Saturday 4 March 2017

जैविक दहशतवादाची टांगती तलवार?

दिनांक २१ फेब्रुवारी २०१७ च्या दैनिक प्रत्यक्ष मधील एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले होते . ती बातमी होती जगविख्यात ’मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे प्रमुख बिल गेट्स यांनी दिलेला इशारा - जैविक दहशतवाद तीन कोटींचे बळी घेईल ! सिरीयामध्ये गेल्या ६ वर्षांपासून  सुरु असलेल्या संघर्षात सुमारे ४ लाख जणांचा बळी गेला असून सर्व जगभरातून सिरीयातील परिस्ठितीवर चिंता व्यक्त केली जाते. मात्र सिरीयापेक्षाही भीषण अरिष्ट जगावर कोसळणार असल्याचा दावा बिल गेट्स ह्यांनी केला.

जर्मनीच्या म्युनिक शहरात आयोजित करण्यात आलेल्या ’म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स ’ येथे आमंत्रित केल्या गेलेल्या जगभरातील प्रमुख देशांतील नेते , अधिकारी तसेच व्यापारी व उद्योजक वर्गातील प्रभावी व्यक्तींच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बिल गेट्स यांनी जागतिक सुरक्षेला दहशतवाद्यांपासून असलेल्या धोक्यासंबंधी उहापोह केला. पुढे त्यांनी दहशतवाद्यांचा जैव हल्ला हा अण्विकयुध्द आणि हवामानबदलाच्या परिणामांपेक्षाही अधिक धोकादायक असेल असा इशाराही दिला होता.

ह्यावरून जैविक दहशतवाद (biological terrorism) हा किती भयावह असू शकतो ह्याचे विदारक चित्र नजरेसमोर तरळून गेले आणि त्याचे गांभीर्य , होणारे तात्कालीन व दूरगामी  दुष्परिणाम ह्याच्या संभाव्य जाणीवेने मन अधिकच कातर झाले.

जैविक शस्त्रे अनेक पातळ्यांवर हानिकारक ठरू शकतात . श्वसनातून मानवाच्या शरीरात गेल्यास ही जैविक शस्त्रे बर्‍याच प्रमाणावर हानी करतात वा मृत्युदेखिल घडवून  आणू शकतात. त्वचेच्या संपर्कात आल्याने किंवा अन्नपदार्थातून शरीरात गेल्याने या शस्त्रांचा परिणाम दिसून येतो. ह्या शस्त्रांनी मानवांना, प्राण्यांना आणि वनस्पतींना देखिल हानी होऊ  शकते.



जैविक शस्त्रे सैन्याचे तळ किंवा निर्वासित छावण्यांवरही वापरली जातात व ती वापरण्यामागे शत्रूचा उद्देश्य पिकांवर व गुराढोरांवर हल्ला करून , अन्नधान्याच्या साठ्यात कमतरता आणणे, लोकवस्त्यांवर हल्ला करणे, माणसांचे मानसिक धैर्य कमकुवत करणे व त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण करणे हा असतो.

जैविक दहशतवादाच्या आपत्तीचं असं हे भीतीदायक वास्तव आपल्या समोर खडे ठाकले आहे.


सूचना : हा लेख पहिल्यांदा दिनांक ०४ -०३ -२०१७ च्या " दैनिक प्रत्यक्ष " मध्ये व्यासपीठ ह्या सदरात प्रकाशित झाला होता.   


2 comments:

  1. Biological terrorism is a threat to the mankind all over the world.Our water reservoirs , army camps, food storages would be soft targets .Biological weapons result in max destruction at min cost n resources.
    Daily news paper PRATYAKSHA , apolitical newspaper has been covering these issues n many other international news since long n it's helping, updating n guiding its readers by taking lots of efforts .
    many thanks to daily PRATYAKSHA.

    ReplyDelete
  2. Yes, as the third world war progresses into second phase , the biological warfare would most likely start. Because the main advantage of bio war is that the initiator can not be traced easily and remains safe from counter attack.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog