Wednesday 6 July 2016

ऑपरेशन जल- राहत


आज पहिल्यांदा टेलिव्हीजन वरील बातमी पाहून आपला भारत देश आपत्ती निवारणासाठी उच्च तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करताना पाहून उर अभिमानाने भरून आला. तसा आपला भारत देश हा सतत दुष्काळ, पूर ह्या नैसर्गिक आपत्तींचे तडाखे सोसत असतो. परंतु तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापराच्या अभावी मदत आणि बचाव कार्य पार पडताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे आणि परिणामी होणारी मनुष्यहानी, वित्तहानी ह्यांची आकडेवारी मनाला चटका लावून जात असे.   
     
आपल्या भारत देशात पूराच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी व मदत आणि बचाव कार्य   प्रभावीपणे पार पाडण्याकरीता प्रथमच भूदल , नौदल , वायुदल , अशा तीन्ही सेना  आणि एनडीआरएफ़ आणि एसडीआरएफ़ ह्या संस्था सुसंघटीत झाल्या आणि "ऑपरेशन जल- राहत " आसाम येथील गुवहाटी येथील ब्रम्हपुत्रा नदीच्या किनार्‍यावर प्रथम खेपेस  यशस्वी रीत्या पार पाडण्यात आले. ह्या मागे अर्थातच आपल्या पंतप्रधान नरेंद मोदीजी ह्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 

वास्तविक पहाता डिसेंबर २०१५ मध्ये कंबाइंड कमांडर कॉन्फरन्स मध्ये पंतप्रधान नरेंद मोदीजी ह्यांनी आपत्ती निवारणाचे मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी तीन सेनांनी सुसंघटीत होऊन  एकत्रित प्रयास करावे ह्या विषयी सूतोवाच केले होते. त्यावेळी पंतप्रधानानी भूदल, नौदल आणि वायुदल अशा तीन सेना आणि बाकी इतर एंजसींनी आपापसात सुसूत्रीकरण करून मदत आणि बचाव कार्याचे आयोजन करावे ह्यावर अधिक भर दिला होता. पूरामुळे दरवर्षी सुमारे अडीच लाख लोकांना झळ पोहचते आणि त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यास आणि सराव आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ मदतीचा हात देऊ शकेल असा अंदाज वर्तविण्यात  आला होता. सेनेच्या हार्न डिव्हीजनचे मेजर जनरल राजीव सिरोही ह्यांच्या मते "ऑपरेशन जल राहत " मध्ये तीन सेनांनी एकत्रित येऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.ह्या ऑपरेशन दरम्यान चिता हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तर त्याच बरोबरीने भारतीय वायुसेनेच्या "एम आई १७ : हेलिकॉप्टरच्या वापराने पूराच्या प्रभावाखाली असलेल्या पोहचण्यास  दुर्गम अशा  भागात जाऊन वैद्यकीय मदत देऊन सुटका करणे, बचाव करणे शक्य झाले आणि सोबत बचाव पुरवठा साहित्य पोहचविणे सुध्दा सुकर झाले. ह्या संपूर्ण बचाव कार्यात तीन सेनांबरोबर एनडीआरएफच्या तीन युनिट आणि आसाम   एसडीआरएफच्या टीमही सहभागी झाल्या आहेत. 

अशा प्रकारच्या सरावाने आपण नक्कीच निसर्गाच्या प्रकोपाला सुसंघटीतपणे ,सशक्त सबल होऊन सामोरे जाऊ शकतो ह्याची अनूभूती मिळाली आहे.  

मदत आणि बचाव कार्य कशा प्रकारे पार पाडण्यात आले हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडीओ पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=jisouq7iaiI


3 comments:

  1. Sunita very unique article..and much needed to know the efforts of Modi govt and offcourse our Jawans from all 3 fronts.
    Thanks a lot for the article.
    सीमेवर शत्रूशी लढणारे व आपत्तींतुन सामान्य माणसाना वाचवणारे जवान असतातच पण तुझ्या लेखणीची ताकद पाहुन तूही आमचे राष्ट्रप्रेम जागवलेस , अप्रतिम लेख

    ReplyDelete
  2. Ambadnya. खूपच छान माहिती आणि video.

    ReplyDelete
  3. We are really proud of our respected Prime Minister who has vision and action .
    Thanks a lot Suneetaveera for such a wonderful article .
    Ambadnya.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog