Saturday 6 June 2015

शिवराज्याभिषेक - भारतीय जनमनातील, इतिहासातील अविस्मरणीय सुवर्ण क्षण !!!

शिवराज्याभिषेक - भारतीय जनमनातील, इतिहासातील अविस्मरणीय सुवर्ण क्षण !!!



निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु | 
अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी |
यशवंत, कीर्तिवंत | सामर्थ्यवंत वरदवंत |
पुण्यवंत, नीतिवंत | जाणता राजा || 

सदगुरु श्रीरामदासस्वामी ह्यांनी आपल्या ह्या स्वशिष्याचे (शिवरायांचे) कौतुक करावे (तेही शिवरायांची सुपुत्र धर्मवीर संभाजी राजे ह्यांना लिहीलेल्या पत्रात ) आणि ते यथार्थ उद्गार संपूर्णत: जेथे जिवंत प्रचिती देत उभे ठाकावेत असे ते  आमुचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराज, शिवबा, शिवछत्रपती अशा अनेक नावांनी ज्यांनी प्रत्येक भारतीयाच्याच नव्हे तर अनेक परदेशीय़ांच्या ही मनाला भुरळ पाडली असे हे रणधुरंधर, परम प्रतापी, न्यायप्रिय, कर्तव्यदक्ष भव्य दिव्य, धीरोदात्त, परम तेजस्वी असे महान व्यक्तीमत्त्व! "दिव्यत्त्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती " ह्याचा जिवंत साक्षात्कार , आविष्कार म्हणजे आमचे शिवराय! आणि अर्थातच अशा आमच्या शिवरायांचा राज्याभिषेक - शिवराज्याभिषेक ही प्रत्येक भारतीयास अत्यंत आवडती , अविस्मरणीय घटनाच म्हटले तर वावगे ठरणार नाही असे वाटते.

Friday 5 June 2015

जागतिक पर्यावरण दिन - पर्यावरणाचा वसा !!!!

आज ५ जून म्हणजे जागतिक (विश्व ) पर्यावरण दिन ! 



संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंबलीने १९७२ च्या स्टॉकहोम येथील पर्यावरणविषयक परिषदेच्या निमित्ताने ‘५ जून’ हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जाहीर केला. पर्यावरणविषयक जागतिक जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याबाबत राजकीय सहाय्य व कृती वाढवण्यासाठी हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. 



UNEP म्हणजे United Nations Environment Programme द्वारे दरव्रषी ५ जून  रोजी जागतिक पर्यावरण दिन वेगवेगळ्या संकल्पना मांडून साजरा करण्याचे आव्हान केले जाते.‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात सर्व लोकांच्या सहभागाला महत्त्व असून यातून शासन, सामाजिक गट, कारखानदार या सर्वांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी प्रेरणा मिळते. जगभरातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये हा दिवस निरनिराळ्या पध्दतींनी साजरा केला जातो. यात पथयात्रा, हरित सोहळे, निबंध व पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम यासारखे उपक्रम राबविले जातात. हा दिवस साजरा करून आपण स्वत:ला व इतरांना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रेरित करत असतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.

Wednesday 3 June 2015

वटवृक्षाची पूजा - भूमातेची अंबज्ञता - 2

आधीच्या लेखात आपण वडाचे औषधी गुणधर्म पाहिले, आता आपण वडाच्या झाडासंबंधी अजून काही महत्त्वाचे मुद्दे पाहू या - 

वड हा मंजिराच्या जातीचा वृक्ष.  त्याला फुटणार्‍या पारंब्या जमिनीच्या खोल भागात जातात आणि त्याला मुळे फुटून पुन्हा वटवृक्ष तयार होतो. त्याचा रुंद खोड आणि विस्तारीत फांद्यामुळे होणारा भव्य विस्तार, डौलदारपणा, दाट पानांमुळे मिळणारी दाट सावली यामुळे पूर्वीच्या काळी हा वृक्ष वाटसरूचे आश्रयस्थान असे. म्हणूनच याला आधारवडही संबोधले जाते. फार पूर्वी आणि आजही खेडय़ातून बैलगाडीने किंवा पायी प्रवास करणारे शेकडो पांथस्थ या वटवृक्षाखाली निद्राधीन होऊन विश्रांती घेतात. हिंदी मध्ये व्यापारी लोकांना ’बनिया’ असे म्हणतात. ब्रिटीश जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी पाहिले की हे ’बनिया’ लोक व्यापाराच्या वेळी प्रवास करताना ह्या झाडाच्या विशाल सावलीत बसून चर्चा करतात , मिंटीग घेतात आणि म्हणून त्यांनी ह्या झाडाला बनिया वरून बॅनियन ट्री -     ( Banyan Tree) असे नाव ठेवले.



Tuesday 2 June 2015

वटवृक्षाची पूजा - भूमातेची अंबज्ञता

वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा ! हिंदू कालगणनेनुसार मराठी वर्षातील ज्येष्ठ महिना हा नावाप्रमाणेच ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा म्हणावा लागेल. संपूर्ण वर्षभरातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो.( २१ जून - ह्या वर्षी अधिंक महिन्यामुळे तो आषाढ शुध्द पंचमीला येतो - अपवाद  अधिक महिना कालगणनेनुसार) उन्हाळ्याची दाहकता सोसून सर्व चराचर आर्ततेने पावसाची कधी चाहूल लागेल म्हणून आसुसलेले असते आणि अशावेळी आभाळ काळ्या मेघांनी  भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला, कधी पाउस येईल वाटते आणि मध्येच पावसाची हलकी सर येणार्‍या पावसाळ्याची आठवण करून देते. परतीच्या वाटेवर पाऊल ठेवत निरोप घेणारा उन्हाळा नि सुरू होऊ पाहणारा पावसाळा यांची जणूकाही गळाभेट या महिन्यात पाहता येते. ज्येष्ठात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. या पौर्णिमेला अध्यात्मिक  व धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्यामागचे वैज्ञानिक महत्त्वही समजून घेतल्याने खर्‍या अर्थाने आजच्या वैज्ञानिक युगाशी मिळते जुळते घेण्यासारखे होईल. 

भारतीय संस्कृती, शास्त्र, परंपरा या महान ऋषी-मुनींच्या वैज्ञानिक, अध्यात्मिक चिंतनातून निर्माण झाल्या आहेत ज्यात त्यांनी चराचरातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अभ्यासिले, जाणले आणि समाजात रुजवले, बिंबवले ते अनेक सण, उत्सवांच्या आधारे. त्यात त्यांनी निसर्गाचा समतोल सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या वृक्षांचे अनन्यसारधारण महत्त्व आहे हे जाणूनच वृक्ष, वेली झाडांचे मानवी जीवनाशी पूर्वापार नांत जुळवून दिले. 

माणसाला निरोगी, निरामय जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची खूप मदत होते. याशिवाय झाडांची पाने, फुले फळे अगदी वाळलेले लाकडे देखील मानवाला उपयोगीच असतात. या अनमोल देण्याचे जपणूक करावी, संवर्धन करावे हा संदेश पूर्वजांनी पूर्वापार काळापासून समस्त  मानवजातीला दिला. म्हणूनच विविध व्रते, उत्सव, सण तसेच विविध देवी देवतांच्या पूजेत झाडांना, त्यांच्या पाना-फुलांना फळांना मानाचे महत्त्वाचे स्थान आहे. वृक्षांचा महिमा वाढून वृक्ष जतन करण्यास माणूस प्रवृत्त व्हावा, म्हणूनच आपल्याकडे वटपौर्णिमेसारखी व्रतं, परंपरा पाळली जातात. गरज आहे ती आपण ती व्रते सुजाण पणे पाळण्याचा. वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची महिमा आपण जर समजून घेतला तर खरे वृक्षपूजन करण्याचा प्रयत्न आपण केला असे आपण म्हणू शकतो. 


प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog