Tuesday 7 February 2017

सागरी प्रदूषणाचे विपरीत परिणाम रोखण्यासाठी ठोस पावले उचलायलाच हवीत !





चेन्नई : येथील कामराजर बंदरानजीक एम टी मॅपल आणि एम टी डॉन कांचीपुरम ह्या दोन जहाजांत शनिवारी  टक्कर होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर तेल गळती सुरू आहे. याचा फार मोठा फटका येथील समुद्रातील जैवविविधतेला बसला असून स्थानिक मासेमारांचा रोजगार ही बुडाला आहे. शनिवारी हा प्रकार घडला असून मंगळवारपर्यंत थिरूवनमियूर किनाऱ्यापर्यंत तेलाचा तवंग पसरला होता.


                                                                   

                                                                
इन्कॉईस, नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फर्मेशन सर्व्हिस  INCOIS (Indian National Center for Ocean Information Services), हैद्राबाद ही संस्था कोस्ट गार्डच्या सहाय्याने तेल गळतीचा आढावा घेत आहे.  तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहिती दिली की अंदाजे ७२ टन तेल सध्या एकत्रित केले आहे आणि तेल गळती ही पलावक्कमच्या जवळील वेट्टुवन्कणीच्या पुढे पर्य़ंत पसरली आहे. एन्नोरमधील २५०० मीटर्सचा परिसर हा बॅक्टेरियल औषधाच्या सहाय्याने तेलापासून प्रतिबंधित करण्यात आला आहे.

                                                                             
                                                                          
ह्या तेल गळतीच्या बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले.

ह्या आधी मुरगाव बंदरातील वेस्टर्न इंडिया शिपयार्डमध्ये सहारा इंडियाच्या ‘एमव्ही क्वींग’ या जहाजातून जुलै २०१६ मध्ये अशीच मोठ्या प्रमाणात तेल गळती झाली होती.  भारतीय तटरक्षक दलाचे ‘समुद्र प्रहरी’ या जहाजाने या तेल गळतीमुळे पसरत असलेला तेलाचा तवंग इतरत्र समुद्रात पसरू नये म्हणून वेस्टर्न इंडियाच्या धक्क्यापासून काही अंतरावर सभोवताली संरक्षक ‘बूम फोम’ सोडून तेल गळती न पसरण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते.

सिंगापूरहून जेद्दाहला जात असलेल्या ‘एमव्ही मोल कम्फोर्ट’ या जहाजाला  भारतीय सागरी हद्दीत येमेन येथे रात्री आग लागण्याची  दुर्घटना घडली होती. येमेन येथून २०० समुद्री मैल आणि मुंबईच्या पश्चिम समुद्र किना-यापासून ८४० समुद्री मैल अंतरावर १७ जून २०१३ रोजी भर समुद्रात या जहाजाचे दोन तुकडे झाले होते. या जहाजावर साडेचार हजार कंटेनर होते. यातील काही कंटेनरला रात्री भीषण आग लागली.आगीचे वाढते लोण आणि पसरलेल्या काळ्या धुरामुळे आग विझवताना व्यत्यय येत होता आणि त्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले नव्हते. त्या वेळी काही कंटेनर पाण्यात बुडून त्यामधील तेल समुद्रात पसरले होते ,ज्यामुळे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. पर्यावरणाची झालेली हानी भरुन काढण्यासाठीही बर्‍याच महिन्यांचा काळ लागला असे तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी सांगितले असल्याचे निदर्शास आले होते.

एम एस सी चित्रा ह्या व्यापारी जहाजाची एम व्ही खलिजा ३ ह्या जहाजाशी अरबी समुद्राच्या किनार्‍यापासून ५ नॉटिकल मैलाच्या परिसरात सकाळी ९.५० वाजता ०७ ऑगस्ट २०१० रोजी टक्कर होऊन प्रचंड मोठ्या प्रमाणावर तेल गळती झाली होती. याचा फार मोठा फटका येथील समुद्रातील जैवविविधतेला बसला होता आणि स्थानिक मासेमारांचा रोजगार बुडून फार मोठ्या आर्थिक फटका बसल्याच्या बातम्या आपण वाचल्या होत्या. १२०० कार्गो तेल वाहून नेणार्‍या चित्रा जहाजाचे सुमारे ३००-४०० कार्गो तेल समुद्रात सांडल्याने अरबी समुद्राच्या पृष्टभागावर तेलाचा तवंग पसरला होता आणि मुंबई, मुंबई उपनगरीय, ठाणे, रायगड ह्या ४ जिल्ह्यांतल्या ११० किलोमीटर किनारपट्टीचे खूप मोठे नुकसान झाले होते.

सागरी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी भारत सरकारने समुद्राच्या उच्चत्तम भरतीरेषेपासून 500 मीटरचा भूभाग ते 12 सागरी मैलापर्यंतचा भाग सीआरझेड 2011 कायद्याच्या नियंत्रणाखाली आणलेला आहे. सीआरझेड कायद्याचा उद्देश  चांगला असला, तरी  वरील तेल गळतीच्या बातम्या पहाता मोठय़ा जहाजांमधून होणारी तेल गळती आणि जहाजांची समुद्रातच होणारी साफसफाई यासारख्या समस्यांवर आपण आजवर प्रभावी उपाय योजना राबवू शकण्यास पाहिजे त्या प्रमाणात समर्थ नसल्यामुळे आपल्याला सागरी प्रदूषण ही आपत्ती आपल्याला वारंवार भेडसावत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मोठ्या तेलवाहू व्यापारी जहाजांचे अपघात व तेल वाहतूक करणाऱया जहाजांचे टँक धुण्यासाठी होत असलेला समुद्राचा वापरामुळे, परिणामस्वरूप  सागरी प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

                                                              
तेल वाहतूक करणाऱया जहाजांच्या अपघातांमधून उद्भवणार्‍या तेल गळतीच्या समस्येचा राक्षस  दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणावर आ वासून उभा ठाकत आहे . त्यामुळे सागरी प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. गेल्या सहा-सात वर्षांत पश्चिम किनाऱयावर जहाजांना मोठे अपघात झाले आहेत.  त्याचे विपरित परिणाम सागरी पर्यावरणावर झालेले आहेत.
Aerial View of Marina Beach
तेल गळती सोबत समुद्र हा डंपिंग ग्राऊंड म्हणून वापरला जात असल्याने अजूनही वेगळ्या प्रकारच्या सागरी प्रदूषणाचा धोका जास्तच बळावत चालल्याचेही चित्र सामोरी येत आहे. 


भारताचा समुद्र इतरांसाठी डंपिंग ग्राऊंड

इतर देश भारताच्या सागरी क्षेत्राचा डंपिंग ग्राऊंडसाठी सर्रास वापर करतात. त्यांना लगाम घालणे आवश्यक आहे. परदेशी जहाजांच्या अपघाताविषयी भारतामध्ये असाही एक मतप्रवाह आहे, की भंगारात आलेल्या जुनाट जहाजांच्या विल्हेवाटीचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, तेव्हा इतर राष्ट्र भारताच्या पश्चिम किनाऱयाचा वापर जहाज बुडविण्यासाठी करतात.

सागरी पर्यावरणावर विघातक परिणाम – डॉ. बबन इंगोळे

काही वर्षांपूर्वी गोवा येथील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. बबन इंगोळे यांनी आपले मत मांडताना तेल गळती, जहाजांचे अपघात व जहाजांची मोठय़ा प्रमाणावरील साफसफाई यामुळेच किनाऱयावर डांबरसदृश तवंगांची समस्या उद्भवते, याला ठामपणे दुजोरा दिला असल्याचे वाचनात आले होते.
आंतरराष्ट्रीय हद्दीत जरी परदेशी जहाजांचे टँक व इतर साफसफाई केली गेल्यास प्रवाहाबरोबर या सर्व तेलाच्या घटकांची समुद्रात घुसळण होऊन ते जवळच्या किनाऱयावर लागतात. सागरी पर्यावरण त्यामुळे धोक्यात आले आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जहाजांमधील तेल गळती व साफसफाईबाबत काही कडक निर्बंध लादून त्यांची ठोस अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. किनारा स्वच्छतेची जबाबदारी कोस्ट गार्ड व स्थानिक जिल्हा प्रशासनाची असल्याचे त्यांनी सांगितले होते.


एकूणच ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरची परिस्थिती पाहता, केंद्र सरकारने सागरी प्रदूषणाचा मुद्दा येणाऱया काळात गांभीर्याने घेतला तरच आपला तरणोपाय लागेलअसेच चित्र आजमितीस दिसत आहे.


संदर्भ  : १.  ७ ऑगस्ट २०१० रोजी एम एस सी चित्रा व एम व्ही खलिजिअ जहाज टक्कर त्यानंतरच्या सागरी पर्यावरणशास्त्र वर मुंबई बे तेल घातक रसायनांची अपघाती सांडून जाण्याची क्रिया प्रभाव वर अंतरिम अहवाल.
                  //www.mpcb.gov.in/marathi/oilSpill/oilSpill.php 

सूचना : हा लेख पहिल्यांदा "दैनिक प्रत्यक्ष" मध्ये ०७ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रकाशित झाला होता.
                                                                     

4 comments:

  1. Sea pollution going up day by day.no preventive measures being taken by anyone so far.the day is not too far when ecological balance will disturb n will result in subsequent elimination of many species from this earth permanently.
    really an eye opening article published by daily newspaper PRATYAKSHA.

    ReplyDelete
  2. हरि ओम साधारणता हमें ऐसा लगता है कि घर के बाहर हम कचरा फेंक देते हैं तो हमारा घर सुंदर हो साफ हो जाता है लेकिन सच बात तो यह है कि जैसे ही हवा का झोंका आएगा वैसे ही वह कचरा हमारे घर में आ जाएगा इसका मतलब हमारा घर साफ नहीं हुआ है।
    वैसे ही जब बड़ी फैक्ट्रीयां अपना कचरा और तेल वगैरह समुद्र में बहा देते हैं तब वह कचरा अपने आप समुद्री जीवो का जीना मुश्किल कर देता हैं ।
    समुद्री जीव जीवन के चक्र का एक अमूल्य भाग हैं ।
    जैसे ही जीवन के चक्र में कोई भी एक कड़ी टूट जाती है वैसे वह किसी ना किसी तरीके से हमारे जीवन पर बुरा असर करती है ।
    यह समझ कर हमें दूर तक सोचना चाहिए और समुद्री किनारे साफ रहे इसका ख्याल रखना चाहीए।
    इसलिए जो भी जरूरी नियम बनाने पड़े वह राष्ट्रीय हो या अंतर्राष्ट्रीय हो उसके लिए अवश्य बनाने चाहिए ।
    ओराई से कार्य करने वालों को कठोर से कठोर सजा होनी चाहिए ।
    यह लेख लिखकर सुनीता विरा आपने अपने समाज के प्रति जागरुकता दिखाई है ऐसे ही जागरुकता हम सभी देशवासियों के मन में जब जागेगी तब जरूर हमारे देश के कायदे भी अत्यंत जागरूकता से इन सब चीजों को रोकने मैं कामयाब होंगे ।
    हरि ओम श्री राम अम्बज्ञ ।

    --
    डॉ निशिकांत विभुते ।

    ReplyDelete
  3. Well Written..Today Sea pollution is at peak level and no nation would want to take it seriously..extreme steps are expected to protect natural resources and mother earth for our future..if mother future is protected then only mankind can survive..its each individual's accountability..

    Thanks
    Shyamkant

    ReplyDelete
  4. Marine pollution challenge for us today & tomorrow.Nicely illustrated.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog