Showing posts with label वाचन - अचिंत्यदानी छंद. Show all posts
Showing posts with label वाचन - अचिंत्यदानी छंद. Show all posts

Tuesday, 6 November 2018

मायक्रोचिप्स तंत्रज्ञान अणि मानव !!!





स्वीडनमध्ये चार हजारांहून अधिक नागरिकांच्या शरीरात ‘मायक्रोचिप्स’ - या शीर्षकाखाली एक बातमी दैनिक प्रत्यक्षच्या २४ ऑक्टोबरच्या अंकात वाचनात आली आणि खूप मोठा धक्काच बसला.  आतापर्यंत ’मायक्रोचिप्स" ह्या घरगुती पाळीव प्राण्यांच्या ओळखीसाठी वापरात येत असल्याचे माहितीत होते. मायक्रोचिपींग ही एक सोपी , सुरक्षित आणि जलद पध्दती असून हरवलेल्या वा गमावलेल्या आपल्या पाळीव प्राण्यांच्या विशेषत: कुत्र्यांच्या पुन: भेटीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे ऐकिवात होते.  आता तर स्वीडनमध्ये तब्बल चार हजारांहून अधिक नागरिकांच्या शरीरात त्यांनी आपणहून ’मायक्रोचिप्स’ बसवून घेतल्या आहेत . 



स्वीडनमध्ये सध्या रेल्वेसेवा, रेस्टॉरंट, लिंक्ड्सारख्या खाजगी कंपन्या यासारख्या ठिकाणी ह्या मायक्रोचिप्सचा वापर होत आहे, ज्या ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (आरएफआयडी) नावाने ओळखण्यात येणार्‍या तंत्रज्ञानावर आधारलेल्या आहेत. तांदळाच्या दाण्याइतका आकार असलेली ही मायक्रोचिप  सुमारे  $180 (£140)  एवढ्या किमतीत इच्छुक माणसाच्या हातात बसविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ह्या मायक्रोचिप्सचा वापर रेल्वेस्टेशन्सपासून ते नोकरीच्या ठिकाणापर्यंत सर्व जागी, तसेच इमारतींमधील प्रवेशासाठी , संगीत जलसा (कार्यक्रम) वा मैफिलींमधील प्रवेशासाठी होऊ लागला आहे.  ह्या लघु तंत्रज्ञानाने पैसा (रोकड रक्कम) वा तिकीटे जवळ बाळगण्याची गरज संपते   एवढेच नव्हे तर सोशल मिडीयावर ह्याद्वारे सहभागी होता येते असे निदर्शनास आले आहे. मायक्रोचिप्सचा वाढती लोकप्रियता लक्षात घेता स्वीडनमधील काही कंपन्यांनी तर आपल्या कर्मचार्‍यांना   ही ’मायक्रोचिप्स इंप्लांट ’ करण्याची सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याचेही वृत्त वाचनात आले आहे. 



मायक्रोचिप्स वापरण्याची सुरुवात सुमारे जून २०१७ मध्ये झाली असावी जेव्हा एस जे रेल ह्या स्वीडीश ट्रेन ऑपरेटरने सुमारे १०० लोक ट्रेनच्या प्रवासासाठी मायक्रोचिप्स वापरत असल्याचे घोषित केले होते. प्रवासी त्यांच्या हातातील इंप्लाट केलेल्या मायक्रोचिप्स च्या आधारे त्यांचे तिकीट डिव्हाईसवर थेट प्रत्यक्ष लोड करू शकत होते आणि ट्रेन कंडक्टर  स्मार्टफोन वापरून ह्या चिप वाचून खात्री करू शकत असे की प्रवाशांनी त्यांच्या  प्रवासाचे पैसे भरले आहेत की नाही .  खूपच व्यापक आणि मुख्य प्रवाही तंत्रज्ञानाच्या वापरापैकी हा एक वापर होता जो भरपूर अग्रेसर  विचारवंत कंपन्यांनी स्विकारला. लिंक्ड्सारख्या व्यावसायिक सोशल मिडीया वापरणार्‍या कंपनीने देखिल मायक्रोचिपींग तंत्रज्ञानाचा स्विकार केला आहे.   स्वीडनमधून समोर आलेल्या माहितीमुळे हे दावे खरे ठरल्याचे दिसत आहे. स्वीडनमधील ‘बायोहॅक्स इंटरनॅशनल’ ही जॉवान ऑस्ट्र्लुंड ह्यांनी ५ वर्षांपूर्वी सुरु केलेली ह्या नवीन उद्योगातील बाजारातील अग्रणी कंपनी आहे. या कंपनीकडून नागरिकाची संपूर्ण माहिती असणार्‍या मायक्रोचिप्स तयार करून त्या शरीरात रोपण केल्या जात आहेत.

मायक्रोचिप्स या संकल्पनेचे समर्थक ‘मायक्रोचिपिंग’ म्हणजे माणसाला स्वातंत्र्य बहाल करणारी व्यवस्था सल्याचा दावा करीत आहे कारण या मायक्रोचिपमुळे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा कुठल्याही स्वरुपाचे ओळखपत्र जवळ बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.  परंतु प्रत्यक्षात ‘कॉन्स्पिरसी थिएरिस्ट’ मायक्रोचिपींग ही जागतिकीकरणवाद्यांची जगभरातील जनतेला गुलाम करण्याची योजना असल्याचा आरोप करीत आले आहेत. 

मायक्रोचिपींग ह्या सदर तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या नागरिकाची वैयक्तिक माहिती त्याच्या परवानगीशिवाय सहजपणे मिळविता येऊ शकते. त्यामुळे हे तंत्रज्ञान नागरिकांना व्यवस्थेचे गुलाम बनविणारी आहे. तसेच आपल्याला नको असलेल्या विरोधकांचा काटा काढणे यामुळे व्यवस्थेला सहज शक्य होऊ शकते, अशी चिंताही ‘कॉन्स्पिरसी थिएरिस्ट’कडून व्यक्त केली जात आहे ज्यात तथ्य असावे असे वाटते.

. ‘सीबीएस ऑस्ट्रेलिया’ या वृत्तवाहिनीने ऑस्ट्रेलिया सरकारने २०१० सालीच आपल्या देशातील सर्व नागरिकांमध्ये ‘मायक्रोचिप’ बसविण्याची योजना आखली होती ही माहिती उघड केली होती. स्वीडनमधील ‘बायोहॅक्स इंटरनॅशनल’ ही जॉवान ऑस्ट्र्लुंड ह्यांनी ५ वर्षांपूर्वी सुरु केलेली ह्या नवीन उद्योगातील बाजारातील अग्रणी कंपनी आहे. या कंपनीकडून नागरिकाची संपूर्ण माहिती असणार्‍या मायक्रोचिप्स तयार करून त्या शरीरात रोपण केल्या जात आहेत. स्वीडनमध्ये चार हजारांहून अधिक नागरिकांच्या शरीरात ‘मायक्रोचिप्स असल्याच्या समोर आलेल्या माहितीमुळे ‘कॉन्स्पिरसी थिएरिस्ट’ प्रतिपादन करीत असलेले दावे खरे ठरण्याची चिन्हे स्प्ष्ट दिसू लागली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

स्वीडीश शहर लुंड मधील मॅक्स ४ प्रयोगशाळेतील  बेन लिबर्टन हा मायक्रोबायॉलॉजिस्ट AFP ला सांगतो की मायक्रोचिप्स रोपण करून  सध्या साठवण्यात आलेली आणि पुरविली जाणारी माहिती ही जरी लहान असली तरी ती वाढण्याची शक्यता अधिक आहे. मायक्रोचिप मध्ये जास्त माहिती एका जागी साठवून ठेवल्यास तीच माहिती आपल्याच विरोधात वापरली जाण्याचा धोका अधिक वाढतो.   जर मायक्रोचिप एके दिवशी वैद्यकीय समस्या शोधू शकते तर तशा मायक्रोचिप्समुळे माणसाच्या  रोग प्रतिकारक प्रणालीवर संक्रमण किंवा प्रतिक्रिया उद्भवू शकते . ही बाबही दुर्लक्षित करून चालणार नाही.    

स्वीडनसारख्या प्रगत युरोपिय देशामधील हजारो नागरिकांनी मायक्रोचिप स्वीकारल्याने नजिकच्या काळात ही व्यवस्था युरोपात अन्य देशांत ही लवकरच प्रस्थापित होण्याची संभाव्यता अधिक असल्याचे गडद चित्र स्पष्ट  दिसत आहे . माणूस तंत्रज्ञानावर एवढा अवलंबून राहिला तर नक्कीच त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहणार नाही ह्यात तिळमात्र शंका नाही. माणसाच्या विकासासाठी तंत्रज्ञान का तंत्रज्ञानाच्या अवाजवी उपयोगामुळे माणूसच  तंत्रज्ञानाचा गुलाम बनतो की काय ही आशंका मनाला भेडसावत राहते, त्यामुळे ती नजरेआड करून मुळीच चालणार नाही असे प्रामाणिकपणे वाटते.    

संदर्भ: १.  दैनिक प्रत्यक्ष
 

 टीप - " मायक्रोचिप्स तंत्रज्ञान अणि मानव  !!! "  ह्या संदर्भातील लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ३ नोव्हेम्बर २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता

Saturday, 23 June 2018

कृत्रिम बुध्दीमत्ता ( आर्टिफिशियल इंटिलिजन्स - Artificial Intelligence )- मानवतेसाठी शाप की वरदान ???

                                                                  
जगन्नियंत्या परमेश्वराने वसुंधरा पृथ्वीवर नानाविध प्रकारचे जीव जंतु, प्राणी , पक्षी निर्माण केले आणि मानवाची निर्मिती करून तो अत्यंत आनंदीत झाला आणि आता नवीन काही नको ह्या अर्थाने ’त्या’ मानव हा शब्द उच्चारला आणि ’त्या’च्याच सर्वात सुंदर निर्मितीला वा आकृतीला म्हणा ’त्या’ ने मानव असे नामकरण केले. इतर सर्व अन्य प्राण्यांमध्ये त्याने आतापर्यंत कधी न बहाल केलेले अत्यंत दोन सुंदर वरदान त्याने मानवाला बहाल केले ते म्हणजे बुध्दीमत्ता आणि वाणी . 

आपण  पाहतो की आजुबाजुच्या सर्व प्राणी जगतात ह्या दोन गोष्टी बहुधा आढळतच नाही . मानवाला परमेश्वाराने बुध्दीमत्ता ही दिलेली अत्यंत सुंदर , अमूल्य अशी देणगी आहे म्हणा किंवा वरदान आहे, ज्यामुळे तो सर्व प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ आणि वरचढ ठरतो. ह्याच बुध्दीमत्तेच्या आधाराने मानवाने स्वत:चे जीवन सुख, समृध्द केले. वाणीच्या म्हणजेच आवाजाच्या माध्यमातून माणूस बोलू लागला, एकमेकांशी संवाद साधू लागला . वेगवेगळ्या भाषा वाप्रून तो आपल्या आचार विचारांचे प्रदान करू लागला.  पुढे ह्याच बुध्दीमत्ता आणि वाणी ह्या भगवंताने दिलेल्या अत्यंत श्रेष्ठ वरदानांचा वापर करून मानवाने आकाशाला गवसणी घालण्याइतकी प्रगती विज्ञान , संशोधन, तंत्रज्ञान  ह्यांच्या सहाय्याने केलेली आपण पाहतो.

मानवाने कॉम्प्युटरचा म्हणजेच संगणकाचा शोध लावला व त्याचा वापर दिवसागणिक वाढतच गेला. आज आपण पाहतो मानवाचे अवघे जीवन, त्याच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गोष्टी ह्या सार्‍या ह्याच संगणकाने संपूर्ण रीत्या काबीज केल्या आहेत म्हणजेच मानव हा कॉम्प्युटरवर जास्तीत जास्त अवलंबून राहू लागला आहे. पूर्वी आकडेमोड किंवा हिशोब करताना माणूस स्वत:च्या बुध्दीमत्तेने करायचा, कोणत्याही प्रकारच्या मशीनवर अवलंबून नव्हता. पण तेच आता कॅल्क्युलेटर , कॉम्प्युटर ह्यांच्या मदतीशिवाय हिशोब करणे सहसा जमत नाही वा अवघड होत चालले आहे. पूर्वीच्या पिढीमध्ये कोणाचाही टेलिफोन नंबर , घराचा पत्ता , कोणा व्यक्तीच्या वाढदिवसाच्या  तारखा किंवा लग्नाच्या तारखा ह्यांची एकतर छोट्या डायरीत नोंद ठेवली जायची किंवा माणसाच्या बुध्दीनुसार त्या गोष्टी पाठ करून त्या लक्षातही ठेवल्या जायच्या, पण आता मात्र हेच चित्र संपूर्णत: पालटले आहे . माणूस एवढा मोबाईल किंवा स्मार्टफोनच्यावर अवलंबून राहू लागला आहे की कधी कधी स्वत:चा मोबाईल नंबर वा घरातील/कुटूंबातील  दुसर्‍या सदस्यांच्या फोनचा नंबर सुध्दा लक्षात राहत नाही आणि  त्यासाठी आधार घ्यावा लागतो तो ह्या मोबाईल रूपी मशीनचाच !         

’गरज ही शोधाची जननी आहे ’अशी म्हण प्रचलित आहे , बुध्दीमत्ता ह्या वरदानाचा यथोचित वापर करून मानवाने निरनिराळ्या विभिन्न क्षेत्रांत अगदी नेत्रदीपक प्रगती केली आहे. संगणकाच्या आधारे माणसाने सर्वच क्षेत्रांत खूप मोठी भरारी मारली आहे. संगणकाच्या अफाट कार्यक्षमतेमुळे, त्याच्या अतुलनीय वेगामुळे माणसाचे कष्टही वाचू लागले, वेळेची बचतही होऊ लागली. त्यातूनच मानवाच्या मनाला भुरळ पडू लागली ती ह्या बुध्दीमत्तेला कृत्रिम रीत्या तयार करून तिचा वापर करण्याची ! अशा रीतीने परमेश्वराने बहाल केलेल्या ह्याच बुध्दीमत्तेला कृत्रिम रीत्या मशीनच्या सहायाने बनविण्यासाठी मानवाने अहोरात्र परिश्रम घेतले आणि त्यातून साकार झाली ती ’कृत्रिम बुध्दीमत्ता’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्स - Artificial Intelligence ( AI ) 

कृत्रिम बुध्दीमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटिलिजन्स  ही सुध्दा सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर कॉम्प्युटर सायन्सचीच (संगणक शास्त्राची )एक शाखा आहे ज्याद्वारे मनुष्यासारखे बुध्दीमान असलेले असे मशीनस् बनविले गेले की ज्यांना स्वत: निर्णय घेण्याची क्षमता आहे, जे माणसाप्रमाणे विचार करून , बुध्दी वापरून , माणसाच्या मदतीशिवाय निर्णय स्वत:च घेऊ शकतात.

कृत्रिम बुध्दीमत्ता हे एक असे सिम्युलेशन (अनुकरण) आहे ज्याद्वारे मानव मशीन्सना मानवी बुध्दीमत्ता प्रदान करतो की ज्यामुळे त्या मशीन्समध्ये अशी बुध्दीमत्ता विकसित केली जाते की ज्यायोगे ती मशीन्स मानवाप्रमाणे विचार करतील व कामे करतील. अर्थातच हे सारे संगणाकाच्या मदतीनेच  करता येते . ह्यात तीन प्रक्रिया सामिल असतात. पहिल्या प्रक्रियेत शिकणे म्हणजे ह्यात त्या मशीनच्या मेंदूत किंवा बुध्दीमह्ये माहिती ( Information) दिली जाते व काही नियम शिकविले जातात , जेणेकरून त्या नियमांचे पालन करून ती मशीनस त्यांना दिलेली कामे पार पाडू शकतील. दुसर्‍या प्रक्रियेत कारण-मिमांसा म्हणजे Reasoning . ह्यातून ती मशीन्स त्यांना दिल्या गेलेल्या सूचनांनुसार त्यांना दिलेल्या नियमांचे पालन करून निर्णय घेण्यामध्ये यशस्वी होतात व त्याद्वारे ते अनुमानित (सर्वसाधारण, ढोबळमानाने) किंवा निश्चित स्वरूपाचा, स्पष्ट किंवा ठाम निर्णय घेऊ शकतात आणि तिसरी प्रक्रिया असते ती स्व-सुधारणा करण्याची म्हणजेच Self-correction ची.

कृत्रिम बुध्दीमत्तेची ओळख जगाला जॉन मॅकार्थी ह्या अमेरिकेन शास्त्रज्ञाने १९५६ साली डार्ट्माऊट परिषदेत करून दिली होती ज्याचे आज विशाल महाकाय वृक्षात रूपांतर झाले आहे ज्यात आज Robotics Process Automation  पासून  Actual Robotics पर्यंत सर्वांचा समावेश करण्यात येत आहे.     

कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर -

१. कृत्रिम बुध्दीमत्ता - आरोग्य क्षेत्रात
आज  कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर  हा अनेक हॉस्पिटलमध्ये आरोग्य निगडीत कार्यात करण्यात येत आहे, ज्यामुळे रूग्णांवर लवकरात लवकर आणि अत्यंत प्रभावीरीत्या औषधोपचार करता येऊ शकतो . अशारीत्या कृत्रिम बुध्दीमत्तेचा  वापर करणार्‍यांपैकी एक नाव सुप्रसिध्द आहे  ते म्हणजे आयबीएम वॅटसन . ह्यातून असे आढळले आहे की कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून  आरोग्यविषयक क्षेत्रात एक खूप मोठी क्रांती घडवून आणता येऊ शकते .
२. कृत्रिम बुध्दीमत्ता - व्यापार क्षेत्रात
Robotics Process Automation च्या मदतीने आता मशीन्सकडून मानव Highly Repetitive Tasks खूप्च सुंदर रीत्या करवून घेऊ शकतो ज्यातून कंपनी आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे , प्रभावीरीत्या , मदत करू शकतात, अति वेगाने, शीघ्रतेने उत्तम दर्जाच्या  सेवा पुरवू शकतात
३. कृत्रिम बुध्दीमत्ता - शिक्षण क्षेत्रात 
   कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून शिक्षक मुलांचे अधिक चांगल्या प्रकारे वर्गीकरण करून, त्यांना समजून घेऊन, त्यांची बौध्दिक क्षमता समजून घेऊन त्यांना जास्त वेळ देऊन अभ्यासात मदत करू शकतात. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्याचे निराकरण करू शकतात. कोणकोणत्या विषयांत त्याची प्रगती कमी होते व ती का कमी होते हे जाणून त्यांना त्यावर मार्गदर्श करू शकतात , ज्यामुळे त्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अधिक रूची वाटेल, त्यांना अधिक आवड निर्माण होईल व ते विषय अभ्यासण्यास अधिक सोपे जातील.
४. कृत्रिम बुध्दीमत्ता - वित्त क्षेत्रात (Finance )    
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून वित्त क्षेत्रात खूप मोठा फायदा होत आहे कारण Financial Institutions , नानाविध वित्त -संस्थांना आता जो Data Analysis करण्यामागे भरपूर वेळ व पैसा  खर्ची घालावा लागायचा तो आता खूपच कमी झाला आहे.
 ५. कृत्रिम बुध्दीमत्ता - कायदा क्षेत्रात     
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून Documents Processing सारखे कायदा क्षेत्रांतील अत्यंत कटकटीचे , वेळखाऊ काम आता खूपच सोपे , सहज झाले आहे व त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक कार्यक्षम रीत्या पार पाडता येऊ शकते.
६. कृत्रिम बुध्दीमत्ता - उत्पादन क्षेत्रात  ( Manufacturing )   
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून उत्पादन क्षेत्रात भरभराट झालेली आढळते. पूर्वी ज्या कामासाठी अधिक मनुषयबळ लागायचे ते आता कमी मनुष्य़बलाचा वापर करूनही कमी खर्चात करता येऊ शकते. 
७.  कृत्रिम बुध्दीमत्ता - लष्करी क्षेत्रात  ( मिलिटरी - Military aaplications)
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून लष्करी क्षेत्रांत Fighter Pilots ना प्रशिक्षण देता येऊ शकते जेथे unpredictable situations युध्दात उद्भवू शकतात , जेथे मानव पोहचू शकत नाही अशा ठिकाणी ड्रोनचा वापर , शस्त्रांचा वापर करता येऊ शकतो , अर्थातच ह्यामध्ये मानवी युध्दाचे नियम पायदळी तुडविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच हा वापर विध्वंसक वा विघातक परिणाम घडवू शकतो अशी भीती संशोधक व्यक्त करीत आहेत.

कृत्रिम  बुध्दीमत्ता आणि मानवाचे भवितव्य
दिवसागणिक मानवाच्या जीवनातील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वाढता वापर आणि त्याचा प्रभाव बघता कुठे तरी अशी अनामिक भीती मनाल स्पर्शून जाते की मान हाच त्या कृत्रिम बुध्दीमत्तेच्या जाळ्यात अडकणार त नाही ना? कोणत्याही गोष्टीच्या चांगले आणि वाईट अशा दोन बाजू असतात. कृत्रिम बुध्दीमत्ता ही मानवाने स्वत:च्या प्रगतीसाठी विधायक कार्यात वापरली तर लाभदायक ठरेल ह्यात दुमतच नाही . परंतु हीच कृत्रिम बुध्दीमत्ता विघातक , संहारक कार्यासाठी पण वापरता येऊ शकते ह्याचे सदैव भान राखायलाच हवे. कृत्रिम बुध्दीमत्ता हे तसे पाहता दुधारी तलवारीसारखे शस्त्र आहे. जर मशीनसमधील त्याचा वापर हा अनाठायी झाला तर हीच मशीनस मानवावर सत्ता गाजवू शकतात ह्याचा कधीही विसर पडून चालणार नाही. 

आज मानव कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून मशीनस मुळे सुखी झाला असे जरी चित्र दिसत असले तरी कोणी सांगा उद्या हीच मशीन्स ह्याच कृत्रिम बुध्दीमत्तेच्या आधारे मानवाला गुलामही बनवू शकतात अशीच भीती काही नामवंत संशोधक, उद्योजक व्यकत करीत आहेत व तसा निर्वाणीचा इशाराही देत आहेत.

बुध्दीबळ खेळातील जगज्जेत्या गॅरी कॉस्पोरोव्हला १९९७ साली आयबीएम कंपनीच्या Deep Blue ह्या सुपरकॉम्प्युटरने हरविले होते ही बाब हेच दाखविते की यंत्रातील, संगणकातील कृत्रिम  बुध्दीमत्ता मानवाच्या बुध्दीमत्तेवर मात करून त्याला पराजित करू शकते.

जानेवारी २०१८ च्या एका बातमीनुसार अमेरीकेत झालेल्या वाचन आणि आकलनाच्या एका उच्च पातळीच्या स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) बसविलेल्या यंत्रांनी मानवांवर मात केली आहे. त्यात असे आढळले की अलीकडेच घेण्यात आलेल्या या चाचणीत दोन नैसर्गिक भाषा प्रक्रिया साधनांना मानवांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.यातील एक साधन हे मायक्रोसॉफ्ट या अमेरीकी सॉफ्टवेअर कंपनीने तयार केले असून दुसरे साधन अलीबाबा या चिनी ऑनलाईन विक्री कंपनी तयार केलेले होते.

अवघ्या काही वर्षांपूर्वी केवळ अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानाने आज सिद्ध करून दाखवल्या आहेत . आज आपण पाहतो की माणूस म्हणून तो जे काही करतो, ते तंत्रज्ञान करू लागले. काही वर्षांपर्यंत बुध्दीमत्तेचे म्हणजेच मेंदूचे काम तेवढे माणसाच्या हातात शिल्ल्क राहिले असे वाटत होते. आता तेही जवळपास केले जाऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजूबाजूचे वातावरण, एखाद्या घटनेच्या  त्यावेळच्या किंवा आधीच्या घडामोडी, परिस्थिती, भाव भावना , मानवी बंध  या साऱ्या गोष्टीचा परिणाम एकवेळ माणसाच्या मेंदूवर होऊ शकतो. परंतु कृत्रिम बुध्दीमत्त वापरण्याने  या यंत्रावर तसा कुठलाही परिणाम होणार नाही.

त्यामुळेच सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयावर जगभरात चिंतन सुरू आहे. सगळ्याच गोष्टी यंत्राच्या सहाय्याने होत गेल्या तर मग माणसाचा उपयोग तो काय? अशी भीती सार्‍या स्तरांवर व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कृत्रिम बुध्दीमत्ता हे मानवतेसाठी शाप आहे की वरदान आहे ह्यावर विचार करण्याची वेळ आता नक्कीच येऊन ठेपली आहे.
जगभारातील संशोधक, विचारवंत आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या लष्करी वापरावर चिंता व्यक्त करीत आहेत आणि त्यामुळे जगात प्रचंड विध्वंस माजेल असा सज्जड  इशाराही देत आहेत. 

विख्यात संगणक प्रोग्रामर्स, तत्वज्ञ , नामवंत मुत्सद्दी, आणि अग्रगण्य उद्योजकांपर्य़ंत अनेकजणांनी कृत्रिम बुध्दीमत्ता म्हणजेच  आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या वापराबाबत, त्याच्या विकासाबाबत इशारे दिले आहेत , याबाबत त्यांना  काय वाटतं? ह्याचा आपण आढावा घेतल्यास आपल्या नक्कीच लक्षात येऊ शकते -  

व्लादिमिर पुतीन-
रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले व्लादिमिर पुतीन म्हणतात आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या क्षेत्रात अग्रेसर असलेला देशच पुढच्या काळात जगावर सत्ता गाजवू शकेल.

स्टीफन हॉकींग
सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, लेखक आणि कृष्णविवर  भौतिकशास्त्र प्रणेते स्टीफन यांना हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा इव्हेंट असल्याचे वाटते. या माध्यमातून युद्ध, रोगराई आणि गरिबीवर मात करता येईल. यामुळे आयुष्याला एक प्रचंड गती येईल. आर्थिक बाजार, मानवी संशोधन, शस्त्रास्त्रांचा विकास समजण्यापलिकडे झालेला असेल. यातील धोके कसे टाळायचे हे जर आम्ही समजून नाही घेतले तर मानवी इतिहासातील तो शेवटचा इव्हेंट असेल, असा  सावधानतेचा गंभीर इशाराही ते देतात.

एलॉन मस्क
टेस्ला मोटर्सचा सीईओ आणि नावाजलेला सुप्रसिध्द द्रष्टा  उद्योजक एलॉन मस्क म्हणतो, कृत्रिम बुध्दीमत्तेचा विध्वंसक वापर  हा अनुभवातून घेतलेला सर्वात मोठा धोका असेल. प्रगतीच्या नावाखाली आपण काही वेडेपणाचे पाऊल तर उचलत नाही ना याचाही विचार करायला हवा. अर्थात याचा वापर चांगल्या हेतूतूनच व्हायला हवा.
म्हणूनच हा धडाडीचा उद्योजक ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स ’ अर्थात कृत्रिम बुध्दीमत्ता ह्याच्या धोक्यांबद्दल सातत्याने आवाज उठविणारा  ’ओपन ए आय’ हा उपक्रम जागतिक पातळीवर बहुतांश व्यासपीठावरून राबवित आहे व त्यातून एलॉन मस्क ह्यांची जगाला तिसर्‍या महायुध्दातील होऊ घातलेल्या भीषण नरसंहारापासून वाचविण्याची अटाटी दिसते असे मला प्रामाणिकपणे वाटते.
परंतु हाच एलॉन मस्क दुसरीकडे कृत्रिम बुध्दीमत्तेचा विधायक कार्यासाठी कसा वापर करता येऊ शतो हे ही दाखवित आहे.  कृत्रिम बुध्दीमत्तेचा  वापर करून ’न्यूरालिंक ’ द्वारे मानवी मेंदूला संगणकाशी जोडून मेंदूशी निगडीत गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी उत्पादन येत्या ४ वर्षांत  विकसित करण्याची मस्क ह्यांची महत्त्वाकांक्षा आहे व त्यावर ते कार्य करीत आहेत.

बिल गेट्स
मायक्रोकॉफ्टचे सहसंस्थापक ६० वर्षीय बिल गेट्स म्हणतात, ‘सर्वत्र कमी भासणाऱ्या मजुरांची ती योग्य रिप्लेसमेंट असेल. हे तंत्रज्ञान योग्यच आहे. त्याचा वापर फक्त सकारात्मक विचारातून व्हायला हवा. आगामी काही दशकांत हे तंत्रज्ञान सर्वत्र दिसेल तेव्हा चिंताही वाढलेली असेल.’

कृत्रिम बुध्दीमत्ता अर्थात  आर्टिफिशियल इंटिलिजन्स हे मानवाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी हातभार लावणारे वरदान ठरो व  त्याच्या अमर्याद लष्करी पातळीवरील वापरामुळे भीषण मानवी नरसंहारासाठी  वापरता येणारा तो शाप न ठेरो हीच त्या जगन्नियंत्या परमेश्वराच्या , आदिमातेच्या  चरणीं प्रार्थना !!!

संदर्भ - दैनिक प्रत्यक्ष

Wednesday, 21 March 2018

एलॉन मस्क - द्रष्ट्या उद्योजकाची गगनभरारी !

दैनिक प्रत्यक्ष नववर्ष विशेषांक - १ जानेवारी २०१८ चा विशेषांक हा वाचकांसाठी दीपस्तंभच आहे जणू ! समुद्राच्या गर्भात दडलेल्या अनेक भीषण तटरेषा (तटरेखा),प्राणघातक उथळ पाण्याचे प्रवाह, रीफ,  बंदराच्या सुरक्षित प्रवेशासंबंधी जसे एखादा दीपस्तंभ  नाविक व स्थानिक कोळ्यांना (मासेमारी करणार्‍यांना) सूचना देत राहतो व त्यांच्या प्राणांचे अंधारातही सदैव संरक्षण करीत राहतो , त्याप्रमाणेच दैनिक प्रत्यक्षचा नववर्ष विशेषांक हा देखिल नव नवीन विषयांचे  एवढेच नव्हे तर जगात घडणार्‍या विशेष, विलक्षण आणि विक्षीप्त घटनांचे ज्ञान करवून देतो आणि त्याच वेळी काळाबरोबर वास्तवाचे भान ठेवून सजग राहायला, सभानतेने प्र्त्येक पाऊल टाकायला, चालायलाही शिकवितोच !

सर्वसामान्यत: अंधारातच माणसाचा नेहमी घात होत असतो आणि आता "तिसर्‍या महायुध्दाच्या " उभ्या ठाकलेल्या कराल काळाच्या जबड्यातून सही सलामत तरायला हा अज्ञानरूपी अंध:कार छेदणे ही अत्यावश्यक , अत्यंत निकडीची बाब आहे , हे जाणून दैनिक प्रत्यक्ष अशाच सर्वसमर्थ दीपस्तंभाची भूमिका निभावून माणसाला संकटांशी चार हात करायला खंबीर , चाणाक्ष , निडर , निर्भय बनविण्याचे महान कार्य करीत आहे , तेही तब्बल एक तप म्हणजे सातत्याने १२ वर्षे !”

                                                                      
’ एलॉन मस्क - द्रष्ट्या उद्योजकाची विस्मयकारी कथा ’ हा अंबरीष परळकर ह्यांनी लिहीलेला ७ पानांचा प्रदीर्घ लेख अशाच एका विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त गोष्टींची नुसतीच आवड असणार्‍याच नाही तर तशीच स्वप्ने पाहून ती सत्यात उतरविणार्‍या एका प्रगाढ अभ्यासू वृत्तीच्या, असामान्य बुध्दीमत्तेच्या , अपार मेहनत घेण्याची , धडाडीने अशक्यप्राय वाटणार्‍या जगावेगळ्या संकल्पनांमध्ये सर्वस्व ओतण्याची अद्वितीय जिद्द अंगी बाणविलेल्या, व ते सत्यात उतरविण्यासाठी लागणार्‍या कोणत्याही स्वरूपाचा धोका देखिल पत्करण्याची तयारी व हे सर्व करण्याची अजब क्षमता देखिल असणार्‍या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करवून देतो.

अवघ्या १५ दिवसांच्या अवधीत अंतराळ, वाहन व उर्जा ह्या तीनही क्षेत्रांमधील विलक्षण संभाव्य बदल व भवितव्याचे संकेत देणार्‍या तीन घटना वाचताना त्यामागील परमेशवराने निर्मिलेल्या ह्या ’अजब मेंदू’ चा आवाका पाहून तोंड विस्मयाने विस्फारले जाते . ’गरज ही शोधाची जननी आहे’ असे वाचले होते पण दूरदृष्टीने माणूस अशी अति विशाल, उत्तुंग गगन भरारी घेऊ शकतो व जगात अशी मानवाच्या सर्वकष, सर्वांगीण विकासाचा विचार करणारी माणसे आहेत हे पाहून त्या जगन्नियत्यांच्या मानव बनविण्याच्या कृतीमागचा उद्देश्यही दृष्टीगोचर होतो.
२१ व्या शतकातील मानवाची अंतराळातील झेप किती आवश्यक आहे हे जाणवले ते त्या द्रष्ट्या उद्योजकाच्या ’स्पेसेक्स’ ने जेव्हा सप्टेंबर २०००८ मध्ये ’फाल्कन १ ’ ह्या रॉकेटने पृथ्वीबाहेरच्या कक्षेत यशस्वी झेप घेतली आणि अंतराळ युगातील एका नव्या पर्वाची सुरुवात झाली त्या मागील चित्तथरारक पार्श्वभूमी वाचताना.!
२०१० साली पहिलं ’रियुजेबल स्पेस्क्राफ्ट’ आणि त्यानंतर अवघ्या पाचच वर्षांत २०१५ साली ’रियुजेबल रॉकेटचे लॅंडींग ’ ह्या घटना केवळ ’स्पेसेक्स’ कंपनीच्या नव्हे तर अंतराळक्षेत्राच्या इतिहासातील देखिल अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.

लहानपणी आपण सारेच अनेक स्वप्ने पाहतो पण ती सत्यात उतरविण्यासाठी क्वचितच हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी माणसेच चिकाटीने, जिद्दीने, धडाडीने अपरंपार कष्ट घेतात असे चित्र समाजात दिसते. परंतु एलॉन मस्क ह्यांच्या कर्तुत्त्वाची यशोगाथा वाचताना मात्र माणूस काय करू शकतो परमेश्वरने दिलेल्या अफाट बुध्दीमत्तेच्या जोरावर ह्याचे प्रत्यंतर पदोपदी येते. लहानपणापासूनच पृथ्वीपलिकडील विश्वाने झपाटलेल्या मस्क ह्यांनी शालेय जीवनातच ह्याची सुरुवात केली होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारन त्यांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ’ब्लास्टर’ नावाचा जो गेम तयार केला होता त्याची संकल्पनाच मुळी परग्रहावरून संहारक क्षेत्रे घेऊन आलेली अंतराळयाने पाडणे ही म्हणजेच अंतराळक्षेत्राशीच जुळलेली होती. आपल्या मराठीत ह्याच करिता म्हण दृढ झाली असावी -’मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.’

’टेसला मोटर्स’ ह्या एलॉन मस्क ह्यांच्याच दुसर्‍या कंपनीने जगाला दिलेली देणगी तर अतुलनीयच आहे. जगातील प्रत्येक रस्त्यावर किफायतशीर ’इलेक्ट्रीक कार’ असावी हे आपले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी एलॉन मस्क ह्यांनी ’टेसला’ कडून तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रीक गाड्यांचे तंत्रज्ञान जगातील सर्व कंपन्यासाठी खुले केले, हे करून त्यांनी वातावरणातील प्रदूषण रोखण्याचा सोपा मार्ग आमच्या समस्त मानवजातीच्या हाती सोपविला.
’सोलर सिटी’ , ’सोलर रूफ’ ह्या संकल्पना म्हणजे तर उर्जा क्षेत्राला  दिलेले वरदानच जणू ज्या योगे जगाला ’शाश्वत उर्जेच्या" दिशेने पुढे नेण्यासाठी एक नवीन पाऊल टाकून आगळी वेगळी दिशाच दाखविली होती.
’हायपरलूप’ - विमानाच्या दुप्पट वेग असणारी , हवामानाचा कोणताही परिणाम न होणारी व कमी उर्जेचा वापर असणारी वाहतूक यंत्रणा व हे तंत्रज्ञान आणि ते विकसित केल्यानंतर त्याचे पेटंट न घेता ,कोट्यावधी डॉलर्सच्या कमाईवर बिनधास्तपणे सोडलेले पाणी पाहता  एलॉन मस्क हा केवळ खोर्‍याने पैसा ओढणारा उद्योजक नसून त्याच्या संशोधनाद्वारे त्याची ठाम भूमिका , उदात्त विचारसरणी आणि मानवजातीसाठी आमूलाग्र बदल घडवून आणण्याची प्रेरणा कारणीभूत असल्याचे आढळते.

हायपरलूप व अंडरग्राउंड टनेलिंग हे तंत्रज्ञान मंगळावर वापरण्यासाठी उपयुक्त ठरेल असे एलॉन मस्क ह्यांनी संकेत दिले होते. पृथ्वीवर काहीतरी आदळून मृत्यु येण्यापेक्षा मंगळावर मृत्यु आलेला आवडेल असे म्हणणार्‍या एलॉन मस्क ह्यांनी आपल्याला ह्याच आयुष्य़ात मानवाने मंगळावर पाऊल ठेवलेले पहायचे आहे अशी बाळगलेली महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी मंगळावर आपली ’रोडस्टर’ ही ’ऑल इलेक्ट्रीक कार ’ पाठविण्याची तयारी ह्याची जबरदस्त साक्ष देते.

त्यानंतर अवघ्या सव्वा दोन महिन्यांच्या कालावधीनंतर १२ मार्च २०१८ रोजी अमेरीकेतील टेक्सास येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना एलॉन मस्क ह्यांनी तिसरे महायुध्द भडकल्यास पृथ्वीवर पुन्हा एकदा ’अंधारयुग’ येण्याची शक्यता वर्तवून , पृथ्वीवर पुन्हा  मानवी जीवनाची सुरुवात करण्यास अंतराळातील चंद्र व मंगळावरील तळ महत्त्वाची भूमिका बजावतील असा दावा केल्याचे दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १३ मार्च २०१८ रोजीच्या ’तिसरे महायुध्द’ ह्या विशेष भागात प्रतिपादन केले आहे.

गेल्या वर्षीच एलॉन मस्क ह्यांनी चंद्रावर मानवी वस्तीचा समावेश असणारा ’मून बेस अल्फा’ व मंगळावरील मानवी वस्तीची योजना असणारा ’मार्स सिटी प्लॅन’ यांची घोषणा केली होती तर नुकत्याच १२ मार्च २०१८ रोजी ऑस्टिन शहरातील ’एसएक्सएसडब्ल्यू  कॉनफरन्स ’ मधील एका कार्यक्रमात पुढील वर्षाच्या म्हणजे २०१९ च्या पहिल्या ६ महिन्यांतच अंतराळक्षेत्रातील त्यांच्या मालकीच्या आघाडीच्या ’स्पेसेक्स ’ ह्या खाजगी कंपनीकडून ’इंटरप्लॅनेटरी ’ प्रकारातील अंतराळयाने तयार होतील व त्यामुळे दोन ग्रहांमधील प्रवासाचा अवधी खूपच कमी होईल अशी ग्वाही दिली. परंतु त्याच बरोबरीने मंगळावर जाणारे पहिले मानवी पथक मोठा धोका पत्करणारे असेल ह्या वास्तवाचे संकेतही द्यायला मस्क विसरले नाहीत. एलॉन मस्क ह्यांनी स्पष्ट शब्दांत तंबी देखिल दिली की मंगळावरील पहिले मिशन हा श्रीमंत लोकांसाठी सुटकेचा गु्प्तपणे रचलेला कट नाही ( the first missions to Mars will not be "an escape hatch for rich people" ). मंगळावर जाणारे लोक हे अगदी मूलभूत गोष्टीं पासून समाज निर्माण करतील आणि त्याकरिताच प्रचंड आर्थिक पाठबळाची गरज आहे.

’आर्टिफिशियल इंटेलिजन्स ’ अर्थात कृत्रिम बुध्दीमत्ता ह्याच्या धोक्यांबद्दल सातत्याने आवाज उठविणारा  ’ओपन ए आय’ हा उपक्रम जागतिक पातळीवर बहुतांश व्यासपीठावरून राबविणे ह्यातून एलॉन मस्क ह्यांची जगाला तिसर्‍या महायुध्दातील होऊ घातलेल्या भीषण नरसंहारापासून वाचविण्याची अटाटी दिसते.

’न्यूरालिंक ’ द्वारे मानवी मेंदूला संगणकाशी जोडून मेंदूशी निगडीत गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी उत्पादन येत्या ४ वर्षांत  विकसित करण्याची मस्क ह्यांची महत्त्वाकांक्षेला परमेश्वरी वरदहस्त व सहाय्य लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना !

टीप - " एलॉन मस्क - द्रष्ट्या उद्योजकाची गगनभरारी !  " हा लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक २१ मार्च २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता.  

Wednesday, 14 February 2018

भारताचा पहिला ’कचरा महोत्सव’

काय नाव वाचून दचकलात ना? पहिल्यांदा ही बातमी वाचली तेव्हा मी ही बुचकळ्यातच पडले होते. आपण नेहमी विवीध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेले विवीध खाद्य मेळावे ,महोत्सव ह्यांबद्दल  ऐकतो , पाहतो आणि मस्त पैकी तावही मारतो जसे आंबा महोत्सव ,, चिक्कू महोत्सव,  चॉकलेट महोत्सव इत्यादी. पण नुकतीच एका आगळ्या वेगळ्या बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले आणि ते म्हणजे आमच्या ऑफीसमध्ये होणार्‍या जनरल नोलेज क्वीझमधील एका प्रश्नाने आणि त्या अनुषंगाने दिलेल्या बातमीने. भारतातील पहिला गारबेज फेस्ट "कचरा महोत्सव २०१८" हा कोणत्या राज्याने आयोजित केला होता? उत्तरामध्ये नाव मिळाले ते छत्तीसगडचे !

दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ३ फेब्रुवारी २०१८च्या अंकात "राष्ट्रगंगेच्या तीरावर" ह्या सदरात "टूर द छत्तीसगड" हा लेख वाचला आणि आवडला देखिल होता. 

जगभरात छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्याची नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख आहे आणि ही ओळख पुसून टाकण्यासाठी छत्तीसगड पर्यटन विभागाने कंबर कसली आणि "टूर द छत्तीसगड" म्हणून कार्यक्रम सुरु करून त्या अंतर्गत "सायकल एक्स्पेडिशन " आयोजित केली होती ही बातमी वाचनात आली.  त्या आधी "बेस्ट कॉप " ची बातमी वाचनात आली आणि त्यानंतर  ट्विटर ह्या सोशल मिडीयावर ’भारताचा पहिला ’कचरा महोत्सव २०१८’ हया रायगड डिस्ट्रीक्ट , छत्तीसगड ह्यांच्या ट्विटने छत्तीसगड ची नव्याने ओळख होत असल्याचे ध्यानात आले. छत्तीसगड राज्य असो वा बस्तर जिल्हा हा माओवाद्यांचा जिल्हा वा राज्य असल्याचा जो गैरसमज जगभरात  पसरला होता तो दूर होण्यास नक्कीच मोठा हातभार लागेल असा आशावाद निर्माण झाला आहे. 




रायपूर म्युनसिपल कॉर्पोरेशनेने १९ जानेवारी ते २१ जानेवारी २०१८ ह्या कालावधीत द गारबेज फेस्टीव्हल "कचरा महोत्सव " चे छत्तीसगड मध्ये आयोजन केले होते. म्युनसिपल कॉर्पोरेशनच्यानुसार अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच उत्सव आहे. ह्या गारबेज उत्सवाचा मूळ उद्देश्य जागृती करणे , लोकांना वेस्ट मॅनेजमेंट ह्या विषय़ाबाबत मार्गदर्शन करणे आणि गारबेज किंवा कचरा म्हणून संबोधित केल्या गेलेल्या वस्तूंपासून विवीध टेक्निकस वापरून त्याच फेकल्या जाणार्‍या वस्तू पुनश्च नव्याने वापरात  आणता येऊ शकतात ह्याचे प्रायक्षिक करून दाखविणे हा होता. ह्या ३ दिवसीय उत्सवामध्ये व्याख्याने,चर्चा , स्पर्धा आणि सांस्कृतिक प्रयोग आयोजित केले गेले होते. ह्या व्यतिरिक्त कचर्‍याचे (गारबेजचे) प्रभावी रीत्या ,व्यवस्ठित प्रकारे कसे व्यवस्थापन करता येऊ शकते  ह्यां बाबत लोकांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने विवीध प्रकारच्या कार्यशाळांचे ही आयोजन केले गेले होते.ह्या फेस्टीव्हल मध्ये वेस्ट ( टाकाऊ)  मधून युटिलीटी वस्तु कश्या बनविता येतील ह्या संबंधीच्या विवीध प्रकारचे स्टॉल्स देखिल सहभागी करण्यात आले होते. 


स्वच्छतेवर आणि आरोग्यावर शाळेतील मुलांनी लिहिलेल्या कविता, लेख ह्यांचा सुध्द्दा येथे समावेश केला होता. लहान मुले आपल्या वागण्यातून , कृतीतून स्वच्छतेचा संदेश सहजतेने समाजात  पसरविण्यास खूप मोठा हातभार लावतात , त्यामुळे ते खरे (ऍम्बेसेडार )प्रतिनिधी असतात. त्यांनी केलेल्या काही प्रतिकृती खरोखरीच खूप महत्त्वपूर्ण संदेश देऊन समाज प्रबोधनाचे कार्यच  जणू करीत होत्या. 
                                        



अशा प्रकारे आगळ्या वेगळ्या संकल्पनांचा वापर करून स्वच्छ्ते संबंधी आपण नक्कीच सुंदर उपक्रम राबवून कचरा निर्मूलन करून वेस्ट मॅनेजमेंटचा प्रश्न सोडवू शकतो. 

टीप - " भारताचा पहिला ’कचरा महोत्सव’ " हा लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १२ फेब्रुवारी  २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता. 

Friday, 2 February 2018

ड्रोन टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी वापर - तेलंगणा सरकारचे पाऊल कौतुकास्पद !

ड्रोन हा शब्द आता  नवखा राहिलेला नाही, आबालवृध्द अशा सर्वांच्याच चांगलाच परिचयाचा झाला आहे. सीमेवरील सुरक्षेसाठी, निरीक्षणासाठी, सर्वेक्षणासाठी , टेहाळणीच्या कामासाठी अशी बरीच कामे करण्यासाठी ड्रोन वापरतात असे आपल्या वाचनात येते.                                                                     

आपला भारत देश हा मुळात शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर येथे लोकांचे शेती हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असते. भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती हा कणा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतु येत्या काही वर्षांमध्ये कमी उत्पादकता , संसाधनातील संकटे आणि अनिश्चित हवामान (पाऊस) ह्यां सर्वांच्या एकत्रित परिमान स्वरूप शेतीतून मिळणारे उत्पन्न हे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर घटले आहे. पिकांच्या उत्पादनातील घट पाहता पिकांचे उत्पादन, त्यांच्या कापणीच्या वेळा, पिकांच्या होणार्‍या नुकसानाचा ठोकताळा, पिकांच्या विम्याच्या हफ्त्यांची परतफेड ह्या बाबींचा एकत्रित विचारविनिमय होणे अत्यंत निकडीचे आहे असे ध्यानात आले.          

पिकांच्या उत्पादनांचा अंदाज बांधताना  जिरायती शेती, बागायती शेती, खरीप हंगामातील शेती, रब्बी हंगामातील शेती अशी वेगवेगळी पिकांची वर्गवारी करून त्याचा तपशील ठेवावा लागतो. त्यातून शेती खूप मोठ्या भूभागावर (जमिनीवर) पसरली असल्यास पिकांच्या उत्पादनाचा आढावा घेणे ही कठीण काम होऊन बसते. 
                                                                                                                          








भारतात मोसमी वार्‍यांपासून प्रामुख्याने पाऊस पडत असला तरी देखिल पावसाच्या बेभरवशी वागण्याने म्हणा वा लहरी पावसाने खूपदा शेतीचे वारेमाप नुकसान होते. त्या नुकसानाचा अंदाज घेणे हे खूप महत्त्वाचे काम असते. अशा वेळेला ड्रोन टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी वापर करता येऊ शकतो ह्यावर विचार केला जाऊ लागला. जर प्रमाणित पध्दतीचा  अवलंब केला तर ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून पिकांच्या उत्पादनाचा व त्याच बरोबरीने नुकसानाचाही अंदाज बांधता येऊ शकतो असे निदर्शनास आले. त्यामुळे तेलंगणा सरकार आपल्या भारत देशामध्ये बहुधा पहिल्यांदाच अशा प्रकारे ड्रोन टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी वापर करण्याबाबत नियोजन करत आहे, जेणे करून पिकां बाबतच्या विम्याच्या दाव्यांची (इन्शुअरन्स क्लेमस) जलद गतीने आणि पारदर्शक पध्दतीने  परतफेड करण्यास खूप मोठा हातभार लागेल.  त्यांच्या मते विम्याच्या दाव्यांची परतफेड व विसंगती सुधारण्याकरिता, सर्व भागधारक (स्टेकहोल्डर्स) ह्यांना ही बाब स्विकारार्ह नक्कीच वाटेल. 

सध्या अस्त्तित्वात असलेली पध्दत ही मानवी कामांवर अवलंबून असल्यामुळे पिकांच्या नुकसानाबाबत अंदाज बांधणे हे वेळखाऊ व किचकट पध्दतीचे काम बनते आणि त्यामुळेच विमा परतफेड करण्यास उशीरही लागतो.
  
कृषी (शेतकी) विभागाने  नुकत्याच झालेल्या ह्या रब्बी/यासंगी हंगामात , एका बंगळूर स्थित कंपनीवर ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून एका गावामध्ये प्रायोगिक तत्त्वावर  पिकांच्या नुकसानाचा अंदाज वर्तविण्याचे काम सोपविले आहे , ज्यांनी हे प्रात्यक्षिक विनामूल्य करून देण्याचे मान्य केले आहे. त्या विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ," आम्ही रंगारेड्डी तालुक्यातील कंडुकुर मंडलच्या नेडुनुर गावातील २० शेतकर्‍यांच्या मालकीची ६६ एकर शेती ह्या कामासाठी निवडली आहे."  त्याच गावाच्या निवडीबाबत बोलताना त्या अधिकार्‍याने माहिती दिली की एक तर ते गाव शहराच्या जवल आहे आणि दुसरे कारण म्हणजे निवड केलेल्या जागेत भाजीपाला, फुले, अन्नधान्य , नगदी पिके(कॅश क्रॉप्स), आणि काही फळांच्या लागवडी अशी विवीध प्रकारची पिके घेतली जातात. तसेच त्या प्रायव्हेट कंपनीने ह्या अभिनव ,अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधीच कारले, वांगी, शेंगा, टॉमेटो, भेंडी, मिरची, गुलाब, आंबा, कापूस, मका, वाटाणा (लहान आकाराचा) , गहू, ज्वारी, बाजरी अशा उभ्या शेतातील पिकांचा फोटो काढून काही प्रकारे सराव अभ्यास देखिल केला आहे. त्या कंपनीने पिकांच्या उत्पादनासोबतच , मातीचे आरोग्य, कीटक.किटाणू समस्या आणि इतर काही महत्त्वाच्या बाबी ह्यां बाबत माहिती मिळवून देण्यासही संमती दर्शविली आहे ही बाबही निदर्शनास आणून दिली आहे. 

कृषी मंत्रालयाने पिकांच्या उत्पादनाचा अंदाज बांधण्यासाठी पिकांच्या कापणीच्या प्रयोगांबाबत तर्कशक्तीयुक्त सुधारणा करण्यासाठी एका समितीची आधीच स्थापना करून ठेवली आहे.  कृषी मंत्रालयाच्या एका अधिकार्‍या- नुसार ह्या संदर्भात महालानोबिस नेशनल क्रॉप फॉरकास्ट सेंटर (एमएनसीएफसी) बनविंण्याच्या योजनेला स्वीकृती मिळाली आहे. गेल्या वर्षी मंत्रालयाने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथील सर्वेक्षणासाठी एक ड्रोन भाडे-तत्त्वावर घेतला होता. मंत्रालयाच्या योजनेनुसार प्रत्येक राज्यासाठी एक ड्रोन विकत घेण्याची योजना आहे.

ड्रोन टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी वापर करण्याची योजना आखणे हे  तेलंगणा सरकारचे पहिले पाऊल खरेच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.

खरोखरीच अभिनव, अत्याधुनिक तंत्रज्ञान - ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीबाबत प्रगती केल्यास भारताच्या विकासाला , प्रगतीला गती लाभण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही हे  निर्विवाद सत्य आहे !

सूचना - "ड्रोन टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी वापर - तेलंगणा सरकारचे पाऊल कौतुकास्पद !" हा लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक २ फेब्रुवारी  २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता. 

Sunday, 24 December 2017

दगडफेक करणारे हात आता फूटबॉलचा गोल रोखत आहे....

आज सद्य परिस्थितीत आपल्या जवानांनी, सुरक्षा दलांनी राबविलेल्या धडक मोहीमा, त्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनी जम्मू-काश्मीरमध्ये दोनशेहून अधिक दहशतवाद्यांना संपविण्यात यश आले आहे. परंतु गेली कित्येक महिने आपल्या भारतीय जवानांवर होत असलेली दगडफेक आणि तेथील  स्थानिकांचा अतिरेकी, दहशतवाद्यांना मिळणारा पाठींबा ह्यामुळे सीमेवरून घुसखोरीचे प्रमाण वाढण्यास हातभारच लागत होता. ह्या दगडफेकीच्या बातम्या वाचतानाच मागच्या वर्षी नॅशनल मिडीयावर एक संतप्त काश्मीरी तरूणीचे जम्मू अणि काश्मीर पोलीसांवर दगडफेक करतानाचे चित्र सर्वत्र प्रसिध्द झालेले पाहण्यात आले होते. त्यामुळे  अल्पावधीत्च अफशान आशिक हे नाव सर्वांना परिचितही झाले होते.  परंतु आज त्याच अफशान आशिकचे नाव ट्विटर सारख्या मिडीयावर जम्मू -काश्मीरच्या स्त्री फुटबॉल  संघाची  कप्तान , गोलकिपर म्हणून झळकत आहे. ती मुंबई संघातर्फे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनीधीत्व करत आहे २२ जणांच्या फुटबॉल टीमचे !
खरोखरीच ही खूप सुखावह ,आनंददायक बाब आहे ! 
                                                                   
अफशान सांगते मागच्या वर्षीच्या तिच्या दगडफेक करणार्‍या जम्मु-काश्मीरच्यासंतप्त युवतीच्या फोटोमुळेच तिच्या आयुष्याला एक नवीनच कलाटणी मिळाली. मुळातच त्याच फोटोची सत्यता पडताळून पाहताना अफशान ही एक मूळ फुटबॉल प्रेमी असल्याचे उघडकीस आले. तिच्या मते त्या फोटोनेच तिच्या वैयक्तिक जीवनातील तिच्या स्वत:च्या खेळातील करिअरला सुध्दा एक नवीच सुसंधी उपलब्ध झाली आणि त्याच मुळे जम्मु-काश्मीर मधील कित्येक मुलींना ती फुटबॉल ह्या पुरुषप्रधान खेळाची ओळख करून देऊ शकली.  आपल्या रागाला व्यक्त करण्यासाठी दगडफेक करतानाचा तिचा फोटो प्रसिध्द झाल्यामुळे ती एक खेळासाठी हपापलेली, उत्सुक क्रीडाप्रेमी असल्याचे तिचे मूळ स्वरूप जगासमोर आले. त्यानंतर जम्मु-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती ह्यांनी अफशानला जम्मु-काश्मीर तर्फे फुटबॉल खेळण्यासाठी आणि जम्मु-काश्मीरमध्ये महिलांचा फुटबॉल खेळातील समावेश वाढवैण्यासाठी प्रेरीत केले, प्रोत्साहनही दिले आणि खूप मोठे पाठबळ पुरविले. मेहबूबा मुफ्तींनी स्पोर्टस  सेक्रेटरींना अफशान व तिच्या सहखेळाडू महिला फुटबॉल टीमला सर्वतोप्रकारे सहाय्य पुरविण्याचे आदेश दिले आणि राज्य प्रशासनाने सुध्दा जराही दिरंगाई न करता वा आदेशाकडे काणाडोळा न करता महिला फुटबॉलपटूंना खेळाचे सर्व साहित्य देखिल पुरविले आणि त्यामुळेच अवघ्या एका वर्षात एक संपूर्ण टीम बनविता आली.  

नुकतीच मंगळवारी अफशान व तिच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी २२ जणांची फुटबॉल टीम , त्यांचे कोच सतपाल सिंग काला आणि मॅनेजर त्सेरींग अंगमो ह्यांनी युनियन होम मिनीस्टर राजनाथ सिंग ह्यांची भेट घेतली. स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडिया (Sports Authority of India (SAI) ह्या इंस्टिट्युटची काश्मीरमध्ये सुरुवात व्हावी आणि त्या योगे काश्मीरमधील तरूण मुलींना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण मिळावे ह्याबाबत संमती मिळविण्यासाठी ही भेट घेतली गेली होती.  अफशानने  एका वृत्तपत्राला (TOI) बातमी देताना अशी प्रतिक्रिया दिली की युनियन होम मिनीस्टरांनी आमच्या फुटबॉल खेळासंबंधीच्या समस्या शांतपणे जाणून घेतल्या , ज्याने मी अत्यंत प्रभावित झाले. आम्हांला जम्मु-काश्मीरमध्ये आता खेळासाठी पायाभूत सुविधा अजून उत्तमरीत्या पुरविल्या जातील असा विश्वासही तिने व्यक्त केला. होम मिनीस्टरांनी अफशान आणि तिच्या सहकारी खेळांडू समोरच जम्मु-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा करून त्यांना ते श्रीनगरला पोहचल्यावर त्यांना भेट देण्याविषयी सुचविले असे तिने सांगून आपले समाधान व्यक्त केले.

२३ वर्षांची अफशान आशिक ही श्रीनगर मधील कॉलेजमधून बीएचे शिक्षणही घेत आहे. थोड्याच कालावधीत बॉलीवुड मध्ये तिच्या  जीवनातील खेळातील प्रवासाबाबत एक फिल्मही बनविली जाणार आहे असे वाचनात आले. 

                                                                         


                                                                   
पोलिसाच्या चुकीच्या वागणे नसते तर आपण दगड उचलला नसता असे सांगून मागील वर्षी झालेल्या दगडफेकीच्या बद्दल आपल्या मनात पश्चात्ताप नसल्याचे अफशानने मत व्यक्त केले . परंतु आज मला प्रतिष्ठा मिळाली आहे आणि मला सन्मान मिळाला आहे , तो मला जपायचा आहे. मला माझ्या फुटबॉलवर माझे लक्ष केंद्रीत करायचे आहे आणि मला माझ्या राज्याला आणि माझ्या देशाला अभिमानास्पद कामगिरी करायची आहे असे अफशानने उद्गार काढले.     

आपत्ती व्यवस्थापनामध्ये जातीय दंगली , वैमनस्यातून उद्भवलेले दंगे ह्यांना मानवी आपती ( Man made disasters) असे संबोधिले जाते, ह्या आपत्तींना तोंड देण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून बचावात्मक उपाय योजले जाऊन त्याची तीव्रता, होणारे भयावह परिणाम कमी करता येऊ शकतात असे वाचनात आले होते. त्यामुळे जम्मु-काश्मीर मधील जातीय दंगली , दहशतवाद्यांची, अतिरेक्यांची घुसखोरी ह्यांवर तेथील स्थानिकांच्या समस्या जाणून त्यावर उपाय योजणे हे अत्यंत आवश्यक पाऊल होते. तरूण पिढी शिक्षणापासून वंचित राहिल्याने त्यांचे जीवन अनुचित दिशेने भरकटत चालले होते व युवा शक्तिचा गैरवापर करून जातीय दंगली घडविल्या जात होत्या. जम्मु-काश्मीर मध्ये युवा -वर्गाला त्यांची कर्तबगारी दाखविण्यास योग्य पध्द्तीने वाव दिल्याने, तेथील शांतता, तेथील समजाचा विकास हे शक्य होऊ शकते असे चित्र दिसू लागले आहे. 

खरोखरीच सरकारने उचलेली ही खूप स्तुत्य बाब आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. 

खेळाडूंना प्रोत्साहन देऊन , त्यांना पाठींबा दिल्यास ऑलिम्पिकमधील वा अन्य आंतरराष्ट्रीय खेळांमधील भारताची कामगिरी अधिक उज्ज्वल होऊ शकते हे निर्विवादास्पद सत्य कोणीच नाकारू शकत नाहीत.  


    
सूचना -  हा लेख प्रथम दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १० डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रथम प्रसिध्द्व झाला होता.

Sunday, 20 August 2017

संत कान्होपात्रा

हरि ॐ
आज दैनिक प्रत्यक्ष में अग्रलेख पढतें हुए भक्तमाता पार्वती ॠषिकुमारों एवं शिवगणों को समझाते हुए जो बातें कही थी , उस में का एक वाक्य ने मन को छू लिया ।  भक्त माता पार्वती ने कहा था  कि मानव के मन में चण्डिकाकुल ( आदिमाता दुर्गा, दतात्रेयजी, हनुमानजी, किरातरूद्रजी, माता शिवगंगागौरी , आदिमाता का वाहन बना देवीसिंह, आदिमाता के चरणों में बालभाव में बैठा उनका पुत्र त्रिविक्रम ) पर श्रध्दा और विश्वास होता है । किंतु ’मेरा तुम पर विश्वास है’ यह केवल मुंह से बोलना पर्याप्त नहीं है, बल्कि वह तुम्हारी कृति से भी प्रगट होना चाहिए ।  यह पढकर मन गहरी सोच में डूब गया कि अगर यह बात माता पार्वती बता रही है  और वो भी ऋउषिकुमारों और शिवगणों को , तो अवश्य ही यह बात हम आम आदमियों के लिए भी बहुत महत्त्वपूर्ण ही है ।  फिर खयाल आया कि हम भगवान पर हमारा विश्वास है , हमारी श्रध्दा है ऐसे कितने जोर शोर से अपने मुंह से बोलतें हैं , किंतु क्या सचमुच में हमारा भगवान/ भगवति के चरणों पर इतना अटल विश्वास रहता है क्या? इस के बारे में हमें सोअचना आवश्यक हो जाता है ।  हम हमेशा भगवान को अपना माता -पिता, भाए-बहन , सखा कहतें हैं , वो ही एक कर्ता - धर्ता- संहर्ता है , इस बात को भी स्विकार करतें हैं ।  फिर भी छोटी-मोटी मुसिबतों से हम घिर जातें हैं , तब हमारे कदम लडखडाने लगतें हैं , भगवान के चरणॊं पर होनेवाला हमारा विश्वास कम पडने लगता है ।  हमारा मन नाना तरह की भली-बुरी आशंकाओं से दोलने लगता हैं , हमारी रूह  भय से कंपित हो उठती हैं,  हमारे मन की शांति , तृप्ति  , समाधान खो जाता है ।  यह इसिलिए घटित होता हैं क्यों कि हमारा विश्वास चट्टानों की तरह खंबीर , अडिग नहीं होता है ।  मेरा भगवान या मेरी भगवति कोई भी संकट से महान है और वह उसके बच्चे को यानि  मुझे बचाने केलिए कुछ भी कर सकतें हैं , यह विश्वास दृढ नहीं होता हैं ।  यह सोचतें हुए मन में संत कान्होपात्रा की यकायक याद आने लगी और याद आया कि यह एक ऐसी संत थी, जिनका अपने विठ्ठल भगवान पर पूरा विश्वास था और वो कितनी भी बडी मुसिबत में कभी  भी टूटा नही था । 

कौन थी यह कान्होपात्रा ? चलिए उनकी कहानी जानने की कोशिश करतें हैं -
संत कान्होपात्रा
नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ  पाहे ।।
हरिणीचे पाड व्याघ्रे धरियले। मजलागी जाहले तैसे देवा ।।
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी। धावे वो जननी विठाबाई ।।
मोकलूनी आस, जाहले  उदास ।घेई कान्होपात्रेस हृदयास ।।
 

(कान्होपात्रा यह एक मराठी भाषिक संत  थी , इसिलिए उनकी अभंग रचना मराठी में पाई जाती है । ) 
     
यह संत कान्होपात्रा का अभंग बताता है कि उनका उनके भगवान पर कितना अटूट विश्वास था, कितना भरोसा था उअनका पने भगवान विठ्ठल के चरणों पर ।

संत कान्होपात्रा यह १५ वी सदीं के जमाने में  मंगलवेढा गांव में, शामा नामक गणिका (नायकीण/ वेश्या ) के घर में पैदा हुई थी । शामा यह उस वक्त की सबसे रईस गणिका (वेश्या ) थी और उनके कोख से पैदा हुई यह कान्होपात्रा इतनी अधिक सुंदर, रूपमति थी कि उसकी मां ने उसे १६ सालह की उम्र होने तक अपने घर के बाहर कदम भी रखने नहीं दिया था । शामा को यह डर था कि उसकी  इतनी सुंदर बेटी -कान्होपात्रा कहीं दूसरी जगह भाग ना जाए या फिर कोई भी उसे भगाकर ना ले जाएं । यह अपनी आयु के सोलह साल तक अपनी तीन मंझिलों वाले प्रासाद (राजमहल जैसी उंची मकान ) के बाहर कदम भी न रखी हुई  यह कान्होपात्रा , बाहर के पूरे जमाने से अनजान थी । ना तो उसने कभी विठ्ठल भगवान का नाम सुना था , ना वो जानती थी कि विठ्ठल कौन है? पर यही कान्होपात्रा जिसने एक बार भी भगवान विठ्ठल का नाम सुना नहीं था , वही कान्होपात्रा फिर भगवान विठ्ठल की श्रेष्ठ भक्त , संत कैसे बन गयी , यह बहुत ही अचरज में डालनेवाली बात हैं , ना? मानों किचड से कमल का फूल खिल गया था जैसे ! 

एक दिन कान्होपात्रा अपनी मकान के सज्जे में बैठी थी तब उसने संत नामदेवजी के अभंग सुने और उस अभंग में बताये गये विठ्ठल नाम के प्यार का बखान सुनकर , उसके मन में विठ्ठल को मिलने की आंस जाग उठी । वो अपनी दासी से विठ्ठल के बारे में पूछ्ताछ करती है ।  उसकी दासी ने बतायी हुई विठ्ठल नाम की महता सुनकर कान्होपात्रा का मन और भी तेजी से उसे मिलने के लिए व्याकुल हो उठा था और तेजी से दौडकर भगवान के चरणों में पनाह (शरण )लेना चाहता था । उसे भगवान विठ्ठल से मिलने की, उस पांडुरंग को अपनी आंखो से देखने की, उससे प्यार करनेवालों से मिलने की इच्छा पैदा हुई । यही उद्विग्न अवस्था में अपना सारा ऐश्वर्य, वैभव पिछे छोडकर कान्होपात्रा मंगलवेढा छोडकर सात कोस दूरी पर होनेवाले पंढरपूर पहुंच जाती है।  पंढरपूर इस वैकुंठ नगरी में वह भिक्षा मांगकर और पूरी पवित्रता से अपना पेट पालकर गुजारा करने लगती है ।  

पर एक दिन बिदर के बादशाह (महाराजा) कान्होपात्रा की सुंदरता के बारे में  सुनकर उसे पकडकर ले जाने के लिए अपने सैन्य को भेज देतें हैं ।  उस वक्त कान्होपात्रा दौडते हुए अपने भगवान विठ्ठल के चरणों में शरण लेने पहुंच जाती है । भगवान विठ्ठल के द्वार पर खडे रहकर वह बडी आर्त भाव से बुहार लगाती है अपने भगवान विठ्ठल की  और कहती है हे मेरे भगवन ! मेरी पुकार सुनकर आप जल्दी चलें आईये, आप मेरा अंत ना देखिए , मेरा आप के सिवा इस दुनिया में और दूसरा कोई भी नही है, आप मुझे अपने ह्रुदय से लगा लिजिए ।  उसकी वह पूर्ण  विश्वास से भरी , अंतर से भरी पुकार सुनकर उसके भगवान कैसे चुप बैठतें ? उसी वक्त कान्होपात्रा एक बिजली में रुपांतरित हो गई और उसी जगह पर तरटी नामक एक वृक्ष ( पेड) पनप उठा ।  इसिलिए उसी वृक्ष को कान्होपात्रा माना जाता है  और भगवान विठ्ठल के दर्शन करने से पहए उनके इस श्रेष्ठ भक्त कान्होपात्रा का दर्शन लेना आवश्यक माना जाता है । आज भी वही तरटी का वृक्ष  पंढरपूर में खडा है जो संत कान्होपात्रा की कहानी याद दिलाता है और आनेवाले काल में भी याद दिलाता रहेगा ।                 

हमें हमारी जीवन में अपने भगवान पर ऐसा ही अटूट विश्वास होना चाहिए इस बात का स्बक संत कान्होपात्रा हमें सिखलातीं है ।  इस पूरी दूनिया में मेरा संकट कितना भी गहरा हो, मेरी मुश्किल कितनी भी कठिन हो, मेरे जान पे बन आयी हो तभी मुझे मेरे  भगवान पर विश्वास रखना ही चाहिए , और उसके सिवा कोई दूसरा मुझे मदद कर नहीं सकता , इसीलिए सिर्फ और सिर्फ भगवान को ही मदद के लिए पुकारना चाहिए । 

भक्तमाता पार्वती ने जो बात कही कि सिर्फ अपने मुंह से भगवान पर मेरा विश्वास है यह बोलना पर्याप्त नही है तो मेरी कृति से भी वोही विश्वास प्रगट होना चाहिए ।  यह बात अपनी जिंदगी में वास्तव में जी कर कान्होपात्रा ने हमें बताया है ।  ऐसी महान संत कान्होपात्रा को मेरा शत शत नमन और ऐसा ही अटूट विश्वास भगवान के चरणों पर मैं कर सकूं इसिलिए उस भगवान को भी कोटी कोटी प्रणाम !  

 


प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog