हा हा , अरे डायरी कधी एक पानाची असते का बाबा ? सर्व मित्रांमध्ये अतुल आणि त्याची "एक पानाची डायरी " हा हास्याचा विषय बनला होता.
अतुल त्याच्या मित्रांना कळवळून समजावून सांगायचा प्रयत्न करत होता. कोणी त्याची मस्करी करत होते , तर कोणी खिल्ली उडवत होते.
वेळेचे नियोजन म्हणे करणार ? तेही एका पानाच्या डायरीने ?
शेवटी काही मित्रांनी अतुलचे म्हणणे ऐकून घ्यायचे ठरविले . अतुल आता उत्साहाने सांगू लागला मित्रांनो बघा आपल्याला नेहमीच्या कामांव्यतिरीक्त रोज काही ना जास्तीची कामे करायची असतात. मग ते कधी विजेचे बिल भरायचे असेल तर कधी कोणत्या विमा पॉलिसीचा हफ्ता भरायचा असेल. एवढेच काय तर कधी कोणाचा वाढदिवस असतो तर कधी कोणाच्या लग्नाचा वाढदिवस. आपण त्या व्यक्तीला शुभेच्छा देण्याचे ठरवतो देखिल आणि कामाच्या घाई गडबडीत आपण कधी विसरून जातो ते कळत देखिल नाही.
हो ना दोस्ता, काल परवाचीच गोष्ट बघ ऑफीसमध्ये आमच्या मॅनेजर साहेबांचा वाढदिवस होता. रात्री ठरविले सुध्दा की सकाळी ऑफीसात पाऊल टाकताच साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आणि सकाळी विसरूनच गेलो पार. संध्याकाळच्या चहाच्या वेळी आठवण झाली आणि शेवटी साहेबांची नाराजीला सामोरे जावे लागले.
अरे मी पण आमच्या सौभाग्यवतीने फर्माईश केलेल्या काही वस्तू न्यायला विसरून गेलो ऑफीसच्या टेन्शन मध्ये आणि मग काय बाईसाहेबांच्या रागाचा पारा जो चढला की विचारता सोय नाही बघ बाबा...
अतुलने मग सांगितले ह्यावर सोपा उपाय बघा आहे माझ्याकडे तो हा "एक पानाच्या डायरी" चा !
आता सर्वच जण कान टवकारून बसले.
चला तर पाहू या "एक पानी डायरी " म्हणजे काय?
अतुलने मग समजाविले की एक छोटीशी पॉकेट साईझची डायरी (खिशात मावेल) अशी घ्यायची. त्याच्या एका पानाचे मधोमध रेषा मारून दोन सारखे भाग करायचे . एका डाव्या कडच्या भागात आदल्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी करायच्या बाकी राहिलेल्या गोष्टी लिहायच्या आणि दुसर्या उजवीकडील भागात मला आज करायच्या गोष्टी, आठवलेल्या गोष्टी , सुचलेल्या गोष्टी, वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस , कोणाचा नवीन पत्ता, बदलेला फोन नंबर , मोबाईल नंबर अशा गोष्टी लिहायच्या .
आता लिहीलेल्या गोष्टी जशा जशा आपण करू तशा तशा त्यावर टिक मार्क करून ठेवायच्या म्हणजे किती केले आणि किती बाकी राहिल्या ह्याचा अंदाज घेत राहायचा.
अरे बाबा, पण त्यासाठी डायरी उघडावी लागणार ना सारखी ?
सुरुवातीला सवय नसते तेव्हा जड जाते, कठीण वातते , पण जमले की सोपे वाटते बघ ... अतुल नव्या जोमाने पटवून देत होता.
दोन तास , तीन तासाने डायरी उघडून बघायची आणि खुणा करायच्या की काम एकदम सोपे होते बघा.
रात्रीत झोपायच्या आधी पुन्हा एकदा तपासायचे , त्या दिवशीच्या राहिलेल्या गोष्टी नवीन पानावर लिहायच्या आणि ते आजच्या दिवसाचे पान फाडून टाकायचे.
य़ेस ! अतुल संध्याकाळी घरी जायच्या आधी आठवणीने डायरी तपासली की घरी जाताना न्यायचे सामान , वाटेवर करायची कामे आठवली की घरच्या कटकटी, भांडणे एकदम बंद होतील...
कधी बिल भरायचे राह्ते तर कधी शाळेची फी, क्लासची फी भरायची शेवटची तारीख विसरायला होते ... एक ना दोन कितीतरी छोट्या वाटणार्या गोष्टी वेळेत केल्याने आपलीच डोकेदुखी कमी होते.
अतुलचे म्हणणे मित्रांना आता पटू लागले होते. वेळेचे नियोजन करायला शिकायलाच पाहिजे.
सुरेशने विचारले ए अतुल तुझी डायरी बघू ना ? मग सर्व मित्रांनी अतुलची डायरी पाहिली त्या दिवशीच्या पानावर अर्ध्या भागात कालच्या राहिलेल्या गोष्टींची नोंद होती तर अर्ध्या पानावर आजच्या करायच्या गोष्टी...
सुरेश वाचू लागला ... आजच्या पानाचा भाग
१. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या आणि २ ग्लास कोंमट पाणी पिणे.
२. आन्हिक
३. व्यायाम - सूर्य नमस्कार / चालणे - १ तास
४. शताक्षी प्रसाद खाणे
५. जेवायच्या आधी अर्धा तास औषधे
६. संध्याकाळी MRI Report घरी नेणे
७. आईची डायबिटीसची औषधे आणणे
८. रात्री ह्नुमान चलिसा (३)
त्यातील पहिल्या ५ गोष्टींवर टिक मार्क करून त्या खोडल्या होत्या.
रमण म्हणाला अतुल तू अजून पण व्यायाम करतोस , शाळा- कॉलेज संपले आणि व्यायाम बंदच झाला होता बघ... परत सुरु करायला हवा ...
कार्तिक खट्याळपणे म्हणाला हनुमान चलिसा कशाला रे ? आता कोणासाठी ?
अतुल हसत हसत म्हणाला माझ्या मनुसाठी ! तिचे दहावीचे वर्ष आहे ना , महत्त्वाचे , तिचा अभ्यास नीट व्हावा, परीक्षेची भीती वाटू नये म्हणून संकटमोचक हनुमानाची प्रार्थना करतो रे मी...
अतुलने सांगितलेले "एका पानाच्या डायरी"चे महत्त्व आणि वेळेचे नियोजन बर्याच अंशी सर्वच मित्रांना पटले होते.
कार्तिक परत अतुलला म्हणाला हे तुला आरती वहिनींनी शिकविले का?
अतुल उत्तरला , नाही रे बाबा. माझ्या सदगुरुंनी शिकविले . "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असे आपण म्हणतो ना , त्याची प्रचिती म्हणजे माझे सदगुरु!
एवढा कामाचा व्याप , एवढे कामाचे नियोजन आम्ही त्यांच्या कडूनच शिकलो सारे. कोणत्याही गोष्टीचे कामाचे नियोजन कसे करायचे हे त्यांनीच आम्हाला त्यांच्या प्रत्येक कृतीतून शिकविले बघ.
सुरेश सांगू लागला अरे मी "श्रीसाईसच्चरित " रोज वाचतो . त्याच्या पहिल्याच अध्यायात साईबाबा गहू दळतात ती कथा येते. त्यात साईबाबा एका सकाळी गहू दळायला बसायच्या आधी उठून स्वत:ची नित्यकर्मे नीट करतात. दात घासतात, तोंड धुतात. मगच बसतात. गहू दळायच्या आधी पण किती ती तयारी . जाते घेतात , खुंटा घट्ट रोवला का हे तपासून बघतात, कफनीच्या अस्तन्या वर सारतात , कफनीचा घोळ आवरतात .... माझा साईनाथ मला त्याच्या वागण्यातून शिकवितो की मी माझी रोजची कामे कशी नीट करावी , कोणत्या कामाआधी ते नीट व्हावे म्हणून कशी काळजी घ्यावी....
रमण अरे ह्याच संबंधी मी एक सुंदर लेख वाचला आहे साईबाबांचा. त्यात लेखकाने सांगितले की दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठायचे तर मला रात्री झोपताना घड्याळात गजर किंवा मोबाईलमध्ये अलार्म लावावा लागतो तसे मला सकाळी उठल्यावर देवाचे नाव घ्यायचे असेल तर रात्री झोपताना देवाचे नाव घेत झोपायला पाहिजे. म्हणजे तो देवच मला सकाळी जागे करताना त्याचे नाव वदवून घेतो.....
सुरेश ", हो साईसच्चरितात अशी ह्या अर्थाची एक कथा येते. लेखक हेमाडपंत रात्री रामनाम घेत झोपतात आणि दुसर्या दिवशी उठताना त्यांच्या मुखात रामनामच येते पहिले. साईबाबा त्यांना खूणही पटवून देतात....
अरे रमण तू जो लेख वाचला त्याची लिन्क मला दे , मी पण वाचतो ....
रमण सुरेशला त्या लिन्कची मा हिती देतो http://www.newscast-pratyaksha.com/shree-sai-satcharitra-adhyay1-part32-hindi/
ह्या संकेतस्थळावर जाऊन भेट दे आणि वाच तो लेख ! तुला तुझे साईबाबा नव्याने भेटतील आणि त्यांच्या वागण्याचा , त्या गोष्टीचा एक वेगळाचअर्थ वाचायला मिळेल.
सदगुरु हा नेहमीच वेळेचे महत्त्व जाणतो आणि आपल्या शिष्यांना, भक्तांना स्वत:च्या कृतीतून ते पटवून देतो. वेळेचे नियोजन ही खरेच खूपच महत्त्वाची बाब आहे.
धनुष्यातून सुटलेला बाण , तोंडातून निघालेला शब्द हा जसे मागे घेता येत नाही तसेच हातातून निघून गेलेला वेळ हा कधीच परत मिळवता येत नाही. म्हणूनच वेळेचे महत्त्व ओळखून आपण वेळीच वेळेचे नियोजन करायला शिकायला हवे .
अतुलच्या सदगुरुंनी सांगितलेला "एक पानी डायरी " चा उपाय मला खूपच आवडला आणि तो आचरणात आणून बघायचा मी प्रयास केला आणि खरोखरी मला वेळेचे महत्त्व कळले, जीवनाला एक नव्याने शिस्त लागली.
मग काय अनुभवून बघायचे का आपण स्वत:च ?
संदर्भ:
१. श्रीसाईसच्चरित
२. http://www.newscast-pratyaksha.com
Superb...
ReplyDeleteAlways,asusual
Best very nice beautifully worded.
Ambadnya
One Page Diary is the best gift given by Sadguru Shree Aniruddha Bapu to all his children (devotees) .
ReplyDeleteMost time management softwares and programmes are based on the same principle .
Ambadnya for quoting it aptly .
Mast article !
ReplyDeleteNew way of gunsankirtan !!
Soft Discipline through lovely devotion !!!
" I love u baba Ambadnya mala hi adhik changalya savayi lava "
Zakas lekh
ReplyDeleteMstach aahe
ReplyDeleteAmbadnya
"one page diary" Basic principle to lead a successful life by following Sadguru's path. ह्या एका पानावरचे काम झाले कि ते काढून टाकायचे नी दुसर्या कोर्या कागदावर नव्या दिवसाची नवीन सुरुवात करायची. " झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे..." असेच तर शिकवत नसेल न आपली ही ONE PAGE DIARY.!!
ReplyDeleteYes perfectly said Rasika Sant. Aptly described great teaching towards Successful life.
Delete