Friday, 29 May 2015

उष्णतेची लहर (Heat wave) आणि उष्माघात - उन्हाळ्यातील आपत्ती - २९ मे २०१५

उष्णतेची लहर (Heat wave) आणि उष्माघात - उन्हाळ्यातील आपत्ती -  २९ मे २०१५



रोजच्या मृतांच्या वाढत जाणार्‍या आकडेवारीने वृत्तपत्रातील ह्या बातमीने अधिकच लक्ष वेधून घेतले.  
यंदाचा उन्हाळा जीवघेणा ठरला असून देशात उष्म्याच्या लाटेने आतापर्यंत १७०० वर लोकांचा बळी घेतला आहे. सध्या हैदराबाद - तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील उष्णतेची लहर काही कमी होत नसल्याचेच दिसून येत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात उकाड्याने मृत्यू झाल्याची नोंदीत दिवसागणिक अधिकच वाढ होत चालल्याचे आढळून येते आहे. कालच्या गुरुवारपासून ( २८ मे २०१५) फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्माघाताने ४१४ वर जणांचा बळी घेतला आहे.

जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेची ही लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशात अनेक राज्यांत पारा ४७ अंशावर असून अनेक राज्यांत सरासरी तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिएसपर्यंत पोहोचले आहे. केंद्र सरकार उष्णतेच्या लाटेने तत्पर झाले असून डॉक्टरांच्या सुट्‌या रद्द केल्या आहेत.

आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यात उष्णतेच्या बळींची संख्या सर्वाधिक आहेत. या राज्यात तापमानाचा पारा ४५ अंशांपेक्षा अधिक आहे. दोन्ही राज्यांमध्ये उष्णतेची लाट आणखी किमान दोन दिवस कायम राहील असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ईशान्य भारतातून येत असलेल्या उष्ण वाऱ्यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रात्रीचे तापमानही भारतात वाढू लागले आहे. सरकारने सर्व राज्यांना दक्षता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयांमध्ये अतिरिक्त वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत.

Sunday, 26 April 2015

आमच्या घराचा हरवलेला (?) आनंद - आपत्ती व्यवस्थापनाचे पहिले वास्तविक पाऊल !!!

संध्याकाळची वेळ होती. शाळेतून कंटाळून, दमून भागून आलेली बच्चे कंपनी खेळायला बिल्डींगच्या परिसरात जमू लागली. धावाधावी, पकडापकडी, लपंडाव असे खेळ रंगू लागले आणि बघता बघता अख्खा परिसर त्यांच्या ओरडण्याच्या, किंचाळण्याच्या आवाजांनी दुमदुमून गेला होता.

काही लहान मुलांचे उडया मारायचे खेळ चालले होते. आजूबाजूला बसायला जे सुमारे २ - २ १/२ फूट उंचीचे बाकडे बनवले होते त्यावरून ६-७ वर्षाची ती लहानगी चिमुरडी बाळे उडया मारून आपण किती शूर आहोत हे दाखवून आपाआपसात गोंधळ घालत होती.

त्यातल्या काही मुलांचे बोलणे कानी पडले ए मी ना जिन्यावरून २ पायर्‍यांवरून उडी मारू शकतो.

दुसर्‍याने त्याला तोंड वेंगाडून दाखवत चिडवले हे त्यात काय एवढे मोठे सांगतोस तू. मी तर ना ३ पायरीवरून पण उडी मारतो.

प्रत्येक जण आपण किती उंचावरून उडी मारू शकतो हे अगदी तावातावाने रंगवून सांगत होता.

तेवढ्यात एक चिमुरडी म्हणाली त्यात काय ? तुम्ही कोणी गच्चीवरून खाली उडी माराल का?

आधी जरा सगळे घाबरले आणि गोंधळले.

तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणाला त्यात काय ते टी.व्ही.वर दाखवतात ना तसे पोटाला दोरी बांधून मारायची उडी.

एका भित्र्या मुलाने विचारले आपण पडून हात पाय मोडले तर? आई-बाबा किती मारतील, झोडूनच काढतील बघ...

त्या प्रश्न विचारणार्‍या चिमुरडीने सांगितले  फक्त उडी मारायच्या आधी suicide note लिहून ठेवायची ...

अग ते suicide note काय असते ? ह्या श्रावणीचे तर काही तरी नवीनच असते बाबा....

आता आश्चर्याने अवाक होऊन तोंड वासायची पाळी  माझी  होती . एव्हाना तेथे असलेल्या काही जणांची बाचाबाची सुरु  झाली... ह्या एवढ्या लहानशा चिमुरडीला कसे काय माहिती?

एक वयस्क बाई म्हणाल्या हे सारे त्या टी. व्ही. वरच्या नको नको त्या मालिका, सिरीयल्स पाहण्याचे परीणाम. किती वेळा सांगून आई - बापांना कळत नाही. लहान मुले जे बघतात ते करायला बघतात. त्यात चांगले काय , वाईट काय हे त्यांना कुठे कळते. म्हणून तर त्यांना वेळ द्यावा लागतो.
दुसरी कडाडली हल्लीच्या आई-बापांना वेळ असतो का मुलांना द्यायला. कामावरून आले तरी कोठे लक्ष असते घरात... लहान मुले एकतर बिचारी वाट पाहून पाहून दमतात आणि आई बाबा नाही लक्ष देत असे दिसले की मुकाट्याने टी.व्ही. म्हणा., Computer म्हणा नाहीतर ते मोबाईल , व्हिडीओ गेम्स घेऊन बसतात आणि शिकतात मग हे असले नको ते...

Friday, 24 April 2015

श्री आद्य शंकराचार्यविरचितं श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्‌ भाग - २ !!!

आता जाणून घेऊ  या  आदिमातेचे लाभेवीण प्रेम  ….


जगन् मात: मातस्तव चरणसेवा न रचिता 
न वा दत्तं देवि द्रविणम् अपि भूयस्- तव मया ।
तथा अपि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत् प्रकुरुषे 
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।।

आई तुझ्या चरणांची सेवा मी कधीच केलेली नाही , तुझ्यासाठी एक कवडीसुद्धा खर्च केलेली नाही गं ! तरीदेखील माझ्यासारख्या अधमावार तु अनुपम स्नेह करतेस ह्याचे कारण एकच "कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. शरीराने ,मनाने , बुद्धीने कधीही तुझी भक्ती, सेवा, दान केले नाही तरीही तु माझ्यावर निरुपम प्रेम करतेस कारण मी कितीही कुपुत्र असलो तरी तु कुमाता नाही आहेस.


Wednesday, 22 April 2015

श्री आद्य शंकराचार्यविरचितं श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्‌ !!!

आज श्री आद्य शंकराचार्य जंयती.

श्री आद्य शंकराचार्यांनी अखिल मानव समाजाला श्री देवी अपराध क्षमापन स्तोत्र, महिषासुरमर्दिनी स्तोत्र ह्या सारखी आदिमातेची अनेक स्तोत्रे देऊन आदिमातेच्या अनिर्वचनीय रूपाला शब्दबध्द करून जणू काही साक्षात तिचे प्रत्यक्ष दर्शनच घडवले आहे असेच वाटते.

आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या १८ हातांमध्ये शस्त्रे असतात म्हणून काही लोक भोळ्या, भाबड्या भक्तांना घाबरवतात की हे देवीचे उग्र रूप आहे , तिच्या सर्व हातांत तर शस्त्रे आहेत , मग ती तुम्हाला मदत कशी करणार, ती सदैव उग्र रूपच धारण करते. त्या सर्व प्रश्नांना अगदी सोप्या पध्दतीने उत्तर देऊन शंकराचार्य निरुत्तर करतात. आदिमाता एवढी अपार करुणामयी आहे , तिची करुणा आपल्या लेकरांसाठी कशी सदैव भरभरून वाहते ह्याचे एवढे सुंदर वर्णन अजून तरी कोठे वाचनात नाही आले. आदिमाता उग्र रूप धारण करते , हातात शस्त्रे धारण करते ते दुष्ट . असुरांचा नि:पात करायला, त्यांनाचे निर्दालन करून श्रध्दावानांचे संरक्षण करायला , अन्यथा ती सर्वतोपरी प्रेमळ आणि प्रेमळच आहे, तिच्या इतुकी क्षमाशील अन्यत्र कोठेही सापडणे केवळ अशक्य...आदिमाता कशी आपल्या बालकाच्या अपराधाला पोटात घालून सदैव क्षमा करण्यास तत्पर असते हे जाणून घेऊ या , शंकराचार्यांच्या ह्या महान स्तोत्रातून ...      

चला तर मग आज त्यांच्या जंयतीच्या निमीत्ताने ह्या स्तोत्रांची आठवण करून त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करू या आणि आदिमातेच्या प्रेमात आकंठ अवगाहन करू या...
मूळ संस्कृत स्तोत्र पुढीलप्रमाणे आहे-

।। श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्‌।।

न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदपि न च जाने स्तुतिकथा।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम्‌।।1।।
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत्‌।
तदेतत्‌ क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।2।।
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।3।।
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।4।।
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम्‌।।5।।
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ।।6।।
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम्‌।।7।।
न मोक्षस्याकाङ्‌क्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रूक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः।
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मयि अनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव।।9।।
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।10।।
जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि।
अपराधपरम्परापरं न हि माता समुपेक्षते सुतम्‌।।11।।
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवि यथा योग्यं तथा कुरु।।12।।

।। एवं श्रीशंकराचार्यविरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम्‌।।




प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog