून माघार घेतल्याचे वृत्त वाचले. या निर्णयाचे  राईस ह्यांनी केलेले समर्थन पाहता , हा निर्णय योग्यच होता ,असे वाटू लागले. राईस ह्यांच्या अशाच सल्ल्यामुळे अमेरिकेची मोठी हानी टाळू शकते, असे संकेत यातून मिळू लागले आहेत. 

टीप - " अमेरिका , इराण,  अणुकरार आणि  कॉन्डोलिझा राईस  ! " ह्या संदर्भातील लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १६ मे २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता.  

Friday 11 May 2018

मेरे साईनाथ - काल के भी काल होनेवाले महाकाल स्वरूप मेरे साईबाबा !

श्रीसाईसच्चरित के अध्याय ३ में हेमाडपंतजी बहुत प्यार से हमें हमारे साईनाथ की सत्ता के बारे में बतातें हैं कि - जो खुद मेरे साईनाथ मे मुझे भी और साथ ही अपने सारे बच्चों को गवाही दी है - अपनी जुबान से !

काल के भी जबड़े में से।
निजभक्त को मैं खींचकर बाहर निकाल लूँगा।
करते ही केवल मत्कथाश्रवण
(मेरी कथा का श्रवण)।
रोगनिरसन भी हो जायेगा॥
इस गवाही में यह मालूम हो जाता है कि मेरे साईबाबा की सिर्फ चराचर यानि सजीव , निर्जीव सूष्टी पर ही नहीं बल्कि काल पर भी सत्ता है। हम जानतें हैं कि काल की सत्ता तो हम सभी जीवों पर होती है, फिर भी काल के भी काल होनेवाले महाकाल स्वरूप साईनाथ हमें इस बात की गवाही दे रहे हैं कि काल के जबड़े में फँसे हुए अपने भक्त को मैं खींचकर बाहर निकाल लूँगा अर्थात उसकी रक्षा करूँगा। मृत्यु के जबड़े में फँसे हुए श्रद्धावान को छुड़ाने का सामर्थ्य केवल एकमात्र सद्गुरुतत्त्व के पास ही होता है, अन्य किसी के भी पास नहीं होता।
                                                                         
     

इसी बात का प्रमाण हेमाडपंतजी हमें अध्याय २३ में शामा के जीवन की एक कथा से देतें हैं । माधवराव देशपांडे उर्फ बाबा के लाडले शामा को सांप कांटता है और पूरे बदन में जहर फैलने लगता है । शामा को शिरडी वासी लोग उस वक्त की मान्यता अनुसार बिरोबा (यानि महादेव ) के मंदिर में ले जाना चाहतें हैं ताकि उनका जहर उतर जाए , पर शामा जाने से मना करता है। बाद में शामा के चाचा निमोणकर जी उन्हें बाबा की उदी देतें हैं , उसे भी शामा अस्विकार करतें हैं और सिर्फ अपने साई के चरणों में अनन्य भाव से शरणागती पाने जातें हैं द्वारकामाई में ।   वहां पर पहले तो साईनाथ बहुत क्रोधित होकर शामा को मशीदमाई की पगडंडी भी चढने से मना कर देतें हैं - साईनाथ स्पष्ट शब्दों में आज्ञा देतें हैं कि हे ब्राम्हिन ! चल निकल जा यहां से , नीचे उतर जा । शामा जी ब्राम्हिन थे तो बाबा उन्हें उसीसे पुकारतें हैं । शामा फिर भी वहां से नहीं हट जाता, जो होना है वो मेरा हो जाएगा , किंतु मैं मेरे बाबा के चरणों को छोडकर कहीं ओर नहीं जाऊंगा , यह होता है निजभक्त - साईनाथ का निजभक्त !

अर्थात बाद में साईबाबा का गुस्सा , उनकी आज्ञा जहर को थी , और शामा  को थी ही नहीं इस बात का पता चलता है । हेमाडपंतजी हमें इस कथा का विशेष महत्त्व बतातें हैं कि मेरे साईनाथ ने ना तो कोई मंत्र का उच्च्चारण किया नाही अन्य मांत्रिक -तांत्रिक लोगों की तरह कोई चावल उतारा कें फेंकें नहीं थे , बस्स एक मात्र मेरे साईनाथ की आज्ञा - चल निकल जा नीचे उतर- यह वाक्य ही जहर उतारने के लिए पर्याप्त था । मेरे साईनाथ तो काल के भी काल है ।  काल के भी काल होनेवाले महाकाल स्वरूप मेरे साईनाथ है - तो भला क्या काल उनके शब्दों को कभी धुतकार सकता हैं - कभी नहीं , ये कदापि मुमकीन नहीं । मेरे साईनाथ ही सत्यसंकल्प प्रभु है - उनका हर शब्द केवल सत्य ही सत्य होता है !

हेमाडपंत जी हमें  दूसरी कथा भी ऐसी बतातें हैं जो मेरे साईनाथ की काल पर सत्ता सिध्द करने के लिए पर्याप्त है ।  शामा की कथा में तो हम देखतें हैं कि साईबाबा ने एक मान्व के प्राणों की रक्षा काल के मुंह से की थी , किंतु ४७ अध्याय में हम सांप और मेंढक की कथा पढतें हैं जिस कथा में सांप के मुंह में एक मेंढक इस बुरी तरह से फंसा रहता हैं कि मानों अभी वह सांप उसको निगल जाएगा और वह मेंढक की मौत हो जाएगी । किंतु साईनाथ की आज्ञा सुनने मात्र से ही सांप वहांसे मेंढक को छोडकर भाग खडा हुआ था । यह कथा भी हमें बताती हैं कि मेरे साईनाथ की आज्ञा काल को भी सुननी ही पडती है , चाहे वो इंसान की मौत हो या चाहे किसी अन्य जीव मात्र की मौत हो , सब पर सत्त्ता चलाने वाले काल को मेरे साईनाथ के सामने सिर झुकाना ही पडता है ।

किंतु साईबाबा के शब्दों को हमें गौर से सुनना भी चाहिए - बाबा कहतें हैं कि काल के भी जबड़े में से। निजभक्त को मैं खींचकर बाहर निकाल लूँगा। हमें तो सिर्फ भक्त पता होता है - जो साईबाबा को अपना मानता है, उनकी भक्ती करता है , उनका जप करता है, उनकी पूजा करता है । किंतु साईनाथ चाहतें हैं कि उनके बच्चों का उन्पर अटूट विश्वास हो, उनपर अडिग श्रध्दा हो और इसिलिए ऐसे भक्त को साईनाथ अपना निजभक्त बतातें हैं ।

मेरे साईनाथ मेरी रक्षा करने के लिए और हमारे साईनाथ हमारी रक्षा करने के लिए सर्वथा समर्थ तो हैं ही, परन्तु यह हमारे जीवन में सच होने के लिए, ‘क्या हम साईनाथ के ‘निजभक्त’ हैं’, इस बात का हमें विचार करना आवश्यक है। शामा की कथा तो हमें समझाती है कि साईबाबा का निजभक्त कैसा अटल होता है, अपने साईनाथ के चरणों में उसकी श्रध्दा , भक्ती कैसी अविचल होती है । मेंढक की कथा हमें बताती है कि भले मेरी भक्ती की ताकद कम पड जाए तो भी मेरा साईनाथ - मुझे काल के जबडे से भी निकाल सकता है, इतनी उसकी सत्ता काल पर है ।

इस निजभक्त के बारे में अधिक सविस्तर स्वरूप से मैंने एक बहुत ही सुंदर लेख पढा - जिससे मुझे समझ में आया कि मेरे साईनाथ किसे अपना निजभक्त मानतें हैं , मुझे साईनाथ का निजभक्त बनने के लिए क्या करना चाहिए, मेरी साईनाथ के चरणों में किस तरह की भक्ती होनी चाहिए । मुझे पूरा यकीन है कि आप भी जरूर जानना चाहेंगे , तो चलिए पढतें  है- साईनाथ के निजभक्त होने का राज और प्रयास करतें हैं - हम साईनाथ के निजभक्त बन जाएं ऐसा -
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/shree-sai-satcharitra-adhyay3-part13/

करते ही केवल मत्कथाश्रवण।
रोगनिरसन हो जायेगा॥

साईनाथ यहां हमें उनकी कथाओं का महत्त्व बता रहें हैं - भीमाजी पाटील की कथा में हम देखतें हैं कि नाना चांदोरकरजी ने साईनाथ के बारे में जो बातें बतायी , उससे ही भीमाजी ने शिरडी जाकर साईनाथ के दर्शन करने की ठान ली थी । हेमाडपंतजी बडी खुबी के साथ हमें यह बात विदीत करतें हैं कि भीमाजीने नाना  को खत लिखा , नाना का स्मरण यानि साईनाथ का स्मरण । वो ही शुभशकुन भी था और वो ही रोग का निरसन भी था । साईनाथ की कथा यानि साईनाथ की लीलाओं का बखान यानि साईनाथ का नाम का जाप । सिर्फ यह करने से भी रोग का निरसन हो ही जाएगा  किंतु क्या मेरे मन में उतना विश्वास है, उतना मेरे मन में साईनाथ पर भरोसा है? हम सामान्य मानव है, हमारे मन में सौ तरीके के बुरे खयाल , संशय , तर्क-कुतर्क आतें ही रहतें हैं जो हमारे विश्वास को कमजोर बनाती है । इसिलिए सिर्फ साईनाथ की ही कथा मुझे सुननी चाहिए, सिर्फ और सिर्फ मेरे साईनाथ के चरणों पर ही मुझे विश्वास रखना चाहिए, मुझे किसी भी अन्य की कथा नहीं सुननी चाहिए , मुझे मेरे मन की कथा भी नहीं सुननी चाहिए , मुझे मेरे खुद से ही जादा भरोसा मेरे साईनाथ पर रखना चाहिए , जैसे शामा ने रखा था , काका दीक्षित ने रखा था , म्हालसापती ने रखा था । तभी मेरे साईनाथ मेरे रो का निरसन करेंगे ही - १०८ % सत्य!         

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog